हेलिकॉप्टर दुर्घटनेत जयस्वाल दांपत्य सह दोन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : येथील जयस्वाल दांपत्य सह दोन वर्षाची चिमुकली हिचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 15 जून ला घडली असून या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण वणी परिसरात शोककळा पसरली आहे.

राजकुमार जयस्वाल, पत्नी श्रद्धा जयस्वाल व मुलगी काशी जयस्वाल अशी त्यांची नाव आहे. हे सर्व वणीतील रहिवाशी असून हेलिकॉप्टर दुर्घटना मध्ये त्यांचा समावेश असून आणखी इतर राज्यातील चार जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. 

वणी येथील राजकुमार जयस्वाल हे आपल्या परिवारासह केदारनाथ भेटीला गेले होते, केदारनाथची भेट घेऊन परत पुढील प्रवासाकडे निघाले असता त्यांच्या हेलिकॉप्टरला गौरीकुंड सोनप्रयाग च्या जंगलात हा अपघात झाला. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली असून यात एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे. यातील तीन जण यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील रहिवाशी जयस्वाल दांपत्यासह 23 महिन्याच्या चिमुकलीचा समावेश आहे.

मागील वर्षी राजकुमार जयस्वाल यांनी पहिल्यांदाच भव्य स्वरूपाचे काशी महाशिवपूराण कथेचे आयोजन प्रदीप मिश्रा यांच्या उपस्थितीत केले होते. विशेष म्हणजे राजकुमार यांचा मुलगा विवान हा ऐनवेळी पांढरंकवडा येथील आजोबा कडे थांबल्याने तो बचावला असं बोलल्या जात आहे.या दुर्दैवी घटनेने जयस्वाल कुटुंबियांसह वणी शहरात शोककळा पसरली आहे.

हरवलेले मोबाईल पोलिसांना सापडले

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : वणी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून हरवलेले आठ ते नऊ मोबाईल हस्तगत केले, ज्यांची किंमत सुमारे लाखों रुपये असतील. 

CEIR (सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर) हे एक पोर्टल आहे, जे हरवलेले मोबाईल ट्रेस करण्यासाठी आणि परत मिळवण्यासाठी तयार करण्यात आले आहे,या CEIR पोर्टल वरून अर्जदार नामे कैलाश मानकर, नितीन उताणे, राहुल विरुडकर अतुल टेकाम, चिले व सुमित चोरडिया यांचे मोबाइल मिळाले. अर्जदारांनी ऑनलाईन तक्रारी केल्या होत्या, त्यावरून नमूद मोबाइल ट्रेस झाले असून वरीलपैकी तीन अर्जदार यांना मोबाईल परत देण्यात आले असून चार मोबाईल अर्जदार पोलीस स्टेशनला न आल्याने सदरचे मोबाईल देणे बाकी आहे,अशी माहिती पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर, पोलीस स्टेशन, वणी यांनी दिली.

पोलीस स्टेशन वणी येथे प्राप्त झालेल्या मोबाईल मिसिंग च्या तक्रारीची तत्काळ दखल घेऊन त्यांचे मोबाइल शोधून अर्जदारांना मोबाईल परत दिल्या जात असल्यामुळे अर्जदारासह नागरिकाकडून पोलिस प्रशासन कौतुकास पात्र ठरत आहे.

त्वरा करा... फक्त 20 जून पर्यंतच खादी कॉटन महोत्सव सेल!!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : खादी कॉटन महोत्सव सेल,नाव जरी घेतलं तरी स्वस्त दरात चांगल्या दर्जाच्या वस्तू मिळतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कुर्ता, पैंजामा, पठानी,सलवार, गाऊन आणि जॅकेट, शर्ट, पॅन्ट, टॉवेल, फॅन्सी जुडबॅग, रुमाल आणि भरपूर व्हेरायटी अगदी एकाच छताखाली मिळतात, म्हणून लाखों ग्राहक खादी कॉटन महोत्सव सेल वर विश्वास ठेवतात.

महोत्सव काळात धमाका ऑफर्स दिवाळी, होळी, नाताळ, नवीन वर्ष अशा उत्सव काळात "खादी कॉटन महोत्सव सेल" मध्ये प्रचंड मोठ्या ऑफर्स असतात. या काळात तुम्ही महोत्सवचा लाभ घेऊ शकता. मात्र, आता मोजकेच पाच दिवस उरलेत,20 जून 2025 पर्यंत च आपल्या वणी शहरात हा सेल असणार आहे.

जैताई मंदिर, साई मंदिर चौक येथील खादी कॉटन सेल मध्ये खरेदी करण्यासाठी आजच जर तुम्ही सह कुटुंब, व इष्टमित्रासह भेट दिली, तर तुम्ही मोठ्या प्रमाणावर पैसे वाचवू शकता. रविवार आणि सणासुदीचे दिवस हे खादी कॉटन महोत्सव सेल मधील सर्वोत्तम शॉपिंगचे दिवस आहेत. म्हणून या सुट्ट्यात, एकदा अवश्य भेट द्या, 20 तारीख शेवटची आहे.ही तारीख जाण्यापूर्वी या सेल ला अवश्य भेट द्या आणि स्वस्त दरात उत्तम दर्जाच्या खादी कॉटन कपड्यांची खरेदी करा.



राज ठाकरे यांचा वाढदिवस मारेगावात साजरा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : महाराष्ट्र आणि पंचक्रोशीतील मराठी माणसासाठी तळमळ व अस्मिता जपणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस आज मारेगावात साजरा करण्यात आला. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी त्यांची मनसैनिकांनी आपुलकीने विचारपूस करण्यात आली.

जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे यांच्यासह तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या. अहमदाबाद मध्ये विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहत संतोष रोगे यांनी वाढदिवस साधेपणाने साजरा करत आपली सामाजिक बांधिलकी देखील जोपासली आहे.

याप्रसंगी तालुका अध्यक्ष रूपेश ढोके, शहर अध्यक्ष चांद बहादे,उदय खिरटकार, आकाश खामनकार, विजय रोगे, सिंधूताई बेसेकर, ढेंगळे ताई व पदाधिकारी उपस्थित होते.

उमेश खुशालराव बेसरकर मारेगावचे नवीन ठाणेदार

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : उमेश खुशालराव बेसरकर यांची मारेगाव पोलीस ठाण्याच्या तात्पुरत्या स्वरूपात पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी काल दिनांक 13 रोजी प्रशासकीय कारणास्तव जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या व नेमणूक केल्या आहेत. शहर पुसद येथे कार्यरत असलेले उमेश खुशालराव बेसरकर यांची मारेगाव पोलीस ठाण्याच्या ठाणेदार म्हणून कार्यभार देण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात योग्य अधिकारी देण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी निर्गमित केलेल्या आदेशात सहा अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी काल निर्गमित केलेल्या आदेशात पी आय विलास कुलकर्णी यांच्या कडे मुकुटबन पोलीस स्टेशन तर बेसरकर यांच्या कडे मारेगाव पोलिस ठाण्याचा पदभार दिला आहे.

नूतन ठाणेदाराकडे अनेक आव्हाने

मारेगाव हा आदिवासी बहुल तालुका व आता नव्याने आत्महत्याग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातोय. मारेगाव सह ग्रामीण भागातील लोक मोलमजुरी करून कसे बसे जगत आहे आणि या ठिकाणी मटका, रेती तस्करी, सुगंधित तंबाखू सह गांजा ची विक्री, जनावरांची तस्करी, जुगार, अवैध दारू विक्री ही जोमात आहे. त्यामुळे नवीन ठाणेदार यांना आव्हानात्मक असणार आहे.