उदगीरात कै. विठ्ठलराव केदार राज्यस्तरीय वाड्.मय पुरस्कार वितरण


बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

उदगीर : तालुक्यातील देऊळवाडी येथील कै. विठ्ठलराव केदार प्रतिष्ठान चे प्रोढ व बाल वाड्.मय राज्यस्तरीय पुरस्कार वितरण व अंबादास केदार लिखित तारांबळ या आत्मकथनाचे प्रकाशन ८९ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते  मंगळवारी येथील लॉयन्स नेत्र रुग्णालयाच्या सभागृहात पार पडले.

अध्यक्षस्थानी जि. प. चे माजी अध्यक्ष राहुल केंद्र होते. व्यासपीठावर मसापचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य रामचंद्र तिरूके, डॉ. रामप्रसाद लखोटीया, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य विलास सिंदगीकर, ललिता सबनीस, लेखक अंबादास केदार यांची उपस्थिती होती. यावेळी कोल्हापूर येथील साहित्यिक डॉ. श्रीकांत पाटील यांच्या ऊसकोंडी या कादंबरीला, बीड येथील डॉ. भास्कर बडे यांच्या बाईचा दगड या कथासंग्रहास, बाळासाहेब कांबळे यांच्या भिनवाडा या कादंबरीस, हबीब भंडारे यांच्या जगणं विकणाऱ्या माणसांच्या कविता व अंकुश सिदगीकर यांच्या काळोखाचे कैदी या कविता संग्रहाचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

बालवाङमय पुरस्कारासाठी पुणे येथील शिवाजी चाळक यांच्या उंदरांचा टांगा या बालकविता संग्रहास, हिंगोली येथील बबन शिंदे यांच्या जगावेगळा कीर्तनकार या बाल कादंबरीस, नांदेड येथील लेखिका कमल कदम यांच्या आरपार या आत्मकथनासाठी तर सिराज शिकलगार यांच्या गझलतारा या गझल संग्रहास तर सुप्रिया दापके यांच्या सानुल्याच्या कथा या कथासंग्रहाचा गौरव करण्यात आला. प्रत्येकी दोन हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळावर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल धनंजय गुडसूरकर, परिक्षक प्रा. ज्ञानेश्वर हंडरगुळीकर, रसूल पठाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक रामदास केदार यांनी केले. सूत्रसंचालन नीता मोरे यांनी तर आभार प्रा. ज्ञानेश्वर हंडरगुळीकर यांनी मानले. यासाठी एकनाथ केदार, देविदास केदार,  प्रा. बिभीषण मद्देवाड, सिध्दार्थ सुर्यवंशी, लक्ष्मण बेंबडे, प्रा. राजपाल पाटील, विवेक होळसंबरे, ॲड. महेश मळगे, विक्रम हलकीकर आदींनी पुढाकार घेतला. 

पुरवठा विभागातील RCMS प्रणाली बंद, शिधापत्रिकाधारक लाभापासून वंचित...

चेतन पवार  सह्याद्री चौफेर 

दारव्हा : दारव्हा...तहसीलदार दारव्हा कार्यालयातील (RCMS) ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली तीन महिन्यांपासून बंद असल्याने नागरिक स्वस्त धान्यापासून वंचित आहे. ही प्रणाली बंद असल्याने पिवळ्या व केसरी कार्डावर अनेक आजारांवर मोफत वैद्यकीय सेवा मिळत नसल्याने गोरगरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करुन आरोग्य सुविधा घ्याव्या लागत आहेत.

दारव्हा तहसील कार्यालयात दररोज ४० ते ५० नागरीक विविध कामे करून घेण्यासाठी येत असतात मात्र, पुरवठा विभातील RCMS प्रणाली बंद असल्याने ते नागरिक संबंधित कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालतांना पहावयास मिळत आहे. अनेकवेळा त्यांच्यातील वाद टोकाला जात असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

तालुक्यासह संपूर्ण जिल्हयात केसरी व पिवळ्या कार्डावर धान्य मिळण्यासाठी १२ अंकी नंबर घेणे, तो मिळाल्यानंतर RCMS द्वारे रजिस्ट्रेशन करणे, मुलामुलींचे विवाह झाल्यानंतर माहेरचे नाव ऑफलाईन कमी केले असले तरी ते ऑनलाईन कमी करणे, पाल्यांचे नाव समावेश करणे, आरोग्य सुविधेसाठी ऑनलाईन दाखले घेणे • यासाठी ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीची गरज भासत असते मात्र दारव्हा येथील पुरवठा विभागात गेल्या तीन महिन्यांपासून ही प्रणाली बंद असल्याने प्रचंड हाल होत आहे.ही प्रणाली सुरळीत चालू व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे.

पुरवठा अधिकारी म्हणतात राज्यात प्रणाली बंद

ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली तीन महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांचे कामे होत नसल्याने जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधुन असता सुधाकर पवार यांनी ही प्रणाली संपर्क राज्यभर बंद असून त्या आमच्याकडे काही उपाय नसल्याचे सांगितले.

ट्रकांच्या समोरासमोर धडकेत एकाचा मृत्यू तर,एक गंभीर जखमी

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : खैरी-कोसरा रोडवर आज गुरुवारला दोन ट्रक समोरासमोर धडक दिल्याने दोन्ही कॅबिनचा चुराडा झाला असून घटनास्थळी एकच गर्दी उसळली होती. ही घटना सकाळी साडे नऊ च्या सुमारास घडली.

