दालमिया कंपनी समाेरील प्रकृती चिंताग्रस्त असलेल्या सातही उपाेषणकर्त्यांना पाेलिस बंदाेबस्तात चंद्रपूर शासकीय रुग्णालयात हलविले !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
 
चंद्रपूर : जिल्ह्याच्या काेरपना तालुक्यातील नारंडा येथील दालमिया कंपनी समाेर काही कामगारांनी आपल्या रास्त मागण्यांसाठी दि.२३ नाेव्हेंबर पासून बेमुदत अन्नत्याग आंदाेलन पुकारले हाेते. दरम्यान, आज सोमवार दि.२९ नाेव्हेंबरला सकाळी त्या सात ही उपाेषणकर्त्यांची डॉक्टर मंडळीकडुन वैद्यकीय तपासणी करुन त्यांना पाेलिस बंदाेबस्तात चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

या वेळी महसुल विभागासह पाेलिस विभागाचे वरिष्ठ पाेलिस अधिकारी हजर हाेते. दाेन दिवसांपूर्वी उपाेषणकर्त्यां पैकी अशाेक निळकंठ कुचनकर, निळकंठ बाळकृष्ण लांडगे व हरीदास दशरथ धानाेरकर या तिघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक हाेती त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी एक वैद्यकीय पथक उपाेषण मंडपात आले हाेते परंतु उपाेषण कर्त्या कामगारांनी त्यांना आपली वैद्यकीय तपासणी न करता ते पथक परतुन लावले हाेते. विशेष म्हणजे पाेलिस विभागातर्फे बेमुदत उपाेषण आरंभ झालेल्या दिवसांपासून या ठिकाणी कडेकाेट पाेलिस बंदोबस्त ठेवण्यांत आला हाेता तर महसूल प्रशासनाच्या वतीने कायदा, शांतता व सुवस्था ठेवण्याच्या दृष्टीकाेणातुन काेरपनाचे तहसीलदार महेन्द्र वाकलकर यांनी नायब तहसीलदार प्रविण चिडे, मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे, पटवारी विशाल काेसनकर, काेतवाल रुपेश पानपटे यांची या उपाेषण स्थळी नेमणूक केली हाेती. सदरहु उपाेषण मंडपात एकूण सात कामगार बेमुदत उपाेषणास बसले हाेते.
 
उद्या मंगळवार दि.३० नाेव्हेंबरला कामगार मागण्यांचे संदर्भात एक बैठक काेरपना तहसील कार्यालयात बाेलविण्यांत आली असुन तश्या आशयाचे पत्र दालमिया कंपनी व्यवस्थापक, मनसे नेते सचिन भाेयर व पाेलिस निरीक्षक काेरपना यांना पाठविण्यांत आले आहे. ही बैठक उपविभागीय अधिकारी राजूरा यांचे अध्यक्षतेखाली दुपारी १२ वाजता हाेत असल्याचे समजते.

चंद्रपूर मनपाचा भाेंगळ कारभार जनता त्रस्त, नगरसेवक करताेयं दुर्लक्ष

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : नगर परिषदेचे रुपातंर महानगर पालिकेत झाल्या नंतर चंद्रपूरकरांना सर्व सुविधा उपलब्ध हाेवून लाेकांचे प्रश्न व समस्या जलद गतीने दूर हाेतील अशी अपेक्षा हाेती. पण आज ही येथील जनतेला अनेक समस्यांना ताेंड द्यावे लागत असल्याचे चित्र सध्या चंद्रपूर शहरात दृष्टीक्षेपात पडु लागले आहे.

दरम्यान, याच समस्या अडचणी व प्रश्ना बाबत राजकीय पक्षाचे नेते व कार्यकर्ते प्रत्यक्षात आपला आवाज बुलंद करु लागल्याचे एकंदरीत दिसत आहे. रविवार दि.२८ ला स्थानिक विक्तु बाबा मंदिर जवळील माहेर घर परिसर येथे महानगर पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे चुकीच्या पद्धतीने नालीचे अर्धवट काम केल्याने वाहत आलेले संडास व बाथरूम चे सांड पाणी हे तेथील नागरिकांच्या घरात शिरत असून संपूर्ण परिसरात ही घाण पसरून आजूबाजूच्या लोकांना रोगराईला समोर जावे लागत आहे .या आशयाची तक्रार तेथील नागरिकांनी आपचे शहर सचिव राजु कुडे यांच्या कडे केली.
परिसरातील लोकांनी आपचे कुडे यांना तक्रार करतांना सांगितले की, या भागातील ४ लोकांना मागील काही दिवसांत डेंग्यू झाला. त्या मुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले होते.
वारंवार नगर सेवक यांना तक्रार करून सुध्दा ते या कडे दुर्लक्ष करीत असल्याचे तेथील नागरिकांनी या वेळी सांगितले.

जाणीव पूर्वक नालीचे अर्धवट काम करून जनतेचा जीवाला धोका निर्माण केला आहे. ही बाब अतिशय गंभीर असून संबधित दोषी अधिकारी व ठेकेदारावर फौजदारी कारवाई करण्यात यावी या शिवाय अर्धवट नालीचे बांधकाम पूर्ण करावे अशी मागणी जनतेनी केली आहे. या बाबतीत जनतेला न्याय मिळाला नाही तर,आम आदमी पार्टी बाबुपेठ परिसरातील जनतेला सोबत घेऊन आंदोलन करेल असा इशारा आपचे शहर सचिव राजु भाऊ कूडे यांनी आज दिला आहे 

या वेळेस आपचे शहर सचिव बाबाराव खडसे, दीपक निपाणे, सागर बोबडे, सुखदेव दारुंडे, श्रीराम खंडाळे, सुजाता बोदेले, प्रवीण चूनारकर, जयदेव देवगडे, सुमित रायपुरे, चंदू माडूरवार, विशाल रामगिरवार, करण नक्षिने, जयंत थूल, महेश गुप्ता, अंजू रामटेके, स्मिता लांडे, छाया इदे, विभा कुळमेथे, इंदिरा आलाम, महेश आलाम आदीं कार्यकर्ते उपस्थित होते.

शहरातील वार्ड क्रमांक दोन मधील गौरकार ले-आऊट येथे उभारण्यात येणाऱ्या मोबाईल टॉवरला नागरिकांचा विरोध

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : शहरातील वार्ड क्रमांक 2 मधील गौरकार ले-आऊट येथे एयरटेल मोबाईल नेटवर्क कंपनीचे टॉवर उभारणीचे काम सुरु असून, याठिकाणी टॉवर उभारण्याला स्थानिक रहिवासीयांनी विरोध दर्शविला आहे. अगदी नागरिकांच्या निवासस्थाना जवळच हे टॉवर उभारले जात असल्याने या टॉवरचे काम थांबवुन टॉवर उभारणीला दिलेले ना हरकत प्रमाणपत्र नगर पालिकेने रद्द करण्याची मागणी गौरकार ले-आऊट मधिल नागरिकांनी न.प. मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.

या टॉवरला विरोध दर्शविण्याकरिता येथील नागरिक आमदार संजीवरेड्ड़ी बोद्कूरवार यांच्या निवासस्थानी धडकले. तसेच उपविभागीय अधिकारी यांनाही निवेदन देऊन नागरिकांच्या निवासस्थानाजवळ एयरटेल मोबाईल नेटवर्क कंपनीचे टॉवर उभारू न देण्याची मागणी करण्यात आली आहे. टॉवर उभारण्याला दिलेली एनओसी रद्द न केल्यास टॉवर समोरच उपोषणाला बसण्याचा इशारा येथील रहिवासीयांनी दिला आहे. 

गौरकर ले-आऊट येथे स्वमालकीच्या जागेवर एयरटेल मोबाईल कंपनीचे टॉवर उभारण्यास परवानगी देतांना येथील रहिवासीयांशी कुठल्याही प्रकारची चर्चा करण्यात आली नाही. जागा मालकाला विचारले असता त्याने नगर परिषदेकडे बोट दाखविले. न.प. नेच एनओसी दिल्याचे सांगितले. स्थानिकांची सहमती न घेता जागा मालकाने एयरटेल कंपनीशी करार करुन टॉवर उभारण्याला परवानगी देऊन नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत आज निवेदन देतांना माजी नगराध्यक्षा प्रियाताई लभाने यांनी विद्यमान नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्याशी संपर्क साधला असता त्यानी मागील तिन वर्षात कोणत्याच कंपनीच्या टॉवर उभारणीला नगर पालिकेकडून एनओसी देण्यात आली नसल्याचे सांगितले. मग हे टॉवर काय जागा मालकाच्या आपसी संबंधातून उभारले जात आहे, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. याठिकाणी सेवानिवृत्त नागरिकांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. अगदी निवासस्थाना जवळच हा टॉवर उभारला जात आहे. या टॉवर मधून निघणाऱ्या किरणांचा मानवी जीवनावर दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोबाईल टॉवर मधून निघणाऱ्या किरणांच्या घातक परिणामांतून कर्करोग व अन्य अपायकारक आजार उद्भवत असल्याचे सिद्ध झाले असतांना देखील लोकांची निवासस्थाने असलेल्या ठिकाणी मोबाईल टॉवर उभारण्याला परवानगी देण्यात आली, याचेच नवल वाटते. केवळ कंपनीच्या करारातून मिळ्णाऱ्या रक्कमेपोटी नागरिकांचं आरोग्य धोक्यात आणलं जात आहे. याला लालसा म्हणावी की, अन्य काय हेच कळायला मार्ग नाही. मोबाईल टॉवर मधून येणाऱ्या लहरी आरोग्यास घातक असतात. मोबाईल टॉवरद्वारे होणाऱ्या रेडीएशनच्या दुष्परिणामांमुळे चिमण्या, कावळे व मधमाशांची संख्या कमी होऊ लागली आहे. या लहरींचा मानवी आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याचे समोर आले असतांनाही नागरिकांच्या अगदी निवासस्थाना जवळ मोबाईल टॉवर उभारण्याला परवानगी देण्यात आली आहे. हे टॉवर उभारण्याचे काम बंद न केल्यास या टॉवर समोरच उपोषणाला बसण्याचा इशारा येथील नागरिकांनी नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनतुन दिला आहे.

नगर पालिकेने स्थानिकांची सहमती न घेता एनओसी दिली कशी, व जर नगर पालिकेने एनओसी दिली नाही तर टॉवर उभारलेच कसे, याची चौकशी होणे आता गरजेचे झाले आहे.

दालमिया कंपनी समाेर कामगारांचे आमरण उपाेषण - तिघांची प्रकृती चिंताजनक?

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : जिल्ह्याच्या काेरपना तालुक्यातील नारंडा येथील दालमिया कंपनी समाेर काही कामगारांनी आपल्या रास्त मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन दि.२३ नाेव्हेंबर पासून पुकारले असून अजून पावेताे त्यांचे मागण्या बाबत ताेडगा निघाला नाही. दरम्यान, उपाेषण कर्त्यांची नित्य वैद्यकिय पथकाकडुन तपासणी केल्या जाते परंतु शनिवार दि. २८ नाेव्हेंबर २०२१ रोजी रुग्णालयाचे एक पथक उपाेषण (मंडप) स्थळी आले असतांना उपाेषणकर्त्यांनी त्या पथकाला आपली तपासणी न करता परत पाठविल्याचे विश्वासनिय सुत्राने आमच्या प्रतिनिधीस आज संध्याकाळी सांगितले. जाे पर्यंत आम्हाला याेग्य न्याय मिळत नाही व आमच्या रास्त मागण्या पूर्ण हाेत नाही ताे पर्यंत आम्ही या मंडपातुन हटणार नाही असा निर्धार उपाेषणकर्त्यांनी केला आहे.

शासन व प्रशासनाने या आंदाेलनाची त्वरीत दखल घेणे फारच आवश्यक झाले आहे असे आता सर्व स्तरावरुन बाेलल्या जात आहे. उपाेषणकर्त्यां पैकी अशाेक निळकंठ कुचनकर, निळकंठ बाळकृष्ण लांडगे व हरीदास दशरथ धानाेरकर या तिघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे कळते.
सदरहु उपाेषण मंडप स्थळी पाेलिस विभागातर्फे तगडा पाेलिस बंदोबस्त ठेवण्यांत आला असून महसूल प्रशासनाच्या वतीने कायदा, शांतता व सुवस्था ठेवण्याच्या दृष्टीकाेणातुन काेरपनाचे तहसीलदार महेन्द्र वाकलकर यांनी नायब तहसीलदार प्रविण चिडे, मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे, पटवारी विशाल काेसनकर, काेतवाल रुपेश पानपटे यांची या उपाेषण स्थळी ड्यूटी लावली असल्याचे समजते.
 

हजरत टिपू सुलतान फाउंडेशन वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तथा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार- प्रा.नितेश कराळेंची कार्यक्रमाला उपस्थिती


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : शेर ए हिंद हजरत टिपू सुलतान यांच्या २७१ व्या जयंती निमित्त,दि.२७ नोव्हेंबरला कन्नमवार सभागृह राजुरा येथे,हजरत टिपू सुलतान फौंडेशन शाखा राजुराच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थी तथा विविध सामाजिक संस्थांचा सत्कार कार्यक्रम थाटात पार पडला. या कार्यक्रमाला उपविभागीय वन अधिकारी राजुराचे अमाेल गर्कल ,संस्थापक अध्यक्ष हजरत टिपू सुलतान फौंडेशन चंद्रपूरचे अमजद पापाभाई शेख, नगर परिषद घुग्घुसच्या मुख्याधिकारी आर्शिया जुही उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून खद खद फेम लाव्हारस मास्तर, फिनिक्स अकॅडमी वर्धाचे संस्थापक प्रा. नितेश कराळे आणि वैचारिक व्यक्तिमत्व,इतिहास अभ्यासक,लेखक असा होता टिपू सुलतान सरफराज अहमद,सोलापूर हे होते.वक्त्यांनी अतिशय प्रभावी मार्गदर्शन करून उपस्थितीतांची मने जिंकली.
सदरहु कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी,व्यक्ती व सामाजिक संस्थां इत्यादी 50 व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. या व्यतिरिक्त वरुर रोड येथील युवा सामाजिक कार्यकर्ता विशाल शेंडे यांचा देखिल या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. सदरहु कार्यक्रमाला प्रा.डॉ.संभाजी वरकड,विजय परचाके (गटशिक्षणाधिकारी) मुजावर अली (सायबर सेल,म.पो.चंद्रपूर), डॉ. येरमे दाम्पत्य, अस्लम चाऊस,इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होती.उपराेक्त कार्यक्रमाचे संचालन मुसा चांदसाहाब शेख (सदस्य HTSF राजुरा) यांनी केले.तर आभार प्रदर्शन शहबाज खान यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अध्यक्ष अस्लाम चाउस, शोएब शेख, रियाज शेख, नदीम शेख, मुसा शेख, जलाल बियाबानी, जफर खान, स्वप्नील रामटेके व हजरत टिपू सुलतान शाखा राजुराच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.