मारेगाव येथील रक्तदान शिबीर संपन्न

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर भव्य रक्तदान शिबीर साई मित्र परिवार व वसंतराव नाईक शासकीय रक्त पेढी यवतमाळ, यांच्या संयुक्त विद्यमाने आज, २ जुलै ला सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
जगन्नाथ महाराज मंदीर (राष्ट्रीय विद्यालय मारेगाव) येथील भव्य पटांगणात होणाऱ्या या रक्तदान शिबिरास साई मित्र परिवार, मारेगाव च्या वतीने आयोजित करण्यात आले.  जिल्ह्यात रक्त पिशव्याची गरज आहे. परंतु त्यामानाने रक्त  पुरवठा पाहिजे तसा होत नसल्याने आज, रविवारी संपन्न झालेल्या शिबिरात एकशे सहा रक्त पिशव्या गोळा झाल्या आहे. थॅलेसेमिया, सिकलसेल, कर्करोग, डेंग्यू रुग्णांकरिता रक्ताची मोठी आवश्यकता असते. परिणामी दरवर्षी रक्तदान शिबीर सामाजिक उपक्रम राबविण्यात येते.
रक्तदान हेच श्रेष्ठ दान असं म्हटलं जात त्या अनुषंगाने साई मित्र परिवाराच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सव २०२३ आयोजित दोन दिवशीय हा महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो, त्यात मुख्यता 'भव्य रक्तदान शिबीर' उपक्रम राबविण्यात येतो या वर्षी सुद्धा या शिबिरात जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान केले, अशी माहिती साई मित्र परिवाराच्या वतीने देण्यात आली.
सोबतच आज सायंकाळी ७ वाजता सोपानदादा कनेरकर यांचे जाहीर व्याख्यान होणार आहे. या होणाऱ्या  व्याख्यानाला तालुक्यातील जनतेनी हजर राहून लाभ घ्यावा. तसेच उद्या 3 जुलै ला महाप्रसाद (३ ते ५ पर्यंत) व भव्य शोभायात्रा (५ वा.) चे सायंकाळ'ला आयोजन केले आहे,  यात्रेत शहरातील भाविक भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन साई मित्र परिवार, मारेगाव च्या वतीने करण्यात येत आहे.

राजकीय भूकंप : अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप घडला आहे. राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपालांना भेटून त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर आज मंत्रिमंडळाचा दुसरा शपथविधी झाला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनात अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेना आणि भाजपचे नेते व मंत्री राजभवनात उपस्थित आहेत. आज अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी उत्सुक असल्याचं बोललं जात होतं. त्यासाठी अजित पवार आपल्या समर्थक आमदारांच्या वतीने पक्षावर दबाव टाकत होते, अशीही चर्चा सुरू होती. यानंतर आज अचानक अजित पवार राजभवनावर दाखल झाले आणि त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्याला आता दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत.
अजित पवार सोबत 40 पेक्षा अधिक आमदार
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, याला राजकीय भूकंप म्हणण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अजित पवार आणि 40 पेक्षा अधिक आमदार देशासाठी, महाराष्ट्राच्या कल्याणासाठी एकत्र येत असतील तर ते महत्त्वाचं आहे. मोदींनी जो संकल्प केला आहे त्याला साथ देण्यासाठी अजित पवार आणि सर्व लोक आले आहेत.
त्यांचं मी अभिनंदन करतो, असे बावनकुळे म्हणाले.

आयुष गाडगेंनी सांगितला समृद्धी महामार्गवरील थक्क करणारा "तो" भीषण अपघात..

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल

मारेगाव : असं म्हणतात, "काळ आला होता पण आली नव्हती"...काल झालेल्या समृद्धी महामार्गांवरील अपघातात जवळपास तीस जणांच्या वर जळून कोळसा झालेला आहे परंतु यात सात लोकांना जीवदान मिळाल्याचे माहिती समोर आली.

