स्त्री आणि अध्यात्म....

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

बुलढाणा : स्त्री आणि अध्यात्म यांचे पुरातन काळापासून आजतागायत अगदी जवळचे नाते आहे .स्त्री या शब्दातच एक अद्भुत शक्ती आहे. तेहतीस कोटी देवाचे सामर्थ्य या स्त्रीत्वात लपलेले आहे. प्रत्येक स्त्रीला आपल्या कुटुंबावर परमेश्वरी दयेची सावली पाहिजे असते. त्यासाठी ती सतत उपास तपास, जप तप,उपासना , अनेक व्रतवैकल्ये,म्हणजे सगळे शोडशोपचार करायला तयार असते. जणू काही आपल्या कुटुंबासाठी ती आदिशक्तीचा अवतार घेऊनच कार्यरत असते.
 म्हणून प्रत्येक कुटुंबातील स्त्री ही एक आदिशक्तीच म्हणा की .
अशात एका साक्षात आदिशक्ती रुपात जन्मलेल्या परमपूज्य श्री निर्मला देवी. यांचा जन्म छिंदवाडा येथे 21 मार्च 1923 ला झाला. त्या स्वतः डॉक्टर असून त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात गांधीजीं सोबत क्रांतिकारी कार्यात भाग घेतला. गांधीजींनी जेव्हा या महामायेला क्रांतिकारी रूपात पाहिले तेव्हा गांधीजी म्हणाले, की आता "दैवी शक्ती पृथ्वीवर आलेली आहे . श्री निर्मला देवी या सहज योगाच्या प्रणेत्या .
आतापर्यंत आपण हटयोग, कर्मयोग ,राजयोग, भक्तियोग, लय योग, अष्टांग योग इत्यादी योगाचे प्रकार पाहिले. मात्र सहज योग म्हणजे काय? तर हे आपण जाणत नाही तर चला आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
 सह म्हणजे सोबत आणि ज म्हणजे जन्मणारे म्हणजेच आपल्या सोबत जन्मणारा योग, म्हणजेच "सहज योग" यात आपली कुंडलीनि शक्ती जागृत करून परमेश्वरांशी आपण एकरूप होतो. 
 आपले शरीर हे सात चक्र आणि तीन नाड्या यापासून बनलेले आहे .ते सात चक्र कोणते? 
 १)मुलाधार चक्र 
२) स्वाधीष्टान चक्र 
३) नाभिचक्र 
४) अनाहत चक्र 
५) विशुद्धी चक्र
६) आज्ञाचक्र
७) सहस्त्रार चक्र .
तसेच तीन नाड्या...
१) इडा नाडी.
२) पिंगला नाडी.
३) सुषुम्ना नाडी .
या सर्वांचे ज्ञान परमपूज्य आदिशक्ती श्री निर्मला देवी यांनी पृथ्वीवर प्रसारित केले. किती अद्वितीय ..किती अद्भुत शक्ती या माउलीजवळ. साक्षात आदिशक्ती च .
लहान असताना एका पाठात शिकले होते की कुटुंबातील एक स्त्री जरी शिकली, सुशिक्षित झाली तर अवघे कुटुंब सुशिक्षित होते. त्याचप्रमाणे श्री निर्मलादेवी यांनी पूर्ण विश्वाला आपले कुटुंब म्हणून विश्वातील प्रत्येक व्यक्तीला सुशिक्षित म्हणजेच आत्मसाक्षात्कारी बनविण्याचा प्रयत्न केला या देवीने पृथ्वीवर जनसामान्यांना आपली कुंडलिनी शक्ती जागृत करून आत्मसाक्षात्कार देण्याचे महान कार्य केले जेणेकरून आपले परमपिता परमेश्वराशी कनेक्शन जोडले जावे. प्रत्येक चक्राची अधिष्ठित देवता कोण ?
याचे ज्ञान जनसामान्यात पोहोचविले ... म्हणजेच १)मुलाधार चक्राची अधिष्ठाती देवता --श्री गणेश 
२) स्वादिष्टान चक्राची --ब्रह्मदेव सरस्वती 
३)नाभिचक्र -- श्री विष्णू लक्ष्मी 
४) अनाहत चक्र ---जगदंबा ५) विशुद्धी चक्र ---राधाकृष्ण 
 ६)आज्ञाचक्र --, महावीर गौतम बुध्द,एकादश रुद्र, महालक्ष्मी ,महा गणेश. ७)सहस्त्रार --- सदाशिव आदिशक्ती .

