शिवसेना (ठाकरे गट) तालुका प्रमुखांवर प्राणघातक हल्ला...

सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरीकर यांच्यावर अनोळखी इसमानी काल रात्री 11. 30 ते 12.00 च्या दरम्यान वरोरा-भद्रावती विधानसभा मध्यवती कार्यालय वरोरा नागपुर नाका चौक येथुन कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रचार आटपवुन घरी जात असताना देशपांडे पेट्रोल पंपासमोर प्राणघातक हल्ला करण्यात आला असुन ही विरोधकांची खेळी असल्याचे बोलल्या जात आहे.

कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरु असताना व प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना या निवडणूकीतील उमेदवारावर जिवघेणा हल्ला होणे म्हणजे विरोधकांची राजकीय नितिमत्ता किती खालच्या पातळीवर गेली याचा अंदाज येत आहे.

राजकारणात विरोध होत असतो पण तो विचाराचा विरोध असतो पण वरोरा भद्रवती विधानसभा क्षेत्रात काही गुंड प्रवृत्ती आपली राजकीय सत्ता अबाधित राखण्यासाठी गुंडशाहीवर उतरली असल्याने इथे राजकीय वैर कुणाच्या जीवावर बेतेल याचा नेम नाही. दरम्यान, दत्ता बोरीकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सर्वत्र निषेध व्यक्त होत असून हा हल्ला कुणी केला त्याचा शोध पोलिसांनी लवकर घ्यावा व त्या गुंडाना बदडून काढावे अशी मागणी होत आहे.

दत्ता बोरीकर यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती कारण्यात आले आहे. दरम्यान शिवसेना पदाधिकारी आता आक्रमक झाले असून या घटनेचे पडसाद जिल्हाभर उमटणार असल्याने त्यांची पुढील काय भूमिका असणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

जाणून घ्या आजचा आपला दिवस...

               
                 राशीभविष्य : २५ एप्रिल मंगलवार..!

मेष:-
मेष राशीचे लोक आज भविष्यातील त्यांच्या गुंतवणूक योजनांना अंतिम रूप देऊ शकतात. घरामध्ये तुमच्यावर खूप जबाबदारी येईल. नोकरीच्या क्षेत्रात तुमची कामगिरी चांगली राहील. आज तुमचे विरोधक तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करू शकतात. सार्वजनिक ठिकाणी विनाकारण जाणे टाळा. जे काम तुम्ही हातात घ्याल त्यात तुम्ही यशस्वी व्हाल. 

वृषभ:- 
आज वृषभ राशीच्या लोकांना कामात चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. नवीन भागीदार व्यवसायात सामील होऊ शकतात. पैशाशी संबंधित काही बाबींमध्ये तणाव कमी होईल. घरातून काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमचा मित्र किंवा कुटुंबासोबत आनंददायी प्रवास होईल, एकमेकांसोबत चांगला वेळ घालवाल. 

मिथुन:-
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असेल. यावेळी कोणतीही मालमत्ता खरेदीची योजना बनवताना काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित कराल. मुलांच्या भवितव्याबद्दल तुम्ही खूप चिंतेत असाल. आज तुम्ही घराबाहेर फिरायला जाल, ज्यामुळे तुमचे खूप मनोरंजन होईल. 

कर्क:-
कर्क राशीच्या लोकांना आज ताऱ्यांची साथ मिळेल. जीवनाच्या सर्व क्षेत्रात प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा मजबूत होईल. व्यापाऱ्यांना कायदेशीर गोष्टीपासून दूर राहावे लागेल. नोकरीच्या क्षेत्रात सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आरोग्यासाठीही आजचा दिवस चांगला आहे. 

सिंह:- 
सिंह राशीच्या लोकांसाठी आज व्यावहारिक निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. दुधाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला नफा मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला नफा मिळू शकतो. तुम्ही तुमच्या जीवनसाथीसोबत जीवनाचा उत्तम अनुभव घेऊ शकता. कुटुंबातील सदस्यांकडून आनंद आणि सहकार्य मिळेल. 

कन्या:-
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुम्हाला स्वतःच्या मेहनतीने पुढे जाण्याचा आहे. व्यापाऱ्यांना सामाजिक वर्तुळ वाढवण्यावर भर द्यावा लागेल. पैशाच्या बाबतीत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात काळजी घेणे आवश्यक आहे. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबाच्या वतीने तुम्ही निश्चिंत राहाल. मुलांच्या मदतीमुळे आनंद वाढेल. भगवंताचे ध्यान केल्याने तुम्हाला मनःशांती मिळेल. 

तूळ:-
तूळ राशीच्या लोकांची सर्व कामे आज सहज पार पडतील. व्यापार्‍यांना विशेष फायदा मिळू शकतो. पैशाची देवाणघेवाण करताना एखाद्याला साक्षीदार म्हणून ठेवा. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर आज तुम्हाला यश मिळू शकते. तरुणांना इच्छित जीवनसाथी मिळाल्याने मन प्रसन्न राहील. विचारांचे नियोजन होणार आहे, त्यामुळे कामात यश मिळेल. पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. मित्रांसोबत चांगला वेळ जाईल. 

