प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा!"

"प्रजासत्ताक दिन चिरायू होवो! आपला देश समृद्ध, बलवान आणि एकतेचा प्रतीक राहो!"

"भारत देशाच्या संविधानाचा मान आणि गौरव वाढविणाऱ्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा!"

शुभेच्छुक : सौ. इंदिरा बोन्दरे 
•बिगर सातबारा शेतकरी संघटना महिला अध्यक्षा 
•शामादादा कोलाम ब्रिगेड प्रदेश अध्यक्षा 


वणी वकील संघाचा निवडणुकीत चुरशीचा लढाईत एकता पॅनल ला ७ तर, विकास पॅनल ला ४ पदे

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : वणी बार असोसिएशन (वणी वकील संघ) ची २०२५-२६ या पुढील नवीन तीन वर्षासाठी ११ सदस्यासाठी दिनांक २५ ला झालेल्या निवडणुकीत एकता पॅनल व विकास पॅनल मध्ये झालेल्या चुरशीचा लढाईत ॲड. वीरेंद्र महाजन यांच्या एकता पॅनल चे ७ तर ॲड. निलेश चौधरी यांचा विकास पॅनल चे ४ सभासद निवडून आले. १०५ अंतिम मतदार यादीतील १०२ वकिलांनी मतदानात भाग घेऊन आपल्या मताचा कौल दिला. निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. शाम गायकवाड यांनी दिवसभर निवडणुक प्रक्रिया योग्य पद्धतीने सांभाळून पारदर्शकपणे निवडणूक निकालाची सायंकाळी ७ वाजता घोषणा केली.

निवडणूक निकालाची ॲड. शाम गायकवाड यांनी घोषणा केल्यानंतर ॲड. वीरेंद्र महाजन यांच्या एकता पॅनल ने गुलाल उधळून व बँड चा तालावर नाचून आपला विजय साजरा केला.

ॲड. निलेश चौधरी व ॲड. वीरेंद्र महाजन यांनी आपापल्या पॅनल ला निवडून आणण्यासाठी प्रत्येक वकिलांची प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन आपली भूमिका पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी दोन्ही पॅनल नी घोषणा पत्रके सुद्धा प्रकाशित केली होती. वणी दिवाणी व फौजदारी न्यायालयात वकिलांचे अनेक प्रश्न असल्याने या निवडणुकीत त्याला वाचा फोडण्याचे महत्त्वाचे कार्य झाले. दोन्ही पॅनल नी आपल्या घोषणा पत्रकात अनेक महत्त्वाचे मुद्दे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु या निवडणुकीत ॲड. वीरेंद्र महाजन यांच्या एकता पॅनल ने बाजी मारत अध्यक्ष पद ॲड. वीरेंद्र महाजन, उपाध्यक्ष पद ॲड. यशवंत बरडे, सचिव पद ॲड. अमोल टोंगे, सहसचिव पद ॲड. रामेश्वर लोणारे आणि तीन सदस्य पदे ॲड. दिलीप परचाके, ॲड. चंदू भगत व ॲड. आकाश निखाडे अशी ७ पदे खेचून घेतली तर ॲड. निलेश चौधरी यांच्या पॅनल ने कोषाध्यक्ष पद ॲड. प्रेम धगडी व सदस्य पदे ॲड. दुष्यंत बोरुले, ॲड. अविनाश बोधाने व ॲड. प्रतीक्षा शेंडे अशा ४ पदावर समाधान मानावे लागले. स्वतः ॲड. निलेश चौधरीला अध्यक्ष पदासाठी झालेल्या या निवडणुकीत फार कमी मताने पराभवाला सामोरे जावे लागले. एकता व विकास पॅनल मध्ये विकास पॅनल चा पराभव तर एकता पॅनल चा विजय झाला. 

