मनसेची कोकणातील पुरग्रस्तांकरिता मोठी मदत, अन्नधान्य व जीवनावश्यक साहित्य भरलेला ट्रक कोकणाकडे रवाना

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (३० जुलै) : यावर्षी राज्यात मान्सूनचा पाऊस विलंबाने पडला पण पावसाने दमदार हजेरी लावली. मुसळधार कोसळलेल्या पावसाने सर्वत्र दाणादाण उडविली. राज्यातील काही भागात तर पावसाने हाहाकार माजविला. नद्या नाले तुडुंब भरल्याने पुराचे पाणी गावात शिरले. अनेक गावे पाण्याने वेढली गेली. तर काही गावे पाण्याखाली आली. नद्या नाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांचे संपर्क तुटले. कोसळधार पावसामुळे शहरातील वस्त्यांमध्येही पाणी शिरले. नदी नाल्यांप्रमाणे रस्त्यांवरून पाणी वाहू लागले. शहरातील रस्ते जलमय झाले. शहरातील मुख्य रस्त्यांवर पूर आल्यागत पाणी वाहत होते. रस्त्यावरील पाण्याच्या ओढ्याने वाहने देखील वाहून गेल्याचे पाहायला मिळाले. धुवाधार कोसळलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीतच नाही तर अनेकांचे जीवनचं समाप्त झाले. धो धो बरसणाऱ्या पावसाने गावांनाच पूर आल्याने अनेक निष्पाप जीवांचे बळी गेले. तर अनेकांचे संसार उघड्यावर आले. आजही गावांभोवती पाण्याचा वेढा कायम आहे. राज्यातील अनेक ठिकाणी आभाळ फाटले, दरड कोसळली, घर कोसळले, संरक्षण भिंती घरांवर पडल्या, माणसे दबल्या गेली, अनेकांना जलसमाधी मिळाली, पालापाचोळ्याप्रमाणे जीवं वाहून गेली, काही तर गावच नाहीशी झाली, पावसाने रुद्रावतार धारण केल्याने पार होत्याच नव्हतं झालं. पुराचा सर्वात जास्त फटका बसला तो 'कोकण' भागाला. या भागात ठिकठिकाणी ढगफुटी झाल्याच्या घटना घडल्या. अनेक गावे पाण्याखाली आली. पूर्वपरीस्थीतीने जगण्याचे संदर्भच बदलले. अनेकांच्या उदर्निवाहाचे प्रश्न निर्माण झाले आहे. शासन सर्वोतपरी मदत करीतच आहे. पण अनेक राजकीय व सामाजिक पुढारीही मदती करिता सरसावले आहेत. काही ठिकाणच्या नागरिकांनी तर स्वतःहून पुरग्रस्तांच्या मदतीकरिता पुढाकार घेत अन्नधान्य व जीवनावश्यक साहित्य पूर पीडितांकरिता पाठविले आहे.

वणी विधासभा क्षेत्रातूनही नेहमी संकटकाळात मदतीला धावणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून कोकणातील पूर पीडितांकरिता अन्नधान्य व जीवनावश्यक साहित्य पाठविण्यात आले आहे. मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी राज्यात उद्भवलेल्या पुरसंकटामुळे तेथील जनतेची उपासमार होऊ नये याकरिता वणी विधानसभा क्षेत्रातील जनतेला अन्नधान्य व जीवनावश्यक साहित्याची जमेल तेवढी मदत करण्याचे आव्हान केले होते. त्यांच्या पुढाकारातून आज ३० जुलैला अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंनी भरलेला ट्रक कोकणाकडे रवाना करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळून हा ट्रक रवाना करण्यात आला. यावेळी मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष राकेश खुराणा, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार, ठाणेदार वैभव जाधव व बरीच मान्यवर मंडळी उपस्थित होती. यावेळी राज्यात निर्माण झालेली पूर परिस्थिती, त्यात उद्धवस्त झालेली संसारं व नैसर्गिक आपत्तीमुळे गेलेली जिवं याबाबत गजानन कासावार गुरुजींनी दुःखद संवेदना व्यक्त करत नागरिकांनी आपलं उत्तरदायित्व समजून अशा संकट काळात नेहमी सडळ हाताने मदत करावी असे सांगतानाच येथील जनतेने जी मदत दिली त्याबद्दल समाधान व्यक्त केले. मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर हे नेहमी संकटात धावून आले आहेत. त्यांनी असेच नेहमी संकट काळात जनतेच्या पाठीशी उभे राहावे अशा भावना उपस्थितांमधून व्यक्त होत होत्या. अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंनी भरलेला ट्रक एसडीपीओ संजय पुज्जलवार यांनी हिरवी झेंडी दाखविल्या नंतर कोकणाकडे रवाना झाला.

लग्नाचे आमिष दाखवून विधवा महिलेचे तीन वर्षांपासून शारीरिक शोषण

                        (सांग्रहित फोटो)

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (३० जुलै) : शहरातील एका तीस वर्षीय विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिचे तीन वर्षांपासून शारीरिक शोषण करणाऱ्या शहरातीलच एका युवका विरुद्ध पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेचा पाठलाग करून तिच्याशी ओळख निर्माण करून तिला लग्नाचे आमिष दाखऊन सदर युवकाने तिचे सतत शारीरिक शोषण केल्याचा आरोप महिलेने वणी पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीतून केला आहे. नंतर या युवकाने लग्न करण्यास नकार दिल्याने महिलेने त्याच्या विरुद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार पोलिस स्टेशनला दाखल केली आहे.

शहरातील सर्वोदय चौक येथे वास्तव्यास असलेल्या विधवा महिलेला लक्ष्मण किशोर खेडकर (२८) रा. मच्छी मार्केट याने प्रेमाचा फास टाकून तिला आपल्या जाळ्यात अडकविले. तो सतत या विधवा महिलेचा पाठलाग करायचा. महिला प्रेमाच्या जाळ्यात अडकताच त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. २०१८ पासून सदर युवकाने तिचे शारीरिक शोषण केल्याचे महिलेने तक्रारीत नमूद आहे. लग्नाचे वचन देत तो तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत होता. नंतर महिलेने लग्नाची गळ घालताच तो टाळाटाळ करू लागला. महिलेने लग्नाचा आग्रह धरल्यानंतर त्याने तिला साफ नकार दिल्याने तिने २८ जुलैला पोलिस स्टेशनला येऊन लक्ष्मण खेडकर याच्या विरुद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपी लक्षण किशोर खेडकर याच्या विरुद्ध भादंवि च्या कलम ३७६ (२)(N), ४१७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 
पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.

जिल्ह्यात संततधार पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट तातडीने मदत द्या- जन आक्रोश महाराष्ट्र राज्य समिती च्या जिल्हाध्यक्षा सीमा स्वामी यांची मागणी


सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे 
नांदेड, (३० जुलै) : जिल्ह्यात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले असून, अतिवृष्टीने ग्रस्त भागांचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना सरसकट आर्थिक मदत द्यावी अशा  आशयाचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांची भेट घेऊन जन आक्रोश महाराष्ट्र राज्य समिती या सामाजिक संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सीमा स्वामी लोहराळकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली आहे.
  
नांदेड जिल्ह्यात गत कांही दिवसात संततधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झालेले असून, जनता हवालदिल बनली आहे. खरीपाची बहुतांश पिके वाहून गेली असून अनेक घरांचीही पडझड झालेली आहे तसेच,अनेक बाबींतून शेतकरी, जनता त्रस्त बनली आहे.
या अतिवृष्टी ग्रस्त भागांची स्थळ पाहणी पंचनामे करून सरसकट नुकसान झालेल्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी अन्यथा भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश या सामाजिक संघटनेच्या वतीने आगामी काळात तिव्र जनआंदोलन सुरु करू असा ईशाराही निवेदनातून जिल्हाध्यक्षा स्वामी यांनी दिला आहे.

यावेळी जिल्हा सचिव सुप्रिया कल्याणकर,संगीता झिंझाडे आदीं कार्यकर्त्यांची उपस्थित होती.

ग्राहकाचा मीटर पळविणाऱ्या लाईनमन वासेकर व ठाकरे यांचे वर कार्यवाही करा - सामाजिक कार्यकर्ते घनश्याम मेश्राम यांची मागणी


सह्याद्री न्यूज नेटवर्क |
राजुरा, (३० जुलै) : बामणवाडा तह. राजुरा येथील श्री. सुभाष टेकाम, मजुरी करून कुटुंब चालवीत असताना यांनी नवीन मीटर साठी दिनांक २४/४/२०२१ ला चार महिन्यापूर्वी राजुरा येथील वीज वितरण कंपनीकडे अर्ज केला. त्यानंतर रीतसर दिनांक ८/५/२०२१ ला डिमांड चा भरणा श्री. टेकाम यांनी केला. चार महिने लोटूनही मीटर आले नाही म्हणून तब्बल पाच दिवस राजुरा विद्युत विभागाच्या चकरा मारून मीटर आल्याची खात्री करवून घेतली. तेथील कर्मचाऱ्याने तुझा मीटर ठाकरे लाईनमन कडे पाठविला असून, लावून देईल असे सांगितल्याने सुभाष आनंदित झाले. मात्र, मीटर पाठवून दहा दिवस लोटले असताना लाईनमन ठाकरे कडून मीटर लावण्यात आला नाही. ठाकरे यांचे सोबत संपर्क साधले असता वासेकर लाईनमन ला मीटर लावण्यासाठी सांगितले आहे. असे सांगितले असून टोलवाटोलवी ची उत्तर देत आहेत, वासेकर लाईनमन यांनी दहा दिवसांपासून मीटर लावून दिले नाही. यामुळे विद्युत विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. 

चार महिन्याचा कालावधी लोटला असताना लाईनमन ठाकरे यांनी सुद्धा दहा दिवसांपासून मीटर दडवून ठेवला आहे. यामुळे सुभाष टेकाम यांच्या कुटुंबियांना अंधारात राहावे लागत असून लहान मुलांना त्रास होत आहे. 

लाईनमन ठाकरे हे सुभाष टेकाम यांचा मीटर इतर व्यक्तीला लावून दिलं की काय? अशी शंका निर्माण होत आहे. या अगोदरही असे अनेक प्रकार घडलेले असून शक्यता नाकारता येत नाही असे मत सुभाष टेकाम यांनी व्यक्त केले असून, माझा मीटर मला माझे घरी न लावून दिल्यास कार्यालयात ठीया मांडणार असा संकल्प टेकाम यांनी केला आहे. 

सुभाष टेकाम यांचा मीटर तत्काळ लावून द्यावा व मीटर दडवून ठेवणारे वासेकर व ठाकरे लाईनमन वर कार्यवाही करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते घनशाम मेश्राम यांनी केली आहे.

बिलोलीचे तालुका कृषी अधिकारी रमेश पसलवाड एसीबीच्या जाळ्यात


सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे 
बिलोली, (२९ जुलै) : आरोपी लोकसेवक श्री रमेश लक्ष्मण पसलवाड, वय ५७ वर्ष, व्यवसाय नोकरी तालुका कृषी अधिकारी, बिलोली यांनी दिनांक ७-०७-२०२१ रोजी तक्रारदार यांच्या कडे 9,000 हाजाराची रुपयेची लाचमागणी केली. लाचलुचपत विभागाचे अधिकारी यांनी दिनांक १६-०६-२०२१ रोजी पडताळणी केली. तक्रारदार यांचे तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पडताळणीच्या कामासाठी वेळ वाढल्याने 15,000/- रुपये लाचेची मागणी केली तडजोडीअंती 12,000/- रु.मिळवण्याचा प्रयत्न केला.

यातील आरोपी लोकसेवक रमेश लक्ष्मण पसलवाड यांनी तक्रारदार यांचे नवीन कृषी सेवा केंद्र सुरू करण्यासाठी शेती उपयोगी खत, बियाणे,औषधे विक्रीचे परवान्यांचा प्रस्ताव कृषी अधीक्षक कार्यालय, नांदेड येथे पाठवण्यासाठी 15,000/- रुपये लाचेची मागणी केली व तडजोडीअंती 12,000/ रुपये मिळविण्याचा प्रयत्न केला.

सदरील सापळा मा. श्रीमती कल्पना बारवकर, पोलीस अधीक्षक ला.प्र.वि.नांदेड परिक्षेत्र नांदेड मा. श्रीमती अर्चना पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक ला. प्र.वि. नांदेड परिक्षेत्र नांदेड, पोलीस उप अध्यक्षक मा. विजय डोंगरे, यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक अरविंद हिगोले, पोना गंगातीर्थ, जगन्नाथ अनंतवार, ईश्वर जाधव, नरेंद्र बोडके यांनी कार्यवाही पार पाडली आहे.

तरी सर्व नागरिक आवाहन करण्यात येथे की शासकीय अधिकारी कर्मचारी हे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास लाचेच्या मागणीचे फोन ,मॅसेज, विडीओ, आडीओ क्लिफ असल्यास किंवा शासकीय कर्मचारी, अधिकारी यांनी माहिती अधिकारात शासकीय निधीचा भ्रष्टाचार झाल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला संपर्क साधा असे आवाहन केले आहे.