अल्पवयीन मुलीचा विनयभंग;आरोपीला दोन वर्षाचा सक्षम कारावास

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत एका अल्वयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली होती. ही घटना 2019 रोजी घडली होती. या प्रकरणी पांढरकवडा सत्र न्यायालयाने अजित कुमार मिश्रा (मुळ रा. परेना ता.जि. शिवांग रा. बिहार) हमु भालर या आरोपीला दोषी ठरवून दोन वर्षाचा सक्षम करावासाची शिक्षा व 1 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

या बाबात अधिक माहिती अशी की, मागील पाच वर्षा अगोदर भालर वसाहत 30/09/2019 रोजी एका 14 वर्षाच्या अल्वयीन मुलीचा विनयभंग केला होता. वेकोली इंजिनियर अजित कुमार मिश्राने पिडीत मुलीला ट्युशन ला जात असताना तिच्याशी अश्लील संवाद साधत विनयभंग केल्याची घटना घडली होती. याबाबत पीडित मुलीने वडिलांना आपबीती सांगितली. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.त्यानुसार कलम 354(A),(D)354, 341 ipc सह कलम12 पॉक्सो अंतर्गत आरोपी वर गुन्हा दाखल केला होता.

सदरील प्रकरणाचा तपास करून आरोपी विरुद्ध पांढरकवडा सत्र न्यायालयात प्रकरण सुरु होते. न्यायालयाने सबळ पुरावे व पीडितेच्या बयानावरून न्यायदंडाधिकारी यांनी सदरील खटल्याचा अंतिम निकाल देत आरोपी अजित कुमार मिश्रा यास दोषी ठरवून दोन वर्ष कठोर करावासाची शिक्षा सुनावली आणि एक लाख रुपये दंडाची रक्कम न भरल्यास एक महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.

या प्रकरणाचा तपास अधिकारी ए पी आय सतीश चावरे यांच्या सह एल सी पथक यवतमाळ यांनी तपास करून सदरील आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी वकील प्रशांत मानकर यांनी पीडितेची बाजू मांडली, कोर्ट परैवी अधिकारी आशिष टेकाडे यांनी काम पाहिले आहे.

नवरगाव येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : मागील काही दिवसापासून मारेगाव तालुक्यात आत्महत्या च्या घटनेत वाढ होत असल्याचे चित्र समोर येत असून नवरगाव (धरण) येथील एका तरुणाने जुन्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार आज शनिवारी सकाळी 11.30 वाजता च्या दरम्यान उघडकीस आला आहे. 

शुभम करलुके (अंदाजे वय 32) असं त्याचे नावे आहे. घरी कोणीच नसल्याने डिश केबल च्या वायरने गळफास घेऊन त्याने आपली जीवन यात्रा संपवली. या घटनेचा पंचनामा मारेगाव पोलीसांनी केला असून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून तो मच्छी पकडण्याचा पारंपरिक व्यवसाय करत असल्याचे समजते.

शुभम याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, विवाहित बहीण असा आप्त परिवार आहे. सदर घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलिस करीत आहे.

FIR दाखल होताच पोलिसांनी अवघ्या दोन तासात आरोपीला शोधलं

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : चक्क दुरुस्तीसाठी आणलेल्या कारच्या डिक्की मधून साडेसात तोळे सोन्याचा एकूण सात लाख रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेला होता. याबाबत ठाण्यात तक्रार प्राप्त होताच वणी पोलिसांनी अवघ्या दोन तासात त्या प्रकरणातील संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार दिनांक 30/05/2025 रोजी पोलीस ठाणे वणी येथे फिर्यादी रवींद्र रामदास राजूरकर रा. मोहदा (ता.वणी) यांनी तक्रार दिली की, ते मिर्झा वाशिंग सेंटर (गॅरेज) वणी या ठिकाणी त्यांची फोर व्हीलर गाडी दुरुस्तीसाठी आणली असता, त्यांच्या गाडीच्या डिक्कीतून तीन तोळ्याची एक, अशा दोन बांगड्या आणि चपला कंठी हार वजन दीड तोडे असा एकूण साडेसात तोडे सोन्याचा मुद्देमाल चोरी गेला होता, सदर गुन्ह्याची तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त होताच,पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांचे आदेशाने गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक धीरज गुल्हाने, पो कॉ नंदकुमार, गणेश, गजानन, मुनेश्वर यांनी सदर गुन्यातील आरोपीचा शोध घेऊन आरोपीला पोलीस स्टेशन येथे आणले असता त्याने त्याचे नाव शेख तनवीर शेख अजिज (वय 20) रा. रंगनाथ नगर, वणी असे सांगितले. त्यास गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी आधी उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यानंतर त्यास पोलीस हिसका दाखवताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली व गुन्ह्यातील मालमत्ता ज्या ठिकाणी लपवून ठेवली होती, ती हस्तगत करण्यात आली.यामध्ये तीन तोळ्याची एक अशा दोन बांगड्या, एक चपला कंठी हार वजन दीड तोडे,असे एकूण साडेसात तोडे वजनाचे अंदाजे किंमत 7 लाख रुपयाचा मुद्देमाल त्याच्या ताब्यातून घेतला.
सदरची कारवाई ही गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल होताच अवघ्या दोन तासांमध्ये केलेली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाच कौतुक होत आहे.

सदर ची कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर याचे आदेशानुसार पोउपनि धीरज गुल्हाने,पोलीस कॉन्स्टेबल गणेश, नंदकुमार, मोनेश्वर, गजानन यांनी केली.
 

वणीत अकरा हजारांचा एमडी ड्रग्ज सह मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : शहरात प्रतिबंधित असलेला तंबाखू, खर्रा चवीने चाखला जातो. आजही तलबगारांना खर्याविना राहावत नाही. ह्यात काही नवल जरी नसल तरी मात्र,वणी शहरात एम डी ड्रग्ज (मेफेड्रोन) मिळतोय, याबाबत आश्चर्य व्यक्त होत असून ही वणीसाठी धोक्याची घंटा असल्याची समजली जात आहे.

शहरातील जत्रा रोड परिसरातून शुक्रवारी एका युवकांकडून एम डी ड्रग्ज मादक पदार्थ जप्त करण्यात आला आहे. क्षितिज अशोक इंगळे (वय 23) रा. रंगनाथ नगर, वणी असे ड्रग्ज बाळगणाऱ्या युवकाचं नाव आहे.त्याच्याकडून मेफेड्रोन 2 ग्राम 550 मिली पावडर मिळून आला. ज्याची किंमत 11 हजार 400 रुपये अशी असून ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. तसेच त्याच्या ताब्यातील एक मोटरसायकल, एक आयफोन, व ड्रग्ज असा 86 हजार 400 रुपयचा मुद्देमाल जप्त केला.

सदर आरोपी हा जत्रा रोड परिसरात ड्रग्ज विक्रीकरीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली, त्यआधारे पोलीस त्या ठिकाणी गेले, त्याचा विचारपूस केली. त्याने अगोदर टाळाटाळ केली नंतर पंचांसमक्ष झडती घेतली असता आपोआप बोलका झाला आणि त्याने सर्व कबूल केले.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक, यवतमाळ कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुश जगताप, यांचे मार्गदर्शनात सतिश चवरे, पोलीस निरीक्षक स्थागुशा यवतमाळ, गोपाल उंबरकर, पो.नि. पो.स्टे. वणी, सपोनि अजयकुमार वाढवे, पोउपनि धनराज हाके, स्था.गु.शा. यवतमाळ पोउपनि धनंजय रत्नपारखी पो.स्टे. वणी पोलीस अंमलदार पोलीस अंमलदार सुनिल खंडागडे, सुधीर पांडे, उल्हास कुरकुटे, सुधीर पिदुरकर, निलेश निमकर, रजनिकांत मडावी, सलमान शेख, नरेश राऊत सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ व निलेश आडे, पो.स्टे. वणी यांनी संयुक्त यशस्वीरित्या पार पाडली आहे.

ग्रामीण भागातील विकास कामाचा दर्जा घसरला

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : तालुक्यात गाव पातळीवर मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहे. सदरील कामे नामधारी एजन्सीकडून होत असुन, प्रत्यक्षात राजकीय गुत्तेदार आणि प्रशासनाच्या आशीर्वादाने होत असल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या कामाचा दर्जा तपासणारी यंत्रणा, अभियंता हे दुर्लक्ष करीत असल्याने विकास कामाच्या गुणवत्तेचा दर्जा तपासायचा कोणी, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. गाव पातळीवर होणारी विकास कामे स्थानिक ग्राम पंचायत या एजन्सी मार्फत केल्या जाते, लोकप्रतिनिधींनी विकास कामाचा पाठपुरावा करून ही कामे गुणवत्तापूर्वक करून घेणे अपेक्षित असते, परंतु या कामाचे गुत्तेदार लोकप्रतिनिधीच बनले असल्याने अनेक विकास कामात अनियमितता असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तक्रारी असलेल्या विकास कामाची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे. आदिवासी बहुल मारेगाव तालुक्यात मूलभूल सुविधांचा अभाव आहे. रस्ते, विज, पाणी, नाली बांधकाम, स्मशान भूमीसह इतरही भौतिक मूलभूत सुविधेसाठी ग्रामीण भागातील जनता झगडत आहे. दरवर्षी या सुविधेसाठी सरकार करोडो रुपयाचा निधी देवूनही दुय्यम दर्जाच्या विकास कामामुळे गाव पातळीवरील समस्या सुटल्या नाहीत, हे वास्तव चित्र तालुकाभरात पाहावयास मिळते. तालुक्यात अधिकृत कंत्राटदार व एजन्सी नामधारीच असून त्यांच्या नावाने लोकप्रतिनिधी व ग्राम अधिकारी गुत्तेदारिने अनेक गावात विकास कामे करत असल्याने कामाचा दर्जा निकृष्ट दर्जाचा दिसून येतो. त्यामुळे सहा महिने पुर्वी झालेल्या विकास कामाची वाट लागलेली दिसून येते. शासनाने ज्या अभियंतावर कामाचा दर्जा तपासण्याची जबाबदारी सोपविली आहे. ते कामाच्या गुणवत्तेपेक्षा कशावर नजर ठेवून असतात, हा प्रश्न मात्र या ठिकाणी अनुत्तरीत आहे. ग्रामीण भागात होत असलेल्या विकास कामाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ठ दर्जाची दिसून येते, इस्टिमेट नुसार कामे होत नाही.थातुरमातुर कामे केली जातात. मात्र कामाच्या गुणवत्तेची तपासणीकरीता राजकीय दडपण आणि मायामोह या धोरणामुळे मूल्यमापन करणारे अभियंते आणि देयके काढणारे अधिकारी विकास कामाची पाहणी न करता वजन पाहून बिल मंजूर करून आपले संबंध जोपासत असल्याची चर्चा होताना एकावयास मिळते. त्यामुळे काम करणाऱ्या एजन्सी ला सगळ्यांची मर्जी सांभाळत विकास कामे करावी लागत असल्याने गुणवत्तेकडे दुर्लक्ष होते. दर्जाहीन कामामुळे गाव खेड्यातील दिवसागणीक समस्या वाढत आहेत. त्यामुळे गुण नियंत्रक विभागाकडून विकास कामाचा दर्जा तपासून दोषी कंत्राटदार, अभियंता यांच्यावर कार्यवाही करण्याची गरज आहे.अशी मागणी मारेगाव तालुक्यातील जनतेतून केल्या जात आहे.