वणी दिवाणी व फौजदारी न्यायालयात वकीलांसाठी बसण्यासाठी जागा, महिला वकिलांसाठी विशेष बार रूम, नवीन दिवाणी न्यायधीस वरिष्ठ स्तर व अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची इमारत उभी करणे, परीक्षा देणाऱ्या वकीलांसाठी प्रशिक्षण शिबिर घेणे, ई विधी ग्रंथालय उभारणे, तिन्ही भाषेतील वृत्तपत्रे सुरू करणे, अत्याधुनिक कॅन्टीन, वकिलांचा वाहनांसाठी पार्किंग, महसूल कार्यालयात वकिलांना येणाऱ्या अडचणी दूर करणे, दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर सुरू करणे, आदी व अन्य प्रश्नाची सोडवणूक करण्याचे आश्वासन दोन्ही पॅनल ने केली होती. ती या निवडणुकीनंतर पूर्ण करण्याचा दबाव या नवीन कमिटी ला राहणार आहे. या निवडणुकीत कोणत्याही एका पॅनल ला पूर्ण बहुमत न मिळाल्याने या नवीन कमिटीला सामंजस्याने वकिलांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील एवढे मात्र खरे.

दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू, नांदेपेरा जवळील घटना

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : तालुक्यातील वनोजा देवी येथील एका दुचाकीस्वाराचा अपघातात दुदैवी मृत्यू झाल्याची घटना वणी तालुक्यातील नांदेपेरा नजीक घडली. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा युवक रस्त्याच्या कडेला असलेल्या गडयात पडला आणि यातच त्याचा मृत्यू झाला. असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. रात्री उशिरा या युवकाचा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. 25 जानेवारीला पहाटे मॉर्निंग वोक ला जाणाऱ्या नागरिकांना दुचाकीसह हा युवक रस्त्याच्या कडेला पडून दिसल्यानंतर ही अपघाताची घटना उघडकीस आली. सचिन मधुकर मडावी (वय अंदाजे 36) वर्षे असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे.

पॅशन कंपनी क्र.(MH 34 AC 9424) ने वनोजा (देवी) या आपल्या गावाकडे जात असतांना दुचाकी अनियंत्रित होऊन सचिन हा युवक रस्त्याच्या कडेला असलेल्या गडयात पडला. रात्रीची वेळ असल्याने हा अपघातग्रस्त युवक कुणाच्याही दृष्टीस पडला नाही. त्यामुळे त्याला कुणाचीही मदत न मिळाल्याने रात्रभर जखमी अवस्थेतच तो पडून राहिला. आणि यातच त्याचा मृत्यू झाला. असा कयास वर्तविण्यात येत आहे. 

सचिन मडावी हा एसटी महामंडळात नोकरीवर असल्याचे समजते. मात्र, मागील काही दिवसांपासून तो घरीच होता. 24 जानेवारीला काही कामानिमित्त तो दुचाकीने घराबाहेर पडला. मात्र, गावी परततांना रात्री उशिरा नांदेपेरा पहिले स्टॉप नजीक वळणावर दुचाकीला अपघात झाला. आणि अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज पहाटे मॉर्निंग वोक करणाऱ्या काही लोकांना सचिन हा दुचाकीसह रस्त्याच्या कडेला पडून दिसला. त्यानंतर अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. त्याच्या अपघाताचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. 

सचिन यांच्या पश्चात आईवडील, पत्नी,एक मुलगी असा परिवार असून सदर घटनेचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

अपघात की घातपात? वणी-नांदेपेरा महामार्गावर दुचाकी सह युवक आढळला

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : तालुक्यातील नांदेपेरा गावाजवळ महामार्गावर दुचाकीस्वाराचा अपघात झाला. या अपघातात एक युवक (अंदाजे वय 35) जागीच मृतावस्थेत आढळून आले आहे. 

मॉर्निंग वोक करणाऱ्या नागरिकांना हा युवक रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत दुचाकीसह पडून दिसला, एक युवक पडून असल्याची ही वार्ता समजताच गावातील पुरुष महिला मंडळी घटनास्थळी धाव घेत त्याला पाहण्यासाठी जमली होती. सदर घटना रात्री च्या सुमारास घडली असावी असा उपस्थित नागरिकांतून कयास यावेळी व्यक्त होत होता. मात्र,हा अपघात की घातपात? याबाबत तूर्तास अस्पष्टता असून वृत्त लिहेपर्यंत संबंधित विभाग घटनास्थळी दाखल व्हायची होती. 

