मारेगाव नगरपंचायतला ६१ लाखांचा निधी..!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : सामाजिक विकास योजनेअंतर्गत मारेगाव नगरपंचायतसाठी ६१ लाखाचा निधी मंजूर झाला असून शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाला पुस्तके आणि फर्निचर साठी नगरसेवक शंकर मडाविंनी शासनदरबारी नेहमीच पाठपुरावा केला. त्याची प्रशासकीय मान्यता आणि निधी वितरण आदेश दिनांक १७ जुलै २०२३ रोजी प्राप्त झाले. शंकरावांच्या प्रयत्नातून तब्बल ६१ लक्ष निधी मंजूर करण्यात आला.

केवळ निधी मंजूर करून घेण्यावर नगरसेवक शंकर मडावी थांबल्या नाहीत तर त्या कामांची प्रत्यक्ष अंमलबजावणी नगरसेवक मडाविंनी प्रशासकीय मान्यता करून घेतली.  मारेगाव शहरातील विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी सर्व सोयीसुविधा पूर्ण अशी सुसज्ज ग्रंथालयाची प्रभाग क्रमांक १७ यमध्ये तयार आहे. स्वीकृत नगरसेवक शंकर मडावी 
यांच्या प्रयत्नातून मारेगाव तालुक्यासाठी सामाजिक विकास योजनेमधून नगरपंचायतला भरगोस निधी वाट्याला आला..!

तसेच येणाऱ्या काळात मारेगाव शहरात बिरसा मुंडा सांस्कृतिक सभागृहासाठी लवकरच निधी प्राप्त होणार आहे. त्याकरिता नगरपंचायत कडून जागा सुद्धा प्राप्त झाली असून यापुढेही अजून मोठ्या प्रमाणात शासनाकडून विविध योजेनेतून निधी तालुक्यासाठी आणला जाईल असे, नगरसेवक तथा काँग्रेस अध्यक्ष शहर शंकर मडावी यांनी सांगितले.

मारेगाव येथे गुणवंत विद्यार्थी गुण गौरव सोहळ्याचे आयोजन


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : सावित्रीबाई फुले गुणगौरव समितीच्या वतीने मारेगाव तालुक्यातील 10 वी व 12 वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सोमवार दि.31 जुलै 2023 रोजी येथील शेतकरी सुविधा केंद्रात आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून मा.श्री.न्याय. निलेश वासाडे न्यायाधीश दिवाणी व फौजदारी न्यायलाय, मारेगाव हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुंभा येथील सरपंच अरविंद ठाकरे राहणार आहे. या सोहळ्याचे उदघाट्न वर्धमान फाउंडेशन वणीचे अध्यक्ष तथा बुलढाणा अर्बन को. आप्रेटिव्ह सोसायटीचे डायरेक्टर विजय चोरडिया करणार आहे. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून पेसा समिती अध्यक्ष भैय्याजी कनाके पहापळ, हे राहणार आहे. प्रमुख मार्गदर्शक म्हणून उत्तम निलावाड, तहसीलदार मारेगाव, जनार्दन खंडेराव, ठाणेदार मारेगाव, पद्माकर मडावी बिडीओ, मारेगाव, शंकर हटकर वन परीक्षेत्राधिकारी, मारेगाव, सुनील निकाळजे तालुका कृषी अधिकारी, मारेगाव, नरेंद्र कांडुरवार गट शिक्षणाधिकारी, मारेगाव, प्रा. हेमंत चौधरी, शैलेंद्रकुमार पाटील अभियंता विद्युत मारेगाव, अर्चना देठे तालुका आरोग्य अधिकारी, मारेगाव, दिपक कळमणकर, विस्तार अधिकारी, म. बा.कल्याण मारेगाव, पुंडलिक काका साठे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ता हे करणार आहे. 
गुणगौरव समितीने प्रथमच एक चांगला भारतीय नागरिक घडावा व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि त्याचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी झाला पाहिजे,यासाठी विद्यार्थी गुणगौरव घेण्यात येत आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीस योग्य दिशा मिळावी असा 
 गुणगौरव समितीचा मानस आहे. या कार्यक्रमात तालुक्यातील "विशेष कार्य गौरव" सुद्धा करण्यात येत आहे. या सोहळ्याला तालुक्यातील सर्व विद्यार्थी,पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सावित्रीबाई फुले गुणगौरव समितीच्या अध्यक्षा सौ. प्रतिभा तातेड यांनी केले आहे.

