मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्यात दारव्हा तालुक्यातील बळीराजा व्यस्त

चेतन पवार | सह्याद्री चौफेर

दारव्हा : येणाऱ्या काही दिवसात पावसाळा सुरु होईल या शक्यतेने शेतीतील मशागतीची तसेच जनावरांसाठी चारा साठवणीच्या कामात तालुक्यातील बळीराजा व्यस्त असल्याचे चित्र सद्या दिसून येत आहे साधारणत जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मान्सूनचे आगमन होईल या पावसाच्या शक्यतेवर भोकर तालुक्यातील बळीराजा पीक पेरणीसाठी शेत जमीनीची मशागत करून ठेवतो यामध्ये नांगरने निट निटकेपणा करणे, औत धरणे, जमिनीचे सपाटीकरण करणे, बांध बदिस्ती करून घेणे, शेतातील तण काढणे इत्यादी मान्सूनपूर्व कामे शेतकरी उरकून घेतात पिकासाठी जमीनीची तयारी करावी लागत असल्याचे पावसाळ्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्याची  साठवणूक करून चारा झाकून ठेवला आहे.कामांसाठी शेत मजुरांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते; मात्र सध्या परिसरातील शेतकरी ऐन पावसाळ्यात जनावरांना चारा मिळणे कठीण होवून जाते. त्यासाठी जनावरांच्या चाऱ्याची सोय करून ठेवावी लागत असते. त्यामुळे अनेक शेतकरी चाऱ्याची साठवणूक करण्याच्या कामात तसेच तो चारा पावसामुळे खराब होवू नये म्हणून प्लास्टिकचे मोठे कागद टाकून झाकून ठेवण्याच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र दारव्हा तालुक्यात ग्रामीण भागात दिसून येत आहे. पाऊस सुरु झाल्यानंतर पेरणीसाठी धावपळ होवू नये म्हणून त्यासाठी आवश्यक बी - बियाणे तसेच खते घेण्यासाठी शेतकरी बी-बियाणे विक्रीच्या दुकानात गर्दी करत आहेत.

वनोजा देवी येथे खरीप पीक "कर्ज" वाटप

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : सध्या खरीप हंगाम सुरु झाला असून त्यातच संपूर्ण वणी मतदारसंघात विविध सहकारी सोसायटी च्या निवडणुका होऊ घातल्या असताना त्या ग्रामस्तरावर पार  पडत आहे. अशा अवस्थेत खरीप पिक कर्ज वाटपाला विलंब होऊ नये म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यां वतीने वनोजा देवी येथे असाच "कर्ज वाटप कार्यक्रम व मार्गदर्शन" चा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे संजय देरकर उपाध्यक्ष जिल्ह मध्यवर्ती बँक मारेगाव हे उपस्थित होते. सोबत मंचावर नवनिर्वाचित अध्यक्ष गोवर्धन टोंगे, प्रमुख पाहुणे म्हणून डिमनताई टोंगे, जनार्धन गाडगे उपसरपंच, अरुण चोपनी पुणे, प्रवीण खानझोडे, भोगेकर मॅडम व नवनियुक्त संचालक व संचालिका, गावातील महिला बचत गट व गावातील नागरिक उपस्थित होते.
या प्रसंगी सर्व महिला व नवनियुक्त संचालक मंडळानी  संजय देरकर यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आला आहे. मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात बँके च्या विविध योजना ची सविस्तर माहिती दिली. शेतकरी बांधवानी फक्त पिक कर्जावर अवलंबुन व राहता इतरीही योजना चा लाभ घेतला पाहिजे व शेतकरी बांधवंनी आपलं उद्धार केला पाहिजे, मी माझे कर्तव्य पार पाडीत आहो. आपण सभासदांनी मला निवडून पाठविले त्यामुळे मी आपल्या समक्ष ह्या माहिती पोचवीत आहे,हे माझे कार्य आहे असे प्रतिपादन केले.
यावेळी गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कमळवेल्ली सोसायटीवर शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय


योगेश मडावी | सह्याद्री चौफेर 

झरी : तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. कमळवेल्ली येथे झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पॅनलच्या १२ ही उमेदवारांचा दारूण पराभव करीत भारतीय जनता पार्टी पॅनलचा दणदणीत विजय झाला. 

या विजयाचे शिल्पकार नरेंद्ररेड्डी बोदकुरवार माजी संचालक य. जि. म. सह. बँक यवतमाळ, वामनराव येलचलवार माजी जि.प. सदस्य यवतमाळ, अशोकरेड्डी बोदकुरवार माजी सभापती कृ.उ.बा.स. मारेगाव, पुष्पाताई रामन्ना चुक्कलवार सरपंच रा. कमळवेल्ली, अशोक पोतराजवार, सचिन दुम्मनवार व किशोर पाईलवार रा. टाकळी, मनोहर खडसे व व्यंकटराव कुळसंगे रा. दाभा, दिलीप पाटील राऊत व गंगाधर राऊत रा.अहेरअल्ली, तुळशीदास पडलवार व कुशकुमार केमेकार रा. वठोली यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढविण्यात आली. या निवडणुकीत विजयी झालेले आदिवासी कर्जदार मतदार संघातुन निवडून आलेले मतदार वासुदेव अर्जुन उईके यांना २७५ मते, दत्ता विठ्ठल कुळसंगे २७८, महादेव परसराम कुळसंगे २७३, व्यंकटराव नानाजी कुळसंगे २८२, भिवा किसन गेडाम यांना २४७ मते मिळाले.
बिगर आदिवासी कर्जदार खातेदार मतदार संघातुन निवडून आलेले उमेदवार दिलीप कृष्णा भोयर २७५, श्रीनिवास वामनराव येलचलवार २७३, महिला प्रतिनिधी मतदार संघातुन बेबी प्रभाकर वेट्टी २७७, निर्मला कवडु सिडाम २७९, अनुसुचित जाती/जमाती मतदार संघातुन निवडून आलेले उमेदवार सिताराम पुरुषोत्तम हलवले २८८, इतर मागास प्रवर्ग मतदार संघातुन जगदीश बापुराव टोंगलवार २७७, भ.ज./भ.जा./ वि.मा.प्र. मतदार संघातुन कुशकुमार रामलु केमेकार यांना २८२ मते मिळाले.
या निवडणुकीच्या निकालावर संपूर्ण झरी तालुक्यातील जनतेचे विशेष लक्ष होते. शेतकरी विकास पॅनलचे (भाजपा) १२ ही उमेदवार विजयी झाल्यामुळे सर्व झरी तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने गुलाल उधळून आतिशबाजी विजयी उत्सव साजरा करण्यात आला.