आणि तीन नाड्या 
१) इडा नाडी-- महाकाली आणि भैरवनाथ .ही चंद्र नाडी आहे. ही नाडी भूतकाल दर्शविते.
२) पिंगला नाडी ही सूर्य नाडी आहे .या नाडीवर साक्षात महा सरस्वती व हनुमानजींची शक्ती आहे. ही नाडी भविष्यकाळ दर्शविते.
३) सुषुम्ना नाडी -- महालक्ष्मी व महा गणेश . ही नाडी वर्तमान काल दर्शविते.
    एवढे अगाध ज्ञान आपल्याला देणारी ही माऊली, या माऊलीला कोटी कोटी नमन .
   आपण रोज पेपर वाचतो म्हणा किंवा पेपर उघडतो त्यावेळेस आपल्या नजरेस काय येते ..कोणत्या बातम्या असतात पेपरमध्ये ..एक बलात्कार ,दुसरा म्हणजे नशेत ,वाईट संगतीत मदमस्त होऊन वावरणारी ही पिढी.. असं मोठं शीर्षक असतं आणि तिसरं म्हणजे अपघात बस ..एवढे वाचले की एका आईच्या मनात धास्ती भरते की माझी मुलगी माझा मुलगा बाहेर शिकायला गेले आहे, तसेच नोकरीसाठी बाहेर जाणारा आपला पती यांना तर काही होणार नाही ना? अशा विचारात असणारी आजची आधुनिक स्त्री ..तिला आपल्या पाखराभोवती आपल्या सख्या भोवती एक दैवीवलय, सुरक्षा कवच पाहिजे असतं .हो की नाही या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी आज सहज योग ही एक काळाची गरज बनलेली आहे. सहज योग ही एक "ध्यानधारणा" करण्याची पद्धती आहे या पद्धतीने आपल्या भोवती एक दैवी औरा निर्माण होतो या औरात, या वलयात आपल्याला परमेश्वरी साम्राज्यात असण्याचा भास होतो. भास म्हणण्यापेक्षा एक दैवि कवचच निर्माण होते आणि या कवचात आपले सर्व प्रकारचे संरक्षण होते.म्हणून माझी सर्व स्त्री जातीला नव्हे तर समाजातील सर्वच लहान मोठ्या मंडळींना नम्र विनंती की आपण सर्व सहज योगाच्या दिशेने वाटचाल करावी.

सौ. मंजुषा राजेंद्र प्रसाद पांडे

अवैध रेती वाहतुक करणारे दहा टाॅक्टर वडकी ठाण्यात केले जमा

सह्याद्री चौफेर | विनोद माहुरे 

राळेगाव : उपविभागीय अधिकारी राळेगाव यांच्या नेतृत्वात महसूल पथकाने रात्री च्या दरम्यान,अवैध रेती वाहतुक करणाऱ्या दहा टाॅक्टर पकडून वडकी पोलिस स्टेशनमध्ये जप्त करण्यात आले. या कार्यवाहीने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. 

तालुक्यातील झुल्लर येथील वर्धा नदी पात्रातून अवैधरित्या रेतीची वाहतुक तीन दिवसांपासून सुरू असल्याची माहिती विशाल खत्री उपविभागीय अधिकारी राळेगाव यांना मिळाली. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी यांनी महसुल पथकाला बोलावून दिनांक ७-३-२५ रोजी रात्री १ वाजताच्या दरम्यान, झुल्लर येथील वर्धा नदी च्या पात्रातून अवैध रेती वाहतूक करीत असतांना जवळपास दहा टाॅक्टर मिळाले. यात १) टाॅक्टर क्रमांक एम.एच.२९ ऐ.के १२९८ परिक्षित रमेश फुटाणे यांच्या मालकीचा ट्राॅलीसह, २) टाॅक्टर क्रमांक एम.एच.२९ बि.सि.२४३४ कुणाल रविंद्र ठाकरे यांच्या मालकीचा ट्राॅलीसह, ३) टाॅक्टर क्रमांक एम.एच‌ २९ ऐ.के ६७६२ दिनेश बाबाराव काळे यांच्या मालकीचा ट्राॅलीसह, ४) टाॅक्टर क्रमांक एम.एच.२९ बि.सि.०.८५७ ब्रम्हानंद पुंडलिक कोरडे यांच्या मालकीचा ट्राॅलीसह, ५) टाॅक्टर क्रमांक एम.एच.२९ ऐ.के‌११८० विनोद शंकर देवकर यांच्या मालकीचा ट्राॅलीसह, ६) एम.एच.२९ बि.पी.४०२८ कुणाल अविनाश शिंदे यांच्या मालकीचा ट्राॅलीसह, ७) एम.एच.२९ ऐ.के १३३६ स्वप्नील भावराव महल्ले यांचा मालकीचा ट्राॅलीसह,  ८) एम.एच.३२ ऐ.एम.४६२८ ईमरखा पठाण यांच्या मालकीचे टाॅक्टर, ९) एम.एच.२९ बि.पि.६१२० स्वप्नील प्रभाकर खंडाळकर यांच्या मलिकीचे ट्राॅलीसह, १०) टाॅक्टर क्रमांक एम.एच.२९ बि.पि.६६८३ हेमंत देविदास वाभिटकर यांच्या मालकीचा ट्राॅलीसह, वडकी पोलिस स्टेशनमध्ये जप्त करण्यात आले आहे. 