वृश्चिक:-
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. स्वतःसाठी वेळ काढा आणि तुमच्या भविष्यातील योजनांवर काम करा. मालमत्तेशी संबंधित प्रकरणे मार्गी लागतील. नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. देवाची उपासना केल्याने मनाला शांती मिळेल. घरातून बाहेर पडताना काळजी घ्या. आज वैवाहिक जीवनात गोडवा राहील. कुटुंब किंवा प्रियकरांसोबत चांगला वेळ जाईल. 

धनु:-
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुम्हाला तुमच्या दैनंदिन दिनचर्येत किंवा नियोजनात काही मोठे बदल करावे लागतील. व्यावसायिकांना काही व्यक्तींसोबत आवश्यक भेटीगाठी कराव्या लागतील. घरातील वडिलधाऱ्यांचा सल्ला पाळणे हितकारक ठरेल. नोकरी करणाऱ्या लोकांची वरिष्ठांकडून प्रशंसाही होईल. वैवाहिक चर्चेतील यशामुळे तरुण उत्साही होतील. 

मकर:-
आज मकर राशीच्या लोकांसाठी परिस्थिती प्रतिकूल असू शकते. तुमची आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील. तुम्हाला पैसे आणि मौल्यवान वस्तूंबाबत जास्त काळजी घ्यावी लागेल. तरुणांना अपेक्षित रोजगार मिळू शकतो. आज तुम्हाला हवे तसे फळ मिळेल. तुमची मानसिक सुस्ती आज संपेल आणि तुम्हाला सर्व बाजूंनी चांगली बातमी मिळेल. 

कुंभ :-
कुंभ राशीचे लोक आज आपले काम प्रामाणिकपणे करतील. आज तुमच्या वागण्यात अधिक सकारात्मकता असेल. पैशाच्या बाबतीत आज लोभाची स्थिती टाळण्याचा प्रयत्न करा. कोणतेही ऑनलाइन काम सुरू करण्यासाठी तुम्ही योजना तयार कराल. मुलांसोबत चांगला वेळ जाईल. तुम्ही चांगल्या लोकांशी संपर्क प्रस्थापित कराल, जे तुम्हाला कामात यश मिळवण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील. 

मीन :-
आज मीन राशीचे लोक असे काही करू शकतात ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. दैनंदिन उत्पन्न पूर्वीपेक्षा चांगले होईल. तुमच्या महत्त्वाच्या गोष्टी कोणाशीही शेअर करू नका. आईसोबत वेळ घालवणे तुमच्यासाठी चांगले राहील. आज तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते. आज व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे आणि आरोग्य देखील चांगले राहील.


मारेगाव बाजार समिती ची निवडणूक शेतकरी परिवर्तन पॅनल च्या दिशेने, राजकीय वर्तुळात चर्चा...!!


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक काँग्रेस सेना आघाडी समर्थित पॅनल लढत आहे. तर त्यांच्या विरोधात भाजप समर्थित इतर सर्व विरोधक एकत्र आलेले आहे. काँग्रेसकडून अनेक वजनदार नेत्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या काही असंतुष्टांनी भाजपशी सूत जुळवीत उमेदवारी पदरात पाडून घेतली आहे. यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अत्यंत रोचक व चूरशीची होणार असे दिसते.

येत्या 30 एप्रिलला मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाची निवडणुक होत आहे. या निवडणुक मैदानात शेतकरी परिवर्तन तथा शेतकरी एकता पॅनल आमने सामने दंड थोपटून उभे आहेत. या निवडणूक मैदानात दोन्ही पॅनल कडून 34 उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका प्रलंबित असल्यामुळे गेल्या काही वर्षाच्या इतिहासात ही निवडणूक पहिल्यांदाच रंगतदार होताना दिसत आहे. 

नेहमी अविरोध होणाऱ्या यंदाच्या निवडणूकीत बाहुबली उमेदवारांनी परस्पर विरोधात दंड थोपटले असून विजय आपलाच असे दावे प्रतिदावे दोन्ही पॅनल कडून केल्या जात असले, तरी दोन्ही पॅनल कडून प्रचाराची रणधुमाळी डोअर टू डोअर सुरु झाली आहे. अवघ्या चार दिवसानंतर प्रचाराचा कार्यक्रम क्लोज होईल, त्यामुळे कोण कोणाच्या क्लोज येतील हे आता सांगणे नक्की जरी नसले तरी, मारेगाव बाजार समितीची निवडणूक शेतकरी परिवर्तन पॅनल च्या दिशेने वाटचाल करित असल्याचे राजकीय वर्तुळात बोलल्या जात आहे. 



राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी- अनिकेत नैताम


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

केळापूर : सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपिल क्र. २५०२/ २०२२ महाराष्ट्र आदिवासी ठाकूर जमात स्वरक्षण समिती विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर या प्रकरणात न्यायमूर्तीद्वय संजय कौल,अभय ओक,मनोज मिश्रा या तीन न्यायमूर्तीच्या खंडपीठाने २४ मार्च २०२३ रोजी निर्णय दिलेला आहे.

या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात यावी.अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचेकडे ट्रायबल फोरम यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष अंकित नैताम यांनी केली आहे.
 
सर्वोच्च न्यायालयाने बहुचर्चित व प्रलंबित असलेले 'शिल्पा ठाकूर' प्रकरणाचा न्यायनिवाडा नुकताच केला.यात जमातीच्या खरे, खोट्याची पडताळणी करतांना आप्तसंबंधी पडताळणी निरर्थक ठरविण्यात आली आहे. 

आप्तसंबंध तपासणी निर्थक ठरविल्यामुळे जमातीचे संशयास्पद अगर खोटे दाखले पडताळणीसाठी दाखल करणाऱ्या अर्जदारांच्या दाव्यांची पडताळणी करतांना आप्तसंबंध तपासणी (Affinity Test) करण्यास फारच मोठा अडथळा निर्माण झालेला आहे.

कोणत्या दाव्यांची प्रकरणे दक्षता समितीकडे अधिक सखोल तपासणी व आप्तसंबंध तपासणीसाठी पाठवायची ह्याबाबत निर्णय घेण्याच्या पडताळणी समित्यांच्या अधिकारांवर गदा आली आहे. त्यामुळे राज्यात मूळ ३३ आदिवासी जमातींच्या नामसदृष्याचा फायदा घेणाऱ्या गैर आदिवासी जातींना ह्यापुढे बिनबोभाटपणे आदिवासी जमातींचे जातपडताळणी प्रमाणपत्र मिळण्याचा धोका उद्भवलेला आहे. 

संविधानाने खऱ्या आदिवासींना घटनात्मक हक्क दिलेले आहे, मात्र नामसद्रुश्याचा गैरफायदा घेऊन जमातींची चोरी करणा-या जाती आदिवासींचे घटनात्मक हक्क पळवू शकतात.

त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या ह्या निकालाचे पुनर्विलोकन करण्यासाठी तात्काळ राज्यशासनाने पुनर्विचार याचिका दाखल करण्यात यावी.अशी मागणी ट्रायबल फोरम यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष अंकित नैताम यांनी केली आहे.


कायद्याचे उद्दिष्ट व गाभा नष्ट होईल
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती,भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र  (देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियम) अधिनियम २००० च्या कायद्याचे उद्दिष्ट व गाभा नष्ट होऊ शकतो .ज्या आधारावर हा कायदा तयार झाला त्या ‘कुमारी माधुरी पाटील विरुद्ध अतिरिक्त आदिवासी आयुक्त‘ ह्या खुद्द सर्वोच्च न्यायालयाच्या १९९४ सालच्या ऐतिहासिक निकालाच्या उद्दिष्टालाही देखील "खो' बसू शकतो.


बनावट जातप्रमाणपत्राच्या आधारे आमच्या घटनात्मक हक्काच्या नोक-या, मेडिकल आणि इंजिनिअरिंग प्रवेशातील राखीव जागा, जमिनी, म्हाडाच्या सदनिका, पेट्रोलपंप, गॅस एजन्सी चोरल्या आहे. घटनात्मक हक्काचे संरक्षण होण्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी केलेली आहे.
- अंकित नैताम
जिल्हा उपाध्यक्ष, ट्रायबल फोरम यवतमाळ .

मारेगावात वंचित बहुजन आघाडी तर्फे पाणपोई सुरु

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : येथील वंचित बहुजन आघाडी तर्फे गरजू नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पंचायत समिती मारेगाव मेन रोड परिसरात पाणपोई सुरु करण्यात आली आहे.

पाणपोईचे उदघाटन तालुका अध्यक्ष गौतम दारुंडे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव नेहारे, म्हणाले की यावर्षी उष्णता खूप जास्त आहे, बाजारात येणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठी आहे. या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता. परंतु श्री. संदीप आस्वले यांनी ही बाब लक्षात घेऊन पाणपोई करिता सहकार्य केले आहे. अनेक नागरिकांना याचा फायदा होणार आहे.

वंचित बहुजन आघाडी च्या वतीने दरम्यान, मान्यवरांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष गौतम दारुंडे, उपाध्यक्ष संजय जिवने, मोरेश्वर लभाने, गोरखनाथ पाटिल, विठ्ठलराव नेहारे साहेब, अनंता खाडे, दिनेश करलुके, अनंतराव गोवर्धन, कुमार अमोल कुमरे यांची उपस्थिती होती.