श्री गुरुदेव विद्यालयात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सह्याद्री न्यूज : शंकर घुगरे 
        
वणी : दि.३ जानेवारी २०२२ ला शिरपूर येथील श्री गुरुदेव विद्यालयात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याप्रसंगी वयोगट १५ ते १८ मधील तब्बल ३२० विद्यार्थ्यांनी लसीचा पहिला डोज घेतला.
      
केंद्र सरकार व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने हा लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून भारतीय संस्कृती विकास मंडळ शिरपूर चे सन्माननीय सचीव मा. पुरुषोत्तमराव कोंगरे हे उपस्थित होते. त्याचप्रमाणें प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य बंडुभाऊ चांदेकर व मा.परशराम पेंदोर, पंचायत समिती वणीच्या सदस्या सौ. वर्षाताई मोरोपंत पोतराजे, शिरपूर ग्रामपंचायत सरपंच श्री. जगदीश बोरपे, उपसरपंच श्री.मोहीत चचडा, शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी मा.प्रविणजी बोडखे, विद्यालयाचे प्राचार्य मा.ना.पुं.पिंपळकर, पर्यवेक्षक श्री. मो.ल.परचाके हे प्रामुख्याने उपस्थित होते.
         
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री. ना.पु.पिंपळकर यांनी केले तर सुत्रसंचलन प्रा. गणेश लोहे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता श्री.ना.खु.शेडामे यांनी आभारप्रदर्शन करून केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरोग्य विभाग चमू शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्र, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांचा अडेगावात संवाद दौरा


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 

झरी : संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभदादा खेडेकर यांचा विदर्भ विभागीय संवाद दौरा सुरू आहे. त्या निमित्त अडेगाव येथे भेट देऊन यवतमाळ जिल्हाअध्यक्ष अजय धोबे यांच्या अध्यक्षतेखाली हा संवाद दौरा पार पडला.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना खेडेकर यांनी संभाजी ब्रिगेडच्या अनेक सामाजिक व राजकीय विषयांवर चर्चा करण्यात आली. संभाजी ब्रिगेडचे कार्य नव्याने सांगण्याची गरज नसून तुम्ही केलेल्या कार्यातून लोक संभाजी ब्रिगेडला ओळखतात. संभाजी ब्रिगेडच्या राजकीय प्रवेशावर बोलतांना आपण जे काय काम करतो आपल्यातील जे अनेक लोक तयार झाले. आणि ते आपला विचार आपला अजेंडा ते घेऊन जाऊन आपल्या पदरात काहीतरी पाडून घेतील. आपण निर्माण केलेले सामाजिक वैचारीकतेने समाजाचा राजकीय मंडळी कडून काही फायदा होताना दिसत नाही. त्यामुळे नेतृत्व करण्याची धमक असणाऱ्या तरुणाने दुसऱ्या कुठल्या पक्षाचा दावणीला बांधला जाऊ नये.

आपल्या पंचसूत्री मध्ये राजसत्ता हा उल्लेख पूर्वीच होता. कारण देशातील कुठल्याही प्रश्नांचे उत्तराची चाबी ही राजसत्ता आहे. आणि निकोप समाज घडविण्यासाठी ही चाबी आपल्या हाती असणे गरजेचे आहे. मागचं काही सांगण्यापेक्षा पुढं आपल्याला काय करायचं आहे हा विचार करायला हवा. संभाजी ब्रिगेड ने पहिल्याच प्रयत्नात ३५० ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकविला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत बऱ्यापैकी आपली ताकद दाखविली. नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका या निवडणुका सुध्दा मोठ्या ताकदीने लढविणार असल्याचे यावेळी ते बोलले.

राजकारण कश्यासाठी आपले जे मूळ प्रश्न आहे. शेतकरी, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यावर अधिवेशनात कुणीही बोलायला तयार नाही. हे अधिवेशन कुत्रे मांजरी म्याव म्यावं करण्यात घालविल असे बोलत त्यांनी प्रस्थापितावर घोचक टीका करत आपल्या जातीची आपल्या मातीची लोक जो पर्यंत तिथे पोचत नाही तोपर्यंत आपले प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे सर्वांनी येणाऱ्या निवडणुकीत संभाजी ब्रिगेड ला मदत करण्याचे आव्हान यावेळी खेडेकर यांनी केले.

