सभापती गौरीशंकर खुराणा यांचा पुसद अर्बन बँके तर्फे सत्कार


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

 मारेगाव : मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनियुक्त सभापती गौरीशंकर खुराणा यांचा पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी बॅकेच्या वतीने पुसद येथील बँक कार्यालयात सत्कार करण्यात आला, यावेळी बँकेचे उपाध्यक्ष राकेश खुराणा उपस्थित होते.
     
नेहमी शेतकऱ्याचे हित जोपासणारे गौरिशंकर खुराणा हे झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आघाडीचे मताधिक्य घेऊन महाविकास आघाडीच्या शेतकरी एकता पॅनल मध्ये निवडून आले,त्यानंतर त्यांची सभापतीपदी बहुसंख्य संचालकानी त्यांना पाठिंबा देत अविरोध निवडून दिले. या घटनेचे पुसद अर्बन बँकेने दखल घेत त्यांचा सत्कार करण्यात आला.

या सत्कार कार्यक्रमाच्या प्रसंगी गौरीशंकर खुराणा यांनी आपण शेतकरी हिताचे निर्णय घेऊ असे सांगीतले, यावेळी पुसद अर्बन बँकेचे उपाध्यक्ष राकेश खुराणा, संचालक ललित सेता, निळूभाऊ पाटील, सौ पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक सेवकर, सुरोसे व बॅक कर्मचारी उपस्थित होते .

पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण व्हावी- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मनपा आयुक्तांना निर्देश

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : पावसाळ्यापूर्वी चंद्रपूर शहरातील नालेसफाईची सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महानगरपालिका आयुक्त यांना दिले आहेत.

चंद्रपूर शहरातील मोठे व छोटे नाले आणि गटारीमध्ये पावसाचे पाणी तुंबल्यास ते नागरिकांच्या घरात साचून नागरिकांची गैरसोय होऊ शकते. ही बाब टाळण्यासाठी युद्धस्तरावर या सर्व नाल्यांची सफाई करणे, त्यातील गाळ काढणे, प्रसंगी नाल्यांचे रुंदीकरण करणे ही कामे करण्याचे निर्देश ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मनपा आयुक्तांना दिलेत.

मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी जेसीबी यंत्राचा वापर करावा, नाल्यातील पाणी नागरिकांच्या घरांमध्ये कोणत्याही परिस्थितीत शिरणार नाही यासाठी नाल्यांचा प्रवाह सुस्थितीत ठेवण्याची सूचनाही ना. श्री. मुनगंटीवार यांनी केली. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बरेचदा दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होण्याचा धोका असतो. विशेषत: नाल्यांच्या शेजारून गेलेल्या जलवाहिनींमध्ये गळती असल्यास हा धोका अधिक वाटतो. त्यातून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नाले, गटारी यांचे निर्जंतुकीकरण करावे. अशा सूचना पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मनपा आयुक्त यांना दिले आहेत.

जिल्ह्यात बारावीचा निकाल 91.98 टक्के,मुलींनी मारली बाजी


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत देण्यात आलेल्या इयत्ता १२ वी परिक्षेचा निकाल आज गुरुवारी जाहिर करण्यात आला. या जिल्ह्याचा निकाल ९१.९८ टक्के इतका लागला आहे. या निकालात मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त असून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. तर जिल्ह्यातील १६ तालुक्यांमधून महागांव तालुक्याने ९६.०९ टक्के निकाल लागुन जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे.

यावर्षी १२ वीच्या परिक्षेला जिल्ह्यातून २९ हजार ९०७ नियमित विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. त्यापैकी २७ हजार ५०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे १५१२ विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणीत स्थान मिळविले आहे. तर ८ हजार ५५३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले तसेच आहे. १३ हजार २०४ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण होण्याचा मान मिळाला आहे. शाखा निहाय निकालामध्ये विज्ञान शाखेचा सर्वाधिक ९७.८४ टक्के निकाल लागला आहे. वाणिज्य शाखेचा ६८५ विद्यार्थीनी या परिक्षेत उत्तीर्ण झाल्या असून त्यांच्या निकालाची टक्केवारी ९४.०२ एवढी आहे. मुलांपेक्षा मुलींच्या निकालाची टक्केवारी ३.९८ टक्के ज्यादा आहे.

