दिव्यांग बांधवाच्या विविध मागण्यासाठी चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिले गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

सह्याद्री न्यूज नेटवर्क |

किनवट : येथील गटविकास अधिकारी यांना दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली किनवट तालुका अध्यक्ष अंकुश राठोड, महीला अध्यक्ष बालीताई जागनेवाड, शिष्टमंडळ गटविकास अधिकारी व नायब तहसीलदार किनवट यांना भेटून निवेदनातील प्रश्नावर चर्चा करीत असता दोन्ही अधिकारी यांना ऊतर देता आले नाही. 
     
आज दिनांक 24 फेब्रुवारी रोजी निवेदन देण्यात आले यावेळी डाकोरे पाटिल यांनी गटविकास अधिकारी यांना सात प्रश्न व तहसिलदार साहेब यांना नऊ प्रश्नाचे लेखी ऊतर दि 9 मार्च 22 पर्यंत दोन्ही कार्यालयाकडून निवेदनाद्वारे माहिती व हक्क खालील मागण्याची दखल न घेतल्यास दि 13 मार्च 22 पासुन जिल्हाधिकारी नांदेड येथे दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेतृत्वाखाली बेमुधत धरणे व आंदोलन करण्याचा इशारा दिला.

 दिव्यांग बांधवाच्या मागणी असलेले प्रश्न पुढील प्रमाणे :

1) दिव्यांग मित्र अॅप नांदेड
दिव्यांग व्यक्तीसाठी असलेल्या समाज कल्याण विभागाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व सुविधा दिव्यांगाला घरपोच मिळण्याकरीता दिव्यांग मित्र अॅप नांदेड ची निर्मिती नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री व माजी जिल्हाधिकारी नांदेड यांनी केली व एकही दिव्यांग वंचित राहू नये वेळेचे बंधन वेळापञक 14 जुलै ते 31 जुलै 20 नाव नोंदणी व दि .1 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट 20 पर्यंत छाननी व 15 ऑगस्ट 20 ला लाभ देण्याचे व एकहि दिव्यांग वंचित राहिल्यास कार्यवाही करण्यात येईल असे लेखी आदेश दिले असता अठरा महिन्यात आपल्या तालुक्यात किती दिव्यांगाची दिव्यांग मिञ अँप मध्ये नोंदणी,मंजुरी,किती दिव्यांगाना लाभ दिला वरीष्ठाचे वेळापञक व आदेश न माननार्या अधिकारी यांच्यावर आपण काय कार्यवाही केली.त्याची यादीसहित माहिती त्वरित देण्यात यावी.
2) दिव्यांग कायदा 2016 ची अंमलबजावणी दिव्यांग बांधवाना सर्व सामान्य जनतेसारखे जीवन जगता यावे म्हणून त्यांना त्यांचे हक्क व अधिकार मिळावा म्हणून दिव्यांग हक्क 2016 च्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून आपल्या कार्यालयासहित किती ग्रामपंचायत ने दिव्यांगाच्या ग्रामसभा किंव्हा बैठकीत माहिती दिली त्यांची माहिती रजिस्टर सहित देण्यात यावी.
3) दिव्यांग साहित्य व पायाभूत साधने शिबीर
नांदेड जिल्ह्यातील डिसेंबर 2019 मध्ये दिव्यांगासाठी पायाभूत साधने व साहित्य मोजमाप शिबीराचे आयोजन करून लाखो रुपये खर्च करण्यात येऊन अनेक दिव्यांगाना साहित्य का मिळत नाही ते आज हि आपल्या पंचायत समिती का? पडुन आहे आज पर्यंत किती दिव्यांगाना वाटप केले किती देणे बाकी आहे त्याच्या कारणासहित लाभार्थी यादीसहित त्वरीत माहिती देण्यात यावी.
4) दिव्याग राखीव पाच टक्के निधी ग्रामपंचायत, व पंचायत समिती, येथे 2016 ते 2021 पर्यंत आज पर्यंत आपल्या तालुक्यातील किती ग्रामपंचायत व आपल्या कार्यालयातून किती वेळेस दिव्यांग निधी देण्यात आला त्या लाभार्थी रक्कमेसहित यादी देण्यात यावी. दिव्यांग पाच टक्के निधी दिला नसेल तर का देण्यात आला नाही ते कारणासहित माहिती त्वरित देण्यात यावी. 
5) म.ग्रा.रो.ह.योजनेत दिव्यांगाला काम मिळेना
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत दिव्यांगाला दरवर्षी किमान 100 दिवस गावातच रोजगार देण्याची तरतूद करण्यात आली आहे. आपल्या तालुक्यातील किती गावात दिव्यांगाना काम किंव्हा बेरोजगार बता देण्यात आला किंव्हा नाही दिला तर त्यांचे कारणासहित दिव्यांग लाभार्थी यादीसहित माहिती देण्यात यावी.
 6) दिव्यांगाला स्वयंरोज गारासाठी जागा
गावातील शासकिय व निमशासकीय कार्यालयात व कार्यालयीन परिसरात दिव्यांगाला स्वयं रोजगारासाठी 200 स्केअर फुट जागा देण्याबाबत शासन निर्णय व परिपत्रक काढण्यात आले आहे. आपल्या कार्यालयासहित किती ग्रामपंचायत ने दिव्यांगाना जागा देऊन किती दिव्यांगाना आधार दिला जर दिला नसेल तर कारणासहित लाभार्थी यादीसहित माहिती त्वरीत देण्यात यावी. 
7) दिव्यांग बांधवाना घरकुल योजनेत प्राधान्य म्हणून पाच टक्के प्रमाणे घरकुल आपल्या तालुक्यात किती गावात दिव्यांगाना लाभ देण्यात आला व नाही दिला तर त्यांच्या कारणासहीत लाभार्थी यादी देण्यात यावी.
    