मोठ्या प्रमाणात तालुक्यातील ट्रॅक्टर जप्त केल्याने अवैध रेती वाहतुक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.जिल्ह्यातील सर्वात मोठी अवैध रेती वाहतूकीची कार्यवाही असल्याचे बोलल्या जात आहे. 

युवासेनेचा नगर परिषदेला 10 मार्च पर्यंत अल्टीमेटम

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : शहरात तीन दिवसाआड पाणी पुरवठा सुरु आहे. त्यातही घाण पाणी पुरवठा केला जातो, मात्र वणीकर जनतेकडून ३६५ दिवसांचा कर वसूल केल्या जात आहे. हा वणीकर जनतेवर अन्याय आहे. मालमता व पाणी करावरील व्याजाची रक्कम माफ करण्याची मागणी, उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वात मुख्याधिकाऱ्यांना निवेदनातून करण्यात आली. 

निवेदनात म्हटले आहे की, वणी न.प हद्दीतील मालमता व पाणीकर मालमत्ता धारकाकडून कर वसूल करण्यात येत आहे. संभवतः मालमता व पाणीकर धारकांनी काही अपरिहार्य कारणास्तव तसेच आर्थिक अडचणीमुळे कराची रक्कम वेळेत भरणा केली नाही. मात्र आता अनेक करधारक सध्यास्थितीत कराचा भरणा करण्यास तयार आहेत. परंतु भरमसाठ रक्कम व्याजाचे स्वरुपात आकारण्यात आली आहे. याबाबतचे यापूर्वी अनेक निवेदन दिले. त्यावेळी शिवसेनेच्या शिष्ट मंडळाला व्याजाची रक्कम माफ करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु नगर पालिकेने कोणतीही चर्चा केली नाही किंवा व्याजाची रक्कम माफ केली नाही निव्वळ जनतेची लूट करीत आहेत.

नगर परिषदेचे उत्पन्न वाढविण्याकरिता भरमसाठ रक्कम व्याजाचे स्वरुपात आकारण्यात आल्यामुळे सामान्य नागरिकांना त्याचा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. अगोदरच महागाईची डोकेदुखी आणि त्यात व्याजाची भरमसाठ रक्कम कराचे स्वरुपात आकारणे म्हणजे सामान्य नागरिकांवर सपशेल अन्याय ठरत आहे. यापूर्वी नगर पालिकेने व्याज माफ करून मुद्दल रक्कम वसूल केली आहे.

एकीकडे घाण पाण्याचा पुरवठा, त्यातही वर्षातून केवळ सहा महिने पाणीपुरवठा मात्र वार्षिक अहवाल करआकारणी केल्याने हा वणीकर जनतेवर अन्याय असून, ब्रिटिश राजवट असल्यागत जनतेला अनुभव येत आहे.

कराचे स्वरूपात आकारण्यात येत असलेली व्याजाची रक्कम माफ करून वरील कर मुद्दल स्वरुपात आकारण्यात यावी, जेवढे दिवस पाणी पुरवठा केला जातो तेवढेच दिवसाची कर आकारणी करावी, अन्यथा १० मार्च नंतर नगर पालिका विरोधात युवासेनेकडून तिव्रस्वरूपाचे जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे, मनोज वाकटी, कुंदन पेंदोर, मिलिंद बावणे, निखिल मडावी, बादल येसेकर, गौरव पांडे, अनुप पोटे, आर्य राऊत, अमोल अरेल्वर, रोशन काकडे, आशु ठाकूर, इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते. 

