मारेगाव येथे लोकन्यायालयात २०५ प्रकरणाचा निकाली


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (३० सप्टें.) : येथील दिवानी व फौजदारी न्यायालयात विविध स्वरूपाच्या प्रलंबित २०५ केसेस चा निपटारा करण्यात आला. यात ३९ लाख रुपायाच्यावर तडजोड राशी जमा झाली.

राष्ट्रीय लोक अदालात अंतर्गत येथील न्यायालयात अनेक लंबीत दिवाणी व फौजदारी केसेस चा आपसी तडजोडी ने निपटारा करण्यात आला. यात वादपूर्व २०५ प्रकरणे आणि दाखल आपसी तडजोड चे ४० प्रकरणे असे एकूण २०५ केसेस चा "लोक अदालत" मध्ये निपटारा करून ३९ लाख ७८ हजार ९९८ रुपये आपसी तडजोड राशी जमा झाली. यात पॅनल प्रमुख म्हणून न्यायाधीश निलेश वासाडे तर सदस्य म्हणून एड. मेहमूद पठाण, सुमित हेपट यांनी कामकाज बघितले.

लोकन्यायालयाच्या यशस्वीतेसाठी न्यायालयीन कर्मचारी डोईजड, बी.पी. चव्हाण, आर.वैद्य, पी.वासाड, एस. टेबरें, शेबे, बुजाडे, राऊत यांनी परिश्रम घेतले.

करंजी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात नुकसानीची आमदार अशोक उईके यांनी केली पाहणी


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
पांढरकवढा, (३० सप्टें.) : राळेगांव विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रा.डॉ अशोक उईके यांनी दिनांक ३० सप्टेंबर गुरुवार ला करंजी परिसराचा दौरा केला. शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता पिकांची झालेली नासाडी पाहून शेतकरी हवालदिल होण्याची भीती आमदार अशोक उईके यांनी व्यक्त केली.आपण महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीस यांच्याकडे ओला दुष्काळ जाहीर करावा या संदर्भात भेट घेऊन मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.शेतकरी अस्मानी सुलतानी संकटात सापडला आहे रुंझा.करंजी. परिसरातील शेतकरी गेल्या दोन महिन्यांच्या पावसाने वैतागला आहे. कपाशीचे बोंड सडलेली आहे. सोयाबीनचे पीक गेलेले आहेत.ज्या पिकांवर शेतकऱ्यांची आर्थिक घडी बसते तीच पिके उध्वस्त झाल्याने आता करावे काय हा त्याच्यापुढे प्रश्न उभा राहिलेला आहे. हा परिसर राळेगाव मतदार संघाच्या आवाक्यात आहे.मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी ही जबाबदारी आहे.असे आमदार उईके म्हणाले त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी स्वतः हा शेतात जाऊन त्यांच्याशी हितगुज केली यावेळी शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले ही परिस्थिती पाहून उईके यांनी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते यांच्याकडे ओल्या दुष्काळाची मागणी आपण करणार असल्याचे सांगितले. ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहणे आजच्या काळात गरजेचे आहे. शेतकरी हा या देशाचा कणा आहे. आणि शेतकऱ्यांवरच जर मरणासन्न परिस्थिती आली तर तुम्हा आम्हाला जगणे कथन जाईल असे मत व्यक्त केले. मी तुमच्या सोबत आहो घाबरून जाऊ नका असा धीरही शेतकऱ्यांना आमदार प्रा.डॉ. अशोक उईके यांनी दिला शेतकऱ्याच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पिकांच्या नुकसानीची पाहणी करतांना आमदार प्रा. डॉअशोक उईके याच्या सोबत पांढरकवडा तहसीलदार सुरेश कव्हळे, गटविकास अधिकारी चव्हाण, सभापती राजेश पसलावार, माजी सभापतीं पंकज तोडसाम, विनोद बोरतवार, विलास बनकर, महादेव ठाकरे, मोहन बंडेवार, मारोती ठाकरे,
बाळा मानकर, तुळशीराम चव्हाण सचिन मडावी आकाश राठोड, परिसरातील शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते.

पिसगांव आदिवासी सोसायटीवर गैरआदिवासी सचिवाची नियुक्ती ?


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (३० सप्टें.) : आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून 'पेसा' अंतर्गत विविध योजना अंमलात आणला. बहुतांश गावपातळीवर समाजाची लोकसंख्येच्या आधारे ग्रामपंचायत,आदिवासी सहकारी संस्थेची निर्मितीही केली. यात मुख्य पदे आदिवासी समाजाच्या वाट्याला असतांना पिसगांव आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था अपवाद ठरत आहे. येथे सोसायटीच्या सचिव पदी आदिवासी समाजाला बगल देत गैरआदिवासी समाजाच्या व्यक्तीची थेट सचिव पदी नियुक्ती केल्याने समाजात संतापाची लाट उसळत आहे. परिणामी ही नियुक्त रद्द करण्यात येऊन आदिवासी घटकाला प्राधान्य देण्यात यावे यासाठी तक्रार दाखल करण्यात आली आहे. 
     
आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळख असलेल्या मारेगाव तालुक्यात बहुतांश ग्रामपंचायती व सहकारी संस्था पेसा अंतर्गत मोडते. अशातच तालुक्यातील पिसगाव ग्रामपंचायत ही पेसा अंतर्गत आहे. येथे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था असून, या संस्थे अंतर्गत परिसरातील किमान अकरा गावांचा समावेश आहे. पेसा अंतर्गत गावे असल्याने येथील ग्रामपंचायत, सहकारी संस्थेत आदिवासी घटकाला प्राधान्य देऊन मुख्य प्रवाहात आणण्याची शासनाकडून तसदी घेण्यात येते मात्र, पिसगांव येथे चक्क आदिवासी समाजाला डावलून आदिवासी सोसायटीत एका गैरआदिवासी संचालकाने आपल्या पुतण्यालाच प्राध्यान्य देत सचिव पदावर नियुक्त केल्याने समाजात संतापाची लाट उसळत आहे. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आली असून, आदिवासी प्रामुख्याने पेसा अंतर्गत गावातील ही नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात यावी. अन्यथा उपोषणाच्या माध्यमातून आम्ही न्याय मागू अशी भूमिका लक्ष्मीबाई रामपुरे, सूर्यभान कोरझरे, भीमराव आत्राम, गजानन कोरझरे, बोनाबाई घाटे, विठोबा लोखंडे, पोतु बोंदरे, किसन लोखंडे, विठ्ठल मरापे, दिलीप जुमनाके यांच्या सह अनेक सभासदांनी तक्रार निवेदनातून घेतली आहे. 

वरोऱ्यात आयपीएल वर सट्टा घेणाऱ्या दोघांना अटक, बावणे ले-आऊटात कारवाई

                    (संग्रहित फोटो)

सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे 
वरोरा, (३० सप्टें.) : सटोऱ्यासाठी पर्वणी ठरत असलेल्या आयपीएल-२० क्रिकेट सामन्यांवर लाखोंचा सट्टा लावला जातो. क्रिकेट बेटिंगवर लगवाडी लावणारे व लगवाडी घेणारे मोबाइल द्वारे अतिशय गुप्तपणे हा क्रिकेट सट्टयाचा खेळ खेळत असतात. बुकी आपल्या प्यादयांना गुप्त जागी बसवुन त्यांच्या मार्फत हा क्रिकेट सट्टा ऑपरेट करतात. संशयाची पालही चुकचुकणार नाही, असे ठिकाण हे बुकी क्रिकेट सट्टा घेण्याकरीता बसवणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्याकरिता निवडतात. सध्या बुकिंनी लोकवस्तीमध्ये सट्टा घेणारे आपले कर्मचारी बसविले आहेत. लोकांची निवासस्थाने असलेल्या ठिकाणी घर व फ्लॅट रेंटवर घेऊन तेथे सर्व साहीत्यासह सट्टा घेणाऱ्यांना बसविले जाते. बावणे ले आऊट मधील काकडे यांचे घरी चालविण्यात येणाऱ्या क्रिकेट सट्टा अड्यावर पोलिसांनी धाड टाकुन क्रिकेट सट्टा घेणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडुन 1 लाख 69 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

बावणे ले-आऊट मधील एका घरा मध्ये क्रिकेट सामन्यांवर सट्टा खेळवळा जात असल्याची गुप्त माहीती पोलिस पथकाला मिळाली. ऑनलाईन पध्दतीने हा क्रिकेट सट्टा घेतला जात असल्याचेही पोलिसांना कळले. पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकली असता दोन व्यक्ती इंडियन प्रीमियर लीग (IPL20) च्या राजस्थान रॉयल व रॉयल चॉलेंज बंगलोर संघावार मोबाइल द्वारे सट्टा घेतांना आढळून आले. पोलिसांनी ऑनलाईन क्रिकेट सट्टा घेणाऱ्या सिद्धार्थ राजेंद्र दुगड (23) रा. साई नगर वरोरा, उदय रवींद्र काकडे (33) रा. बावणे ले-आऊट यांना रंगेहाथ अटक केली. त्यांच्या कडुन 1 लाख 69 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने गुन्हा करण्यात आला आहे. 

सदर कार्यवाही मा. आयुष नोपानिउपविभागीय पोलिस अधिकारी वरोरा यांचे मार्गदर्शनात पोनि दिपक खोब्रागडे यांचे अधिपत्यात सपोनि राजकिरण मडावी, सपोनि राहुल किटे, पोउपनि किशोर मित्तरवार, पोहवा दिलीप सूर, नापोशी किशोर बोढे, पोशी सुरज मेश्राम, पोशी कपिल भंडारवार, पोशी प्रवीण निकोडे यांनी केली.

शेतकऱ्यांनो 2021-22 पिक विमा काढलाय, मग जाणून घ्या "ह्या" अत्यंत महत्वाच्या सूचना


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (३० सप्टें.) :
चालु 2021-22 वर्षात खरीप हंगामात पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची सूचना देण्यात आल्या आहे.

ज्या शेतकऱ्यांचे चक्रीवादळ किंवा अतिपावसामुळे किंवा पुराच्या पाण्यामुळे पिक नुकसान झाले असल्यास, शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीस टोल फ्री क्रमांकावर फोन करून किंवा ई-मेल करून किंवा क्रॉप इन्शुरन्स ऍपचा वापर करून, किंवा विमा कंपनीच्या कार्यालयात लेखी स्वरूपात कळवावे.
नुकसानीची घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत तक्रार करावी. नाहीतर तक्रार मान्य होत नाही. त्यामुळे नुकसानीचा दिनांक आपण वापरत असलेल्या तक्रारीच्या माध्यमानुसार अचूक टाकावा किंवा सांगावा.

केळापूर तालुक्यातील पांढरकवडा येथे रॉय कॉम्प्लेक्स राहुल भवन जवळ गाळा क्र. 65 येथे कंपनीचे कार्यालय सुरू आहे. याकरिता विमा कंपनी कडून तक्रार करण्यासाठी चार पर्याय देण्यात आलेले आहेत. त्यानुसार आपली तक्रार नोंदवावी.

१) टोल फ्री नंबर :
 18001035499

२) ई-मेल ID- support@iffcotokio.co.in

३) ऍप वरून तक्रार करण्यासाठी लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central

🟢दरम्यान, ऍप वापरून तक्रार देतांना विमा पावती नंबर टाकणे आवश्यक आहे. तक्रार नोंद झाल्यानंतर मोबाईल वर येणाऱ्या "डॉकेट आय डी" चा स्क्रीन शॉट आवर्जून काढून ठेवा. या आय डी वरून आपल्या प्रकरणाची सद्यस्थिती पाहिजे तेंव्हा मोबाईल वर लगेच कळते. त्यामुळे ऍप चा वापर करून तक्रार करणे केंव्हाही फायदेशीर आहे. तसेच ऍप चा वापर करणे सोपे आहे.

ऍप वर माहिती भरताना पुढीलप्रमाणे भरता येईल :
• नुकसानीचे कारण - cyclone रेन (चक्रीवादळ) किंवा excess rainfall (अती पाऊस) यापैकी जे असेल ते नोंदवावे किंवा लिहावे.

• जर सोयाबीन पाण्यात उभे असेल तर standing crop असे दाखवावे किंवा नोंदवावे.

• जर सोयाबीन शेतात सोंगून सुडी न मारता पसर असेल तर cut & spread in bundles असे दाखवावे किंवा नोंदवावे.
🟢
• वर्ष 2021-22 असे लिहावे/नोंदवावे.


४) लेखी तक्रार : जर वरील तिन्ही पर्याय व्यवस्थित चालू नसतील तर, तालुका स्तरावर असलेल्या विमा कंपनीच्या कार्यालयात खालील कागदपत्रे सादर करावे.
 
१) विहित नमुन्यातील पीक नुकसान पूर्वसूचना अर्ज,
२) विमा पावती, 
३) विमा पावतीवर नोंदवल्या नुसार 7/12 व 8-अ
४) आधार कार्ड xerox व 
५) बँक पासबुक xerox
जोडुन पीक नुकसान तक्रार देऊन पोहोच (oc) आवर्जून घ्यावी. 
🟢तक्रार अर्जाचा नमुना विमा कंपनीच्या कार्यालयातुन माहिती करून घेऊन भरावा. अशी तालुका कृषी अधिकारी राकेश दासरवार पांढरकवढा यांनी दिली.