जनतेचा मूलभूत अधिकार व सुरक्षेसाठी शहीद भगतसिंगांचा संघर्ष होता - कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

राजूर कॉलरी : शहीद भगतसिंग इंग्रजांविरुद्ध लढत असताना त्यांचा संघर्ष निव्वळ इंग्रजाांपासून स्वातंत्र्य मिळविण्यापुरता नव्हता तर या देशात कोणत्याही व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्ती कडून शोषण होऊ नये, जनतेचे मूलभूत अधिकार त्यांना मिळाले पाहिजे, जनतेला त्याचे हक्क प्राप्त करण्यासाठी संघटित होऊन त्याला संघर्ष करण्याचे अधिकार अबाधित असावे यासाठीचा त्यांचा संघर्ष होता आणि त्यासाठीच सन १९२९ साली संसदेमध्ये जनविरोधी जनसुरक्षा विधेयक (public safety bill), व कामगार विरोधी ट्रेड डिस्प्यूट बिल हे विधेयक ठेवल्या जाणार होते त्याचा विरोध करण्यासाठीच भगतसिंगांनी संसदेमध्ये बॉम्ब टाकून आणि ह्या विरोधातील पत्रके टाकून स्वतःला अटक करवून घेतली होती. यावरून त्यांचा संघर्ष कशासाठी होता हे लक्षात येते, असे प्रतिपादन शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांचा शहीद दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. कुमार मोहरमपुरी यांनी केले.

राजूर येथील शहीद भगतसिंग चौकातील त्यांचा तैलचित्राला सामाजिक कार्यकर्ते डेव्हिड पेरकावार व मो. असलम यांच्या हस्ते देशातील युवकांचे आदर्श व प्रेरणादायी व्यक्तिमत्व शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना शहीद दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. 

यावेळेस डेव्हिड पेरकावार, जयंत कोयरे, महेश लिपटे, कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी यांनी उपस्थितांना भगतसिंगाचे विचार व कृती याबद्दलची माहिती दिली. या झालेल्या छोटेखाणी अभिवादन कार्यक्रमात गावातील गायक कलाकार राजेंद्र पुडके व नागो काळे ह्यांनी क्रांतिकारी गाणे म्हणून उपस्थितांमध्ये जोश जागविला.

या अभिवादन कार्यक्रमाला प्रामुख्याने पोलिस पाटील वामन बलकी, अशफाक अली, कैलास पाईकराव, अजय भुसारी, राकेश इग्रपवार, संजय कवाडे, स्नेहल वाळके, जब्बारभाई, पंधरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

गणेशपूरात फुलली अंजिराची फळबाग, उत्पन्नात मोठी वाढ!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

झरी : झरी (जामणी) तालुक्यातील गणेशपुर (खुर्द) येथे माळरानात चंद्रकांत दशरथ घुगुल यांनी वैशिष्ट्यपूर्ण व मौल्यवान असलेल्या अंजीर फळांची बाग फुलवून उत्पादन घेणे सुरू केल्याने त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्याने त्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. 

झरी जामणी तालुक्यातील चंद्रकांत घुगूल राहणार पांढरकवडा (लहान) हे शिवेसेनेचे अनेक वर्षापासून तालुका प्रमुख असून राजकिय सामजिक क्षेत्रात त्यांची चांगली ओळख आहे. तसेच त्यांची पत्नी सुद्धा झरी जामणी पंचायत समितीच्या सदस्य होत्या. त्यांचा सातत्याने तोट्यात चालत असलेल्या शेती व्यवसायाला त्यांनी आधुनिक पद्धतीची जोड साधत शेती व्यवसायाकडे प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले आणि यातूनच त्यांनी अंजिराची फळबाग फुलवली आहे. आपल्या जमिनीत अंजीर फळाचे उत्पादन होऊ शकते असा विश्वास मणी बाळगून त्यांनी चापली पवनसुत नर्सरी राजु तुरणकर यांचे मार्गदर्शनात उच्चप्रतिच्या पुणेरी जातीचे रोपे आणून सन 2022 मध्ये जवळपास 300 झाडांची लागवड त्यांनी दिड एकरात केली. मागील वर्षी 1 क्विंटल चे उत्पादन घेतले तर, आतापर्यंत दिड क्विंटल अंजीराची विक्री करण्यात आली असून यंदा एकूण तीस क्विंटलच्या वर दोनशे रुपये प्रतिकिलो प्रमाणे म्हणजे जवळपास 6 लाखाच्या वर विक्रमी उत्पन्न होणार असल्याचे शेतकरी चंद्रकांत घुगूल यांनी सांगीतले. संपूर्णतः ऑरगॅनिक पद्धतीने हे उत्पादन सुरू आहे. याकरिता त्यांनी 46 हजार रुपये किमतीचा गोबर गॅस प्रकल्प शेतात उभारला आहे. त्यातून येणारी शेणाची स्लारी पूर्ण झाडांना देण्यात येत असल्याचे चित्र पहायला मिळते आहे. 

अंजीर हे वैशिष्टपूर्ण फळ आहे. इतर फळापेक्षा ते मौल्यवान मानले जाते. कारण ते पित्तविरोधी आणि रक्तशुद्धीरोधक असून भारत, अमेरिका आणि आफ्रिका यासह अनेक देशांमध्ये अंजीरांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. त्याचे फळ ताजे आणि सुकलेले अशा दोन्ही प्रकारचे असते. अंजीर पिकल्यावर त्याचा मुरांब्बा बनवून उपयोगात आणला जातो. मात्र, ज्या ठिकाणी हवामान समशीतोष्ण आणि कोरडे असते,अशाच भागात अंजीरची लागवड केली जाते.असं तज्ज्ञ सांगतात.

भारतात तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेशातील काही भागात याची लागवड केली जाते. चार-पाच वर्षांच्या वनस्पतीतून सुमारे 15 किलो फळे मिळतात. पूर्णपणे परीपक्व झालेला अंजीर एका वेळी 12000 रुपयांपर्यंत कमावून देतो. 

महाराष्ट्रात अशाप्रकारे लागवड

व्यावसायिकदृष्ट्या अंजीरची लागवड केवळ महाराष्ट्रातच केली जाते. महाराष्ट्रात एकूण 417 हेक्टर क्षेत्रात लागवड केली जाते, त्यापैकी 312 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र एकट्या पुणे जिल्ह्यात आहे. सातारा आणि पुणे जिल्ह्यांच्या सीमेवरील नीरा नदीच्या खोऱ्यातील खेर-शिवरा ते जेजुरी या 10-12 गावांचे क्षेत्र महाराष्ट्रातील अंजीर उत्पादनाचा एक प्रमुख भाग आहे. अलीकडे सोलापूर-धाराशिव (उस्मानाबाद) मधील शेतक-यांनी अंजीरांची लागवड सुरू केली आहे. चंद्रकांत घुगूल यांनी केलेल्या यशस्वी प्रयोगामुळे आता यवतमाळ जिल्ह्यातील अतिदुर्गम झरी जामणी तालुक्यात सुद्धा अंजीर फळाचे उत्पादन होऊ शकते हे सिद्ध झाले आहे.

कोणत्या हंगामात अंजीर घेता येते

अंजीर उष्ण आणि कोरडे अशा हवामान चांगले सहन करतात. यामुळे महाराष्ट्रातील मोठ्या भागात हे फळ पिकविण्याच्या दृष्टीने वाव आहे. कमी तापमान या पिकाला हानिकारक नाही. पण दमट हवामान नक्कीच धोकादायक ठरु शकते. विशेषत: कमी पर्जन्यमान असलेल्या भागात अंजीर पिकवता येतात, जेथे ऑक्टोबर ते मार्च या काळात पाण्याची उपलब्धता कमी असते.

अंजीर लागवडीसाठी जमीन कशी असावी

माध्यम काळ्या आणि लाल मातीतील अत्यंत हलक्या प्रतीच्या जमिनीत फळबागांमधून अंजीराचे उत्पादन घेता येतात. मोठ्या प्रमाणात चुनखडीसह खारट, काळ्या मातीत अंजीर उत्तम वाढते. अंजीरांसाठी चांगले ड्रेनेज असलेली मीटर खोल माती चांगली असते. तथापि या मातीत चुन्याचे प्रमाण असले पाहिजे. या फळझाडासाठी खूप काळी माती अयोग्य आहे. झाड उथळ आणि चांगल्या ड्रेनेज मातीत पाहिजे तसे वाढत नाही.

कोणत्या आहेत प्रगत जाती, अंजीरचे अनेक प्रकार असतात. पुणेरी दिनकर, सिमरन, कालिमिर्ना, कडोटा, अश्या अनेक जातीचे रोपे मिळतात. ताजे अंजिरासाठी प्रगतशील शेतकरी घुगुल यांच्याशी संपर्क साधावा व सर्व प्रकारचे फळ, चंदन, मोहगणी, मिलियादुबिया, अशा अनेक रोपांसाठी चापली पवनसूत नर्सरी (मांगरूळ रोड ता. मारेगाव) ला अवश्य भेट द्या!

रमेश बोबडे राष्ट्रीय स्तरावरील लीडर ट्रेनर स्काऊट एल टी ही परीक्षा उत्तीर्ण

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : येथील रमेश प्रभाकर बोबडे हे जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा नवीन वाघदरा येथे पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी 1992-93 या वर्षांपासून स्काऊट गाईड चळवळीमध्ये प्रवेश केला. राष्ट्रीय ट्रेनिंग सेंटर पचमढी येथे अवघड प्रशिक्षण त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण करणारे जिल्ह्यातील पहिले शिक्षक ठरले. 

