केगांव बोदाड रस्त्याची झाली दयनीय अवस्था

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : तालुक्यातील अनेक खेड्याकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था वाईट झाली आहे. अशातच मार्डी वरून बोदाड-केगांव कडे जाणारा रस्ता जास्तच खराब झाला आहे. 

तालुक्यातील केगांव रस्ता उखडला असून या रस्त्याची चाळणी झाली आहे. रस्त्या उखडल्याने खड्ड्यांचा लांबून त्यांचा अंदाज येत नसून वाहन धारकांना प्रवास करतांना तारेवरची कसरत करावी लागते.त्यामुळे रात्रीच्या (Night) वेळी दुचाकी स्वारांची गाड्या घसरून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. केगांव रस्त्याच्या (kegaon Road) दुरावस्थेमुळे या मार्गांवर प्रवास करतांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो असे बोलले जात आहे.

गेली दोन वर्षापासून केगांव ते मार्डी चार ते पाच किलोमीटर अंतराचा हा रस्ता बहुतांश उखडलेला असून, या रस्त्यावर चार चाकी वाहन नाचत चालली असल्याचा भास होतो. त्यात रात्रीच्या वेळी कोणता खड्डा चुकवू अशी परिस्थिती निर्माण झालेली असतांना संबंधित विभाग, लोकप्रतिनिधी, यांनी तातडीने लक्ष देणे गरजेचे झाले असून या रस्त्याची तंदुरुस्त करण्याची अपेक्षा आहे. 

सलून व्यावसायिक प्रमोद जांभुळकर यांना पितृशोक

सह्याद्री चौफेर | रवी घुमे 

मारेगाव : येथील प्रमोद जांभुळकर सलून व्यावसायिक यांचे वडील वासुदेव जांभुळकर वृद्धापकाळाने आज पहाटे 4.00 वाजता निधन झाले. मृत्यू समयी 75 त्यांचे वय होते. 

मारेगाव शहरातील वासुदेव जांभुळकर यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी आज शुक्रवारी पहाटे 4. वाजता दरम्यान,निधन झाले. आज दि.27 जाने. रोजी 2. वाजता त्यांचे पार्थिवावर मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

त्यांचे पश्चात पत्नी, मुलगा, दोन विवाहित मुली, ष्णूशा, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे. 

संविधानिक मूल्यांची जपणूक करुया – पालकमंत्री मंत्री संजय राठोड    

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

यवतमाळ : देशाला दिशा देणाऱ्या संविधानिक मूल्यांची जपणूक करत महाराष्ट्राला घडवण्यात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन आज अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

पोस्टल ग्राऊंड येथे आयोजित भारतीय प्रजासत्ताकाच्या ७३ व्या वर्धापन दिनाच्या मुख्य कार्यक्रमात श्री. राठोड बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कर्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक पवन बनसोड, यांच्यासह राज्य शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. राठोड म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला दिलेले संविधान हे सर्वोच्च स्थानी असून संविधानाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत हा देश विविध क्षेत्रांत प्रगती करीत आहे. प्रत्येक भारतीयांना अभिमान असलेल्या संविधानातील मूल्यांचा अंगीकार करून महाराष्ट्राचा विकास होत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असतांना प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य प्रामाणिपणे पार पाडल्यास बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले राज्य व देश निर्माण होईल. त्याचबरोबर नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचाही समावेश आपल्या राज्यघटनेत करण्यात आला आहे. समानता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शोषणापासून संरक्षणाचा हक्क, धार्मिक निवड स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक स्वातंत्र्याचा हक्क, संविधानिक प्रतिकाराचा हक्क आदी मौल्यवान हक्क या घटनेने नागरिकांना बहाल केले आहेत असेही ते म्हणाले.

तत्पूर्वी, श्री राठोड यांनी मुख्य कार्यक्रमस्थळी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास वंदन केले. त्यांनी यवतमाळ पोलीस, होमगार्ड, छात्रसेना, स्काऊट गाईड आदी पथकांचे खुल्या जिप्सीमधून निरीक्षण केले. या सर्व पथकांनी मुख्य मंचासमोरून पथ संचलन केले. श्री. राठोड यांनी या सर्व पथकांची मानवंदना स्वीकारली.
यावेळी विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी मल्लखांबासह ताल योगासनांचे प्रात्यक्षिक तसेच विविध सांस्कृतीक कार्यक्रम सादर केले. यावेळी आयएसओ मानांकन मिळाल्याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, अमरावती विभागातून उत्कृष्ट उपजिल्हा निवडणुक अधिकारी म्हणुन मुख्य निवडणुक अधिकारी कार्यालयाने पुरस्कृत केल्याबाबत उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, ७/१२ संगणकीकरणात उत्कृष्ट काम करणारे करळगाव येथील तलाठी आशिष पाचोरे यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

यावेळी सहायक जिल्हाधिकारी मेघना कवळी, अप्पर जिल्हाधिकारी पेअविण सिंह दुबे, अप्पर पोलिस अधिक्षक पियुष जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, तसेच सर्व प्रशासकिय अधिकारी उपस्थित होते.

विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय कान्हाळगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे 

मारेगाव : स्थानिक विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयमध्ये दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाला. 
या आजोजित फेस्टिवलचे उदघाटन श्री.नरेंद्र कांडुरवार
गटशिक्षणाधिकारी मारेगाव, प्रमुख पाहुणे म्हणून श्री.ताटकोंडावर सर, सौ,भाग्यश्री संजय ठावरी, तर 
महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप देरकर, पालक प्रतिनिधी श्री संजय पाटील नक्षणे कार्यक्रमाला उपस्थीत होते.
दोन दिवसीय वार्षिक महोत्सवात क्रीडा खेळ,गायन,नृत्य, स्पर्धा घेण्यात आले व शैक्षणिक सत्र फेबु/मार्च 2022 मध्ये एच.ए.सी प्रथम, द्वितीय, तृतीय परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून प्रमाणपत्र देण्यात आले.

या प्रसंगी गटशिक्षणाधिकारी कांडुरवार साहेबांनी पुढील भवितव्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या. 
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. कुळमेथे व प्रा.पोटे यांनी केले तर आभार प्रा. जाधव सर यांनी मानले. प्रा,पुडके, भारत लाडके, देवेंद्र देठे, इत्यादीनी हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यात सहकार्य केले.

चंद्रकांत लांबट यांना राष्ट्रपती पदक जाहीर

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

चंद्रपूर : रामनगर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले चंद्रकांत गणपत लांबट यांना त्यांच्या कार्यकाळातील गुणवत्तापूर्ण व विशेष कामाबद्दल प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. 
मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. चंद्रकांत लांबट 1988 मध्ये गडचिरोलीत पोलीस हवालदार म्हणून रुजू झाले.
सन 1988 ते 2007 पर्यंत त्यांनी गडचिरोली नक्षलग्रस्त भागात एकूण 20 वर्षे सेवा बजावली, त्यानंतर त्यांची बदली चंद्रपूर येथे झाली, ऑक्टोबर 2020 रोजी त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती झाली, तेव्हापासून ते रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. 
त्यांच्या कार्यकाळात दर्जेदार आणि उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले, याआधी त्यांना विशेष सेवा पदक, अंतर्गत सेवा पदक, पोलीस महासंचालक पदक सन्मान आदींनी गौरविण्यात आले आहे.
विशेष उल्लेखनीय की, चंद्रकांत गणपत लांबट हे मारोती गौरकर (ता मारेगाव) यांचे भास जावई असून वनोजा देवी यथील धांडे परिवाराचे जावई आहे.