खैरी कोसारा या मार्गांवर जड वाहतूक मोठया प्रमाणात होत असते. चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला जोडणारा हा मार्ग असून या रोड वर कोळसा रेतीची वाहतूक पैज लावल्यागत होत असते. आज गुरुवारला सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास खैरीहुन एम एच ३४ बी जी ०७९९ या क्रमांकाचा कोळशाने भरलेला ट्रक वरोराकडे जात होता. अशातच वरोराहुन खैरी कडे ट्रक क्र. एम एच ३४ ए बी ९७९९ हा सुद्धा येत होता, कोसारा ते खैरी दरम्यान एका वळणावर भरधाव दोन्ही ट्रकांची समोरासमोर धडक झाल्याने दोन्ही ट्रकच्या कॅबिनचा चुराडा झाला.
ही धडक जोरदार असल्याने दोन्ही वाहणातील चालक कॅबिनमध्ये अडकले होते. त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला, वृत्त लिहीस्तोवर मृतकाची व जखमीची ओळख पटली नसून घटनास्थळी वडकी पोलीस दाखल झाले होते. 

वीज पडण्याची सूचना देणारी 'दामिनी'

चेतन पवार | सह्याद्री चौफेर 

दारव्हा : तालुक्यातील मान्सून कालावधीत विशेषतः जून व जुलै या महिन्यात वीज पडून जिवीतहानी होत असते. वीज पडून जिवीतहानी होऊ नये, या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पृथ्वी मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी 'दामिनी' अॅप तयार केले आहे. हे दामिनी अॅप वीज पडण्याची सूचना देणार आहे. त्यामुळे नागरिकांनी वीज पडून होणाऱ्या धोक्यापासून वाचण्यासाठी अॅप वापरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. सदरचे अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.

सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून सर्व नागरिकांना तसेच शासकीय यंत्रणा, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक, क्षेत्रीय अधिकारी, मंडळ अधिकारी, गावस्तरावरील सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत डाटा एंन्ट्री ऑपरेटर यांना सदरचे अॅप डाऊनलोड करुन त्याचा वापर करणेबाबत प्रवृत्त करण्यात यावे. तसेच सदरचे अॅप (GPS) लोकेशन ने काम करीत असून विज पडण्याच्या १५ मिनिटापूर्वी सदरच्या अॅपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते.

ॲपमध्ये आपले सभोवताल वीज पडत असल्यास सदरचे ठिकाणापासून सुरक्षीत स्थळी जावे. तसेच सदर वेळी झाडाचा आश्रय घेऊ गावातील सर्व स्थानिक शासकीय अधिकारी कर्मचारी यांना सदर अॅप डाऊनलोड नागरिकांना देऊन होणारी जीवितहानी टाळावी, असे आवाहन (तहसीलदार) तालुका दंडाधिकारी यांनी केले.

माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांचा वाढदिवस निमित्य भव्य रक्तदान व पुस्तक प्रकाशन सोहळा सम्पंन्न

कालू रामपुरे | सह्याद्री चौफेर 

वरोरा : नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांचा ४९वा वाढदिवस आज मंगळवार २४ मे रोजी भव्य रक्तदान शिबीराने व पुस्तक प्रकाशनाने आलिशान सेलिब्रेशन हॉल येथे साजरा झाला. नगराध्यक्ष म्हणून मागील पाच वर्षांत शहरात केलेल्या कोट्यावधीचे ठडक विकास कामे,त्यांचा अनुभवाचा लेखाजोखा म्हणून "माझा वरोरा" नामक एका स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.
        
येथील आलिशान सभागृहात झालेल्या या समारंभात लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील यांच्या हस्ते व प्रसिद्ध साहित्यिक ना. गो.थुटे, डाॅ.हेमंत खापने, श्रीकृष्णा घड्याळपाटील, रोटरीचे अध्यक्ष हिरालाल बघेले यांच्या उपस्थितीत आज या स्मरणिकेचे प्रकाशन झाले. या प्रसंगी प्रा.श्रीपाद पाटिल यानी आपले मत व्यक्त करतांना सांगितले की वरोरा शहरात सर्व पक्षीय नगरसेवकांना सोबत घेऊन संपूर्ण शहराचा विकास करणारे नगराध्यक्ष,वरोरा शहराचा ईतीहासात कोट्यावधिची विकास कामे करून शहराचा चेहरा मोहरा बदलविणारे नगराध्यक्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची ओळख निर्माण होईल,प्रमाणिक-मुदभाषी,सर्व धर्माचे आदर करणारे सर्व लोकांना सोबत घेऊन चालणारे व्यक्तिमत्व म्हणून आपण नेहमी ओळखले जाणार,आपण केलेले कार्य या शाहरची जनता कधीच विसरणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले. बाबासाहेब भागडे यांनी याप्रसंगी प्रकाशन सोहळ्याचे संचालन केले. 
रक्तदान शिबिरामध्ये १५१ रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले हे विशेष. रक्तदान शिबिरासाठी नागपूर येथील डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे यांचे सहकार्य मिळाले. 
शहरातील तसेच ग्रामीण भागातील विविध संघटनाचे पदाधिकारी ,कार्यकर्ते व सर्व स्तरातील हजारो नागरिकांनी कार्यक्रमस्थळी येऊन अहेतेशाम अली यांचे अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.