यावेळी दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल, तालुका अध्यक्ष अंकुश राठोड, सचिव गणेश जाधव, महीला अध्यक्ष बालीताई जानगेनवाड, आनंदराव मेश्राम, गजानन लामसोंगे, देवराव आञाम, पायल आडे छाया वानखेडे, गोंविद वाकोडे, शेख गौस, देवानंद सोनकांबळे ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

वणी विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडुन स्वप्नील धुर्वे यांच्या नेतृत्वात ईडी च्या अधिकाऱ्यांना बांगड्या ची भेट


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चे नेते नवाब मलिक यांना ईडी कडून अटक करण्यात आली त्याचेच पडसाद आज वणी मध्ये पहायला मिळाले, वणी विभागातील युवकाच्या पुढाकारातून ईडी (ED) च्या अधिकाऱ्यांना बांगड्या चे डब्बे पोस्टा मार्फत यांचा अर्थ मंत्री भारत सरकार यांना पाठवुन निषेध आंदोलन करण्यात आले आहे.

भारत सरकार चा वित्त विभागाच्या अधीनीस्त असलेली संस्था अंमलबजावणी संचालनालय (ई.डी) यांनी राजकीय द्वेषा पोटी नवाब मलिक यांचा वर अटकेची कार्यवाही केलेली आहे. हि कार्यवाही लोकशाही साठी घातक आहे, ईडी तील सनदी अधिकारी हे केन्द्र सरकार चे बाहुले झालेले आहे, आज पर्यंतच्या इतिहासामध्ये अश्या कार्यवाही कधीच झालेली नाही.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्या करीता केन्द्र सरकार ई.डी (ED) ला हाताशी धरुन राज्यातील मंत्र्यांना बदनाम करायचे काम मोदी सरकार करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी चे जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुर्वे यांनी केला आहे. पोस्टामार्फत बांगड्या चे डब्बे उपविभागीय अधिकाऱ्यांनी मार्फत निवेदन पाठविण्यात आले आहे.
या वेळी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुर्वे, सुर्यकांत खाडे,विजय नगराळे, तालुकाध्यक्ष हेमंत गावंडे, शहराध्यक्ष मनोज वाकटी, राजु उपरकार, गुणवंत टोंगे, रामकृष्ण वैद्य,वैशाली तायडे, नागभीडकर, प्रणय बल्की, बंटी प्रेमकुंटावार, सचिन वालदे, जयस्वाल,सचीन चव्हाण,प्रणय बल्की,अनिकेत थेरे, समीर भादंकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

