पांढरकवडा तालुका ओलादुष्काळ जाहीर करा


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
पांढरकवडा, (२८ सप्टें.) : पावसाळ्यात अति पावसामुळे तालुक्यात शेतकऱ्यांचे दैणादीन अवस्था झाली आहे. शेतात लागलेला माल हातात येणे अवघड झाले आहे. कापूस सोयाबीन ही नगदी पिकांची अति पावसामुळे वाट लागलेली दिसून येत आहे. शेतीला लावलेली रक्कम निघणे कठीण झाले आहे. ओल्या दुष्काळामूळे बळीराजा चिंतेत पडला आहे.

बळीराजा शेतीसाठी बँकेतुन व सावकाराकडून घेतलेले कर्ज कसे फेडावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. आता शासन ''मायबाप'' समजून शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे. नाहीतर शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्ती ठरेल. शेतकरी देशाचा कणा आहे. तो कणा मोडला गेला तर देशाचा आर्थिक विकास कोलमोडायला वेळ लागणार नाही.कोरोना काळात देश आर्थिक संकटात होता भारताचा GDP हा अतिशय खालावला होता.

भारत देशाचा बळीराजा हा देशाची लाज राखला. आज तो बळीराजा निसर्गाच्या प्रकोपामुळे संकटात आहे. त्याला आज एक मदतीचा हात देणे तितकेच महत्वाचे आहे.

वांजरी शिवारात वाघाने केला बैलावर हल्ला


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
पांढरकवडा, (२७ सप्टें.) : वांजरी शिवारात दिवसेंदिवस जनावरांवर हल्ल्याच प्रमाणात वाढलेलं आहे. जंगलालगत व माळा लगत असलेल्या शेतकऱ्यांना शेतात येणे जाणे अतिशय कठीण झाले.अशा वातावरणात शेतात जाणे कठीण झाले आहे. जणांवरांवर हल्ले महिन्याला आठवड्याला होत आहे. ती वेळ माणसावर येऊ नये. या करिता वनविभागाने तात्काळ योग्य ते पाऊल उचलणे तितकेच महत्वाचे आहे. श्री.बाबुराव ढवा आत्राम रा.वांजरी या शेतकऱ्यांच्या बैलावर वाघाने प्राणघातक हल्ला केला परंतु जिवाच्या आकांताने बैल घरी पळून आला आणि जीव वाचला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांने तात्काळ शेतकऱ्यांच्या घरी धाव घेतले. जणांवरांवर तात्काळ खाजगी उपचार करण्यात आले. सदर हल्ल्याचे प्रकरण या पुढे घडू नये. याकरिता, वनविभागाने आपल्या टीम द्वारे गावात येऊन लोकांना जनजागृती करणे व विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे.

वांजरी शिवारात जंगलालगत असलेल्या शेतात भीतीचे वातावरण असल्यामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेकरिता शेतकऱ्यांना वॉलकंपाउंडची गरज आहे. ती वनविभागाने त्वरित करून देण्याची मागणी वांजरी ग्रामस्थ करत आहे.

शोषण व अत्याचाराचे विरोधात आवाज उचलने म्हणजे भगतसिंग यांच्या विचारांशी जवळीक होय


सह्याद्री न्यूज | जयंत कोयरे 
राजूर, (२८ सप्टें.) : "भारत व पाकिस्तानात शहीद ए आजम भगतसिंग यांना ओळखत नाही असा व्यक्ती क्वचितच सापडणे होय, परंतु त्यांच्या विचारांना समजून घेणे व त्यांच्या विचारावर कृती करणारा मात्र बोटावर मोजण्या इतपत मिळतील. अन्याय अत्याचाराचे विरोधात आवाज उचलणे व अत्याचार होणारच नाही अशी व्यवस्था आणण्यासाठी तसे प्रयत्न करणे ह्यामध्ये फरक आहे, असे असले तरीही शोषण व अत्याचाराचे विरोधात आवाज बुलंद करून त्यासाठी लढा उभारणे हे शहीद भगतसिंग यांच्या विचाराशी जवळीकता होय", असे मत आज भगतसिंग यांच्या ११४ व्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी झालेल्या येथील कार्यक्रमात वक्त्यांनी व्यक्त केलेल्या विचारातून सूर प्रकटला.

येथील शहीद भगतसिंग चौकातील त्यांच्या प्रतिमेला येथील जिजाई कम्प्युटर इन्स्टिट्यूट चे संचालक जयंत कोयरे व सामाजिक कार्यकर्ते अश्फाक अली यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. 

यावेळेस महेश लिपटे सर, पोलीस पाटील सरोज मून, माकपचे कॉम्रेड कुमार मोहरमपुरी, कवी-गायक राजेंद्र पुडके, राजूर विकास संघर्ष समितीचे साजिद खान, जयंत कोयरे यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रमुख पाहुणे म्हणून मो. असलम, समीर बेग उपस्थित होते. कार्यक्रमात प्रामुख्याने निलेश भगत, जब्बार, स्वप्नील डवरे, प्रकाश दाते हजर होते.

पावसाने घरांचे नुकसान झालेल्या कुटुंबियांना आ.किशोर जोरगेवारांची आर्थिक मदत

सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२८ सप्टें.) : तीन दिवसांपासून चंद्रपूरात सोसाट्याचा वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. अश्याच राष्टवादी नगर येथील नुकसानग्रस्त कुटुंबियांना आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचने नंतर यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आर्थिक मदत केली आहे. यावेळी यंग चांदा महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा वंदना हातगावकर व आदिवासी समाजाच्या महीला शहर अध्यक्षा वैशाली मेश्राम यांची उपस्थिती होती.
       
तीन दिवसांपासून चंद्रपूरात वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेकांच्या घरांना शती पोहचली आहे. अनेकांच्या घरावरील टिना उडाल्या असून मातीच्या भिंती कोसळल्या आहेत. याच पावसाचा फटका राष्ट्रवादी नगर येथील रहिवासी शकुंतला नत्थूजी रघाताटे, जोत्सना गणेश कुळसंगे, निर्मला जाधव, त्रिवेणी लक्ष्मण जुमनाके यांच्या घरांना बसला असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

दरम्यान, याची माहिती आमदार किशोर जोरगेवार यांना मिळताच त्यांनी सदरहु कुटूंबियांना आर्थिक मदत करण्याचा सूचना यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना केल्यात त्यानंतर यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पिढीत कुटूंबियांची भेट घेत त्यांना आर्थिक मदत केली आहे. तसेच शासनाकडून मिळणारी मदतही लवकर मिळावी याकरिता प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

बाेगस रासायनिक खते विक्री करणाऱ्या शंकरपूरच्या राजू वैद्यवर कारवाई करा - प्रहारची मागणी !


सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२८सप्टें.) : चंद्रपूर जिल्हा अंतर्गत येत असलेल्या चिमूर तालुक्यातील शंकरपूरच्या राजू वैद्य यांनी बाेगस रासायनिक खताची विक्री केल्यामुळे याचेवर कायदेशीर कारवाई करण्यांची मागणी आज मंगळवार दि.२८ सप्टेंबरला प्रहारच्या एका शिष्टमंडळाने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे कडे एका लेखी निवेदनातुन केली आहे.

वैद्य यांनी दत्त कृषि केन्द्र या नावाने शंकरपूर नगरीत आपले दुकान थाटले असुन, अनेक शेतक-यांनी त्यांचे कृषि केन्द्रातुन डिएपी ही रासायनिक खते विकत घेतली आहे. परंतु पिकांवर कुठलाच परिणाम दिसुन न आल्यामुळे कमलाकर ठाकरे यांनी चंद्रपूर जिल्हा कृषि अधिकारी यांचे कडे रितसर तक्रार नाेंदविली. संबंधित खताचे नमूने तपासणीसाठी पंजाबराव देशमुख कृषि महाविद्यालय नागपुर व शेतकरी माती परिक्षण शंकरपुर यांचे कडे पाठविले असता अहवालात स्पष्ट पणे नमुद केले आहे की, यात रासानिक घटकांचा समावेश शुन्य आहे. या बाबीकडे जिल्हाधिकारी चंद्रपुर यांनी तातडीने लक्ष पुरवून संबंधित दुकान मालकावर कायदेशीर कारवाई करावी.

कारवाई न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्षा कडुन लवकरच आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा सादर केलेल्या निवेदनातुन महेश हजारे, शेरखान पठाण,अफराेज अली व अशिद मेश्राम, यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करतांना आज प्रत्यक्षात शेतकरी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात माेठ्या संख्येने हजर हाेते.