संविधान दिना निमित्त वणी व राजूर येथे घेण्यात आली संविधान दौड स्पर्धा

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदणखेडे 

वणी : संविधान दिनाचे औचित्य साधून वणी व राजूर येथे संविधान दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. बहुजन स्टुडन्ट्स फेडरेशन वणी व ब्ल्यू व्हिजन शाखा राजूर यांच्या वतीने संविधान दिना निमीत्त ही दौड स्पर्धा घेण्यात आली. वणी येथे आंबेडकर चौकातून तर राजूर येथे शहिद भगत सिंग चौकातून या स्पर्धेला सुरुवात झाली. पुरुष व महिला अशा दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला महिला व पुरुषांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिला व पुरुष गटातील पहिल्या तीन विजेत्यांना पुरस्कार रूपात रोख बक्षिसे, सन्मानचिन्ह व संविधानाच्या प्रति देण्यात आल्या. 

वणी येथे आंबेडकर चौकातून सुरु झालेली ही दौड स्पर्धा शिवाजी महाराज चौक व कृषी उत्पन्न बाजार समिती पासून परत आंबेडकर चौक अशी घेण्यात आली. क्रीडा अधिकारी मालेकर व बेलेकर गुरुजी यांचं या स्पर्धेला योग्य मार्गदर्शन लाभलं. ऍड. राहुल खापर्डे यांनी निळी झंडी दखविल्यानंतर ही दौड सुरु झाली. या स्पर्धेत प्रथम पुरस्कार प्रवीण लांडे चंद्रपूर यांनी, द्वितीय पुरस्कार रोहित येलादे वणी तर तृतीय पुरस्कार प्रविण जाधव वणी यांनी पटकावला. महिला गटातून प्रथम पुरस्कार वैष्णवी भुरसे, द्वितीय पुरस्कार रेणुका वसाके तर तृतिय पुरस्कार राणी शेंडे यांनी प्राप्त केला. संत रविदास महाराज चर्मकार युवा मंच हे या स्पर्धेचे संयोजक होते. 

राजूर येथे संविधान दौड स्पर्धेअंतर्गत शहिद भगत सिंग चौक ते दीक्षाभूमी अशी ही दौड लावण्यात आली. सरपंच विद्याताई पेरकावार, जी.प. सदस्य संदीप भगत व अशोक वानखेडे यांनी निळी झंडी दाखविल्यानंतर या दौड स्पर्धेची सुरुवात झाली. या स्पर्धेत एकूण ३८ स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यातून क्रिश विश्वकर्मा राजूर याने प्रथम, प्रवीण लांडे चंद्रपूर याने दुसरा तर आकाश ठमके वणी या स्पर्धकाने तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार पटकावला. तसेच सुबोधी सुशील अडकिने व प्रज्वत फुलझेले या चौदा वर्षांच्या मुलांनी उत्कृष्ठ दौड लावल्याने त्यांना प्रोत्सानपर बक्षिसे देण्यात आली. बक्षीस वितरण सरपंचा विद्याताई पेरकावार, जी.प. सदस्य संदीप भगत व माजी सरपंचा प्रणिता मो. असलम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता ब्लू व्हिजन राजूर शाखेने विशेष सहकार्य केले.

कोविड-१९ ने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या निकटतम नातेवाईकांस मिळणार पन्नास हजार रूपये सानुग्रह सहाय्य – मंत्री विजय वडेट्टीवार

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिनांक ४ ऑक्टोबर २०२१ रोजी दिलेल्या निर्णयानुसार कोविड-१९ या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकटतम नातेवाईकांस ५०,०००/- रूपये (रु. पन्नास हजार ) इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

           
राज्य शासनाने मदतीची रक्कम लाभार्थींच्या थेट बँक खात्यात जमा करण्याकरिता ही योजना तयार केली आहे. त्यानुसार लाभार्थ्यांना मदतीची रक्कम थेट लाभार्थींच्या खात्यात जमा होणार आहे. महाराष्ट्र राज्यात जी व्यक्ती कोव्हिड-१९ या आजारामुळे निधन पावली आहे तसेच जर त्या व्यक्तीने कोव्हिड-१९ चे निदान झाल्यामुळे जरी आत्महत्या केली असेल तरी त्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकास रु. ५०,०००/- (रु. पन्नास हजार) इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत्त निधीमधून देण्यात येणार आहे. हे सानुग्रह सहाय्य देण्याकरिता कोव्हिड -१९ मृत्यू प्रकरणे निर्धारित करण्यासाठी पडताळणी करण्यात येईल. पडताळणीसाठी विविध मुद्दे शासन निर्णयात सविस्तरपणे देण्यात आलेले आहेत. ही मदत मिळण्यासाठी कोव्हिड-१९ या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेईवाईकाने राज्य शासनाने या करिता विकसित केलेल्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जदार स्वत: किंवा सेतू केंद्रात किंवा ग्रामपंचायतीत CSC-SPV मधून अर्ज करु शकेल.
       
या कामासाठी नव्याने वेब पोर्टल पुढील आठवड्यातच विकसित करण्यात येणार आहे. त्या वेब पोर्टल वर ऑनलाईन अर्ज कसा करावा तसेच संपूर्ण या योजनेची तपशीलवार कार्यपध्दतीची माहिती असेल. हे वेब पोर्टल कार्यान्वित झाल्यानंतर सर्व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणे याबाबत आपल्या स्तरावर याबाबतची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी तसेच याबाबत प्रसिद्धी करावी. जिल्हा तसेच तालुका व गाव पातळीवर देतील आणि सर्व संबंधितांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने करावे. याबाबतचा महसूल व वन विभागाचा शासन निर्णय आज निर्गमित केलेला आहे. यामध्ये याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.                          

भारतातील संविधान हे जगातील सर्वात माेठे संविधान -जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : भारतातील संविधान हे जगातील सर्वात माेठे संविधान असल्याचे मत चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी व्यक्त केले. ते आज येथील मुख्य मार्गावर असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात समता सैनिक दल, भारतीय बाैध्द महासभा, रिपब्लिकन पक्ष, व डॉ.बाबासाहेब आंबेडकर शतकाेत्तर जयंती महोत्सव समिती चंद्रपूर व्दारा आयोजित संविधान सन्मान दिन व प्रबाेधन सभा कार्यक्रमात कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बाेलत हाेते. ते पुढे म्हणाले की, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विधानचा मसुदा तयार करतांना अहाेरात्र मेहनत घ्यावी लागली. दाेन वर्षानंतर हा मसुदा तयार झाल्यानंतर ताे संविधान सभेत सादर करण्यात आला. त्या नंतर भारतीय राज्यघटना पारीत करण्यात आली.

आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्ह्याचे पाेलिस अधिक्षक अरविंद साळवे, प्रविण खाेब्रागडे, निर्मला नगराळे, अ.वि.टेंभरे, प्रतिक डाेर्लिकर, राजकुमार जवादे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित हाेते. कार्यक्रमाच्या आरंभी महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व पाेलिस अधिक्षक अरविंद साळवे यांनी पुष्पमाला अर्पित करुन अभिवादन केले.

या वेळी सामूहिक राष्ट्रगाण झाले. जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी मंचावर भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवि मून यांनी केले तर सूत्रसंचालन चंद्रपूरच्या मृणाली कांबळे यांनी केले. उपरोक्त कार्यक्रमाला पुरुषां साेबतच महिलांची उपस्थिती विशेष उल्लेखनिय हाेती.

  

श्री गुरुदेव विदयालय व कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन संपन्न

सह्याद्री न्यूज | शंकर घुगरे 

वणी : शिरपूर येथील श्री गुरुदेव विदयालय व कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन संपन्न झाला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.ना.पु.पिंपळकर सर, पर्यवेक्षक श्री मो.ल.परचाके सर व प्रा.वि.दे.करमनकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

मुख्याध्यापक श्री.ना.पु.पिंपळकर सर, पर्यवेक्षक श्री. परचाके सर व प्रा.वि.दे.करमनकर सर यांनी संविधानाचे महत्व पटवून सांगितले तर, प्रा.गणेश लोहे सर यांनी संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन केले त्यांच्या पाठोपाठ सर्व विद्यार्थी तसेच शिक्षकांनी संविधान वाचन केले.

कार्यक्रमाचे संचलन श्री.लोहे सर व श्री.योगेश किन्हेकर सर यांनी केले तर प्रा श्री.रुपेश धुर्वे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व वर्ग ५ ते १२ चे विद्यार्थी उपस्थित होते.

सुरमाज फाउंडेशनने वितरक केले रेशन किट

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

चोपडा : सुरमाज फाउंडेशन चोपडा जो नेहमी सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक कामे करते आणि लोकांकडून मध्ये जे काही शक्य असतात ते लोकांसाठी करण्याच्या प्रयत्न करतात. २०२० मध्ये सहा महिने कंप्लीट लॉकडाऊन होता आणि आपल्या देशात बरेच गरीब लोक आहेत जे दररोज काम करतात आणि दररोज जेवतात, तेव्हा अन्नासाठी उपलब्ध नव्हती हे लक्षात घेता सूरमाज फाउंडेशनने आतापर्यंत 800 राशन किट वितरण केले आहे किटमध्ये जेवण लागणारी वस्तू भोपळा, पीठ, मसूर, साखर, शेव, तेल, चहा, चणा इत्यादी 15 दिवसाच्या रेशनच्या सामान होत. गरीब लोकांना काही प्रमाणात मदत केली गेली. हाजी उस्मान शेख (अध्यक्ष, सुरमाज फाउंडेशन), काजी झायउद्दीन साहेब, अबुललौस शेख, डॉ. रागीब, डॉ मोहम्मद जुबेर शेख आणि त्यांचे सहकारी हे काम करीत होते.