मारेगाव : कोरोना नंतर शाळेत येणाऱ्या दाखलपात्र विद्यार्थी हे पूर्णतः गोंधळलेल्या अवस्थेत राहणार आहे. अंगणवाडी किंवा शाळा न पाहलेल्या विद्यार्थ्यांना शाळेची ओळख व्हावी तसेच शिक्षक व पालकांना त्यांच्या बौद्धिक कौशल्याची जाणीव व्हावी यासाठी शाळेशाळेत मेळाव्याचे आयोजन करून दाखलपात्र विद्यार्थ्यांची शाळा पूर्वतयारी करून घेतली जाणार आहे. पुढील सत्रात नव्याने दाखल होण्याऱ्या विद्यार्थ्यांची शाळा पूर्वतयारी करून घेता यावी यासाठी शिक्षण विभागाने नियोजन आखले आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ व पंचायत समिती मारेगाव च्या संयुक्त विद्यमाने शाळा पूर्वतयारी अभियान तालुकास्तरीय प्रशिक्षण येत्या २३ व २४ मार्च २०२२ रोजी नरसाळा येथील जिल्हा परिषद शाळा मध्ये प्रशिक्षण होणार आहे. त्यानंतर सर्व शालास्तरावर शाळा पूर्वतयारीचे विद्यार्थिकेंद्रित मेळावे आयोजित करण्यात येणार असून, त्यात विद्यार्थ्यांची गुणवत्ता पातळी लक्षात घेऊन त्यांच्या पालकांच्या मदतीने त्यांना अपेक्षित गुणवत्ता पातळीपर्यंत पोचवीण्याचे उदिष्ट निश्चित केल्या जाणार आहे. यासाठीचे केंद्रस्तरावर अंगणवाडी सेविका, मदतनीस, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक या सर्वांना प्रशिक्षित केल्या जाणार आहे. या मेळाव्याला पालकांचे समुपदेशनसह विद्यार्थ्यांचे भाषा, गणित, शारीरिक व बौद्धिक गुणवत्ताचा अंदाज घेतल्या जाणार आहे.
जगाचा पोशिंदा असलेल्या कास्तकारांवरच आली आहे उपासमार सहन करण्याची वेळ
प्रशांत चंदनखेडे | सह्याद्री चौफेर
बाजार समितीच्या माध्यमातून कास्तकारांनी धान्याची विक्री केली. बाजार समितीने स्वतः व्यापारी नेमले, व त्यांच्या मार्फत बोली लावून धान्य खरेदी केले. २४ किंवा ४८ तासांत चुकाऱ्याची रक्कम कास्तकारांच्या खात्यात जमा होणे अनिवार्य होते. पण व्यापाऱ्याने धोकेबाजी करत चुकारे न देता पळ काढला. नाममात्र सालवंशी, शेतीचा सातबारा व कोरे चेक घेऊन बाजार समितीने कोणतीही शहानिशा न करता व्यापाऱ्याला धान्य खरेदीचा परवाना दिला. व्यापाऱ्याने कास्तकारांचे कोट्यवधी रुपयांचे धान्य खरेदी करून चुकारे न देताच जमानतदारासह पळ काढला. व्यापाऱ्याची पैसे देण्याची नियत फिरली. जगाचा पोशिंदा असलेल्या कास्तकारांच्या पोटावरच या नियतखोर व्यापाऱ्याने लात मारली. बाजार समितीनेही वेळेवर चुकाऱ्याची रक्कम अदा होत नसतांनाही या व्यापाऱ्याकडे धान्य खरेदी सुरूच ठेवली. एवढेच नाही तर १५ दिवस लोटूनही धान्याची रक्कम मिळाली नसतांनाही बाजार समितीने व्यापाऱ्याला धान्याची उचल करू दिली. याला व्यापाऱ्यावर दाखविलेला अंधविश्वास म्हणावे की काय, हेच कळत नाही. कास्तकार बाजार समितीवर डोळेझाकपणे विश्वास ठेऊन पैशाच्या हमीमुळं बाजार समितीच्या माध्यमातूनच धान्याची विक्री करतात. पण आता बाजार समितीच ठगांच्या जाळ्यात अडकू लागल्याने कास्तकारांनी विश्वास ठेवायचा तरी कुणावर हा प्रश्न निर्माण झाला आहे. १४७ कास्तकारांचे १ कोटी १३ लाख रुपयांचे चुकारे थकीत होते. त्यापकी बाजार समितीने ५६ लाख रुपयांचे चुकारे काही कास्तकारांना काही दिवसांपूर्वी अदा केले. उर्वरित चुकाऱ्याची रक्कम २५ फेब्रुवारीला कास्तकारांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे बाजार समितीने स्पष्ट केले होते. पण एक महिना होत आला तरी कास्तकऱ्यांच्या खात्यात चुकाऱ्याची रक्कम जमा न झाल्याने कास्तकारांचा आज संयम सुटला, व कास्तकारांनी एकजूट होऊन बाजार समितीच्या कार्यालयावर मोर्चा काढला. धान्याची रक्कम तत्काळ अदा करा, नाही तर धान्य परत द्या, अशी आक्रमक भूमिका आज सभापतीच्या दालनात जमलेल्या शेतकऱ्यांनी घेतली. सभापती व सचिवांना चुकाऱ्यासाठी हतबल झालेल्या कास्तकारांनी चाललेच धारेवर धरले. कास्तकारांना तुमच्यासारखे मासिक वेतन मिळत नाही. वर्षभर राबराब राबून, आस्मानी व सुलतानी संकटांचा सामना करून जे धान्य हातात येतं ते विकून कौटोम्बिक गरजा भागवाव्या लागतात. कास्तकारांवर आज उपासमार सहन करण्याची वेळ आली असतांनाही त्यांना धान्याचे चुकारे देण्याऐवजी बाजार समिती वेळकाढू धोरण अवलंबत आहे. त्यामुळे कास्तकारांनी बाजार समितीच्या दालनातच उपोषणाला बसण्याचा इशारा सभापती व सचिवांना दिला. ५ जानेवारी २०२२ ते ११ जानेवारी २०२२ या कालावधीत बाजार समितीचा परवानाधारक व्यापारी धीरज अमरचंद सुराणा रा. बन्सल ले-आऊट दत्त मंदिर मागे याने १४७ कास्तकारांकडून १९३५.०२ क्विंटल धान्य (सोयाबीन, चणा, तूर) खरेदी केले. ज्याची किंमत १ कोटी १३ लाख रुपये एवढी आहे. या व्यापाऱ्याचा जमानतदार रुपेश नवरतनमल कोचर रा. पद्मावती नगर हा होता. धान्याचे चुकारे न देताच व्यापाऱ्यासह जमानतदारही फरार झाला. हे दोघेही जवळपास तिने महिने होऊनही पोलिसांच्या हाती लागले नाही. दोघेही पोलिसांना गुंगारा देत आहे, व अटकपूर्व जमिनीसाठी प्रयत्न करित आहे. या व्यापाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण त्याला अटक करण्यात मात्र पोलिसांना अद्यापही यश आले नाही. सभापती म्हणतात की, जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांच्या संपत्तीचा लिलाव करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यांची संपत्ती विकून चुकारे देऊ हि भाषा आता कास्तकारांसमोर वापरली जात आहे. व्यापाऱ्याने नाममात्र सालवंशी, शेतीचा सातबारा व कोरे चेक बाजार समितीला देऊन धान्य खरेदीचा परवाना मिळविला. या व्यापाऱ्याच्या शेतीवर व घरावरही बँकेचे कर्ज असल्याची बाजार समितीतीलच काही कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा सुरु होती. मग फसवणुकीचा इरादाच असणाऱ्या व्यापाऱ्याच्या व जमतदाराच्या बँक खात्यात काय भुरका असेल असा संतप्त सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित होत होता. शेतकरी तत्काळ चुकारे देण्याची मागणी करत होते. पण शेवटी एका आठवड्यात चुकारे देण्यावर तोडगा झाल्याचे समजते. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांची आक्रमकता पाहून मोठा पोलिस बंदोबस्त त्याठिकाणी ठेवण्यात आला होता. तहसीलदार व पोलिस निरीक्षकांनीही बाजार समितीमध्ये येऊन कास्तकारांच्या व्यथा समजून घेतल्या.
सपोनि शिवाजी टिपूर्णे व प्रविण हिरे यांनी कोणतेही अनुचित प्रकार घडणार नाही, याची खबरदारी घेत कास्तकारांची समजूत काढली. पण शेवटी या महिन्यात धान्याच्या चुकाऱ्याची रक्कम न मिळाल्यास कर्ज काढलेल्या कास्तकारांना व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागेल ही व्यथा मात्र कास्तकारांमधून व्यथित होत होती.
कृषी उद्योगातील गैरव्यवहार टाळण्यासाठी टॅली सॉफ्टवेअरद्वारे ऑडिट - कृषीमंत्री दादाजी भुसे
सह्याद्री चौफेर | न्यूज
मुंबई : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, अहमदनगर या कार्यालयाकडून 2012 ते 2017 या कालावधीत 1 कोटी 20 लाख 98 हजार रूपयांचा अपहार झाल्याचे निदर्शनास आले असून यात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या तीन अधिकारी-कर्मचाऱ्यांवर आर्थिक गुन्हे अन्वेषण, अहमदनगर यांच्यामार्फत एफ.आय.आर. दाखल करण्यात आला असून त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. या प्रकरणी काही कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवरही कार्यवाही करण्यात येणार आहे. भविष्यात अशा प्रकारच्या अडचणी उद्भवू नये, यासाठी सर्व महाराष्ट्रात टॅली या आज्ञावलीद्वारे ऑडिट करण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
या प्रकरणी हलगर्जी करणाऱ्या 21 अधिकारी-कर्मचारी यांना विभागामार्फत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून दोषी सेवानिवृत्ती अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. वितरक व लाभार्थी ग्राहकांकडून येणाऱ्या रकमेच्या अफरातफरीप्रकरणी कोणत्याही निरपराध कर्मचाऱ्यांवर कार्यवाही केली जाणार नाही याची काळजी घेतली जाईल. या अपहार प्रकरणी 15 दिवसांच्या आत कृषी आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येईल, असे श्री.भुसे यांनी सांगितले.
या रक्कम अपहारात 15 लाख 30 हजार रूपये एका लिपिकांकडून वसूल करण्यात आले आहे. दोन कर्मचारी हे न्यायालयात गेले असून याबाबतची वस्तुस्थिती न्यायालयात भक्कमपणे मांडण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी सांगितले.
यासंदर्भात विधान परिषद सदस्य सर्वश्री अमोल मिटकरी, चंद्रशेखर बावनकुळे, अभिजित वंजारी यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
ग्रामपंचायतचे ब्लॉक तोडून वाढीव बांधकाम करणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा - योगेश मडावी यांची मागणी
सह्याद्री चौफेर | न्यूज
झरी : माथार्जुन ग्रामपंचायतचे हद्दीतील ग्रामपंचायतचे मालकीचे ब्लॉक भाडेकरूने परवानगी न घेता असंविधानीक रित्या परिपक्व बांधकाम तोडून वाढीव बांधकाम केले असून त्याची चौकशी करून त्या भाडेकरुवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी योगेश मडावी यांनी सोमवारी माथार्जुन ग्रामपंचायतचे सचिव मनोज दासरवार यांचे मार्फत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना केली आहे.
माथार्जुन ग्रामपंचायतने १२ वर्षापूर्वी हे ब्लॉक भाडेतत्त्वावर दिले. ग्रामपंचायतने दिलेल्या भाडे करारानुसार फक्त ११ ते १२ महिने ग्रामपंचायत मार्फत दिले जाते त्यापेक्षा जास्त भाडे करारनामा करण्यास जिल्हा परिषद यवतमाळ यांची अनुमती घ्यावी लागते. ग्रामपंचायतचे व मडावी यांचे माहिती नुसार मागील १२ वर्षापासून भाडे कर (भाड्याची रक्कम) सुध्दा भाडेकरूने ग्रामपंचायत मध्ये जमा केले नाही. परंतू भाडेकरूने परिपक्व बांधकाम तोडून वाढीव बांधकाम केले असून प्रशासनाचे व ग्रामपंचायतचे याकडे दुर्लक्ष आहे. संबंधित भाडेकरू कडून परिपक्क ब्लॉक बांधकाम तोडून ब्लॉक वाढविण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाची व वरिष्ठ कार्यालय विभागाची अनुमती घेतली असल्यास अनुमती पत्र व वाढीव बांधकामाची तांत्रिक व प्रशासकीय मान्यता व माथार्जुन ग्रामपंचायतचा ठराव अनुमती पारित केलेला ठराव साक्षांकित करून देण्यात यावे व हे सर्व दस्ताऐवज नसल्यास भाडेकरूने केलेल्या बांधकामाची चौकशी करून भाडेकरूवर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते योगेश मडावी यांनी निवेदनाद्वारे ग्रामपंचायतचे सचिव मनोज दासरवार यांचे कडे करण्यात आली आहे.
शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जल जागृती सप्ताह साजरा
शंकर घुगरे | सह्याद्री चौफेर
वणी : महाराष्ट्र राज्य शासन निर्णय जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य च्या निर्णयानुसार सोळा मार्च ते बावीस मार्च जलसंवर्धन सप्ताह चे आयोजन एस.पी. एम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात करण्यात आले.
यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जल हेच जीवन आहे "save the water save the life"
पाण्याचे महत्व पटवून सांगितले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री क्षीरसागर सर उप प्राचार्य श्री तामगाडगे सर उपस्थित होते श्री बुजोने सर यांनी यांनी जल प्रतिज्ञा सादर केली व मागून विद्यार्थांनी ती प्रतिज्ञा समुहाने म्हटली.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बुजोने सर यांनी केले यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
Subscribe to:
Posts (Atom)