वणी-नांदेपेरा हा 11 किलोमीटर लांबीचा असणारा महामार्ग सतत या ना त्या कारणाने चर्चेत असतो. महामार्गावर गेल्या वर्षात अनेक छोटे मोठे अपघात घडले आहेत. नांदेपेरा गावाजवळील टर्निंग धोकादायक असल्याचे बोलल्या जाते. या वळणावर वाहन चालवताना अति दक्षता बाळगावी लागते, अन्यथा अपघात निश्चित. याचं ठिकाणी काही महिन्याअगोदर मोठा ट्राला रस्ता सोडून रस्त्याच्या कडेला घुसला होता. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र वाहणाचे मोठे नुकसान झाले. आज सकाळी उघडकीस आलेला अपघात त्याच वळणावर झाल्याने विविध चर्चेला पेव फुटले आहे.

राज्यस्तरीय पाणलोट यात्रेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यवतमाळातून शुभारंभ

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

यवतमाळ : प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना- पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत जलसंधारणाच्या जनजागृतीसाठी 'पाणलोट रथयात्रा' काढण्यात येणार आहे. या राज्यस्तरीय यात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यवतमाळ येथून होणार आहे. जवळपास 30 हजार शेतकरी या कार्यक्रमास उपस्थित राहणार असून त्या अनुषंगाने आज पालकमंत्री संजय राठोड यांनी तयारीचा आढावा घेतला.

महसूल भवन येथे आयोजित बैठकीला पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यात्रा शुभारंभ कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय ग्रामविकास मंत्री, राज्याचे दोनही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहे. यवतमाळ येथून यात्रेचा शुभारंभ झाल्यानंतर ही यात्रा दिग्रस तालुक्यातील लाख, तुपटाकळी, काटी, रामनगर गावातून पुढे जाणार आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 या योजनेच्या राज्यातील 140 प्रकल्प क्षेत्रातील 30 जिल्ह्यांमध्ये पाणलोट रथ तीन महिने जनजागृतीचे काम करणार आहे. जिल्ह्यातून यात्रेचा शुभारंभ होणार असल्याने उत्तम नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना केल्या.

यात्रेदरम्यान पाणलोट अंतर्गत नवीन कामांचे भूमिपूजन, झालेल्या कामांचे जलपूजन तसेच लोकार्पण, वृक्ष लागवड, जुन्या पाणलोट कामांची दुरुस्ती, भूमी जलसंवाद, श्रमदान असे उपक्रम होणार आहेत. यात्रेसाठी पाणलोट योद्धे तसेच धरिणी ताई यांची पाणलोट जनजागृतीसाठी नेमणूक करण्यात येणार आहे. यात्रेतील सहभागासाठी युवकांची माय भारत पोर्टलमार्फत नोंदणी करण्यात येणार असून हाती मृदा घेऊन मृद व जल संरक्षण व संधारणाची शपथ घेतली जाणार आहे. यात्रेदरम्यान गावकऱ्यांना देखील शपथ दिली जाणार आहे.

यात्रेत दृकश्राव्य पद्धतीचे फिरते मोटार वाहन राहणार असून गावकऱ्यांना आभासी पाणलोट सहलीचा अनुभव घेता येईल. तसेच यात्रेदरम्यान माती व पाणी परीक्षण केले जाईल. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेतून शेतकऱ्यांना धरण व तलावातील गाळ शेतात टाकण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. यात्रेचा शुभारंभ यवतमाळात होणार असल्याने वेगवेगळ्या समित्या नेमून जबाबदारींचे वाटप करण्यात आले आहे. बैठकीत प्रत्येक समिती प्रमुखाकडून पालकमंत्र्यांनी तयारीचा आढावा घेतला.

यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा - संजय राठोड
मृद व जलसंधारण काळाची गरज झाली आहे. शेतकऱ्यांना सिंचनासह नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी जलसंधारण फार महत्वाचे आहे. त्याचे महत्व नागरिकांना पटवून देण्यासोबतच विविध घटकांचा यासाठी सहभाग वाढविण्यासाठी ही यात्रा आहे. या यात्रेत शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.