०१ जुलै महाराष्ट्र कृषी दिननिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!


                      ०१ जुलै महाराष्ट्र कृषी दिन


महाराष्ट्रात दरवर्षी १ जुलै हा दिवस 'महाराष्ट्र कृषी दिन' म्हणून साजरा केला जातो. कृषीप्रधान भारत म्हणून ओळखले जाणाऱ्या देशात कृषीसंस्कृतीचे स्मरण आणि शेतकरी कृतज्ञतेचा प्रतिक म्हणून या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे.

या अनुषंगाने कृषी दिनानिमीत्य व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमीत्य सर्व तालुका वासीयांना कृषी दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...! 
बळीराजाचे राज्य येऊ दे 
खरीप हंगामाच्या शुभेच्छा.. भरपूर पाऊस येऊ दे... 

शुभेच्छुक :- प्रसाद सुधाकर ढवस
आत्मा समिती अध्यक्ष मारेगाव तालुका

बळीराजा तुझ्यासाठी..!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारला एक वर्ष पूर्ण होत असताना आषाढी एकादशी निमित्ताने त्यांनी पांडुरंगाचरणी नतमस्तक होत राज्यातील शेतकऱ्यांसह सर्व घटकांना सुखी, समृद्धी करण्याचे साकडे घातले. बळीराजा संपन्न व्हावा, त्याची संकटे दूर व्हावीत हीच भावना शासनाची असल्याचे त्यातून दिसून आले. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गेल्या वर्षभरात शासनाने तसे निर्णयही घेतले आहेत.
‘सततचा पाऊस’ ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित करुन शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सततच्या पावसाचा दुसरा ट्रीगर लागू झालेल्या महसूल मंडळातील बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण करुन पंचनामा करण्यात येईल आणि 33 टक्के पेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झाले असल्यास मदत देण्यात येणार आहे. बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 1 हजार 500 कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना 7 हजार 93 कोटी 19 लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या मदतीच्या दुप्पट रक्कम आणि दोनऐवजी तीन हेक्टर मर्यादेत मदत देण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेत राज्यातर्फे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याने केंद्र आणि राज्याचे मिळून आता शेतकऱ्यांना दरवर्षी 12 हजार रुपये मिळणार आहेत. राज्यातील सुमारे 1 कोटीपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना यांचा लाभ होणार आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत राज्य शासनाने सुरू असलेल्या खरीप हंगामात केवळ 1 रुपये भरुन पीक विम्याचा लाभ देण्याकरिता ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यास त्यामुळे मदत होणार आहे. शेतकऱ्यांच्या पीक विमा हप्त्याचे 3 हजार 312 कोटी रुपये सरकार भरणार आहे.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी 2017-18, 2018-19 आणि 2019-20 हा कालावधी विचारात घेऊन या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित पूर्ण परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. केवळ निर्णयच नाही तर प्रत्यक्षात कार्यवाही करून 12 लाख 84 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 4 हजार 683 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले.

शेतीला दिवसा वीजपुरवठ्यासाठी 3 वर्षांत 30 टक्के कृषि वीजवाहिन्यांचे सौर उर्जीकरण करण्यात येणार आहे. याचा लाभ 9 लाख 50 हजार शेतकऱ्यांना होणार असून शेतीसाठी दिवसा 12 तास वीज उपलब्ध होऊ शकेल. जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यात 20 हजार गावात 6 लाख संरचना तयार होऊन गावे जलयुक्त झाली होती. हे अभियान 5 हजार गावात परत सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील गावे पुन्हा जलसमृद्ध होण्यास मदत होणार आहे.
सिंचन विकासासाठी जलसंपदा प्रकल्पांना वेग देण्यात येत आहे. आजतागायत 29 प्रकल्पांना सुधारित मान्यता देण्यात आली. त्यामुळे 6 लाख 50 हजार हेक्टर जमीन सिंचीत होणार आहे. शेतजमिनीच्या ताब्यावरून वाद मिटवणारी सलोखा योजनादेखील सुरू करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त ‘श्रीअन्न अभियान’ अंतर्गत 200 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

शेतीसाठी शासनाने घेतलेल्या या गतीमान निर्णयांमुळे शेतकऱ्यांना संकटकाळात दिलासा मिळण्यासोबत शेतीचे उत्पादन वाढवून आर्थिक स्थैर्यासाठीदेखील मदत होणार आहे. वर्षभरातील या सकारात्मक आणि क्रांतीकारी निर्णयांमुळे शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येऊ शकेल.

