ओला दुष्काळ जाहीर करा - मनसेची मागणी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगांव : सतत च्या नापिकीने व अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीने शेतकरी राजा पुरता हतबल झाला आहे. परिणामी शेतकरी आत्महत्येचे प्रमाण देखील वाढलेले असल्याने अशा परिस्थितीत मारेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा,अशी मागणी आज मनसेच्या वतीने तहसीलदार यांना करण्यात आली. 

मारेगाव तालुका हा मागास तालुका असुन, मारेगांव तालुक्यातील जास्तीत जास्त प्रमाणात शेतकरी हे अल्पभुधारक असुन, मागील २-३ वर्षापासुन पिकांच्या नुकसानीने शेतकरी हा मेटाकुटीस आला आहे. महागाई फार मोठ्या प्रमाणात वाढलेली असून शेतकरी आत्महत्येचे प्रमाण देखील वाढलेले आहे. यावर्षी देखील शेतकऱ्यांना अतिवृष्टी चा सामना करावा लागत आहे. मागील १०-१५ दिवसापासुन सतत होणाऱ्या पावसाने शेतक-यांच्या पिकांना नुकसान सहन करावे लागत असुन अनेकवेळा खते, बि-बियाणे, फवारण्या ह्या विनाकारण व्यर्थ गेलेल्या असुन आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.

त्यामुळे मारेगांव तालुका हा ओला दुष्काळ जाहीर करुन स्थळ पंचनामा करुन तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदान प्रदान करण्यात यावे अशी मागणी तालुका अध्यक्ष रुपेश ढोके यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांना करण्यात आली आहे. 

निवेदन देताना जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, तालुका अध्यक्ष रुपेश ढोके, महिला अध्यक्ष उज्वला चंदनखेडे, तालुका उपाध्यक्ष उदय खिरटकर, शहराध्यक्ष चांद बहादे, विभाग अध्यक्ष रोशन शिंदे, आदित्य बुचे, सुनील आत्राम, गणेश धाबेकर, आरती राठोड, वसंता घोटेकार, सिंधुताई बेसकर या असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

आधुनिक युगात यशस्वी होण्यासाठी कौशल्य आत्मसात करणे आवश्यक..


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला प्रत्येक काम करत असताना कलात्मक चपळाईने बारकाईने लक्षपूर्वक व नवीन नवीन दृष्टिकोनाने कार्य करावे लागतात आधुनिकच्या युगामध्ये प्रत्येकाने डिजिटल चा उपयोग करणे आवश्यक असून कौशल्याच्या माध्यमातून या स्पर्धेच्या युगात टिकून राहू शकतो तंत्रज्ञान वापरताना शास्त्रीय कारण प्रात्यक्षिक, लेखी माहिती चा अभ्यास करून त्यात तज्ञ होणे आवश्यक आहे. असे मार्गदर्शन कौशल्य आणि डिजिटल या विषयावर सागर मुने यांनी वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे प्रत्येक बाबतीत व जीवनात कौशल्याचा उपयोग कसा करायचा असे सांगितले.

22 जुलै ते 28 जुलै पर्यंत शासनातर्फे शैक्षणिक सप्ताह नगरपरिषद शाळा क्रमांक पाच मध्ये राबविण्यात आला यात सांस्कृतिक शैक्षणिक श्रमदान स्वच्छता कलावंत डिजिटल माध्यम अशा विषयांद्वारे शैक्षणिक सप्ताह साजरा करण्यात आला. 

महाराष्ट्र शासनाने दिनांक 22 जुलै ते 28 जुलै दरम्यान शिक्षण सप्ताह साजरा करण्याचे सर्व शाळांना आदेश दिलेले आहे. नगर परिषद शाळा क्रमांक 5 मध्ये दिनांक 22 जुलै ते 28 जुलै पर्यंत शिक्षण सप्ताह साजरा करण्यात आला. या शिक्षण सप्ताहाचे उद्घाटन दि. 22 जुलैला करण्यात आले. याप्रसंगी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या शैक्षणिक साधनांची प्रदर्शनी भरविण्यात आली.
        
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी नवीन शैक्षणिक धोरणानुसार केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे या शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या शिक्षण सप्ताहामध्ये 22 जुलै पासून शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे अध्ययन-अध्यापन साहित्य दिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस, क्रीडा दिवस, सांस्कृतिक दिवस, कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस, मिशन लाइफ च्या दृष्टिकोनातून इको क्लब उपक्रम, शालेय पोषण दिवस, समुदाय सहभाग दिवस अशा पद्धतीने सात दिवस विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

समुदाय सहभाग दिनानिमित्त दि. 28 जुलैला पालक सभा घेण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मीना काशीकर यांनी अध्यक्षीय भाषण केले व प्रास्ताविक रजनी पोयाम, संचालन कोंगरे आभार डंबारे यांनी केले.

शिवसेना (उबाठा) पक्षाच्या 'भगवा सप्ताह'ला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सह्याद्री चौफेर । कुमार अमोल 

वणी : शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व सर्व शिवसैनिक (सर्व विंग) च्या शिवसैनिकांच्या व्दारा पक्षप्रमुख आदरणीय उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे आदेशाने दि.४ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०२४ पर्यंत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वणी विधानसभा क्षेत्रातील पक्षाच्या कार्यालयातून भगवा सप्ताह व प्राथमिक सभासद नोंदणीला सुरवात करण्यात आली असून या सप्ताहाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

यामध्ये प्रामुख्याने सदस्य नोंदणी अभियान, माझी विज माझा अधिकार अभियान, प्रत्येक बुथ वर मतदार यादी वाचन आदी उपक्रम राबविले जाणार आहे. तसेच जनसंपर्क वाढविणे, पक्ष बांधणी करणे, पक्ष संघटन मजबूत करणे, गावपातळीवर शिवसेनेच्या शाखा निर्माण करणे, पक्ष प्रवेश सोहळे घेणे व जेष्ठ शिवसैनिकांचा सत्कार, यावर देखील भर देण्यात येणार आहे.

पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात राज्याच्या जनतेला दोनदा दिलेली कर्ज माफी, शेती मालाला दिलेला भाव, विविध लोकहितार्थ राबविल्या गेलेल्या योजना व घेतलेले निर्णय, कोरोना काळातील महाभयंकर सकंटावर केलेली नियोजनबध्द मात याबाबत या सर्व लोकोपयोगी कार्यांला उजाळा देत जनतेपर्यंत पोहचवणे.

भगवा सप्ताहाच्या निमित्ताने घरोघरी जावुन शिवसैनिक व पदाधिकारी व्दारा जनतेसमोर वाचा फोडुन या ढोंगी सरकारचा फडदाफाश करुन जनतेची जनजागृती करणे. घटनाबाह्य सरकारकडुन राज्यात सुरु असलेली हुकुमशाही, जाती पातीच्या नावावरील भेदभाव व आरक्षणाच्या नावाखाली जाती-जाती मध्ये तेढ निर्माण करणे सुरु असुन याबाबत जनजागृती करणे. वणी विधानसभा क्षेत्रातून या सर्व विविध उपक्रमावर दि.४ ऑगष्ट ते ११ ऑगष्ट पर्यंत कार्यक्रम चालणार असुन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फ दैनदिन लोकहितार्थ जनसेवा, सामाजिक कार्य व पक्ष सघंटन सतत अवरिहीत सुरुच आहे.

शिवसेना वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या नेतृत्वात पक्षाच्या बळकटीसाठी कार्यकर्त्यांची एकजूट करण्याचा निष्ठेने प्रयत्न केला जात आहे. याच दृष्टीकोनातून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वणी विधानसभा मतदार संघात "भगवा सप्ताह" आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाच्या सुरुवातीला दि.४ ऑगष्ट पासून सद्गुरू जगन्नाथ महाराज मंदिरात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दीर्घ आयुष्यासाठी महाआरती व प्रार्थना करण्यात आली.

