प्रदुषणाचा हाेताेय नागरिकांना अधिक त्रास- लॉयडस् मेटल कंपनीच्या विराेधात घुग्घुस शहर काँग्रेसचे आंदोलन


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : औद्योगिक नगरी म्हणून आेळख असणा-या घुग्गुस शहरात आज गुरुवार दि. ३० डिसेंबरला सकाळी ११ वाजता स्थानिक गांधी चौक पासून तर लॉयड्स मेटल कंपनी गेट पर्यंत शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजू रेड्डी यांच्या नेतृत्वात लॉयड्स मेटल कंपनीच्या विरोधात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

या माेर्चात महिला नेत्या संगीता बोबडे, निर्मला जोगी, पुष्पा नक्षिणे यांचेसह शहरातील अन्य महिला व युवक कार्यकर्ते सहभागी झाले हाेते. आंदाेलनाच्या संदर्भात राजू रेड्डी यांनी समाज माध्यमातून दाेन दिवसांपुर्वीच या मोर्चात माेठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभागी हाेण्यांचे आवाहन केले हाेते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिक या मोर्चात सहभागी झाले हाेते. घुग्गुस वासियांच्या दृष्टीकाेणातुन त्यांच्या मागण्या रास्त हाेत्या. सदरहु कंपनीच्या प्रदुषणामुळे स्थानिक नागरिकांना बराच त्रास करावा लागत असुन विविध आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे बाेलल्या जाते. त्याच साेबत या कंपनीत स्थानिकांना राेजगार न देता बाहेरच्या लाेकांना राेजगार देत असल्याची खंत अनेकांनी या वेळी बाेलून दाखविली.

गांधी चौकातुन घोषणा देत निघालेला हा मोर्चा लॉयड्स मेटल कंपनीच्या गेटवर पाेहचला त्या ठिकाणी लॉयड्स मेटल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आंदाेलनकर्त्यांशी चर्चा केली नंतर मागण्यांचे एक लेखी निवेदन त्यांना सादर करण्यांत आले. या माेर्चाने आज नागरिकांचे लक्ष वेधून घेतले हाेते.
 

चंद्रपूर : येत्या नविन २०२२ या वर्षात एक सुट्टी जाहीर करा - क्रां.नारायणसिंह उईके आदिवासी विकास संस्थेची जिल्हाधिका-यांकडे मागणी

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : विदर्भातील चंद्रपूर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असुन याच प्रदेशात बाबुराव शेडमाके या स्वातंत्र्यविरांचा जन्म झाला आहे. तदवतचं जल, जंगल, जमीन या साठी आपल्या प्राणाची आहुती देणारे जननायक बिरसा मुंडा हे क्रांतिकारक आहे. तसेच संयुक्त राष्ट्रसंघाने आदिवासीच्या हक्क व अधिकारांच्या संरक्षणासाठी एक जाहिर नामा प्रसिध्द करुन ९ ऑगष्ट हा जागतिक आदिवासी गाैरवदिन घाेषित केल्याचे सर्वश्रूतच आहे. उपरोक्त तीन दिवसांचे आदिवासी समाजाला फार महत्व आहे. एव्हढेच नाही तर त्यांच्याशी या समाजाच्या भावना जुळल्या आहे. वरील सर्व बाबीचा विचार करता ९ ऑगष्ट, २१ ऑक्टाेबर किंवा १५ नाेव्हेंबरला (या पैकी एका दिवसाला) एका दिवसाची आपल्या अधिकार क्षेत्रातील सार्वजिक सुट्टी जाहिर करावी अश्या आशयाच्या मागणीचे एक लेखी निवेदन चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना आज गुरुवार दि.३० डिसेंबरला क्रां. नारायणसिंह उईके आदिवासी विकास संस्थेच्या वतीने सादर करण्यांत आले.
 
सदरहु निवेदन सादर करतांना जागर तथा उपरोक्त संस्थेचे अध्यक्ष अशाेक तुमराम, बिरसा क्रांति दलाचे सचिव जितेश कुळमेथे, अ.भा.आदिवासी युवा परिषदचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गेडाम, आदिवासी विद्यार्थी संघचे कंटु काेटनाके, सामाजिक कार्यकर्ता अशाेक उईके, बिरसा क्रांति दलचे राहुल पेंदाम आदीं उपस्थित हाेते.

