मानवी हक्क सुरक्षा परीषेदेच्या राळेगाव तालुका अध्यक्ष पदी विनोद माहुरे तर उपाध्यक्षपदी जितेंद्र कहुरके यांची निवड

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

राळेगाव : मानवी हक्क सुरक्षा परीषेदेची महिला व पुरुष कार्यकारिणीची निवड राळेगाव येथील शासकीय विश्रामगृहात दिनांक ३ एप्रिल रोज गुरुवारी करण्यात आली आहे.
 
राळेगाव तालुका अध्यक्षपदी विनोद माहुरे यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी जितेंद्र कहुरके, रमेश आसुटकर कोषाध्यक्षपदी, रविंद्र निवल सचिवपदी, अमृत पाझारे संपर्क प्रमुखपदी, शंकर मांदाडे कोषाध्यक्षपदी तर सुधाकर दांडेकर यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
तसेच राळेगाव तालुका महिला अध्यक्षपदी सौ.संतोषी वर्मा तर उपाध्यक्षपदी सौ.दुर्गाताई मेघरे तर सचिवपदी सौ. अ‍ॅड. रोशनीताई कामडी (वानोडे) यांची निवड करण्यात आली आहे.

ही निवड मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार यांनी एका नियुक्ती पत्राद्वारे केली आहे.
यावेळी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे कार्यकारी सदस्य, परशुराम पोटे, नानासाहेब बोनगिरवार सदस्य महाराष्ट्र प्रदेश, अमोल कुमरे अध्यक्ष मारेगाव तालुका, हुसकुले यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.या कार्यक्रमाचे संचालन व आभार शंकराव मांदाडे यांनी केले.

मारेगाव मैत्री कट्टा ग्रुप च्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन

सह्याद्री चौफेर| ऑनलाईन

मारेगाव:  समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय मिळवून देणारे, सामाजिक क्रांती घडवून देशाची शान उंचावणाऱ्या महापुरुषांच्या शौर्याची माहिती बहुजनांना मिळावी ह्या उद्देशाने प्रेरित होऊन बहुजन उद्धारक, कायदेतज्ज्ञ, प्रज्ञासूर्य, भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव व जागतिक महिला दिन साजरा करत आहेत.
 विदर्भस्तरीय पारंपरिक वेशभूषा स्पर्धा (Traditional dress competition) वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि देशांमध्ये विविध प्रकारचे पारंपरिक कपडे आहेत जे गेल्या हजारो वर्षांपासून स्थानिक लोक परिधान करतात. पारंपरिक वेशप्रणाली ही एक प्रकारची परंपरा आहे. आपली परंपरा जोपासली जावी, या उद्दात हेतूने18 वर्षांवरील महिलांसाठी पारंपरिक वेशभूषा स्पर्धे चे आयोजन केले आहे. प्रवेश फी 100 रु.प्रथम बक्षीस 5000/-,व्दितीय बक्षीस 3000/-,
तृतीय बक्षीस 2000/-
         
विदर्भस्तरीय नृत्यस्पर्धा
12एप्रिल सायंकाळी 5वाजता 30 वर्षा वरील वयोगटाच्या महिला करीता नृत्यस्पर्धे चे आयोजन करण्यात आले आहे.
वसंत जिनिंगच्या पटांगण वर होणारी ही नृत्य सपर्धा समूह नृत्य व एकल नृत्य अश्या दोन प्रकारे घेण्यात येणार आहे. 
समूह नृत्याला प्रथम 11000/-,द्वितीय 9000/-, तृतीय 7000 रोख,एकल नृत्याला प्रथम 7000 /-, द्वितीय 5000 /-, तृतिय 3000 /-रोख आणि चषक देण्यात येणार आहे.
प्रवेश फी समूह नृत्यासाठी 500 तर एकल नृत्यासाठी 250 रूपये राहील.

भव्य सांस्कृतीक महिला रैली
दिनांक 13एप्रिल रविवारी सायंकाळी 4वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातुन रैली प्रारंभ होऊन शहरात मार्गक्रमण करीत परत येईल.रॅली मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड येथील चवदार तळ्याचे सत्याग्रहाचा दृश्य दाखविणारा देखावा सादर केला जाणार आहे.तसेच ढोल ताशा गजरात विविध नृत्य व आदिवासी डंडार नृत्य सादर केले ‌जाणार आहे 

प्रवेशासाठी सौ .प्रतिभा डाखरे9922669648,सौ.बीना दुपारे हेपट9356035463 सौ.मयुरी जैस्वाल 7066006684 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मारेगावं मैत्री कट्टा ग्रुप च्या वतीने कार्यक्रमाचे संयोजक दीपक जूनेजा यांनी केले आहे.कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सौ.बिना हेपट (दुपारे), सौ.प्रतिभा डाखरे,उदयभाऊ रायपुरे, गणेश पावशरे,किशोर पाटील,गजानन जयस्वाल, शहाबुद्दीन अजानी आदी सदस्य अथक परिश्रम घेत आहे.

अवैध दारू विक्री प्रकरणी दोघांना अटक

सह्याद्री चौफेर| ऑनलाईन

वणी : येथील टागोर चौक, गणेशपूर रोड येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या दोन इसमाना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 41 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन शत्रुघ्न कुडमेथे (पोलीस कॉन्स्टेबल) यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. आरोपी सदानंद अशोक पथाडे (वय 24) रा. केसूर्ली व हर्षल राकेश खरे (वय 20)  रा. रंगनाथ नगर, वणी हे विनापरवाना विदेशी दारूची विक्री करीत असताना आढळले.

पोलिसांनी घटनास्थळावरून रॉयल चॅलेंज कंपनीच्या 180 मिली क्षमतेच्या 48 बाटल्या (किंमत 9120 रुपये), ओल्ड मंक कंपनीच्या 180 मिली क्षमतेच्या 48 बाटल्या (किंमत 6960 रुपये) आणि एमएच 29 एस 846 क्रमांकाची जुनी हिरो होंडा मोटारसायकल (अंदाजे किंमत 25000 रुपये) असा एकूण 41 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 (अ) (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार सीमा राठोड करत आहेत.सदरची कारवाई वणी ठाणेदार गोपाल उंबरकर यांचे आदेश्याने पो.का. गजानन यांनी केली

हरवलेला मोबाईल वणी पोलिसांकडून मूळ मालकाला परत

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : वणी पोलिस स्टेशन च्या हद्दीतून एका नागरिकाचा हरवलेला मोबाईल वणी पोलिसांकडून त्याला परत करण्यात यश आले आहे. आपला गहाळ झालेला मोबाईल पुन्हा सुखरूप मिळाल्यामुळे संबंधित मालकाच्या चेहऱ्यावरून आनंद द्विगुणित झाला.

मेहनती च्या पैशातून हजारो रुपये घालून खरेदी केलेला मोबाईल जेव्हा हरवतो किंवा गर्दीच्या ठिकाणी चोरी झाला की, आपण हताश होऊन तो परत मिळेल ही आशा सोडून देतो. औपचारिकता म्हणून पोलिसांत तक्रार नोंदविली जाते. मात्र, अशाच दाखल झालेल्या तक्रारीचा छडा लावून वणी पोलिस स्टेशनच्या पथकाने 17 जानेवारी 2024 रोजी हरवलेल्या मोबाईल (C.E.I.R) वरून शोधून ते दि. 01/04/2025 रोजी येथील पेट्रोल पंपावर हरवलेला मोबाईल परत करण्यात आला आहे. 

वणी ठाण्याचे ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या हस्ते व पोलिस उपनिरीक्षक रत्नपारखी यांच्या उपस्थितीत सोमवारी हा मोबाईल सतीश श्रीराम करडे (रा. मुरधोनी) यांना परत दिला असून वणी पोलीस प्रशासनाचे यावेळी त्यांनी आभार व्यक्त केले.

निराधार लाभार्थ्यांना थकीत रक्कम तातडीने देण्यात यावी - राजु धावंजेवार

सह्याद्री चौफेर| ऑनलाईन

वणी : संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांची रक्कम थकीत असल्याने ती रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा करण्यात यावी अशी मागणी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांचे मानधन मिळाले नसल्याने त्यांना त्यांच्या मूलभुत गरजा भागवणे कठीण झाले आहे. लाभार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी बँकेत जावे लागते, बँकेत गेले असता पैसे आले नाही असे उत्तर दिल्या जाते व तहसील कार्यालयात जावून चौकशी करा असे सांगितल्या जाते. यामूळे नाईलाजास्तव लाभार्थ्यांना रिकाम्या हाताने परत यावे लागते. 

शासनाकडून मिळत असलेल्या रकमेच्या भरवश्यावर लाभार्थ्यांना महिनाभर सांभाळून खर्च करावा लागतो. लाभार्थ्यांना शासनाकडून निराधार योजनेचे पैसे न मिळाल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशाप्रकारे मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्य अध्यक्ष राजु धावंजेवार यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती पत्र दिले आहे.