या प्रशिक्षणाला प्रत्येक राज्यातील शिक्षक सहभागी होते. या अगोदर स्काऊटचे अनेक प्रशिक्षण त्यांनी घेतले आहे. त्यांच्या शाळेतील व आजपर्यंत स्काऊट क्षेत्रामध्ये राष्ट्रीय स्तरावर 50 च्या वर विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यस्तरावर ७०च्या वर विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. 

उत्कृष्ट ट्रेनर म्हणून त्यांचा महाराष्ट्रामध्ये नावलौकिक आहे. त्यांनी पीप प्रकल्प, प्रौढ शिक्षण, संपूर्ण स्वच्छता अभियान, निर्मल ग्राम पुरस्कार, तंबाखूमुक्त शाळा, निरंतर शिक्षण यामध्ये उल्लेखनीय कार्य केले. त्याबद्दल त्यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार झाला. 5 सप्टेंबर 2015 रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते दिल्लीत हा पुरस्कार त्यांना मिळाला. 

त्याचप्रमाणे स्काऊट विभागांमध्ये उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना तत्कालीन राज्यपाल विद्यासागर यांच्या हस्ते आदर्श स्काऊट म्हणून मुंबई येथे सत्कार झाला. एवढेच नव्हे तर त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन सन 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय स्काऊट जांबाटो अमेरिका येथे दीडशे देशातील विद्यार्थ्यांना 27 दिवस उपस्थित राहून एडवेंचर ट्रेनर म्हणून उल्लेखनीय कार्य केलेले आहे. त्यामुळे वणी तालुका तसेच यवतमाळ जिल्ह्याची मान उंचावली आहे.

जिल्ह्यातील सर्व स्काऊट कार्यालयाचे पदाधिकारी, जिल्ह्यातील तालुका कब मास्टर, स्काऊट मास्टर, गजानन गायकवाड जिल्हा संघटक, मनीषा तराळे जिल्हा संघटिका यांनी अभिनंदन केले. वणी तालुक्यातील सर्व क्लब मास्टर, ब्लॉक लीडर यांनी अभिनंदन केले. गुजलवार, काटकर, केंद्रप्रमुख आणि सर्व हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन केले.

हिवरा येथे निक्षय शिबिर संपन्न

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

 मारेगाव : 100 दिवशीय टीबी मुक्त अभियानांतर्गत हिवरा येथे दि. 20 मार्च गुरुवारला निक्षय शिबिर संपन्न झाले.
 यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी देठे यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हिवरा येथील सरपंच आरतीताई विशाल गाडगे, तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस पाटील राजेंद्र गाडगे, ग्रामविकास अधिकारी मून, विठ्ठल ठावरी, मुख्याध्यापक इंगोले, जि. प.शिक्षक परचाके, क्षय रोग टेक्निशियन कपिल रामटेके, श्रीमती वानखेडे, आरोग्य सहाय्यक आर. डी.रिंगणे, आरोग्य सेविका श्रुती गलाट, सामुदायिक आरोग्य अधिकारी पराग नगराळे, पल्लवी मडावी, लॅब असिस्टंट जीवन तिरणकर, आरोग्य सेवक प्रशिक बोरकर, अखिल वेलादे, शंकर आत्राम, उपस्थित होते.

यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या आजारावर कशा प्रकारे नियंत्रण आणावे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच टीबी मुक्त अभियान जे राबविण्यात येत आहे त्या अंतर्गत 210 रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली. सोबतच बी पी, सीबीसी, शुगर व सिकलसेल ची तपासणी करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमाचे संचालन आर डी रिंगणे तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कपिल रामटेके यांनी केले. तर उपस्थितांचे आभार आरोग्य सेविका श्रुती गलाट यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता आशा सेविका सौ मंगला एकरे, कमल दरवेकर, सरिता जीवतोडे, वंदना ढोके,शुभांगी बावणे,गटप्रवर्तक वैशाली खीरटकर, सुहासिनी भगत, व तसेच अंगणवाडी सेविका,मदतनीस यांचे सहकार्य लाभले.

यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी, तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस,प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी,आशा सेविका, तसेच गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी विक्की बांगर यांची नियुक्ती

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी विक्की बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

ही नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजु धावंजेवार यांनी शुक्रवारी २१ मार्च ला एका नियुक्ती पत्राद्वारे केली.नियुक्तीपत्र देतेवेळी महाराष्ट्र राज्य प्रदेश सदस्य परशुराम पोटे, अमोल कुमरे, वेणुदास हुसुकले, निशांत मेश्राम, सोनु भाऊ पाटील आदी उपस्थित होते.
 
सामान्य माणसावर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराविरोधात मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे विक्की बांगर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.