ग्रामीण भागातील छोट्या किराणा दुकानदाराचा मुलगा रामेश्वर सब्बनवाड झाला आय ए एस अधिकारी उदगीर

बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

उदगीर : लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यात महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथील रामेश्वर सब्बनवाड यांनी एमपीएससी (mpsc) परीक्षेत स्वतःच्या जिद्द चिकाटी मेहनतीच्या जोरावर लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत ओबीसी प्रवर्गातून 202 क्रमांकाने तो उत्तीर्ण झाला आहे.

हंडरगुळी गावाचे नाव उज्वल करून तो हंडरगुळी ग्रामीण भागातील पहिला आयएएस होण्याचा मान पटकावला आहे. या उज्वल यशाबद्दल उदगीर तालुक्यात आनंद व्यक्त होत आहे. रामेश्वर सब्बनवाड यांचे प्राथमिक शिक्षण गावातच रामराव पाटील प्राथमिक विद्यालय हंडरगुळी येथे झाले, ६ ते १० शिक्षण लातूर येथील जवाहरलाल नवोदय विद्यालयात झाले. ११-१२ वी चे शिक्षण भारतीय जैन संघटना पुणे येथील विद्यालयात झाले असून, सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पुणे येथील शासकीय महाविद्यालयात पूर्ण केले.

चांगल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना त्यांनी स्वतः शिकवनी घेऊन स्वबळावर स्पर्धा परीक्षा दिली परंतु त्यांना प्रथम त्यात यश आले नाही दुसर्यांदा ध्येय उद्दिष्ट जिद्द चिकाटी अहोरात्र मेहनतीच्या अभ्यासाने त्यांना दुसऱ्यांना यश प्राप्त झाले आहे.

वडिलांचे गावात छोटेसे किराणा दुकान आई वडील व दोन भाऊ असून त्यांना उच्च शिक्षण देण्याचा त्यांचा मानस असून रामेश्वर सब्बनवाड यांनी इतर मागास वर्गात (OBC) प्रवर्गात लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उज्वल यश संपादन केल्याबद्दल तो मोठा अधिकारी होणार असल्याचा आनंद आई वडील भाऊ व गावातील नागरिकांना होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल गावातील शिक्षणप्रेमी नागरिक ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले असून तालुक्यात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मारेगाव शहरात होणार सुसज्ज डॉ आंबेडकर अभ्यासिका व छत्रपती शिवाजी महाराज उद्यान

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 
 
मारेगाव : शहरात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आजूबाजूच्या ग्रामीण भागातून शिक्षण घ्यायला येतात,त्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे,पोलिस भरती ची तयारी करणारे विद्यार्थ्यांचे संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, शहरात एकही अभ्यासिका नसल्याने विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत होती. त्यामुळे शहरात सुसज्ज अशी अभ्यासिका असावी अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होती. मात्र यासाठी कोणीही पुढाकार घ्यायला तय्यार नव्हते. परंतु नगरसेवक जितू नगराळे यांनी याबाबत पुढाकार घेतला. त्यांनी शंकर मडावी नगरसेवक यांना सोबतीला घेतले आणि त्यांच्या प्रभागातील खुल्या स्पेस वर मारेगावतील सर्वात मोठे उद्यान बांधायचं निश्चय केला. जेणेकरून प्रभाग क्रमांक १७ मधील लोकांसाठी उपयुक्त पडेल. आणि उद्यानामध्ये एका भागात सुसज्ज असे ग्रंथालय बांधण्याचे ठरविले.
आज मारेगाव शहरात सर्वात मोठे उद्यान आणि ग्रंथालय प्रभाग क्रमांक १७ मध्ये मंजूर करण्यात आले आहे. तसेच संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव ग्रंथालयासाठी आणि रयतेचे राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव उद्यानासाठी एकमताने मंजूर करण्यात आल्याने नगरपंचायतीच्या सर्व नगरसेवकांचे विशेष आभार. तसेच यामुळे सर्व समाजात आनंदाचे वातावरण आहे. मारेगाव शहर नेहमीच एकोप्याने राहतात हे यातून दिसून येते. यासाठी जितू नगराळे यांनी विशेष प्रयत्न केले आणि त्यांना शंकरराव मडावी यांनी साथ दिली. 
पुढील काळातही मारेगाव नगरपंचायतसाठी जास्तीत जास्त निधी आणणार असल्याचे जितू नगराळे यांनी सांगितले.