जिल्हा माहिती कार्यालय,पुणे

शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : निसर्गाचा लहरीपणामुळे यंदाच्या मृग नक्षत्राने सलामी कोरडी दिली. त्यामुळे मारेगाव तालुक्यात मिरगाच्या मुहूर्तावर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळाले होते.परिणामी पुढं तरी पावसाची हजेरी लाभेल या आशेत आकाशाकडे नजर लावून मागील काही दिवसात वाट पाहत असतानाच मागील तीन चार दिवसापासून अधून मधून पावसाच्या सरी पडत आहे.
मात्र शेतकऱ्यांना तालुक्यातील चारही महसूल जोरदार पावसाची प्रतीक्षा असून या हंगामात अद्याप तरी असा पाऊस झालेला नाही. मारेगाव तालुक्यातील शेतकरी शेतीच्या कामांना खरं तर एप्रिल महिन्याच्या अखेरपासूनच सुरुवात करतो. पावसाळी शेती पूर्वीची मशागतीची कामे तेव्हापासूनच सुरु होतात. मे च्या अखेरीस रोहणी नक्षत्राने मान्सूनपूर्व ढगांची झलक दाखवील्यावर शेतकरी पावसाची आस आणि हंगामातील रास मणी धरून पुढे कोणते नक्षत्र आहे. त्याचे वाहन काय? हे कधी संपते यांचा ताळमेळ मनात घोळत असतो.
त्याला कारणही तसेच आहे.शेतकऱ्यांचा जेवढा हवामान खात्यावर विश्वास नाही तेवढा विश्वास पंचांग, नक्षत्र व त्याची वाहने आणि जाणत्यांच्या दाखल्यावर आहे. नक्षत्राच्या वाहणावरून पावसाचा अंदाज भारतीय पंचांगानुसार नक्षत्राचे वाहने हत्ती,म्हैस, बेडूक असल्यास दमदार पाऊस, गाढव,उंदीर असल्यास मध्यम तर घोडा व कोल्हा असल्यास विरळ पाऊस होतो असा अंदाज बांधला जातो. परंतु जागतिक प्रदुर्षणामुळे पृथ्वीचे निसर्गचक्र 
पूर्णतः बदलले आहे. यावर्षी आग ओकणाऱ्या मे महिन्यात बेमोसमी पावसाने चांगलेच धुवून काढले तर पाण्याचा अंदाज बांधून असलेल्या मृग नक्षत्रात पावसाने दडी मारली. त्यामुळे पंचांग नक्षत्राचा अंदाज हुकला एवढेच काय तर हवामान अभ्यासकाचे सुद्धा अंदाज चक्रीवादळाच्या अचानक आगमनामुळे चुकले.
मारेगाव तालुक्यातील चार ही महसूल मंडळात पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणी आटोपल्या,मिरुग,कोरडा असतांना सुद्धा पेरणीचे दिवस वाया जात असल्याचे पाहून कोरडवाहू शेतकऱ्यांनी मोठ्या धाडसाने धुरळपेरण्या केल्या. सध्या सर्वत्र ढगाळ वातावरण परंतु जोरदार पाऊस काही पडला गेलाय, त्यात थोड्याफार प्रमाणात पडत असलेल्या हलक्या पावसामुळे धुरळ पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा जरी मिळाला असला तरी अपेक्षेप्रमाणे जोरदार पाऊस पडत नसल्याने अजून मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.




शिवणाळा येथील युवक अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : नुकताच हाती आलेल्या माहितीनुसार मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीत यवतमाळ महामार्गांवर भरधाव अज्ञात वाहनाने पायदळी चालणाऱ्या एका होतकरू तरुणाला धडक दिली. या दुर्घटनेत तरुण जागीच ठार झाला असून ही घटना काही मिनिटाअगोदर घडल्याचे समजते.
अनिल कृष्णराव टेकाम (26) रा. शिवणाळा असे या भीषण अपघातात ठार झालेल्या होतकरू युवकाचे नाव आहे. मृतक हा  नेहमी प्रमाणे मिस्त्री काम आटोपून पायदळ गावंच्या दिशेने येत असताना अज्ञात वाहनाने त्यास उडवून पोबारा केला. ही दुर्दैवी घटना आज शुक्रवारी 10.15 वाजता चे दरम्यान, यवतमाळ-मारेगाव महामार्गांवरील शिवणाळा फाट्यावर नजीक घडली.

अपघात इतका भीषण होता की, यात मृतकाचे डोके चेंदामेंदा झाल्याचे जमावांनी सांगितले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा सुरु असल्याचे समजते.
अनिल याचे पश्चात एकटी आई असून त्याचे वडिलांचे मागच्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले अशी माहिती आहे. जन्मदात्रीचा आधार निघून गेल्याने शिवणाळा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अधिक तपास मारेगाव पोलीस करित आहे. 

ब्रेकिंग न्यूज : पुतण्याने केला चुलत्याचा कोयत्याने "गेम"

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल

मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कोसारा येथे एका इसमाचा निर्घृन खून करण्यात आला. सदर घटना दि.30 जून रोजी सकाळी दहा वाजताचे दरम्यान, घडली. या घटनेने समाजमन सुन्न झाला असून, तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

सुभाष संभाजी पचारे (48) असे मृतकाचे नाव आहे. तर आरोपी चंपत देविदास पचारे (30) दोघेही कोसारा येथील रहिवाशी आहे. आज सकाळी चुलता आणि पुतण्याने मिळून दारू ढोसली, त्यातून "तू तू मैं मैं" झाल्याचा अंदाज वर्तविला जात असून आरोपी चंपत याने आधी चुलत्याच्या छाताडावर दगड आदळला, नंतर कोयत्याने वार केला,मग त्याच्या देहात लाठी गुसवली ही समाजमन सुन्न करणारी घटना गुरुपौर्णिमेच्या पर्वावर आज शुक्रवारी सकाळी 10.15 वाजताचे दरम्यान, घडली. दारू ढोसलेल्या पुतण्याने अशी चुलत्याची निर्दयी निघृन हत्या केली. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून वृत्त लिहेपर्यंत मृतदेहाचा पंचनामा सुरु असल्याचे माहिती आहे. तूर्तास या प्रकरणाची नेमकी कहाणी काय? हे आरोपीच सांगू शकणार...
अधिक तपास पोलीस करित आहे.

आज मारेगाव पोलीस स्टेशन मधून पुरी यांची बदली झाली आणि मारेगाव ठाण्याचे सूत्र जनार्दन खंडेराव यांचे कडे सोपण्यात आले, नवे ठाणेदार रुजी होणार मात्र,त्यांना सलामीसह खुणाची बोयणी झाली, असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे.