सह्याद्री न्यूज | जयंत कोयरे
राजूर, (२८ सप्टें.) : "भारत व पाकिस्तानात शहीद ए आजम भगतसिंग यांना ओळखत नाही असा व्यक्ती क्वचितच सापडणे होय, परंतु त्यांच्या विचारांना समजून घेणे व त्यांच्या विचारावर कृती करणारा मात्र बोटावर मोजण्या इतपत मिळतील. अन्याय अत्याचाराचे विरोधात आवाज उचलणे व अत्याचार होणारच नाही अशी व्यवस्था आणण्यासाठी तसे प्रयत्न करणे ह्यामध्ये फरक आहे, असे असले तरीही शोषण व अत्याचाराचे विरोधात आवाज बुलंद करून त्यासाठी लढा उभारणे हे शहीद भगतसिंग यांच्या विचाराशी जवळीकता होय", असे मत आज भगतसिंग यांच्या ११४ व्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी झालेल्या येथील कार्यक्रमात वक्त्यांनी व्यक्त केलेल्या विचारातून सूर प्रकटला.
येथील शहीद भगतसिंग चौकातील त्यांच्या प्रतिमेला येथील जिजाई कम्प्युटर इन्स्टिट्यूट चे संचालक जयंत कोयरे व सामाजिक कार्यकर्ते अश्फाक अली यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळेस महेश लिपटे सर, पोलीस पाटील सरोज मून, माकपचे कॉम्रेड कुमार मोहरमपुरी, कवी-गायक राजेंद्र पुडके, राजूर विकास संघर्ष समितीचे साजिद खान, जयंत कोयरे यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रमुख पाहुणे म्हणून मो. असलम, समीर बेग उपस्थित होते. कार्यक्रमात प्रामुख्याने निलेश भगत, जब्बार, स्वप्नील डवरे, प्रकाश दाते हजर होते.
शोषण व अत्याचाराचे विरोधात आवाज उचलने म्हणजे भगतसिंग यांच्या विचारांशी जवळीक होय
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 28, 2021
Rating:
