वणीत आंतरमहाविद्यालयीन व्हाॅलिबॉल स्पर्धा संपन्न


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वणीतील आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल (बी झोन) स्पर्धेत कळंब येथील इंदिरा महाविद्यालयाची चमू विजेता झाली तर अमरावतीच्या डॉ.राजेन्द्र गोडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीची चमू उपविजेता ठरली.

शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या वतीने वणी येथे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे आयोजन शासकीय क्रीडा मैदानावर करण्यात आले. 
या स्पर्धेचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार यांचे हस्ते झाले. या स्पर्धेत डॉ.राजेन्द्र गोडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (अमरावती), इंदिरा महाविद्यालय (कळंब), शिवरामजी मोघे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय (केळापूर), श्रीमती नानकीबाई वाधवाणी कला महाविद्यालय (यवतमाळ), इंदिरा गांधी कला महाविद्यालय (राळेगाव) या महाविद्यालयाच्या व्हाॅलिबॉल संघांनी सहभाग घेतला.
अंतिम सामन्यानंतर विजेत्या इंदिरा महाविद्यालयाच्या संघाशी वणीच्या संस्कार क्रीडा क्बलच्या संघाने सरावाचा सामना करून आपल्या खेळाचे प्रदर्शन दाखवले.
स्पर्धेनंतर लगेच पारितोषिक वितरण सोहळा झाला.उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभात शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार, सचिव सुभाष देशमुख, सहसचिव अशोक सोनटक्के यांचेसह कार्यकारिणी सदस्य उमापती कुचनकार, नरेंद्र ठाकरे, अनिल जयस्वाल, नरेश मुणोत, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कवरासे, प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे, प्राचार्य डॉ. सुधाकर रेड्डी, उपप्राचार्य प्रा. पुरुषोत्तम गोहोकार, मुख्याध्यापक प्रमोद क्षीरसागर स्पर्धेचे संयोजक प्रा.उमेश व्यास हे मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेत महेश भोयर,सचिन डोंगरे, फैजान खान , निखिल ठाकरे ,अंकित क्षीरसागर हे पंच होते. विविध महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा.शितल.एस.राऊत (कळंब),डॉ.किरण पवार (राळेगाव), प्रा.सौरभ माकडे (घाटंजी), डॉ.व्ही.आर.चव्हाण (केळापूर), प्रा.धनश्री भगत (अमरावती), प्रा.नितू शेंडे (यवतमाळ) यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व्हाॅलिबॉल चमू स्पर्धेत सहभागी झाल्या. उद्घाटन व पारितोषिक समारंभाचे सूत्रसंचालन आणि स्पर्धेचे समालोचन डॉ.मनोज जंत्रे यांनी केले. प्रा.उमेश व्यास यांनी आभार मानले.
संतोष बेलेकर, जगदीश ठावरी, रूपेश पिंपळकर, सुरज कडूकर, प्रा.राजेन्द्र कोठारी,डॉ. गुलशन कुथे,प्रा.महादेव भुजाडे, प्रा.आनंद हूड, डॉ.आदित्य शेंडे, पंकज सोनटक्के, जयंत त्रिवेदी यांचेसह संस्कार क्रीडा मंडळ आणि लोकमान्य टिळक महाविद्यालयातील खेळाडू, राष्ट्रीय छात्रसेना सैनिक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

निकोप स्पर्धा, सराव आणि सहकार्य आवश्यक - विजय मुकेवार 
वणी परिसराला मोठी क्रीडा संस्कृती लाभली आहे.
मैदानावर खेळणाऱ्या खेळाडूंनी वणीची क्रीडा संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. निकोप स्पर्धा, नियमित सराव आणि सहकार्याची भावना यांमुळे खेळाडू यशस्वी होत असतो.” असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार यांनी पारितोषिक वितरण समारंभात केले.

वणी येथे मोफत भव्य आरोग्य सर्वरोग निदान शिबीराचे उद्या आयोजन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : सेवा पंढरवाडा अंतर्गत भारतीय जनता पार्टी वणी विधानसभा व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने निशुल्क भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन उद्या रविवार दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी ठीक 10 ते 3 वाजता येथील लॉयन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल, नांदेपेरा रोड वणी येथे आयोजित केले आहे. 

मेडिसीन तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, सर्जरी तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नाक कान घसा तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, श्वसनरोग तज्ञ, असे विविध तज्ञाच्या माध्यमातून सर्व रोगनिदान करण्यात येणार आहे. भारतीय जनता पार्टी व सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त पुढाराकातून उद्या रविवारी निशुल्क भव्य आरोग्य शिबिरात सहभागी होऊन लाभ घ्यावा अशी प्रसिद्धी पत्रकातून माहिती देण्यात आली.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याच्या समस्या दिवसागणिक वाढत आहे. वणी विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या सुबक कल्पनेतून आरोग्य सुदृढीसाठी विशेष करून निशुल्क भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात निशुल्क सर्व रोगनिदान व उपचार केल्या जाणार आहेत. तसेच भरती रुग्णांना हॉस्पिटल जाण्याकरिता वाहणांची व्यवस्थाखाट, जेवण सर्व मोफत आहे. 

त्यामुळे वणी शहरातील सर्व नागरिकांनी शिबीर स्थळी येऊन सर्व रोगनिदान व उपचाराचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले आहे.

वीज पडून मृत्यू झालेल्या महिलेचा वारसांना शासनाकडून 4 लाखांची मदत


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील गोरज येथील एका महिलेच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना 30 ऑगस्ट रोजी घडली होती. दरम्यान, मयत महिलेच्या वारसांना शासनाकडून नुकतीच 4 लाख रुपयांची मदत करण्यात आली. आ.संजीवरेड्डी बोदकूरवार यांच्या हस्ते रक्कमेचा धनादेश कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला.

गोरज (ता. मारेगाव) येथील निर्मला श्रीकृष्ण आत्राम यांचा दि.30 ऑगस्ट रोजी अंगावर वीज पडून मृत्यू झाला होता. दरम्यान, झालेल्या घटनेचा तत्काळ पंचनामा करून शेतकऱ्याच्या वारसास शासनाकडून तत्काळ मदत मिळावी, अशा सूचना आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, वैद्यकीय अधिकारी यांना दिल्या होत्या. जिल्हा प्रशासनानेही या घटनेची तत्काळ दखल घेत आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शासनाकडून 4 लाख रुपयाची मदत मयत महिलेच्या पती श्रीकृष्ण गणपत आत्राम रा. गोरज यांना करण्यात आली. आ.बोदकूरवार यांच्या हस्ते रक्कमेचा धनादेश कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला. 

याप्रसंगी तहसीलदार ऊत्तम निलावाड, भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, ता. सरचिटणीस प्रशांत नांदे, भाजपाचे अनुप महाकुलकर, पोलीस पाटील प्रमोद ताजने यांसह मंडळ अधिकारी, तलाठी, महसूल सहाय्यक आदी उपस्थित होते.

आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांनाही शासनाची मदत :
तसेच 2023 मागील वर्षी कोलगाव येथील शालिक उर्फ प्रदिप नानाजी अवताडे यांनी दिनांक 22/12/2023 रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली. आणि ईश्वर मारोती ढोके (वय अंदाजे 33) रा. शिवणी धोबे यांनी दिनांक 17/12/2023 रोजी विष प्राशन करुन आत्महत्या केली होती. आत्महत्येच्या सात्वनपर धनादेश रुपये दोनही कुटुंबातील वारसाना एक एक (1,00,000)  लाख रुपयाची मदत आज रोजी दिनांक 21/09/ 2024 रोजी तहसील कार्यालयात वितरण करण्यात आली.
दरम्यान,लाभ स्वीकारलेल्या कुटुंबातील सदस्यांनी भावुक होऊन शासन प्रशासनाचे आभार मानले. यावेळी वणी विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी केंद्र व राज्याचे सरकार जनतेच्या व विशेषतः शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. 

वैभव कवरासे यांच्या मागणीला यश: चारगाव चौकी ते ढाकोरी (बोरी) राज्य मार्ग होणार सुकर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : चारगाव चौकी ते ढाकोरी (बोरी) राज्यमार्ग हा अतिशय वर्दळीचा असून या रस्तावर चारगाव चौकी ते आबई फाटा आणि ढाकोरी (बोरी) या दरम्यान १०० फुट रस्ता परिसरात २ ते २.५ फूट जागो-जागी खड्डे पडले होते. यासंबधी युवा मोर्चाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष वैभव कवरासे यांनी दिनांक 9 सप्टेंबर रोजी संबंधित विभागाला निवेदन सादर केले होते, त्यांच्या मागणीला यश आले असून सदर रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली.
वणी तालुक्यातील २५ गावातील शेतकरी शेतमजूर वापर, सोबतच चंद्रपूर जिल्हा व तेलंगाणाराज्याकडे जाणारे प्रवासी, वणी बाजार पेठ, शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलीस स्टेशन या ठिकाणी उपचारा साठी गरोदर माता, जेष्ठ नागरिक, लहान बालके, यांना प्रवास करताना प्रचंड नाहक त्रास सहन करावा लागत होता. परिणामी हाडाचे, पोटाचे, आजार असणाऱ्या प्रवाश्यांच्या आजारपणात खर्चात वाढ झाली, अशी या मार्गांवर प्रवास करणाऱ्यांची तक्रार होत होती. सदर या रस्त्यावरून कोळसा, सिमेंट, गिट्टी डोलोमाइन्स यांची वाहतूक करणारी अवजड वाहने व दुचाकी ऑटो यांना तारेवरची कसरत करीत लागत होती. तसेच बेरोजगार युवकांनी रोजगारासाठी घेतलेले ऑटो, छोटा हत्ती, मेट्याडोअर याचा रस्ता नादुरुस्तीमुळे दुरुस्ती खर्च वाढून बँक कर्ज भरणे कठीण झाले. "खड्यात रस्ते कि, रस्त्यात खड्डा" अशी जागोजागी मृत्यूकुंड निर्माण झालेल्या या रस्त्यावरून प्रवास सुरु होता. हा रस्ता सुरळीत व्हावा अशी मागणी वैभव कवरासे यांच्या गावकरी व प्रवाशी यांची आग्रही मागणी होती,आता या मागणीला यश आले असून या भागातील प्रवाश्यांची दुचाकी, बैलगाडी ट्रॅक्टर, ऑटो प्रवास करताना मार्ग सुकर होणार आहे. 
सार्वजनिक बांधकाम विभागाने मागणी असलेल्या रस्त्यावरील खड्डे बुजावण्याचे सुरू झालेले असून आणि काही दिवसात रस्ता वाहतुकीसाठी योग्य राहील जेणेकरून त्रास होणार नाही अशी लेखी पत्र प्राप्त झाल्याने या मार्गांवरील प्रवाशांचा मार्ग सुकर होणार नाही. असं बोलल्या जात असून चारगाव चौकी ते ढाकोरी (बोरी), या रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे माजी जिल्हा उपाध्यक्ष वैभव कवरासे यांच्या ग्रामस्थ व प्रवाश्यानी तूर्तास समाधान व्यक्त केले आहे. 

एलीयट बाईट रोगाने सोयाबीनचे अतोनात नुकसान

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नेहमीच अतिवृष्टी असो की नैसर्गिक आपत्ती नुकसान असो. सतत काहींना काही शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय. अशातच मारेगाव तालुक्यात करपा रोग (एलीयट बाईट) या रोगाने सोयाबीन पिकांवर आक्रमन केल्याने नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी २५ हजार रुपयांचे अनुदान देण्याची मागणी उपसरपंच सचिन पचारे यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना केली आहे. 

यासंबंधी आज शुक्रवारी (ता.२०) तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, शेतात मोठ्या प्रमाणात सोयाबीन चा पेरा आहे. त्याचप्रमाणे सोयाबीन पिकावरील करपा रोग (एलीयट बाईट) नावाचा रोग आला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे नुकसान झाले आहे. परिणामी हेक्टरी २५,०००/- ची मदत तत्काळ मिळावी अशी, मागणी कोसारा ग्रामपंचायतचे उपसरपंच सचिन पचारे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. 

अशा नाजूक परिस्थितीत शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ताबडतोब हेक्टरी २५ हजार रुपयांची सरसकट नुकसान भरपाई द्यावी. अशी आग्रही मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. 

निवेदनावर उपसरपंच सचिन पचारे, भाऊराव  गाणार, प्रकाश खडसे,महादेव वनकर, मंगल गाणार, संतोष बगडे, अंबादास देवतळे, कवडू पाटील, ऋषिकेश कुत्तरमारे, नागेश्वर पचारे, राजू गाणार, खेमराज गाणार, धनराज खडसे, गिरीष चौधरी, नामदेव पचारे, प्रविण कुत्तरमारे, दशरथ येडमे, मुरलीधर येडमे, राजु येरेकर, बबन येडमे,आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.