महसूल विभागाची धडक कारवाई, अवैध रेती वाहणारे ट्रॅक्टर जप्त

सह्याद्री न्यूज | किरण घाटे

चंद्रपूर : जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर,  राजूराचे एसडीआे संपत खलाटे व काेरपनाचे तहसीलदार महेन्द्र वाकलेकर यांचे मार्गदर्शनाखाली काेरपनाचे मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे यांनी व त्यांचे महसुल पथकांनी स्वताच्या प्राणाची पर्वा न करता आज गुरुवार दि.२४ फेब्रुवारीला भल्या पहाटे गुप्त माहितीच्या आधारे अवैध रेतीची वाहने पकडल्याचे नुकतेच वृत्त प्राप्त झाले आहे. ही अवैध रेतीची ट्रॅक्टर पकडण्यासाठी मंडळ अधिकारी पचारे व त्यांचे महसुल पथकांस अख्खी रात्र जागुन काढावी लागली असल्याचे बाेलल्या जाते.

 गेल्या काही दिवसांपासून पैनगंगा नदीच्या पात्रातुन रेती तस्करांनी महसुल विभागाच्या पथकाची नजर चुकवून व पाळत ठेवून वाहनाव्दारे रेती नेण्यांचा सपाटा लावला हाेता. या बाबत मंडळ अधिकारी पचारे यांनी या बाबतीत सर्व माहिती घेत अश्या अवैध गाैण खनिज वाहनांना पकडण्यांची जाेरदार माेहिम सुरु केली आहे. ब-याच वाहनांना महसुल पथकाच्या सहाय्याने पकडुन त्या वाहनांना दंडात्मक कारवायांसाठी तहसील कार्यालयात जमा केले आहे. वाहने पकडल्या जावू नये या साठी रेती तस्करांनी पाळत ठेवणारे राेजंदारीचे व्यक्ती या भागात ठेवले जरी असले तरी पचारे यांचे कारवाया मात्र तेवढ्याच जाेमात सुरु आहे.या भागात नित्य अवैध गाैण खनिज वाहने (वेळ प्रसंगी जीव धाेक्यात) टाकुन पकडल्या जात आहे. मुजाेर रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्यांचे काम काेरपना महसुल पथक करीत आहे. त्यामुळे अवैध रेती तस्करांचे अक्षरश: धाबे दणाणले आहे तर शासनाच्या तिजाेरीत दंडात्मक कारवायापाेटी माेठा प्रमाणात महसुल जमा हाेत आहे.दरम्यान आज पहाटेला ४ वाजता अनिल मधुकर चांदेकर व मिथुन एलय्या पवार यांचे मालकीचे असलेले अवैध रेतींची वाहने मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे, पटवारी विरेन्द्र मडावी, प्रभाकर कुळमेथे, रुपेश पाहनपटे, सुरेश नागाेशे यांनी पाठलाग करुन पकडली सदरहु पकडलेल्या वाहनांची माहिती पचारे यांनी तात्काळ तहसीलदार महेन्द्र वाकलेकर यांना देतांच त्यांनी ती वाहने तात्काळ जप्तीनामा करुन तहसील कार्यालयात जमा करण्यांस सुचित केले. याच अवैध रेती प्रकरणात काेरपनाचा रेती तस्कर अनिल चांदेकर यांचे ट्रॅक्टर पकडण्यांत आले असुन त्याने या पुर्वी अनेकदा याच भागातुन अवैध रेती वाहनाव्दारे नेली असल्याची या परिसरात चर्चा आहे. प्रथमच त्याचे अवैध रेतीचे वाहन महसुल पथकाच्या जाळ्यात अडकले.अनेकदा याच चांदेकरने अवैध रेती तस्करांच्या बाबतीत ताेंडी तक्रारी वरिष्ठांकडे केल्या असल्याचे बाेलल्या जाते. आजच्या कारवाया करतांना ही अवैध वाहने पळून जाण्याच्या बेतात असतांना महसुल पथकाने पाठलाग करुन पकडली. महसुल पथकास या वेळी धमकविण्याचा प्रकार देखिल रेती वाहतुकदारांकडुन केला गेला असल्याचे विश्वासनिय सुत्राने प्रतिनिधीस सांगितले. सदरहु वाहन चालकाजवळ वाहन परवाना नसल्याचे समजते.