तालुका निहाय निकालामध्ये महागांव तालुक्याचा सर्वाधिक ९६.०९ टक्के निकाल लागला आहे. नेर तालुका ९५.९३ तर बाभुळगांव तालुक्याचा ९४.८५ टक्के निकाल लागला आहे. आर्णी तालुका ९४.२६, कळंब तालुका ९२.२१, घाटंजी ९१.६९ टक्के, दिग्रस ९१.३५ टक्के, झरी जामणी ९०.५६ टक्के, राळेगांव ९०.५६ टक्के, मारेगांव ८९.८९ टक्के, पांढरकवडा ८८.०६ तर वणी तालुक्याचा निकाल सर्वात कमी निकाल ९२.२८ टक्के लागला असून कला शाखेचा निकाल ८६.९१ टक्के एवढा लागला आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमातून ८७.५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यावर्षी जिल्ह्यातील १४ हजार २७५ विद्यार्थी १२ वीत उत्तीर्ण झाले असून त्यांच्या निकालांची टक्केवारी ९०.१० टक्के आहे. तर १३ हजार ८०.८७ टक्के लागला आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात 95 तक्रारी

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर (शासन आपल्या दारी) कार्यक्रमात मारेगाव येथे आज 95 तक्रारी प्राप्त झाल्या. तहसील कार्यालय तथा एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय मारेगाव यांच्या संयुक्त विध्यमाने शहरातील बदकी भवन मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती महिलांना देण्यात आली.

शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण माजी सभापती अरुणाताई खंडाळकर होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून मारेगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष डॉ. मनिष मस्की, मारेगावचे तहसीलदार विवेक पांडे, बाल विकास प्रकल्प अधिकारी दिपक कळमकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना देठे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तालुका व्यवस्थापक डाहुले मॅडम, पशुधन विकास अधिकारी डॉ मिश्रा, डॉ राठोड, विस्तार अधिकारी मुनेश्वर अनिल राऊत,सरक्षण अधिकारी रोशन राऊत,प्रामुख्याने उपस्थित होते.

या समाधान शिबिरात तालुक्यातील महिलांनी 95 समस्या मांडल्या यामध्ये घरकुल योजना, बालसंगोपन, शौचालय, शिक्षण, रोजगार, निराधार, रॅशन कार्ड, विहीर योजनाचा समावेश होता. 95 तक्रारी मधून 23 तक्रारीवर तात्काळ कारवाही करण्यात आली. महिलाच्या हक्काचे संरक्षण होऊन त्यांना न्याय मिळावा,यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्यामुळे मोठया संख्येने महिलांची या शिबिरात उपस्थिती होती.

आज दि.26 मे रोजी दुपारी 1 वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिराची सुरुवात झाली, 4 वाजता या शिबिराचा रीतसर समारोप करण्यात आला. प्रास्ताविक बाल विकास प्रकल्प अधिकारी दिपक कळमकर यांनी केले, सूत्रसंचालन गणेश चाव्हण, यांनी तर आभार रामटेके यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पद्मा कनाके, कांचन वनकर, नंदा आत्राम, अंकिता भगत, प्रेमीला मलकापुरे, अनुसया थेरे, प्रभावती खाडे, आशा खामणकर, गिता कांबळे यासह अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी सहकार्य केले. 

अभिषेक कनाके देतोय उन्हाळी सुट्ट्यातील विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरचे विनामूल्य धडे

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : आजच्या विज्ञान युगात विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर चे ज्ञान मिळणे ही काळाची गरज आहे. हीच गरज ओळखून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पहापळ येथे शाळेचे मुख्याध्यापक श्री.एन. टी. चौधरी सर ,पदवीधर शिक्षक श्री. संजय फुलबांधे सर, श्री. अमर पुनवटकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान होण्यासाठी दिनांक 2 मे 2023 पासून नियमितपणे सकाळी 8 ते 10 या वेळात प्रशिक्षण वर्ग घेतल्या जात आहेत.

शाळेतील विद्यार्थ्यांची वर्ग 1ते 5 आणि वर्ग 6 ते 8 अशा दोन बॅच मध्ये विभागणी केलेली आहे . पहापळ येथील संगणक तज्ञ अभिषेक भैय्याजी कनाके हे नियमितपणे विद्यार्थ्यांचे निशुल्क कॉम्प्युटर चे क्लास घेतात.त्यात कॉम्प्युटरची ओळख, बेसिक ज्ञान आणि एक्सेल वर्ड, पेंटिंग यासारखे अनेक प्रोग्राम शिकवले जातात. शाळेतील विद्यार्थ्यांसोबतच गावातील इतरही मुले या कॉम्पुटर क्लास ला उपस्थित राहत आहेत.

उन्हाळी सुट्ट्यात कॉम्प्युटर चे वर्ग सुरु केल्याने विद्यार्थ्यांत तसेच पालकांत आनंद निर्माण झाला आहे आणि त्यांचा यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कॉम्प्युटर क्लाससाठी विद्यार्थ्यांना नियमितपणे उपस्थित ठेवण्यासाठी पहापळ येथील सरपंच श्री. राहुल आत्राम,पेसा समिती चे अध्यक्ष श्री. भैय्याजी कनाके .शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री. अमोल गुरनुले,उपाध्यक्ष सौ. शितल भोयर आणि इतर सर्व सदस्य त्याचप्रमाणे शाळेतील उपक्रमशील पदवीधर शिक्षिका सौ. वाघमारे मॅडम आणि गोंडे मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.