यात सुदैवाने बचावलेला आयुष अनिल गाडगे रा. हिवरा (ता.मारेगाव) हा सुद्धा नागपूर वरून या लक्झरी बसने प्रवास करित होता. त्याने माध्यमांना साधलेला संवाद...त्याने सांगितले संपूर्ण घटनेचा दुर्दैवी प्रवास. तो म्हणाला की, मी बुट्टीबोरी वरून बसलो होतो, शहराच्या बाहेर निघून अंदाजे एक ते दिड वाजले होते. तो झोपलेला होता, त्याच्या अंगावर दोन लोक पडलेले होती. लोक त्याच्या अंगावर पडून असल्याने त्याला जाग आली. तो तिथेच उभा झाला आणि त्याला एक उघडी काच दिसली. त्याला फोडणं आणि बाहेर एक एक पडणं सुरु केले. ज्या खिडकीतून आयुष बाहेर पडला त्यावेळी त्या खिडकीतून त्याच्या अगोदर एक नंतर तो आणि आणखी एक असे दिघे जन बाहेर निघाले,असं तो म्हणाला...
नेमकं काय झाले, कसा अपघात घडला असं जेव्हा त्याला विचारण्यात आले, तेव्हा त्याने सांगितले की, मी तसा झोपलेला होतो, माझ्या अंगावर तीन चार लोक पडलेले, आवज वैगेरे खूप चालू होता. दरम्यान, काहीच कळत नव्हतं. मात्र जो काच त्याला दिसला त्या खिडकीमधून तो बाहेर पडला. ती एकच खिडकी दिसत होती, मधातलं एटी पर्सेंट सर्व जळालं होतं. मी तिथून जसं बाहेर निघालो तस त्याचं ठिकाणी एका मिनिटात आग लागली, असं त्यानं सांगितले.
अपघात घडला तेव्हा त्यांच्या मदतीला कोणी आले होतं का? त्यावर त्याने म्हटलं की, पोलिसांना कोणी तरी माहिती दिली, त्यावेळी तिथे  खूप कमी लोक होते. मदतीला माझे मित्र होते. कारण ते सुद्धा दुसऱ्या ट्रॅव्हल्सने प्रवास करित होते. त्यांच्यात आणि माझ्या गाडीत वीस पंचवीस मिनिटाचे अंतर होते. ते पण तिथे आले, पोलीस पण तिथे आले होते.
या घटनेबाबत मित्रांना त्याने कळवले कसे जेव्हा त्याला विचारण्यात आले, तेव्हा त्याने सांगितल की, मी बुट्टीबोरी वरून गाडीत बसलो होतो आणि माझे तीन मित्र वणी (यवतमाळ) वरून बसले होते. "आम्ही सुरुवातीला चारही सोबत निघणार होतो,पण वेळेवर प्लॅन चेंज झाला आणि मी एकटा बुट्टीबोरी वरून निघालो.आणि ते तिघे वणी वरून निघाले. आयुषला माहित होतं की त्याच्या मित्राची ट्रॅव्हल्स त्याच्या गाडीच्या मागे आहे. दरम्यान ते एकमेकांना बोलतच होते, की माझी गाडी या ठिकाणी थांबली, त्या ठिकाणी थांबली आहे. असं त्यांच्यात संभाषण चालूच होते. पुढे सिंधखेड राजा येथे ट्रॅव्हल्स थांबली तिथे जेवण केलं आणि प्रवासात झोप लागली. मग जसं अपघात झाला, तो बाहेर पडला त्या नंतर एक ट्रॅव्हल्स आली. त्यावेळी तो तीस नंबर च्या सर्वात मागच्या सिंगल शीटवर वर बसला होता, त्याने मागून आलेली पर्पल ट्रॅव्हल्स ला विचारलं की, माझे मित्र या गाडी मध्ये आहे. तर गाडीवाल्याने त्याला सांगितलं की वणीची ट्रॅव्हल्स मागे आहे. वीस ते पंचवीस मिनिट लागतील. तेव्हा त्याला वाहन चालकाला कॉल करून सिचव्हेशन सांगितले की,ते आले आणि मग त्या ट्रॅव्हल्स ने आयुष पुढे मार्गस्थ झाला.
अपघात झाला तेव्हा तो बाहेर निघाला आणखी दोन लोक बाहेर पडली, त्यावेळी कितीवेळात त्याला मदत मिळाली, जसं की, हायवे पोलीस, फायरब्रिगेड किंवा वैद्यकीय, पोलीस मदत किती वेळात मदत मिळाली,असं जेव्हा त्याला विचारण्यात आले तेव्हा त्याने म्हटलं की, ते सांगता येणार नाही पण मी बाहेर पडलो, वीस पंचवीस मिनिटांनी मागील ट्रॅव्हल्स ने त्याचे मित्र आले. जे बाहेर निघाले त्यांना थोडा थोडा मार लागला होता, मला हाताला थोडंस रक्तान भरलेलं होतं, थोडा फार मार लागला असला तरी त्यावेळी ते फार काही जाणवत नव्हतं, मग त्याचे मित्र आले. पोलिसांना सांगितले की मी परस्पर जात आहे. मग मी त्यांच्या ट्रॅव्हल्सने संभाजीनगर ला निघून गेलो असं त्याने सांगितले.
या धक्कादायक घटनेनंतर ज्या ठिकाणी पोहचला तिकडे आयुष ने उपचार करून घेतला होता, त्यानं अगोदर म्हणजे सकाळी पाच वाजता घरच्यांना कॉल करून सांगितले होतं की मी ठिक आहे. कारण त्याने न्यूज वर बघतील होतं की, मिसिंग वैगेरे.. मात्र अगोदरच घरच्यांना सुखरूप असल्याची माहिती दिली.

पुण्याला फिरायला निघालेल्या आयुष सोबत त्याचे तीन मित्र सुद्धा होते, फक्त फरक एवढाच होता की, त्याचे मित्र दुसऱ्या ट्रॅव्हल्सने मागून येत होते. अपघात झाल्यावर ते ही तिथे पोहचले होते. त्यांनी देखील या भीषण अपघाताबाबत आपली मत व्यक्त केली. बोलतांना मित्र एवढंच सांगत होते की,काही सुचत नव्हतं, संपूर्ण ट्रॅव्हल्स बेचिराख झाली होती, सर्वत्र मृतदेहाचे सापळे पडले,आम्ही आयुष ला शोधत होतो. मग तो दिसला आम्हाला समाधान मिळालं, त्याला बघितल्यावर जोराने मिठी मारली आणि पुढे संभाजीनगर ला अश्रू नयनांनी निघून गेलो, असं त्यांनी माध्यमांना सांगितल.
या भीषण अपघातातून आयुष वाचला, तो या प्रवासातून नशीबवान ठरला आहे.खरं तर काच फोडून तो बाहेर पडला.त्याच्या दोन्ही हाताला किरकोळ जखम झाली. त्याने आपल्या सोबत दोन लोकांना बाहेर काढलं, मात्र शेवटी आयुष म्हणाला की, आम्ही सर्व एकमेकांच्या सपोर्टने बाहेर निघालो... एवढच...!! या अपघातांनंतर ते पुढील प्रवास करित,मात्र बाकी पंचवीस जणांचा कोळसा झाला.. 

शोधण्या अस्तित्व माझे.... पवन कुसुंदल यांचे शब्दात

     
                      शोधण्या अस्तित्व माझे

शोधण्या अस्तित्व माझे
कोण मी? आलो कशाला?
मानवाचा जन्म माझा
धर्म मानवतेचा मिळाला...
नम्रता अन् क्षमाभाव हे
नीज अंतरी माझ्या स्थिरावे
सत्कर्म करण्या बळ मिळावे
ठायी केवळ शून्य उरावे...
उपदेशाचे बोल नको 
निजकर्मातून जीवन घडू दे
या मनाच्या धरतीवरती
बंधुभावाचे बीज पडू दे
मी पणा अन् गर्व सारा
संपूनिया पूर्णत्व यावे
सेवा घडावी सदा या हस्ते
इतुके मज ममत्व द्यावे
अर्त माझी हाक तुजला
एकुनी वरदान दे
ज्यांच्या मुळे घडले हे जिवन
त्यांच्या चरणी स्थान दे

सकाळी उठल्या उठल्या मूठभर चणे आणि गूळ खा; 5 आजार राहतील लांब...!!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

आरोग्य उत्तम राहण्यासाठी नियमित व्यायाम व योग्य आहाराचे सेवन करणे गरजेचं आहे. आजकालच्या बैठी जीवनशैली व लोकांच्या आळशीपणामुळे लोकांमध्ये पूर्वीसारखी उर्जा व ताकद राहिलेली नाही. लगेचच थकवा येतो. थोडं काम केल्यानंतर थकवा का येतो? थकवा घालवण्यासाठी आपण चणे व गुळाचे सेवन करू शकता. चणे कॅल्शियम आणि फायबरने समृद्ध असतात, तर गूळ लोह आणि पोटॅशियमसारख्या घटकांचा उत्तम स्रोत मानला जातो. तज्ज्ञांच्या मते, या दोन गोष्टींच्या नियमित सेवनाने अनेक आजार टाळता येतात.
जाणून घ्या गुळ-चणे खाण्याचे ५ भन्नाट फायदे..

हाडे मजबूत होतात
शरीरातील हाडे मजबूत करण्यासाठी गुळ आणि चणे खाण्याचा सल्ला मिळतो. चण्यामध्ये आढळणारे कॅल्शियम हाडे मजबूत करण्यास मदत करतात. तिशीत हाडे ठिसूळ होतात, असे होऊ नये म्हणून गुळ - चणे खा. याचे नियमित सेवन केल्याने हाडांसह इतरही आजार दूर होतात.
हृदय निरोगी राहते
हृदय निरोगी ठेवण्यासाठी गुळ-चणे उपयुक्त ठरते. गुळ-चण्यामध्ये आढळणारे पोषक तत्व हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी करतात. तज्ज्ञही ते खाण्याचा सल्ला देतात.
वजन कमी करते
चण्यामध्ये प्रोटीन आढळते. गुळ - चणे खाल्ल्याने पोट भरलेले राहते. ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. आपण सकाळी गुळ - चणा खाऊ शकता.
पचनशक्ती वाढवते
चणे आणि गूळ पचनशक्ती निरोगी ठेवण्यास मदत करते. या दोन गोष्टी खाल्ल्याने पोटाला आराम मिळतो. या दोन्ही गोष्टी समान प्रमाणात खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
ॲनिमियावर उपाय
अनेक समस्यांमुळे शरीरात रक्ताची कमतरता भासू शकते. अशा परिस्थितीत नियमित चणे आणि गुळ खा. चणे आणि गुळामध्ये लोह पुरेशा प्रमाणात आढळते. ज्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते.