चंद्रपूरात २६ नागरिकांना मिळाला उज्वला गॅस याेजनेचा लाभ !


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरचे सचिव चंदन पाल यांनी शास्त्रीनगर प्रभागातील 26 नागरिकांना प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचा लाभ महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात मिळवून दिला. त्या निमित्ताने लाभार्थ्यांना गॅस वितरणाचा कार्यक्रम नेहरू नगर येथील समाज भवनात आयोजित करण्यात आला होता. महिलांच्या सक्षमीकरणात उज्वला गॅसचे योगदान माेठे असल्याचे भारतीय जनता पार्टी महानगरचे जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना म्हणाले. धूर मुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करणारी ही योजना असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्या नंतर उपमहापौर राहुल पावडे यांनी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले तसेच 160 नागरिकांच्या ई-श्रमिक कार्डची व 120 मतदान कार्डसाठी नोंदणी करण्यात आली.

सदरहु कार्यक्रमात भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य
तुषार सोम, महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, मंडळ अध्यक्ष विठ्ठल डुकरे, बंगाली आघाडी अध्यक्ष
दिपक भट्टाचार्य, नगरसेविका वनिता डुकरे, मंडळ महामंत्री मनोरंजन रॉय, राम हरणे, महानगर सचिव रवी जोगी, सारिका संदूरकर, सतीश तायडे, बंगाली आघाडी महामंत्री कृष्णा कुंडू, शंकर सुडीत, उमेश गुजर, अनुप देवना, प्रशांत बोबडे, आशु रॉय, राज सोनू, उमेश साळुंखे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

दालमिया कंपनी समाेर कामगाराचे उपाेषण सुरुच - ५ जणांची प्रकृती खालावली ?

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : काेरपना तालुक्यातील भारत दालमिया कारखान्यासमाेर दि.२३ नाेव्हेंबर पासून कामगारांनी आपल्या रास्त मागण्यांसाठी बेमुदत आमरण उपाेषण पुकारले असून या उपाेषणाचा आज चवथा दिवस आहे.

दरम्यान या उपाेषण मंडपात उपाेषणाला अनुक्रमे अशाेक निळकंठ कुचनकार (नारंडा), दशरथ सुधाकर वडस्कर (अंतरगांव), श्रीकांत तुळशिराम धानाेरकर (पिंपळगांव) गड, अनिल दादाजी आत्राम (नारंडा), निळकंठ बाळकृष्ण लांडगे (नारंडा), राजेन्द्र छब्बी दुर्वे (नारंडा) व जीवनलाल जगतपाल निषाद (गडचांदूर) हे बसले असून आज शनिवार दि.२७ नाेव्हेंबरला वैद्यकिय चमूने उपाेषण कर्त्यांची प्रकृती तपासणी केली असता यातील पाच कामगारांना रुग्णालयात हलविण्याचा सल्ला डॉ.मंडळीने दिला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या आधी या कामगारांनी आपल्या रास्त मागण्या पदरात पडाव्या या साठी धरणे आंदोलन पुकारले हाेते परंतु त्या आंदाेलनातुन त्यांचे मागण्यांची पुर्तता झाली नसल्याने शेवटी या कामगारांनी बेमुदत उपाेषणाचा पवित्रा उचलला. अद्याप शासन व प्रशासनाने त्यांचे या सुरु असलेल्या उपाेषणाची दखल घेतली नाही हे येथे उल्लेखनिय आहे.

सदरहु आंदोलन हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमांतुन सुरु असून आंदोलन स्थळी पाेलिस बंदोबस्त ठेवण्यांत आला आहे.

कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्‍या व्यक्ती व संस्थांना होणार दंड

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

मुंबई : राज्यात कोविड १९ या आजाराचे रूग्ण कमी झाल्यामुळे राज्य शासनाने आर्थिक, सामाजिक, मनोरंजन व सांस्कृतिक क्षेत्रावरील निर्बंध पूर्णतः लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी शिथिल केले आहेत. राज्य शासन तसेच केंद्र शासनाकडून वेळोवळी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन सेवा देणारे, मालक, परवानाधारक तसेच आयोजक यासह सर्व सेवा घेणारे, ग्राहक, अतिथी अभ्यागत यांनी करावयाचे आहे. आज जारी केलेल्या या मार्गदर्शक तत्त्वात संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता, कार्यक्रमावरील निर्बंधाची व्याख्या, कोविड अनुरूप वर्तन, स्थानिक प्रशासनाचे अधिकार, कोविड वर्तणूकविषयक नियम व दंड याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता :

तिकोट असलेल्या किंवा तिकीट नसलेल्या कोणत्याही कार्यक्रमाच्या समारंभाच्या किंवा प्रयोगाच्या आयोजनाशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्ती तसेच सर्व सेवा देणारे व सहभागी होणाऱ्या व्यक्ती (जसे की, खेळाडू, अभिनेते इत्यादी) अभ्यागत, पाहुणे, ग्राहक यांनी संपूर्ण लसीकरण केलेले असावे,कोणतेही दुकान,आस्थापना, मॉल, समारंभ, संमेलन (मेळावे) इत्यादी ठिकाणी, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींद्वारे व्यवस्थापन केले पाहिजे आणि अशा ठिकाणी येणारे सर्व अभ्यागत, ग्राहक यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असावे. सर्व सार्वजनिक परिवहन सेवांमध्ये संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी असेल.

राज्य शासनाने तयार केलेला युनिव्हर्सल पास (https://epassmsdma.mahait.org किंवा telegram-MahaGovUniversalPass Bot) हा संपूर्ण लसीकरण झाल्याच्या स्थितीचा वैध पुरावा असेल. अन्यथा, छायाचित्र असलेले वैध ओळखपत्र असलेले 'कोविन प्रमाणपत्र देखील' त्यासाठी वैध पुरावा मानले जाईल.१८ वर्षापेक्षा कमी वयाच्या नागरिकांसाठी इतर शासकीय संस्थेने किंवा शाळेने दिलेले छायाचित्र ओळखपत्र आणि वैद्यकोय कारणांमुळे ज्या व्यक्ती लस घेऊ शकत नाहीत त्या व्यक्तींसाठी, प्रमाणित वैद्यकीय व्यावसायोकांकडील प्रमाणपत्र प्रवेशासाठी कागदोपत्री पुरावा म्हणून वापरता येईल.जेथे सर्वसामान्य जनतेतील कोणतीही व्यक्ती भेट देत नाही अशी कार्यालये व इतर आस्थापना तसेच खाजगी परिवहन सेवा यांच्यासाठी संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तीसाठी त्या खुल्या असण्याची शर्त नसली तरी, त्यांना देखील संपूर्ण लसीकरण करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र राज्यात प्रवास:

महाराष्ट्र राज्यात प्रवास करताना कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्थानावरून राज्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांना केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्वे त्यांना लागू राहतील. राज्यात येणाऱ्या सर्व देशांतर्गत प्रवाशांचे एकतर यात यापुढे व्याख्या केल्यानुसार संपूर्ण लसीकरण केले जाईल किंवा ७२ तासांसाठी वैध असलेली आरटी-पीसीआर चाचणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

कोणताही कार्यक्रम, समारंभामधील उपस्थितीवरील निर्बंधामध्ये

कोणताही कार्यक्रम,समारंभ इत्यादींमधील उपस्थितीवरील निर्बंधामध्ये चित्रपट गृह, नाट्यगृह, मंगलकार्यालय सभागृह, बंदिस्त बंद जागेत घेण्यात येणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाच्या अथवा समारंभाच्या उपक्रमाच्या बाबतीत, जागेच्या क्षमतेच्या ५० टक्के लोकांना परवानगी दिली जाईल.संपूर्ण संमेलनांसाठी तेथील जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के लोकांना परवानगी दिली जाईल.संमेलनाच्या किंवा समारंभाच्या अशा ठिकाणांच्या बाबतीतील क्षमता,औपचारिकपणे आधीच निश्चित केलेली नसेल तर (स्टेडियम प्रमाणे) संबंधित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास अशो क्षमता ठरवण्याचा अधिकार असेल.

कोणत्याही संमेलनासाठी (मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या एकूण लोकांची संख्या १ हजारांपेक्षा अधिक असेल तर अशा बाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला त्याची माहिती द्यावी लागेल आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अशा कोणत्याही संमेलनाचे (मेळाव्याचे निरीक्षक म्हणून पर्यवेक्षण करण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी पाठवील आणि तेथे स्थानिक प्रशासन काटेकोरपणे अनुपालन केले जात असल्याची खात्री करतील.कोविड अनुरूप वर्तनाचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले तर स्थानिक प्रशासनाला सदर कार्यक्रम पूर्णतः किंवा अंशत: बंद करण्याचे अधिकार आहेत.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांचे अधिकार:

कोणत्याही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास जर योग्य वाटल्यास कोणत्याही क्षणी, त्यांच्या संबंधित अधिकारक्षेत्रासाठी यात नमूद केलेले निर्बंध व शर्ती वाढविता येतील.परंतु कमी करता येऊ शकणार नाहीत, मात्र,जाहीर नोटोसीद्वारे ४८ तासांची पूर्व सूचना दिल्याशिवाय तसे करता येणार नाही. या आदेशाच्या दिनांकास, अंमलात असलेले जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने लादलेले कोणतेही निर्बंध जर ते पुढे चालू ठेवण्यासाठी जाहीर नोटीस देऊन पुन्हा जारी केले नसतील तर ते ४८ तासांनंतर अंमलात असल्याचे बंद होतील.

संपूर्ण लसीकरणाची व्याख्या :

संपूर्ण लसीकरणाची व्याख्या पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे.लसीच्या दोन्हीही मात्रा (डोस) घेतल्या आहेत आणि दुसरी मात्रा (डोस) घेतल्यानंतर १४ दिवस झालेले आहेत अशी कोणतीही व्यक्ती असा आहे. ज्यामुळे त्याला किंवा तिला लस घेण्यास मुभा नाही आणि त्या व्यक्तीकडे तशा अर्थाचे मान्यताप्राप्त डॉक्टराकडील प्रमाणपत्र आहे अशी कोणतीही व्यक्ती असा आहे. किंवा कोणतीही १८ वर्षापेक्षा कमी वयाची व्यक्तो, असा आहे..

कोविड अनुरूप वर्तनविषयक नियम:

कोविड अनुरूप वर्तनविषयक नियम पुढीलप्रमाणे आहेत.कोविड १९ विषाणूचा प्रसार होण्यास प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यामुळे त्याच्या प्रसाराची साखळी खंडित करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने व संस्थेने पालन करण्याची गरज असलेले दैनदिन सामान्य वर्तन अशी कोविड अनुरूप वर्तन (CAB) या संज्ञेची व्याख्या करता येऊ शकेल. कोविड अनुरूप वर्तनाचे प्रत्येकाने सदैव पालन केले पाहिजे,सर्व संस्थांनी त्यांचे सर्व कर्मचारी, त्यांच्या परिसरांत भेट देणारे अभ्यागत,ग्राहक किंवा संस्थेच्या कोणत्याही कार्यक्रमात, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी होणारी कोणीतीही व्यक्ती,त्याचे पालन करतील आणि त्यांच्या परिसरांमध्ये किंवा व्यवसायाशी संबंधित व्यवहार करताना किंवा कार्य करताना त्यांची अंमलबजावणी करण्याकरिता संस्था जबाबदार असतील. सर्व कर्मचाऱ्यांनी कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करण्यासाठी हॅन्ड सॅनिटायझर, साबण व पाणी, तापमापक (thermal scanner), इत्यादी गोष्टी उपलब्ध करण्यासाठी देखील जबाबदार आहेत.

नेहमी योग्य पद्धतीने मास्क परिधान करा. नाक व तोंड नेहमी मास्कने झाकलेले असले पाहिजे. (रुमालाला, मास्क समजले जाणार नाही आणि रूमाल वापरणारी व्यक्ती, दंडास पात्र असेल.) जेथे जेथे शक्य असेल तेथे, नेहमी सामाजिक अंतर (६ फूट अंतर) राखा.साबणाने किंवा सॅनिटायझरने वारंवार व स्वच्छपणे हात स्वच्छ धुवा.साबणाने हात न धुता किंवा सॅनिटायझर न वापरता, नाक/डोळे/तोंड यांना स्पर्श करणे टाळा.योग्य श्वसन स्वच्छता(आरोग्य) राखा.,पृष्ठभाग निर्वामितपणे आणि बाई सर स्वच्छ व निर्जंतुक करा.खोकताना किंवा शिकताना, टिश्यू पेपरचा वापर करून तोंड व नाक झाका आणि वापरलेले टिश्यू पेपर नष्ट करा. जर एखाद्याकडे टिश्यू पेपर नसेल तर, त्याने स्वतःचा हात नव्हे तर, हाताचा वाकवलेला कोपरा नाका तोडांवर ठेवून खोकावे व शिकावे,सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा आणि सुरक्षित अंतर (६ फूट अंतर) राखा कोणालाही शारीरिक स्पर्श न करता, नमस्कार अथवा अभिवादन करा. कोविड-१९ विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी आवश्यक असलेले अन्य कोणतेही

कोविड अनुरूप वर्तनविषयक नियमांचे पालन न करणा-या व्यक्ती व संस्थांना दंड :

कोविड नियमांचे पालन न करणा-या व्यक्ती तसेच संस्था,आस्थापना या दंडास पात्र असतील. कोविड़ अनुरूप वर्तनाचे पालन न करणान्या कोणत्याही व्यक्तीला असा कसूर केल्याच्या प्रत्येक प्रसंगी रुपये ५००/- इतका दंड करण्यात येईल.

ज्यांनी आपले अभ्यागत, ग्राहक, इत्यादीवर कोविड अनुरूप वर्तन ठेवणे अपेक्षित आहे अशा संस्थेच्या किंवा आस्थापनेच्या कोणत्याही जागेत किंवा परिसरात जर एखाद्या व्यक्तीने कसूर केल्याचे दिसून आले तर, त्या व्यक्तीवर दंड लादण्या व्यतिरिक्त, अशा संस्थाना किया आस्थापनांना सुद्धा रुपये १०,०००/- इतका दंड करण्यात येईल.

जर कोणतीही संस्था किंचा आस्थापना तिचे अभ्यागत, ग्राहक, इत्यादीमध्ये कोविड अनुरूप वर्तन विषयक शिस्त निर्माण करण्याची सुनिश्चित करण्यात नियमितपणे कसूर करीत असल्याचे दिसून आले तर, एक आपत्ती म्हणून कोविड १९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत, अशी संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.

जर एखाद्या संस्थेने किंवा आस्थापनेने स्वतःच कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करण्यात कसूर केली तर ती प्रत्येक प्रसंगी रूपये ५०,०००/- इतक्या दंडास पात्र असेल. वारंवार कसूर केल्यास, एक आपत्ती म्हणून कोविड-१९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत ती संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.

जर कोणत्याही टॅक्सीमध्ये किंवा खाजगी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनात किंवा कोणत्याही बसमध्ये, कोबिड अनुरूप वर्तनात कसूर केली जात असल्याचे आढळून आले तर, कोविड अनुरूप वर्तनात कसूर करणाऱ्या व्यक्तींना, रूपये ५००/- इतका दंड करण्यात येईल,

तसेच सेवा पुरविणारे चाहनचालक, मदतनीस, किंवा वाहक यांना देखील रूपये ५००/- इतका दंड करण्यात येईल. बसेसच्या बाबतीत, मालक परिवहन एजन्सीस, कसुरीच्या प्रत्येक प्रसंगी, रुपये १०,०००/- इतका दंड करण्यात येईल.

वारंवार कसूर केल्यास एक आपत्ती म्हणून कोविड-१९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत मालक एजन्सीचे लायसन काढून घेण्यात येईल किंवा तिचे परिचालन बंद करण्यात येईल.

कोविड अनुरूप वर्तणुकी संबंधीच्या वर नमूद केलेल्या नियमांचे, अनिवार्यपणे पालन करण्यात येईल आणि त्यांचे उल्लंघन केल्यास वर नमूद केल्यानुसार दंड व शास्ती करण्यात येईल तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार कोणत्याही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे उल्लंघन करणा-यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारच्या सार्वजनिक ठिकाणी कोविड वर्तणूकीसंदर्भातील मार्गदर्शक सूचना शासनाने जारी केलेल्या आहेत.


भीमालपेन देवस्थान येथे संविधान दिवस साजरा

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

वणी : भार देश हा संविधान स्विकारण्यापुर्वी ब्रिटिश आश्रित पुरोहितशाहिच्या जबड्यात अडकलेला होता. २६ जानेवारी १९५० ला भारतदेशाने संविधान स्विकारुन सार्वभौमिक प्रजासत्ताकाचा स्विकार करुन या देशातील पुरोहित शाहीला झुगारुन दिले.
सार्वभौम लोकशाहीचा स्विकार केला. त्यामुळे भारतीय संविधान हा कुठलाही ग्रंथ नसून तो मानवी दास्यत्व व शोषण मुक्तिचा कायदेशीर आदेशनाम असल्याचे प्रतिप्रादन ट्रायबल आखाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा, अ.भा.संवैधानिक हक्क परिषचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. गीत घोष यांनी महाराष्ट्र ट्रायबल आघाडीद्वारा आयोजित संविधान दिन तथा तथा शामादादा कोलाम यांचे जयंती दिनानिमित्य केले.
 २६ नोव्हेंबर २०२१ ला भिमालपेन भिवसन देव देवस्थानाच्या प्रांगणात संविधान दिवस तथा शामादादा यांच्या जयंती अनुसंघाने या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक ट्रायबल आघाडी द्वारा करण्यात आले होते, त्या निमीत्य ते बोलत होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष ट्रायबल आघाडी तथा अ.भा.संवैधानिक हक्क परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.गीत घोष होते तर, मुख्य मार्गदर्शक म्हणून ट्रायबल आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.संतोषजी भादिकर हे होते तर,मुख्य अतिथि म्हणून मा. सौ.मंथनाताई सुरपाम, अशोकजी बेसरकर हे होते. सर्व प्रथम कोरोनामुळे ज्यांना आपला प्राण गमवावा लागला. अशा योध्यांना श्रधांजली यावेळी अर्पण करण्यात आली. 
  
या प्रसंगी यांनीही मार्गदर्शन केले.
पुढे बोलतांना घोष म्हणेल की, भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास लिहणारे हे ब्रम्हण्यवादी दृष्टिकोनाचे व चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे इतिहासकार असल्याने त्यांनी सर्वहारा आदिवासी बहुजन समाजाच्या स्वातंत्र्य चळवळीतील इतिसाचे योगदान दुय्यम स्तरावर ठेवले. खरा इतिहास लोकांपासून दडवून ठेवला. त्यामुळे आपल्या देशात विषमतेची दरी अधिकाअधिक वाढली आहे. ते पुढे म्हणेल की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आमच्या ह्रदयात या ब्राम्हणी व्यवस्थेने तिरस्काराची भावना जाणीवपुर्वक रुजविली आहे,ती जोपर्यंत आम्ही आमच्या ह्रदयातून काढुन टाकत नाही तो पर्यंत आम्ही स्वतंत्र जीवन जगू शकत नाही. शेवटी ते पूढे म्हणाले की, भारतीय संविधानाने आम्हा भारतीय नागरिकांना भारताचे, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय; विचार, अभिव्यक्त्ती, विश्वास, श्रध्दा व उपासना याचे स्वातंत्र्य; दर्जाची व संधीची समानता व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आस्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा आपण निर्धापुर्वक करुया तरच संविधानावर येणारे धर्मांध व जात्यांध प्रवृतचे संकट आपल्याला रोखता येईल व आपल्या घटनात्मक अधिकारासह आपल्या आपला देश सुरक्षित ठेवता येईल.
कार्यक्रमाचे प्रस्थाविक प्रशांत जुमनाके,संचालन दत्ता गावंडे आणि आभार रमेश मडावी यांनी मानले.

हा कार्यक्रम यशश्वी करण्याकरीता मा. संतोष चांदेकर, भाऊरावजी आत्राम, भगवानजी आत्राम, संतोष पेंदोर, बाबाराव गेडाम, प्रशांत कुमरे, सुधाम गावंडे, रानू तूमराम, लक्ष्मणराजी सुरपाम, महेश आत्राम, दुर्वासजी कुळसंगे साहेब आदिनी घेतले.

राष्ट्रीय सेवा योजना व शारीरिक शिक्षण विभागाकडून संविधान दिन साजरा


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

मारेगाव : कला, वाणिज्य व विज्ञान महा. मारेगाव येथील रा.से.यो व शारीरीक शिक्षण विभागाकडू संविधान दिन साजरा करण्यात आला.

संविधानामुळे भारताचे जागतिक महासत्ता होण्याचे स्वप्न पूर्ण होईल असे विचार कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. सिद्धराम मुंडे यांनी व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अविनाश घरडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना उच्च शिक्षणाचे महत्व सांगितले. तर डॉ. गजानन सोडनर यांनी संविधानातील मूलभूत हक्क व न्यायिक पुनर्विलोकन या विषयी मार्गदर्शन केले. तसेच संविधान उद्देशपत्रीकेचे वाचन प्रा. विजय भगत यांनी केले. याच बरोबर  संविधान दिनानिमित्त घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान परीक्षेचे बक्षीस वितरण सुद्धा करण्यात आले.
या वेळी स्पर्धेत प्रथम  क्रमांक सायली आसूटकर, बी. ए. भाग १, द्वितीय क्रमांक अंकिता पावडे बी. ए. भाग ३ तर तृतीय क्रमांक नीरज महातले  बी. एस सी भाग २ या विद्यार्थ्यांना मिळाले. सदर कार्यक्रमाचे आयोजन रा.सो.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. बाळासाहेब देशमुख व शारीरीक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. नितेश राऊत यांच्या संयुक्त विद्यमाने झाले.
या प्रसंगी मंचावर डॉ. माधुरी तानूरकर, डॉ. विनोद चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रवीण कुलकर्णी तर आभार डॉ. नितेश राऊत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता प्रा. शैलेश कांबळे, डॉ. घोडखांदे मॅडम, डॉ. चिरडे सर, डॉ. अडसरे सर, प्रा. माकडे सर, प्रा. आत्राम सर, प्रा. जेनेकर सर, प्रा. वांढरे सर, डॉ. कांबळे मॅडम, आदींनी मेहनत घेतली.