या भागातील अनेक गावात शेती उपयोगी परवाना असणारे ट्रॅक्टर आता अवैध रेती वाहतुकीत गुंतली असल्याचे एकंदरीत दिसते.

राळेगाव : शिवजयंती निमित्य मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी व वितरण - अमित ढोबळे यांचा अभिनव उपक्रम


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

राळेगाव : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त प्रहार संघटनेचे अमित ढोबळे यांच्या मार्फत सावरखेड येथील मोफत ई-श्रम कार्ड वाटप करून शिवजयंती साजरी करण्यात आली.

यावेळी बोलतांना गावातील सर्व समस्या सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नरत राहील असे प्रहारचे अमित ढोबळे यांनी गावकऱ्यांना ग्वाही दिली. राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या विचाराने अमित ढोबळे यांनी आपल्या परिसरात मोठ्या उत्साहाने काम चालू केले आहे. गावातील समस्याचे प्रशासन दरबारी मांडत त्या मार्गी लावण्य्साठी नेहमी पाठपुरावा करत असतात. गावातील सर्व संघटीत कामगारांनी ई - श्रम कार्ड नोंदणी केली तसेच त्यांना कार्डचे वितरणही करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाचे उद्घाटन निलेश रोठे माजी सभापती पं.स राळेगाव यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी राहुल चिघघाटे, निलेश पिंपरे, मंगेश आत्राम, मोहन जुनघरे, काशिनाथ टेकाम, आकाश ढोबळे, मुकेश आत्राम, सुधाकर मेश्राम, स्वप्नील तोडासे, विनोद जुनघरे, साईनाथ टेकाम, दिलीप,  अनिल निंबादेवी, श्रीकांत ढोबळे, सुरेश जुनघरे तसेच इतर प्रहार सेवक उपस्थित होते.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथ संपदा प्रत्येकाने वाचली पाहीजे - शिवा प्रधान


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

अमरावती : येथील बौध्द उपासक संघ भिमटेकडी,परीसर अमरावतीच्या वतीने आयोजीत संडे मिशनचा कार्यक्रम नुकताच सपन्न झाला. 
कार्यक्रमाच्या प्रारंभी बौध्द उपासक संघाचे अध्यक्ष मा शिवा प्रधान यांचे हस्ते व प्रमुख अतिथी मा प्रभाकर गवई या मान्यवरांनी दिप प्रज्वलन करुन भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागथ भगवान गौतम बुध्द यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन केले.

बुध्द वंदना सामुहीक घेण्यात आली तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आदराणीय अशोकराव झटाले यांच्या निधनाबद्दल त्यांना सामूहीक आदरांजली देण्यात आली. तदनंतर मंचावरील मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत करण्यात आले. 
कार्यक्रमा चे प्रास्ताविक ऊपासक संघाचे कोषाध्यक्ष मा गंगाधरराव ईंगळे यांनी केले सदर कार्यक्रमामध्ये मा संजय बनसोड संचालक शासकीय ग्रंथालय महाराष्ट्र शासन मुंबई यांनी अभ्यासीकेच्या विद्यार्थ्याना स्टेज डेअरींग यावे या करीता त्यांचा समन्वय असावा असे कार्यक्रमात सांगितले. 