बेंबळा कालव्याच्या पाण्यामुळे शेती पिकांचे नुकसान

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : गट ग्रामपंचायत सिंदी-महागाव व रामेश्वर परिसरात जुलै शेवट च्या पावसाने तुंबलेल्या बेंबळा प्रकल्पाचे पाणी विसर्ग होऊन शेती सह घरात शिरले. यात नागरिकांच्या जीवनाश्यक वस्तू सह महत्वाचे कागदपत्राचे नुकसान झाले आहे. ही नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
संततधार पावसाने कालव्याचे विसर्ग होऊन अनेकांच्या घरात शिरले. या भागात जुलैच्या पावसाने अतोनात नुकसान झाले असून, घरात पाणी शिरण्याचे प्रकार दरवर्षी वाढलेले आहेत. या भागातील पावसाळी व बेंबळा प्रकल्प कालव्याचे वाहिन्या रामेश्वर गावाच्या दिशेने वळविल्याने, कालव्याचे वारंवार पाणी गावात घरात शिरून अतोनात नुकसान होत असल्याचे तक्रारी येथील नुकसान ग्रस्त तथा नागरिकांच्या आहे. याबाबत ग्रामस्थांनी संबंधितांना सुचना व लेखी पाठपुरावा करण्यात आला. परंतु याकडे दुर्लक्ष करित असल्याचा आरोपी स्थानिक गावाकऱ्यांनी केला असून, मोठे नुकसान होत असल्याची ग्रामसमस्या सरपंचा निलिमा थेरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपसरपंच अविनाश लांबट यांच्या उपस्थितीत तहसीलदार निलावाड यांना निवेदनातून मांडली.
परिसरात अनेक वर्षापासून बेंबळा प्रकल्पाचे कामे होत आहेत, पण एकही पावसाळा असे नाही की, घरात शेतात पाणी शिरले नाही. त्यामुळे पिकांचे व घरातील आवश्यक वस्तुचे मोठे नुकसान होत आहे. परिणामी प्रशासनाने नुकसान ग्रस्त शेतकरी, तथा मोल मजुरी करणाऱ्या नुकसानग्रस्ताच्या होत असलेल्या नुकसानीचे निवारण तातडीने करावे अशी आग्रही मागणी गट ग्रामपंचायत सिंदी,महागांव व रामेश्वर येथील सरपंचा सौ थेरे यांचे मार्गदर्शनात ग्रामस्थांनी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी उपसरपंच अविनाश भाऊ लांबट, आशिष खंडाळकर, चंद्रशेखर थेरे, विनोद चहानकर, चंद्रभान बेसेकर, राजू लांडे, संजय देवाळकर, मारोती उरकुडे, दिलीप ताजणे, विनोद एकरे, प्रफुल उरकुडे, प्रफुल पाटील आदींची उपस्थिती होती. 

शेतकऱ्यांच्या खात्यात 14 व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा, पैसे आले नसतील तर 'या' ठिकाणी साधा संपर्क...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

राजस्थान राज्यातील सिकर या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये पाठवणार असल्याचे सांगितले आहे व यांनी पंतप्रधान किसन सन्मानिधीचा 14 वा हप्ता जारी केला आहे. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून दोन लाख 60 हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवण्यात आले आहेत.

तुमच्या खात्यात पैसे आले की नाही असे तपासा...
 रजिस्टर मोबाईल नंबरवर आलेला संदेश तपासा- पीएम किसानचा चौदावा हप्ता जारी झाल्यानंतर योजनेत नोंदणी केलेला मोबाईल नंबर वर खात्यात आलेले दोन हजार रुपये हस्तांतरित केल्याचा संदेश आलेला असेल तो तपासणे गरजेचे आहे.

खाते बॅलन्स तपासा- समजा तुमच्या मोबाईलवर जर मेसेज आला नसेल तर तुम्ही काही काळ वाट पाहू शकतात. परंतु बऱ्याच कालावधीनंतर देखील संदेश आला नाहीतर तुम्ही एटीएम मध्ये जाऊन मिनी स्टेटमेंट काढू शकता किंवा तुमच्या खात्याचा बॅलन्स चेक करू शकतात. तसेच बँकेत जाऊन पासबुक मध्ये एन्ट्री करून देखील तुमच्या खात्यात दोन हजार रुपये आले की नाही हे तुम्ही तपासू शकतात.

नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून तपासा- जर तुम्ही नेट बँकिंग ची सुविधा वापरत असाल तर तुम्ही तुमच्या खात्यातील शिल्लक किंवा तुमच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झाली की नाही हे नेट बँकिंग च्या साह्याने ऑनलाईन देखील तपासू शकतात. तसेच तुमच्या बँकेच्या मिस्ड कॉल नंबर वर देखील मिस्ड कॉल देऊन तुमच्या खात्यातील बॅलन्स जाणून घेऊ शकतात.

तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधा...!

जर बऱ्याच कालावधीनंतर तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत तर तुम्ही खालील पी एम किसान हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधू शकता.

➢ पी.एम. किसान टोलफ्री नंबर- 18001155266

➢ पी.एम. किसान नवीन हेल्पलाइन- 011-2430060

➢ पी.एम.किसान लँडलाईन नंबर- 011-23381092, 23382401

➢ पी.एम. किसान हेल्पलाइन नंबर- 155261


डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी १० ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : अल्पसंख्याक विकास विभागाकडून डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना" सन २०२३-२४ मध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मदरसांनी जिल्हाधिकारी कार्यालयात १० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मुंबई जिल्हा नियोजन अधिकारी यांनी केले आहे.

राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत व मुंबई शहर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील मदरसांनी विहित अटी व शर्तींची पूर्तता करुन विहित नमुन्यातील अर्जाचा परिपूर्ण प्रस्ताव, जिल्हाधिकारी, मुंबई शहर, जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई ४००००१ यांच्याकडे तत्काळ सादर करावा. विहित अर्जाचा नमुना https://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी ०२२-२२६६०९६७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनास प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट, २०२३ पर्यंत असल्याचे पत्रकात म्हटले आहे.