तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

सह्याद्री चौफेर | नंदकुमार मस्के

महागाव : महागाव पोलीस स्टेशन हद्दीतील वरोडी येथे एका 42 वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

अविनाश अनंता अडकीने रा. वरोडी असे गळफास घेतलेल्या मृतक तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. मृतक हा स्वतः कडील एक हेक्टरावर आपल्या कुटुंबाचा कसाबसा गाडा हाकलत होता. दिनांक 22 एप्रिल ला दुपारच्या सुमारास अविनाश ने घरात गळफास लावून आपली जिवन यात्रा संपवली, हि बाब घरच्या मंडळींना कळल्यावर एकच आतंक झाला. काय झाल,हे कोणालाच कळेना सदर बाब महागाव पोलिस स्टेशन ला कळविण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी लगेच घटनास्थळाकडे धाव घेत अविनाश चा मॄतदेह आपल्या ताब्यात घेतला आणि उत्तरीय तपासणीसाठी सवना येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. 

गेल्या तीन वर्षांपासून सतत ची नापीकी व शेत मालाला योग्य भाव मिळत नसल्याने तो नेहमीच चिंताग्रस्त राहायचा. अशातच अविनाश ने खाजगी कर्ज व बँकेच्या कर्जाचे ओझ्यामुळे आत्महत्या सारखें टोकाचे पाऊल उचलले अशी चर्चा गावात असून अविनाश याच्या पाठीमागे आई, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा आप्त परिवार आहे. पुढील तपास महागाव पोलिस करीत आहेत.

जन सुरक्षा विधेयक रद्द करा, युवक काँग्रेसचे निवेदन

सह्याद्री चौफेर| ऑनलाईन

मारेगाव : जन सुरक्षा विधेयक रद्द करावे, अशी मागणी भारतीय युवक काँग्रेसने तहसीलदार यांचे मार्फत सरकारकडे आज दि. 22 एप्रिल ला निवेदनातून केली आहे. 

या विधेयकाद्वारे भारतीय नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य व वैचारिक तसेच तात्त्विक विरोध करण्याच्या अधिकारावर बंधने येतील. अधिकारांचा गैरवापर होईल.या मुळे विधेयकामुळे नागरी हक्क, लोकशाही मूल्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गंभीर परिणाम होतील म्हणून हे विधेयक रद्द करण्याची मागणी भारतीय युवक काँग्रेस चे सय्यद समीर यांचे नेतृत्वात केली आहे. 

निवेदनावर शहर अध्यक्ष सय्यद समीर, उपाध्यक्ष शकील अहेमद,सौ छाया किनाके,आनंदराव मसराम, मनोज भोपरे, राजेश घुमे, नंदेश्वर आसूटकर, घनश्याम गजभिये, अंकुश माफूर,अशोक सुडीत, स्वप्नील वांढरे, प्रतीक वांढरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

साहेब... परीक्षेचे दिवस आहे... आणि तुमची सतत "बत्ती गुल", काही तरी विचार करा!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : वीज वितरण कंपनीची अनियमित वीज पुरवठा, वारंवार बत्तीगुल, तसेच ग्राहकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे हे आता तालुक्यात सार्वजनिक स्तरावर चर्चा आणि तीव्र नाराजीचा विषय बनला आहे.

मारेगाव तालुक्यातील मार्डी परिसरातील इलेक्ट्रिक काही हवा, पाणी किंवा काही कारण नसतानाही दररोज बत्ती गुल होत आहे. ऐन विद्यार्थ्यांचे परीक्षेचे दिवस आहे. आणि वीज वितरण विभागाकडून अघोषित लोडशेडींग सुरु आहे. परिणामी ग्रामीण मुलांच्या शिक्षणात मोठा कमालीचा व्यत्यय निर्माण झाल्याचे बोलल्या जात आहे. दिवसा तर लाईट येरजाऱ्या मारतातच,परंतु रात्री सुद्धा तासंतास "बत्ती गुल" असते. लोकांची इलेट्रिक, इलेक्ट्रॉनिक साधनं वाकुल्या दाखवत आहे. तर कधी अचानक अति विद्युत दाबमुळे घरगुती उपकरण बिघडत आहे. याचा भ्रूदंड नागरिकांनाच सोसावा लागत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील डिजिटल शिक्षणाचा सावळा गोंधळ उडाला आहे. शेतकरी त्रस्त झाला आहे. एक्स्ट्रा क्लास ओस पडत आहे. या सर्व बाबीकडे संबंधित विभाग व लोकप्रतिनिधी मात्र, का बघ्याची भूमिका घेत हेच कळायला मार्ग नाही. जन प्रतिनिधी जनतेच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरत आहे असा प्रश्न देखील आपसूकच उपस्थित होत आहे. 

वीज वितरण कंपन्यांकडून वारंवार वीज खंडित केल्याने लोकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. याचा परिणाम उद्योग, व्यवसाय आणि सामान्य जीवन यांवर होतो. त्यामुळे मारेगाव तालुक्यात सर्व सामान्यांचा 'कोणी वाली आहे कीं नाही' असा तीव्र नाराजीचा सुरु उमटत असून सध्या शैक्षणिक तरी काळात बत्ती गुल राहूच नये अशी मागणी जोर धरत आहे. 

नत्थुजी खानझोडे अनंतात विलीन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण खानझोडे यांचे वडील श्री नत्थूजी बापूराव खानझोडे यांचे दि.19 एप्रिल रोजी दुपारी 4.00 च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय 75 वर्षाचे होते.

वणी तालुक्यातील राजूर (कॉलरी) वार्ड नं 3 मधील सर्वांच्या परिचयातील मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयातील उपचारानंतर त्यांना आठ दिवसांपूर्वीच घरी आणण्यात आले होते.

शनिवारी त्यांचं दुःखद निधन झाले. आज त्यांच्या पार्थिवावर रविवार दि. 20 एप्रिल ला सकाळी 12 वाजता राजूर (कॉलरी) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

स्व. नत्थू जी खानझोडे यांचे पाठीमागे 3 मुलं, स्नुषा, नातवंडं असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

जि.आर.एन.कंपनी निलजई बेलोरा येथील स्थानिक बेरोजगारांना नौकरी द्या - भाकप

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : निलजई बेलोरा परिसरात जि.आर.एन.कंपनी सुरु असुन या कंपनीत परीसरातील तरुण बेरोजगारांना व स्थानिक लोकांना नौकरीत सामावून घेण्याबाबत दि.28/3/25 रोजी निवेदन देऊन कळविले व तशी चर्चा संबधित अधिकरयासोबत केली होती. परंतु कंपनीने अजूनपर्यंत कोणतेही उत्तर दिले नाही. कंपनी राजकीय दबावाखाली किंवा ओळखी पाळखीच्या युवकांना रोजगार देतात व ज्या युवकांना रोजगाराची गरज असतांना त्याची ओळख किंवा राजकीय जवळीक नसेल तर त्याला नौकरीत समावून घेत नाही. अशा युकावर उपासमारीची वेळ येत आहे.

डब्लू. सि. एल.ने परिसरातील शेतींचे अधिग्रहण केल्यामुळे व शेतमजुरी हा व्यवसाय गेल्यामुळे शेतमजुरांच्या हाताला कामेसुद्धा राहीली नाही,दुसरा व्यवसाय नाही. त्यामुळे स्थानिक गरजू युवकांना रोजगार देणे ही कंपनीची सामाजिक व कायदेशीर जबाबदारी आहे. याची जाणीव भाकपने कंपनीस अनेक वेळा करून दिली. परंतु कपनीने कोणतेही म्हणणे ऐकूण घेण्यास तयार नाही. म्हूणन परिसरातील सर्व बेरोजगार युवक भारतीय काम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात दि. 25/4/2025 ला सकाळी 11वाजेपासून कंपनीच्या कार्यालयासमोर "बेमुदत धरणे आंदोलन करीत असल्याचे निवेदन सर्व बेरोजगार युवक व शेतमजुरातर्फे भाकपचे काॅ.मोरेश्वर कुंटलवार, काॅ.रवींद्रभाऊ गोरे, काॅ.दीपक, काॅ.पंढरीभाऊ मोहितकर, काॅ.दिनेशभाऊ शीटलवार, काॅ.मिलिंद रामटेके, राज्य कौंसिलर काॅ.सुनिल यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ, उपविभागीय अधिकारी वणी,पोलिस स्टेशन शिरपुर व संबधित कंपनी व्यवस्थापनास दिले.