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष,बौध्द उपासक संघाचे अध्यक्ष, आंबेडकरी विचारवंत मा शिवा प्रधान अध्यक्षीय भाषणात बोलतांना ते म्हणाले की आजच्या दिवसी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेस आणि गांधी,यांनी अस्पृश्यतेबाबत काय केले हा ग्रंथ लिखानास प्रारंभ केला तो हा ऐतिहासिक दिवस होय डॉ बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथ संपदा खुप विपूल आहे, ती मानवाच्या ती सर्वहारा मानव मुक्तीचे सुक्त उजागर करणारी आहे. महात्मा गांधी आणि काँग्रेस अस्पृश्यांना यांनी अस्पृश्य संदर्भात काय कार्य केले कसाकसा बाबासाहेबांना विरोध झाला स्वतंञ्य मतदार संघ ईग्रजांशी गांधीचा पञव्यवहार त्यांच्या शिफारसी हा असा तत्काळातला शिरस्ता आहे माञ, बाबासाहेबांनी स्वातंञ्य समता बंधूता यांची कास धरत न्यायाची व राष्ट्राची एकात्म भूमीका घेवून कार्य केले बाबासाहेबांची कार्यप्रणाली समतेच्या अधिष्ठानावर आरुढ आहे बाबासाहेबांनी विविध ग्रंथ लिहून तमाम भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला तत्वज्ञानाची अनमोल संजीवनी दिली आहे. एक सत्याचा वैचारिक वारसा दिलेला आहे माञ, तो सर्वानी वाचणे गरजेचा आहे. बाबासाहेबांना समजून घेतांना त्यांची ग्रंथ संपदा प्रत्येकाने वाचली पाहीजे त्यामूळे बाबासाहेबांचे मनोहारी विचार सौंदर्य प्रत्येकाला मोहित केल्याशिवाय राहत नाही बाबासाहेबांच्या विचारातील सामाजीक तत्वे यांचा विचार करून समाजात एकसंघता कशी राहील या बाबीकडे सर्व जातीधर्माच्या पलीकडे जावून राष्ट्र हीत जपणे सुध्दा महत्वाचे आहे. त्यामूऴे संविधानात याची विचार सरणी अंतःर्भूत आहे तीला आपण सर्वजण मिळून जपूया आजच्या दिनाचा संकल्प धरुया असे मौलिक प्रतिपादन "संडे मिशन" या बौध्द उपासक संघाच्या कार्यक्रमात केले आहे.
या प्रसंगी उपासक संघाचे सदस्य मा प्रभाकरराव गवई व शरद सोनोनो यांच्या वाढदिवस प्रित्यर्थ त्यांना मा शिवा प्रधान यांचे हस्ते पुष्पगुच्छ व ग्रंथ त्यांना देवून अभिष्टचींतनपर सदीच्छा दिल्या, कार्यक्रमाचे सुञ संचालन आयू ज्योती बोरकर यांनी केले, आभार प्रदर्शन आयु डी के बागडे यांनी केले. 

सदर कार्यक्रमात प्रामूख्याने उपस्थितामध्ये आयु डी जी वानखडे, आयु एस बी खोब्रागडे, नामदेवराव वाघमारे, सूर्यभान बनसोड, सुधाकर राउत, प्रभाकर गवई, शरद सोनोने, अवधूत गजभीये, गोपाळ रामटेके, नलीनी नागदिवे, प्रतिभा प्रधान, अनिता रोडगे, प्रभाकर गाडगे, वर्षा गाडगे, गंगाधर ईंगळे, बापूराव गुळसुंदरे, व्यंकट खोब्रागडे, अस्मीता सोमकुवर, माला चव्हान, ज्योती बोरकर, डी के बागडे, प्राजक्ता सोमकुवर आदी उपस्थिती होती, बराच वेळ चाललेल्या या कार्यक्रमाची सांगता भिक्खूणी प्रजापती यांच्या आशिर्वाद गाथेने संपन्न झाली. अशी माहिती सहसचिव नामदेवराव वाघमारे यांनी दिली.