यावर १० मार्च पर्यंत काही उपाय योजना न केल्यास जनआंदोलन उभारणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. 

वेकोलीच्या निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणा - मनसेची मागणी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : वेकोलीच्या वणी (नॉर्थ) अंतर्गत सर्व खदानींमध्ये उद्या दिनांक ०७/०३/२०२५ पासून एच.ई.एम.एम.ऑपरेटरच्या होणाऱ्या भरती प्रक्रिया व प्रशिक्षण प्रक्रियेत काही कामगार नेत्यांनी व विकोलीच्या काही अधिकाऱ्यांनी संगनमत करून या भरती प्रक्रियेत आर्थिक देवान घेवाण करून सावळा गोंधळ करत असल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे प्राप्त झाल्याने,या भरती प्रक्रियेत पारदर्शकता व कौशल्य निपुण उमेदवारांचीच निवड व्हावी यासाठी भरती प्रक्रिया व प्रशिक्षण हे कॅमेऱ्याच्या समोर घ्यावे,अशी मागणी मनसेने क्षेत्रीय महाप्रंबधकांस दिलेल्या निवेदनातून केली आहे.

त्यामुळे एच.ई.एम.एम.ऑपरेटरच्या होणाऱ्या भरती प्रक्रिया व प्रशिक्षण हे कॅमेऱ्या समोर घ्यावी व यातील पारदर्शकता सिद्ध करून भरती प्रक्रियेत आर्थिक देवान घेवाण करणाऱ्या भ्रष्ट नेत्यांचा व अधिकाऱ्यांचा हा डाव हाणून  पाडावा, अशी मागणी मनसेचे माजी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी या निवेदनातून वेकोली प्रशासनाकडे करण्यात आली आहे. 

असे न झाल्यास क्षेत्रीय महाप्रंबधक या आर्थिक देवान घेवाणीत महत्वाचे सूत्रधार व हिस्सेदार असल्याचे गृहीत धरून क्षेत्रीय महाप्रंबधकाच्या विरोधात वरिष्ठाकडे तक्रार करण्यात येईल. व वेकोली विरोधात तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या निवेदनातून देण्यात आला. 

यावेळी वणी मनसेचे माजी तालुकाअध्यक्ष फाल्गुन गोहोकार, संतोष राजूरकर, प्रवीण कळसकर, धीरज बगवा, सूरज काकडे, योगेश काळे, निखिल माथनकर यांच्या सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते..

प्रधानमंत्री पिकविमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना तत्काळ द्या - वैभव कवरासे

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिकविमा योजनेचा लाभ चालू हंगामात मिळावा, यासाठी वैभव कवरासे माजी जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, यांनी उपविभागीय अधिकारी वणी यांना निवेदनातून मागणी केली. 

वणी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेतपिकांचे नुकसान झालेले होते. तसेच पावसाळ्यात नदी व नाल्याजवळील पुरामुळे अनेक दिवस पाणी साचल्यामुळे शेतपिकांची प्रचंड मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. त्यामुळे वणी तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्याकरीता पिकविमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रारी दाखल केल्या व त्या अनुषंगाने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पिकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जाऊन पाहणी करूण सर्वेक्षण केले. परंतु तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्यापही प्रधानमंत्री पिकविमा योजनेचा लाभ मिळालेला नाही. असा आरोप त्यांनी केला असून सोयाबिनचे पिक काढून जवळपास ३ महिने झालेले आहे. कपासीचे पिक सुध्दा संपलेले आहे. सदर पिकविमा योजनेचा लाभ खरीप हंगाम संपल्यानंतर एक महिन्यानंतर मिळणे क्रमप्राप्त होते. परंतु कोणत्याही शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिकविमा योजनेचा लाभ चालु वर्षात मिळालेला नाही आहे. 

त्यामुळे संबंधित कंपनीचे अधिकारी यांच्यासोबत तक्रार निवारण सभेचे आयोजन लवकरात लवकर करावे जेनेकरूण तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिकविमा योजनेचा लाभ पिकविमा कंपनीमार्फत मिळवुन देता येईल. अशी आग्रही मागणी वैभव कवरासे यांनी तालुका प्रशासनाला केली आहे. यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी वणी, व तहसीलदार यांना सुद्धा निवेदनाची प्रत सुपूर्द केली.