सिंदोला माईन्स येथे लसीकरण मोहीम राबवून ४० चिमुकल्यांचे केले पोलियो लसीकरण

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : पोलियो या शारीरिक अपंगत्व निर्माण करणाऱ्या आजाराची लक्षणे मुलांमध्ये उद्भवू नये व या आजाराची मुलांना लागण होऊ नये म्हणून शासनाकडून आरोग्य विभागांतर्गत पोलियो लसीकरण मोहीम मागील अनेक वर्षांपासून राबविली जात आहे.

काल २७ फेब्रुवारीला या पोलियो लसीकरण मोहिमेंतर्गत तालुक्यातील ए.सी.सी. सिंदोला माईन्स येथील ऑक्युपेशनल हेल्थ सेंटर येथे पोलियो लसीकरण शिबीर घेऊन ३५ ते ४० चिमुकल्यांना पोलियोचे डोज देण्यात आले. सिंदोला माईन्स, हनुमान नगर व येणक या गावातील जनतेने या शिबराचा लाभ घेऊन आपल्या मुलांना पोलियोचे लसीकरण करवून घेतले. पोलियो लसीकरणाबाबत विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत असली तरी स्थानिक पातळीवर आरोग्य विभागाकडून आरोग्य सेवक व सेविकांमार्फत गावागावात लसीकरण मोहीम राबवावी लागते. लसीकरणाकरिता नागरिकांना प्रोत्साहित करावे लागते. एस.सी.सी. सिंदोला माईन्स येथे ऑक्युपेशनल हेल्थ सेंटरच्या माध्यमातून पोलियो लसीकरण मोहीम राबविण्यात आली. हेल्थ सर्विसच्या जी.डी.एम. डॉ. अपर्णा झवेरी व ए.सी.सी. सिमेंटचे जनरल मॅनेजर सुरेश वांढरे यांच्या मार्गदर्शनात ही पोलियो लसीकरण मोहीम राबविण्यात आली.

या लसीकरण मोहिमेच्या यशस्वीतेकरिता अंगणवाडी सेविका सुनिता पाटिल, आशा सेविका निशा रामटेके, मदतनीस दुर्गा गेडाम, ओ.एच.सी. एसीसी स्टाफ नर्स मंदा चंदनखेडे, ओ.एच.सी. फार्मासिस्ट वैभव उपाध्ये आदींनी परिश्रम घेतले.

शालेय विद्यार्थ्यांना सवलत द्या - अखिल भारतीय संविधानिक हक्क परिषदची मागणी

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी : खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरिता आकारण्यात येणाऱ्या प्रवास शुल्कात पन्नास टक्के घट करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी संविधानिक हक्क परिषद ने वाहतूक विभागाकडे निवेदनातून केली आहे.

कोरोना मुळे शाळा-कॉलेज बंद होते. आता मात्र, शाळा सुरु झाल्याने विद्यार्थी शाळा व ट्युशन क्लासेस करिता ग्रामीण भागातून शहरात येरजाऱ्या करतात. मात्र, फायदा घेऊन खासगी प्रवासी चालक त्यांच्याकडून अतिरिक्त तिकिटाचे दर वसुल करीत आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असून यात सवलत देण्यात यावी अशी मागणी संतोष आत्राम, काजल मेश्राम, खुशबू तेलतुंबडे, स्टेलीन घोष, प्रगती कडू, जया राजूरकर, साक्षी श्रीवास्तव, अंजु चव्हाण व विद्यार्थ्यांनी केली आहे.

संताजी ब्रिगेडचे काम वाखाण्याजाेगे व काैतुकास्पद - संगिताताई तलमले

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

नागपूर : उपराजधानी नागपूरातील संताजी ब्रिगेड तेली महासभाचे काम उल्लेखनिय व वाखाण्याजाेगे असल्याचे मत ए.आय.सी.सी. नॅशनल काे - ऑर्डीनेटर प्रदेशच्या कार्यकारी अध्यक्षा संगिताताई तलमले यांनी व्यक्त केले.

