माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची आंदोलनस्थळी भेट देत केले आश्वासित

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव
: दिंदोडा धरणावर व वर्धा व वेणा नदिच्या काठावर आपल्या हक्काच्या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे. आज प्रकल्प ग्रस्तांच्या आंदोलनाचा बारावा दिवस असून दि.२३ जानेवारी २०२५ पासून सुरू करण्यात आलेल्या या तिनशे ते चारशे महिला-पुरुष व शाळकरी मुल-मुली आपल्या हक्काच्या मागणीसाठी उन्हाची व थंडीची पर्वा न करता दिवस रात्र ठिय्या देऊन धरणावर आंदोलना करिता बसलेले आहेत. या आंदोलनास माजी संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी भेट दिली.

धरणग्रस्तांकडून धरणाच्या कामाला विरोध का होतोय :
१९९३ ते १९९९ याकाळात सरकारने अल्प मोबदला देऊन जमीन अधिग्रहित केल्या होत्या पण धरणाचे काम सुरू केले नव्हते. २०१७ साली विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने धरणाचे काम सुरू केले.धरणाचे काम २०१७ मध्ये सुरू केले असल्याने प्रकल्पग्रस्तांना २०१३ चे कायद्यानुसार मोबदला मिळाला पाहिजे म्हणून धरणग्रस्तांकडून धरणाच्या कामाला विरोध केला जातोय. 

तीन जिल्ह्यातील धरणग्रस्ताचे चुल जलाओ आंदोलन:
२३ जानेवारी २०२५ ला नदीच्या काठावर ओसाड जागेवर घरदार सोडून यवतमाळ, वर्धा व चंद्रपूर या तिनही जिल्ह्यातील व मारेगाव, राळेगाव, हिंगणघाट व वरोरा या चारही तालुक्यातील धरणग्रस्त आपल्या हक्काच्या मागणीसाठी 'चुल जलाओ आंदोलन' करित आहे. यात शालेय विद्यार्थ्यांचा समावेश आहेत. ते शाळकरी मुले तिथुनच शाळेत शिकायला ये-जा करित आहे. 

आमदार खासदार यांचें दुर्लक्ष - आंदोलनकर्त्यांचा आरोप 
भारत हा कृषी प्रधान देश आणि या कृषी प्रधान देशात जगाचा पोशिंदा २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि जगाचा पोशिंदाच आपल्या हक्कासाठी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आंदोलन करित आहे आणि तिन जिल्हे व चार तालुक्यातील लोकप्रतिनिधी झोपेच सोंग घेऊन बसलेले आहेत एकही लोकप्रतिनिधी त्यांचा आंदोलनाला भेट देत नाही व दखल घेत नाही ही शोकांतिका आहे. मंत्री डॉ. प्रा. अशोक उईके व खासदार श्रीमती प्रतिभा धानोरकर यांनी अजूनही भेट दिली नाही. दिवसागणिक दिवस उलटून जात आहे. आंदोलन करते ओसाड जागेवर आंदोलन करत असून ते भजन, किर्तन, नारे निदर्शने करून शासन प्रशासनाचे लक्ष वेधून घेत आहे.  

विविध माध्यमातून मोठी साथ -आंदोलनकर्ते 
२३ जानेवारीपासून तीन जिल्ह्याचा संगम असलेल्या नदीच्या काठावर मानवी साखळी तयार करून आंदोलन छेडण्यात आले. आतापर्यंत दखल घेतली नसल्याने शेवटच्या टोकाचा पाऊल उचलायला लोकप्रतिनिधी आम्हाला भाग पाडत असल्याचा आरोप होत असून या शेवटच्या टोकाला जिम्मेदार लोकप्रतिनिधी राहतील ही गोष्ट आपण पत्रकार माध्यमानी लक्षात घ्यावी, 

माजी आमदार प्रा.वसंत पूरके यांचे आश्वासन 
२७ जानेवारी २०२५ ला माजी आमदार प्रा.वसंत पूरके (राळेगाव विधानसभा क्षेत्र) यांनी आंदोलनाला भेट दिली व त्यांच्या मागण्या ग्राह्य आहेत. याकडे शासनाचे तत्काळ लक्ष देणे गरजेचे आहे. या मागण्यांसाठी मी शेतकरी बांधवांसोबत आहे. पाठपुरावा करण्यासाठी मी ही मदत करायला तयार आहे,असा अभिप्राय आंदोलन कर्त्याच्या बुकात नोंदविला. 

