पावसाचा जोर कायम, पाटाळा पुल पाण्याखाली

सह्याद्री चौफेर | न्यूज 

वणी : मागील महिन्यात पावसाचा कहर. त्यानंतर वरूनराजाने काहीशी उसंत घेतली असतांना पुन्हा दोन दिवसापासून सुरु झालेल्या पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले आहे. अप्पर वर्धा, निम्न वर्धा, बेंबळा प्रकल्प, इसापूर प्रकल्प, यातून विसर्ग वाढल्याने वर्धा नदीला पूर आला आहे. त्यामुळे पुन्हा या वर्धा नदी काठावरील गावात पाणी शिरण्याची शक्यता वाढली. कालपासून वर्धा नदी वरील पाटाळा पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे वणी वरोरा मार्ग बॅरिकेट लावून बंद करण्यात आला असून या मार्गांवरील वाहतूक घुग्गुस चंद्रपूर मार्गे वळविण्यात आली आहे. सदर मार्गांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वणी पोलीस भर पावसात कर्त्यव्यावर आहे. 

खोपडी-चोपडी या गावाचा संपर्क तुटला..


चेतन पवार | सह्याद्री चौफेर 

दारव्हा : गेल्या आठवड्याची उघडीप दिल्या नंतर पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने पिके पुन्हा पाण्याखाली आली आहेत.
दारव्हा तालुक्यातील खोपडी-चोपडी येथे फुलावरून पहिल्यांदाच पाणी पुराच्या पाण्याने गावाचा संपर्क तुटला. पुराचे पाणी नाल्याच्या काठावर असलेल्या शेतात शिरले. यामध्ये जवळपास शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली आली आहेत. परवा मध्यरात्री पासून मुसळधार पाऊस कोसळला. तसेच काल सकाळ पासून सुरु झालेल्या संततधार पावसाने खोपडी चोपडी येथील पुलाला पुर आला. यामध्ये पुराचे पाणी नाल्याच्या काठावर असलेल्या शेतात शिरले. खोपडी-चोपडी येथील नाल्याच्या काठावर असलेली शेकडो हेक्टर जमिन खरडुन गेल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. 
शेतातील पिके पाण्याखाली आले असल्याचे चित्र शेतशिवारात पहायला मिळाले. त्यामुळे अशी पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान खोपडी-चोपडी येथे झाले. असल्याचे प्रेम राठोड (माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ) यांनी सांगितले. दुपारच्या आलेला पुर उशिरापर्यंत ओसरला नसल्यामुळे या मार्गावर असलेली वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही गावाला पुराचा तडाखा बसला आहे.

'पोल्युशन मुक्त - Go Green' प्रचाराची संकल्पना राबविणारा महाराष्ट्रात पहिला केतन पारखी

"केतन पारखी" (9 ऑगस्ट)

                           अभिष्टचिंतन!!

जीवनप्रवासात आयुष्य जगत असतांना ह्या सुंदर भूतलावर आपण जन्माला आलो याचा आनंदोत्सव म्हणून जन्मदिवस साजरे होतात आणि होतच राहतील. पण काही व्यक्तीमत्व अशी असतात ज्यांचे जन्मदिवस फक्त स्वतः पुरताच आनंदोत्सव साजरा करण्याकरीताच करत नाहीत तर आपला जन्मदिवस साजरा होतांना दुसऱ्याच्यां जीवनात आनंद कसा निर्माण करता येईल ह्याच भावनेतून साजरे केले जातात. आज ज्यांचा अभिष्टचिंतन सोहळा आहे ते व्यक्तीमत्व म्हणजे वणी, मारेगाव,झरी तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून ज्यांनी समाजात आपलं वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. आता नागपूर ला त्यांनी स्वतःची "सह्याद्री" मिडिया नावाची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट फर्म आहेत. सामाजिक कार्य करून सुद्धा कुठल्याही प्रशस्तीचा मोह न बाळगता निरंतर काम करत असतो. मग बेरोजगारांचा प्रश्न असो, वणी ग्रीन वृक्षरोपण असो, निशुल्क स्पर्धा परीक्षा असो, की मग गरीब कुटुंबातील मुलांना परवडेल अशा कमी दरात संगणक प्रशिक्षण असो. भाऊसाहेब नेहमी काहींना काही कार्य करत असतात. त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना उदंड आयुष्य लाभोत...हीच सदिच्छा...

आदिवासी एकता महोत्सव

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर

मारेगाव : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दि. 9 ऑगस्ट रोज मंगळवारला " जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी उत्सव समिती, मारेगाव च्या वतीने आदिवासी एकता महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास तालुक्यातील आदिवासी समाज बांधवानी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

वणी वरोरा मार्ग वाहतुकीसाठी बंद

सह्याद्री चौफेर | न्यूज 

वणी : तालुक्यात दि.7 ऑगस्ट पासून सर्वत्र संततधार पाऊस सुरु आहे. अप्पर वर्धा प्रकल्प,निम्न वर्धा प्रकल्प, बेंबळा प्रकल्प, व इसापूर प्रकल्पातून विसर्ग वाढल्याने वर्धा नदी वरील पटाळा पुलावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाल्याने हा मार्ग बंद करण्यात आलेला आहे. वणी ते वरोरा-चंद्रपूर मार्ग बॅरिकेट लावून बंद करण्यात आला असून चंद्रपूर वरोरा जाणारी वाहतूक घुग्गुस मार्गे वळविण्यात आली आहे. या मार्गांवर अनुचित प्रकार घडू नये यासाठी वणी पोलिसांकडून बंदोबस्त करण्यात आला आहे. 
नुकतेच हाती आलेले पाटाळा पुलाचे काही क्षण चित्र