संस्थेचे संस्थापक व सचिव अजय धाेपटे यांनी अथक परिश्रम घेवून त्यांनी या संस्थेला पुढे नेण्याचा आटाेकाट प्रयत्न केला ताे खराेखरचं अभिनंदनिय काैतुकास्पद असल्याच्या त्या पुढे म्हणाल्या. नागपूरातील जवाहर विध्यार्थी गृहात काल शनिवार दि.२६ फेब्रुवारीला आयोजित केलेल्या भव्य महिला मेळावा तथा विनामुल्य आराेग्य शिबिर उद्घाटनाच्या निमित्ताने त्या बाेलत हाेत्या. या वेळी उपस्थित महिलांना संगिताताई तलमले यांनी माेलाचे मार्गदर्शन केले. सदरहु आयाेजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रमेशजी गिरडे यांनी विभूषित केले हाेते. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने वेळी एका पथनाट्याचे आयोजन करण्यात आले हाेते. पार पडलेल्या या पथनाट्यातील कलावंताची अनेकांनी प्रशंसा केली. या वेळी एका रक्तदान शिबीर व आरोग्य शिबीराचे आयोजन देखिल करण्यात आले हाेते. अनेकांनी या शिबिराचा लाभ घेतला असल्याचे आयाेजकानी आमच्या प्रतिनिधीशी बाेलतांना सांगितले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पूर्व नागपूरचे आमदार कृष्णाजी खापर्डे, माजी महापाैर शेखर सावरबांधे, कामठीचे आमदार राधेश्याम हटवार, मनपा नागपूरच्या उपमहापाैर मनिषाताई धावडे, कन्हान नगर परिषदेच्या नगराध्यक्षा करुणा आष्टनकर, पारशिवणी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रतिभा कुंभलकर मंगला गवरे, कल्पनाताई कुंभलकर ,रेखा साकोरे, वंदना भुरे, समिता चकोले, अभिरुची राजगिरे, वंदना चांदेकर, जयश्री वाडीभस्मे, कुसुम बावनकर, शिला कामडे नंदा लोहबरे, मनपा माजी नगरसेविका नयना झाडे, प्रामुख्याने उपस्थित हाेत्या. कार्यक्रमाचे संचालन चित्रा माकडे यांनी केले. संताजी ब्रिगेड तेली समाज महासभाच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजय धाेपटे, विजय हटवार, हितेश बावणकुळे, रुपेश तेलमासरे, गजानन तळवेकर, मंगेश साखरकर, कुमार बावणकर, आदींनी अथक परिश्रम घेतले.

आयोजित उपराेक्त कार्यक्रमाला महिला व तरुणींची उपस्थिती लक्षणिय हाेती.

स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळतांना निर्माण होऊ लागल्या आहेत अनेक अडचणी


सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे

वणी : गरीब लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य खरेदी करतांना मोठ्या अडचणी येऊ लागल्या आहेत. रेशनकार्ड धारकांना धान्य खरेदी करण्याकरिता स्वस्त धान्य दुकानाच्या चकरा माराव्या लागत असल्याने ते कमालीचे वैतागले आहेत. कधी धान्य उपलब्ध नसते, तर कधी तांत्रिक बिघाड व सरवर डाऊन राहत असल्याने लाभार्थ्यांना आल्यापावली परत फिरावे लागत आहे. धान्य मिळण्याचा कोणताही ठरलेला कालावधी नसल्याने मजुरी बुडवून दूर वरून धान्य मिळण्याच्या आशेने येणारे मजुरही धान्याच्या उप्लब्धतेअभावी हताश होऊन परत जातात. बहुतांश स्वस्त धान्य दुकाने राहुटी वस्त्यांपासून २ ते ३ किमी अंतरावर असल्याने लाभार्थ्यांना धान्याच्या किमती पेक्षा घरापर्यंत धान्य नेण्याचा खर्च जास्त उचलावा लागत आहे. धान्य मिळण्याचा वेळ व काळ निश्चित नसल्याने मजूरवर्ग स्वस्त धान्य दुकानाच्या चकरा मारून थकतो, व नंतर धान्य मिळण्यापासूनच वंचित रहातो. मोफत धान्य मिळण्याचाही कालावधी निश्चित नसल्याने कित्येकांना अनाजा पासून वंचित रहावे लागले. रेशनकार्डवर मिळणाऱ्या धान्यावर अनेक गरीब गरजू लोकांची उपजीविका चालते. स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे धान्य हे गरिबांच्या जगण्याचा आधार असतांना त्यांना याच धान्यापासून वंचित रहावे लागत असल्याने त्यांच्या समोर मोठ्या अडचणी निर्माण होऊ लागल्या आहे. धान्य खरेदी ऑन लाईन झाल्याने ग्राहकांचे ईपीओएस मशीनवर फिंगर मॅच झाल्यानंतरच त्यांना अनाज मिळते. परंतु नेटवर्कच्या समस्येमुळे व तांत्रिक अडचणींमुळे ही मशीन काम करत नसल्याने लाभार्थ्यांना धान्य प्राप्त करतांना मोठा त्रास सहन करावा लागत असून तासंतास रांगेत ताटकळत उभे रहावे लागत आहे. मागील काही दिवसांपासून स्वस्त धान्य दुकानातील ई-पास मशीन सातत्याने बंद पडत आहेत. या ई-पास मशीन टूजी नेटवर्कच्या असल्याने नेटवर्कच्या समस्येमुळे या मशीन काम करीत नाही. त्यामुळे मशीनवर नागरिकांचे थंब घेणे शक्य होत नसल्याने लाभार्थ्यांना ई-पास मशीन ऍक्टिव्ह होईस्तोर धान्य मिळत नाही. परिणामी त्यांना स्वस्त धान्य दुकानाच्या चकरा माराव्या लागत असल्याने त्यांचा मोठा मनस्ताप होत आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने सर्व्हर डाऊन रहात असल्याने रेशकार्ड धारकांना स्वस्त धान्य दुकानांची नुसती पायपीट करावी लागत आहे. फेब्रुवारी महिना हा २८ दिवसांचाच असल्याने व सातत्याने ई-पास मशीन बंदची समस्या उद्भवल्याने लाभार्थ्यांना अनाज खरेदी करिता काही दिवस वाढवून मिळतील काय, हा प्रश्न आता नागरिकांमधून विचारला जाऊ लागला आहे. सर्व्हर डाऊनमुळे दुपारी ३ वाजतानंतर धान्य वाटपाला सुरुवात होत असल्याने बऱ्याचशा लाभार्थ्यांना अद्याप धान्य मिळालेले नाही. उद्याची शेवटची तारीख असल्याने अनेक लाभार्थी धान्य मिळण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ई-पास मशीन बंदची समस्या दूर होई पर्यंत रेशनकार्ड धारकांना धान्य खरेदी करण्याकरिता समोर काही दिवस वाढवून देणे गरजेचे झाले आहे.

आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते पुलाचे भूमिपूजन संपन्न


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 

झरी : यवतमाळ जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या तेजापूर येथे शनिवारी (ता. २६) ला विविध भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमापूर्वी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार त्यांचे गावातील मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

तेजापूर ते निंबाळा व देऊरवाडा या गावाला जाण्यासाठी नागरिकांना सोयीचे व्हावे त्यासाठी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार स्थानिक फंडातून पुलांचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य मंगलाताई पावडे, माजी सभापती लीलाताई विधाते, दिनकर पाटील पावडे, सरपंच चंद्रभागा सहारे, आशु पानघाटे, गजानन मालेकर, आशिष मालेकार , भैयाजी भोयर, आशिष उमाटे, सचिन झाडे, मधुकर धांडे, कानोबा झाडे, गणेश काकडे ,छगन मालेकर, अमोल सहारे, व इतर गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, गावकरी मोठ्या संख्येने हजर होते.