नवनिर्वाचित आमदार करण देवतळे यांची भेट 
वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांनी ((ता. 28) ला आंदोलनस्थळी भेट दिली. मी या आंदोलनांचा विषय मंत्री साहेबांना सांगतो असे बोलले. 

आमदार समीर कुणावार यांच्या पीए ची भेट 
समीर कुणांवार (हिंगणघाट विधानसभा क्षेत्र) यांच्या पी ए नी आंदोलनाला भेट देत चर्चा केली व आंदोलनकर्त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. 

आमदार संजय देरकर अजूनही आंदोलन स्थळी फिरकले नाही.
वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर कोसारा पर्यंत येतात, पणमात्र आंदोलकांना भेट देऊन त्यांना सांत्वन देऊ शकत ही खुप मोठी शोकांतिका आहे, असे आंदोलनकर्त्यांनी म्हंटले. खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सुद्धा अजून पर्यंत अकरा दिवस उलटून गेले आज बारावा दिवस पण आंदोलनाला भेट दिली नाही कारण काय? सत्ताधारी तर चला त्यांना पुर्णपणे निर्णय घेऊनच आंदोलनाला भेट द्यावी लागेल पण विरोधीपक्ष नेते हे ही मुंग गिळून गप्प का? हा प्रश्न आंदोलनकर्त्याना पडत आहे. हाच जर आंदोलनाचा निर्णय आम्ही निवडणूक पुर्वी घेतला असता तर हे शांत बसले असते का? असाही प्रश्न आंदोलनकर्त्यातून उपस्थित होत आहे. 

आज बारावा दिवस, लहान मुलांपासून ते वयोवृद्ध सामील 
आज आंदोलनास बारावा दिवस उजाळला, परंतु आंदोलनस्थळी फक्त पोलीस दल व लाईट च्या व्यतिरिक्त कोणत्याही सुविधा नाही. नदी काठावर ओसाड जागेवर आंदोलन सुरू आहेत. तिथे छोट्या मुलांपासून तर वयोवृद्ध गटातील लोक आंदोलनात बसले आहे. साप,विंचू सारखे सरपटणारे प्राणी,जंगलात वावरणारे प्राणी किंवा वातावरणामुळे आंदोलनकर्त्यांमधील कोणी आजारी पडू शकतो. किंवा प्राण्यांपासून इजा पण होऊ शकते, मात्र बारा दिवसांत एकही डॉक्टर तिथे फिरकलेल नाहीत. आरोग्याची  कोणती सुविधा नाही. उष्मघाताला सुरूवात झाली पण त्या आंदोलनकर्त्यांना कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत असा आरोप केला जात आहेत. 

विरोधी पक्ष गेला कुठे? आम्ही आंदोलनाचा मार्ग बदलावा का?
विरोधी पक्ष गेला कुठे? ते सुद्धा चुप बसलेले आहेत. यांनाही आमचं काहीच देणंघेणं नाही असे दिसून येत आहे. विरोधी पक्षाचे दुर्लक्ष होणार असेल तर आम्हाला आपल्या आंदोलनाचा मार्ग बदलवाव लागेल. टोकाच पाऊल उचलन्याशिवाय पर्याय नाहीत, आमच्या हक्काचा २४० कोटीचा प्रस्ताव मंजूर होणार नाही, आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही, अस दिंदोडा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांच, सदस्य व जे जे प्रकल्पापासून ग्रस्त आहेत त्या सर्वांच ठाम मत आहे.
कहीही होवो एक महिना लागो की दोन महिने लागो पण हक्क हा घेणारच अशी ठाम भूमिका दिंदोडा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीची दिसून येत आहे. 

माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवारांनी केले आंदोलनकर्त्यांना केले आश्वासित 
३ फेब्रुवारी ला माजी आमदार संज्जीवरेड्डी बोदकुरवार यांनी दुपारी बारा वाजता दिलेल्या वेळेप्रमाणे आंदोलनाला भेट दिली. त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्यावर व आमदार करण देवतळे,समीर कुंनावार आमदार यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला व यांच्या मागणी करिता मुख्यमंत्री साहेबां सोबत मिटींगचे आयोजन करा असे बोलणे झाले. दरम्यान, पालकमंत्री डॉ..प्रा अशोक उइके साहेब व्यस्त असल्याने भ्रमणध्वनी द्वारे चर्चा होऊ शकली नाही. त्यांच्या पी. ए नी एका तासात बोलण्यास सांगतो अशी पी ए सोबत चर्चा झाली. मंगळवारी माजी आमदार संज्जीवरेड्डी बोदकुरवार हे मुंबई ला जात आहे,तेव्हा आम्ही सर्व मिळून महाजन साहेब व मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा करून  आपल्याला कळवतो व सात तारखेला मी परत आंदोलनाला भेट देण्यासाठी येतो व सोबत सर्वांना घेऊन येण्याचा प्रयत्न करतो असे आश्वासीत केले. 

आंदोलनकर्त्यांनी माजी आ. बोदकूरवारांचे मानले आभार 
माजी आमदार असुही आपण आम्हा प्रकल्पग्रस्तांना भेट द्यायला आले. याकरिता आंदोलनकर्त्यांनी माजी आमदार संज्जीवरेड्डी बोदकुरवार यांचे आभार मानले व जोपर्यंत आमच्या २४० कोटीचा प्रस्ताव मंजूर होत नाही, तोपर्यंत आम्ही सुरु केले आंदोलन सुरूच राहील असेही सांगितले.

कोलार पिंपरी, गोवारी शिवारात वाघाचा वावर

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : कोलार पिंपरी, गोवारी या शिवारात वाघाचा वावर असल्याने त्यांचा बंदोबस्त करावा अशा आशयचे निवेदन वणी तालुका कांग्रेस कमिटी च्या वतीने वनविभाग अधिकारी यांना देण्यात आले आहे. 

यावेळी यवतमाळ मध्यवर्ती बॅकचे माजी अध्यक्ष टिकाराम कोंगरे, तालुका कांग्रेस कमिटी चे अध्यक्ष घनश्याम भाऊ पावडे, राजाभाऊ पाथ्रडकर, प्रफुल्ल उपरे, दिलीप पिदुरकर, रविन्द्र होकम, निवृत्ती ठावरी, मोहन सातपुते, बंडु मालेकर, दिनेश पाऊणकर, धिरज भोयर, प्रेमनाथ मंगाम,सोनु पिदुरकर, गंगाधर परचाके,मधुकर सावे, उमेश चांदेकर, प्रमोद ठाकरे, गोवर्धन पिदुरकर, ज्ञानेश्वर बेलेकर, युवराज ठाकरे, इत्यादि नागरिक उपस्थित होते.

निवेदनात कोलार पिंपरी,गोवारी,भालर या शिवारात अनेक काटेरी झुडपे आहे, त्या झुडपात जंगली जनावरे माणसावर व पाळीव जनावरांवर हल्ले करीत आहे. या आधी सुध्दा एका इसमावर प्राणघातक हल्ला करून तो इसम मरण पावला, गावातील अनेक जनावरांवर सुध्दा हल्ला झाला आहे. गावात वाघाची दहशत पसरली आहे तरी, या परीसरातील वाघ, आस्वल, निलगाय व इतर जनावरांची विल्हेवाट लावण्यात यावी,अन्यथा परीसरातील नागरीकांना सोबत घेऊन तालुका कांग्रेस कमेटी च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा ईशारा देण्यात आला आहे. 
        

स्माॅर्ट मिटर सक्तीने लावण्याचे धोरण बंद करावे-कॉ.अनिल हेपट


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : राज्यातील जनतेच्या घरी घरगुती विद्युत मिटर व्यवस्थित सुरु असतांना भांडवली कंपनीला खुश करण्यासाठी जुने मिटर काढुन स्माॅर्ट मिटर लावण्याचे धोरण विज वितरण कंपनीने सुरु केले आहे.या धोरणाला भारतीय कम्युनिस्ट पक्षाने कडाडुन विरोध केला आहे. या अनुषंगाने भाकपने म.रा.विज वितरण कंपनीच्या वणी व झरी येथील मुख्य अभियंता यांना निवेदन सादर केले.

निवेदनात स्मॉर्ट मिटर लावण्याचे धोरण बंद करावे,सन 2020-21 पासुन शेती पंपाच्या विज पुरवठ्याकरिता डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना विजेचे कनेक्शन विनाअट तत्काळ द्या, शेतीसाठी सौरऊर्जा कनेक्शनची सक्ती करू नये ती ऐच्छीक करावी या मागण्याचा समावेश आहे. 

या मागण्या मान्य न केल्यास जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालये व विज वितरण कार्यालयावर भाकपचे वतीने प्रचंड मोर्चे काढण्याचा ईशारा म.रा.किसान सभेचे राज्य कौंसिलर कॉ.अनिल हेपट यांनी दिला. निवेदन देताना भकपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

विरकुंड येथील 'आमदार चषक' कबड्डीच्या सामन्यात “हास्य दर्पण” नाट्य प्रयोगाचे आयोजन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

 वणी : विरकुंड येथे होत असलेल्या 'आमदार चषक' कबड्डी सामन्याचे आयोजन संयोजक विलास कालेकर व जय बजरंग क्रिडा मंडळाच्या वतीने ६ फेब्रु. पासुन होत असुन यामध्ये ना भुत, ना भविष्य अशा कबड्डी सामन्याचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते विलास कालेकर व जय बजरंग क्रिडा मंडळ नवेगाव (विरकुंड) च्या वतीने करण्यात आले आहे. यामध्ये कार्यक्रमाचे उद्घाटक नवनिर्वाचित आमदार संजय देरकर असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय चोरडीय तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन मोरेश्वर उज्वलकर, आनंदकुमार शेंडे, संजय साखरकर तसेच विशेष मार्गदर्शक देवेंद्र बच्चेवार असणार आहे. उद्धाटकिय समारंभ आटोपताच परिसरातील लोकांच्या मेजवाणीसाठी 'हास्य दर्पण' या एकपात्री नाट्यप्रयोग परिसरातील नागरीकांसाठी ठेवण्यात आला आहे. 

संपुर्ण विदर्भात गाजत असलेल्या प्रा. हेमंत चौधरी यांच्या एकपात्री नाट्य प्रयोगाला संपुर्ण कला क्षेत्रातुन मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.त्यामुळे या कार्यक्रमाचा मोठ्या प्रमाणात जनतेनी आनंद घेण्याचे आवाहन आयोजन समितीचे विलास कालेकर व जय बजरंग क्रिडा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. या नाटकाचे प्रक्षेपण लाईव्ह दाखवण्यात येत आहे. या सामाजिक घडामोडींवर आधारित नाट्य प्रयोगाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक विलास कालेकर व जय बजरंग क्रिडा मंडळ नवेगाव (विरकुंड) च्या वतीने करण्यात आले आहे.

कुंभा येथे आदिवासी गोंड गोवारी महीला मंडळाचा स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : तालुक्यातील कुंभा येथे आदिवासी गोंड गोवारी आरक्षण संरक्षण समिती महीला आघाडीच्या वतीने नुकताच स्नेहमिलन तथा हळदी कुंकू,वाण वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
         
समितीच्या कुंभा शाखा महीला आघाडीच्या वतीने आयोजित सदर कार्यक्रमात महीला आघाडीच्या नेत्या सौ.राधिका माधव कोहळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.यावेळी गावातील शेकडो महीलांना सौ.राधिका कोहळे यांचे हस्ते हळदी कुंकू लाऊन वाण वाटण्यात आले.हा कार्यक्रम अत्यंत हर्षोल्हासात पार पडला.सायंकाळी गावातील सर्व समाज बांधवांच्या वतीने सामुहीक जेवनाच्या कार्यक्रमाने स्नेहमिलन सोहळ्याची सांगता झाली.
       
यावेळी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौ.सारीका मारोती सरवर,सौ.कविता शञुघन ठाकरे,सौ.जोत्स्ना नेहारे,गंगा ठाकरे,पुष्पा राऊत,सुरेखा दुधकोहळे,सुनंदा कोहळे,शैला कोहळे,राधा खंडरे,वंदना खंडरे,लता खंडरे,आशा कोहळे,वैशाली राऊत,शेवंताबाई ठाकरे,कमल ठाकरे,पुजा ठाकरे,मंगला राऊत,वंदना खंडरे,सुनिता नेहारे,प्रणाली राऊत,शैला दि.कोहळे,अर्चना कोहळे,चंद्रकला खंडरे यांचेसह अनेक महीलांनी सहभाग व मेहनत घेतली.