लाखापूर येथील युवकाने केली गळफास घेऊन आत्महत्या


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या लाखापूर येथील एका (22 अंदाजे) वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दुपारी 1 वाजताच्या दरम्यान घडली.

विठ्ठल सुनील कनाके रा. लाखापूर असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार तो एकटा घरीच होता त्याचे आईवडील बाहेर गावी गेले होते. त्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मारेगाव पोलीस स्टेशन ला देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यात आल्यानंतर मृत्यूदेह शवविच्छेदनासाठी मारेगाव रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे माहिती आहे.

विठ्ठलच्या आत्महत्या चे कारण अस्पष्ट असून त्याच्या पाठमागे आई वडील दोन बहिणी असा आप्त परिवार आहे.
पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

चिमूर नगर परिषद च्या परिसरात अस्वच्छता, प्रशासनाचे दुर्लक्ष?

 सह्याद्री न्यूज | विलास पिसे 

 चिमूर : नगर परिषद अंतर्गत क्षेत्रात स्वच्छता होत नसल्याने जनतेचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असल्याने नप प्रशासनाने दखल घेण्याची मागणी कांग्रेस शहर मीडिया प्रमुख पप्पूभाई शेख यांनी केली आहे.

नगर परिषद ला मागील ऐक वर्षांपासून प्रशासन बसले तेव्हा पासून नगर परिषदचे कोणत्याही कामाकडे लक्ष नाही स्वच्छता आणि नाल्या सफाईची निविदा काढण्यात आली काही महिने ठेकेदारने कामे केली पण ठेकेदारने मजुरची मजुरी दिली नाही म्हणून मागील काही महिने महिन्यापासून नाल्या उपसा झाल्या नाही. त्यामुळे नालीतील पाणी प्रवाह वाहत नसल्याने पाणी साचून राहत असल्याने मच्छर वाढत आहे. रस्त्याची साफसफाई होत नसल्याने रस्त्याच्या कडेला कचरा ढिग पडून आहे. कचरा गाडी दोन,तिन दिवसानंतर योतो पण काही प्रभागात सातही दिवस येत नाही,आणि सार्वजनिक विहीर, हेंण्ड पंप ( बोरिंग )ला सुद्धा ब्लिचिंग पावडर टाकत नसल्याचा प्रकार निदर्शनास येत असल्याने याकडे नगर परिषद प्रशासन चे दुर्लक्ष होत असल्याने जनतेचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
करिता नगर परिषद प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन सफाई ठेकेदारावर कार्यवाही करावी आणि नगर परिषद ने स्वच्छताकडे लक्ष देऊन पूर्णपणे कामे करावी असी मागणी चिमुर कांग्रेस शहर मीडिया प्रमुख पप्पूभाई शेख यांनी केली आहे. 
अन्यथा सफाई कर माफ करण्यात यावे.

राेशन-कल्याणीचे अतुट प्रेम; त्यांचे जीवन साथी हाेण्याचे स्वप्न साकारले !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे

चंद्रपूर : जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील नेरी या गावी काल महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या पुढाकारातुन राेशन रघुनाथ कडवे व कल्याणी परसराम कामडी यांचा प्रेमविवाह पार पडला.

हे प्रेमी युगुल चिमूर या एकाच गावचे रहिवाशी असून या दाेघांचे एकमेकांवर ब-याच दिवसांपासून अतुट प्रेम हाेते.या विवाहाला प्रेमी युगुलाच्या परिवारांकडुन विरोध दर्शविला जात हाेता. परंतु प्रेमात आकंठ बुडालेल्या या प्रेमी युगुलांनी जीवनसाथी बनण्यांचे वचन घेतल्यामुळे त्यांनी थेट आंतरजातीय प्रेम विवाहासाठी नेरीच्या तंटामुक्ती समितीकडे अर्ज सादर केला.

समितीच्या पदाधिका-यांनी त्यांचे सर्व जन्मतारखेच्या दाखल्यासह इत्तर कागदपत्रांची तपासणी करुन नेरी ग्राम पंचायतच्या परिसरात विवाह लावून दिला. सध्या नेरीत या प्रेमविवाहची एकच चर्चा ऐकावयास मिळत आहे.