यावेळी मंचावर उपस्थित सुधीरदादा देशमुख, (संभाजी ब्रिगेड केंद्र कार्यकारिणी सदस्य) अजय धोबे (जिल्हाध्यक्ष यवतमाळ) मोहन पानघाटे, अशोक उरकुडे (पो पाटील) संतोष बरडे, पारखी सर हे उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम राऊत, प्रस्थावना समीर लेनगुरे (जिल्हा कार्याध्यक्ष)यांनी केली. तर आभार प्रदर्शन संदीप आसुटकार यांनी केले यावेळी शेकडो कार्यकर्ते व महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मारेगांव इथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

मारेगाव : आज कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मारेगांव इथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने एकलव्य ॲकडमी चे करियर गाईडन्स चे प्रशिक्षण देण्यात आले.

विविध उच्च शिक्षणासाठी वेगवेगळे दालन उपलब्ध असतात परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हेच माहित नसते त्यामुळे आपला ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे पडतो. परंतु आपण प्रयत्न केला तर, अशक्य काहीच नाही हेच या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पटवून दिले गेले.

या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष मा.जिवन पा.कापसे तसेच एकलव्य ॲकडमी चे चव्हाण सर,तायडे सर आणि प्राचार्य हेमंत चौधरी, प्राध्यापक मंडळी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोष्ठाळा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभिवादन


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
           
पंचायत समिती राजुरा अंतर्गत जि प उ प्राथ शाळा कोष्ठाळा येथे पहिल्या महिला शिक्षिका, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 'जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा 'या अभियानाअंतर्गत बालिका दिन म्हणून साजरा करण्यात आला. 
                       
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कल्पना वारकरी मॅडम होत्या तर श्री जनार्दन मेश्राम, श्री. विजयकुमार लांजेवार विषय शिक्षक, श्री वृक्षप्रेमी भास्कर सर, सहाय्यक शिक्षक,व श्रीमती सुरेखा मेश्राम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
             
सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला व दीप प्रज्वलित करण्यात आले. याप्रसंगी सौ कल्पना वारकरी मॅडम यांनी आजच्या मुलींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन उच्च शिक्षण घेऊन आपली प्रगती करावी असे सांगितल.

याप्रसंगी शाळेतील विद्यार्थीनी कु. सिमरन शेख, कु. नाजीया शेख, कु. अल्फिया शेख, कु. गौसिया शेख यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर माहिती दिली तर ज्ञानेश्वरी तुंबडे, पलक ठाकरे, वैष्णवी जाभोर, पल्लवी एकोणकार या विध्यार्थीनीनी गीते सादर केली.
          
या संपूर्ण कार्यक्रमाचे सुंदर संचालन व आभार प्रदर्शन शाळेतील उपक्रमशिल शिक्षक वृक्षप्रेमी भास्कर सर यांनी केले. असे शाळेचे प्रसिद्धीप्रमुख वृक्षप्रेमी भास्कर सर कळवितात.

तरुण मुख्यध्यापकाचा "सेवानिवृत्ती सत्कार...

सह्याद्री न्यूज : कुमार अमोल 

झरी : आचार्य विनोबा भावे एज्युकेशन सोसायटी, लातुर द्वारा संचालित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा, मार्की बु.येथील माध्यमिक मुख्याध्यापक हसतमुख तरुण दिसणारे पंढरीनाथ राजेश्वर सोनटक्के हे दि.३१.१२.२०२१ रोजी सेवानिवृत्त झाले. त्या निमित्ताने संस्थने त्यांच्या प्रदिर्घ सेवेचा सन्मान म्हणून संस्थेचे सचिव मधुकर एकुर्केकर यांच्या वतीने त्यांचे बंधु अण्णाजी काबंळे यांनी सत्कार मूर्तीचा शाल व श्रीफळ देवून सत्कार केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राथमिक मुख्याध्यापक .प्रकाश पाटील होते.

 यावेळी दशरथ विधाते,अलामे, पावडे, बदकी ,सोनाळे, मॅकलवार , किनाके, सोनकाबंळे,गझलवार ,ठावरी, कु.भोयर मॅडम,कु.बावणे, छत्रपती मेंढे,शालिक बांदुरकर, गजानन मुत्यलवार, आत्माराम आत्राम, ताटेवार, दुरुडकर, बुच्चे, जांभुळकर, जुनगरी, दुर्लावार, ठाकरे, पोर्लजवार हे सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रकाश पाटील यांनी अध्यक्षीय भाषणातून सत्कार मूर्तीच्या ३३वर्ष सेवेच्या कारकीर्दीत त्यांनी शाळा व आदिवासी विद्यार्थ्यासाठी केलेले कार्याची माहिती उपस्थित विद्यार्थ्यासमोर विषद केली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अलामे तर आभार प्रदर्शन अमोल सोनकाबंळे यांनी केले.