यावेळी संजय देरकर यांच्यासह शिवसेनेचे (उबाठा) संतोष माहुरे, रवि बोढेकर, दीपक कोकास, डिमन टोंगे, पुष्पा भोगेकर, सुनंदा गुहे, अजिंक्य शेंडे, सतिश गादेवार, विजय पानघंटीकर, अमजद शेख, संतोष कुचनकार, गोवर्धन टोंगे, प्रेमा धानोरकर, पारखी, भगवान मोहिते, राजू ईद्दे, विठ्ठल बोंडे, अजय कवरासे, नंदू ढुमणे, नरेश कोठारी, राजू लडके, प्रशांत बलकी, सुभाष भोगेकर, श्रावण टोंगे, हरिदास केळझरकर, दिवाकर भोंगळे, बंडू निंदेकर, जगन खंडाळकर, संजय देठे, विनोद ढुमणे, विकास धगडी, मो. असलम, यांच्यासह शिवसैनिक व युवासेना मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राळेगाव : रास्त भाव दुकानदारांनी यांच्याकडील 4g ई-पास मशीन तहसीलदार यांच्याकडे केल्या जमा

सह्याद्री चौफेर | विनोद माहुरे
 
राळेगाव : तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकानदार व केरोसीन विक्रेता संघटना, राळेगाव यांना धान्य वाटप करण्याकरीता 4g ई-पास मशीन 1 जुलैला देण्यात आल्या आहे. मात्र, या 4g ई-पास मशीनचे सर्वरच राहत नसल्याने धान्य वितरण करण्यात रास्त भाव दुकानदारांना खुप त्रास होत असल्यामुळे दिनांक 2/8/2024 रोजी राळेगाव रा.भा.धा.दुकानदार संघटना त्यामध्ये सहभागी होऊन तहसीलदार यांना निवेदन दिलेल्या विषयाच्या अनुषंगाने आज दिनांक 5 ऑगस्ट रोजी सर्व रा.भा.धा.दुकानदार संघटना राळेगाव यांनी त्यांच्याकडील 4g ई-पास मशीन तहसीलदार यांच्याकडे निवेदन देऊन जमा करण्यात आल्या आहे.
तालुक्यातील रा.भा.धा.दुकानदार यांना मिळणारे तुटपुंजे कमिशन असल्याने आमच्या परीवारिचा उदरनिर्वाह होऊ शकत नसल्याने ते मिळणारे कमिशन वाढवून देण्यात यावे, याकरिता तहसीलदार राळेगाव यांना निवेदन देण्यात आले. 

यावेळी रमेश लढे अध्यक्ष राळेगाव तालुका रास्त भाव धान्य दुकानदार व केरोसीन विक्रेता संघटना, सुरेश पेंद्राम उपाध्यक्ष रा.भा.धा.दुकानदार संघटना, दिलीप निखाडे सचिव रा.भा.धा.दुकानदार संघटना, यांच्यासह राळेगाव तालुका रास्त भाव धान्य दुकानदार व केरोसीन विक्रेता संघटनेतील शेकडो रास्त भाव धान्य दुकानदार उपस्थित होते.

तलावाच्या पाण्यामुळे महिला शेतकरी संकटात

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : गेल्या आठ दहा दिवसापासुन सतत पाऊस पडत असल्यामुळे अनेक शेतक-याच्या शेतात पाणी साचले आहे. खरीप पिके संकटात सापडली आहे. अशातच तलावाच्या पाण्यामुळे सराटी येथील महिला शेतकरी शेवंताबाई रामा टेकाम (55) हवालदिल झाल्या आहे. मारेगाव तालुक्यात मागील आठ दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पाऊस झाला, तलावाच्या पाण्याने शेतकऱ्याच्या शेतामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलेले आहे. त्यामुळे पीकांचे नुकसान होऊन सर्व पिवळे पडत आहे. 

पावसामुळे शेतातील निंदन तसेच डवरणी करणे ठप्प पडलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात भरपूर तन वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामध्ये काही ठिकाणी शेतजमिनी मधील पिकाचे लहान लहान रोपटे खरडुन गेले आहे. त्या मध्ये सोयाबीन, कापूस, तूर व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 

मारेगाव तालुक्यात सततच्या पावसाने सोयाबीनच्या व कापसाच्या उत्पादनावर परिणाम होणार असल्याची भिती शेतकऱ्यातून व्यक्त केली जात अहे. सततच्या पावसाने स्वचछ सुर्य प्रकाश मिळाला नाही. महागामोलाच्या बियाण्याची वाढ खुंटली असून अशा नाजूक परिस्थतीत महिला शेतकऱ्याला मदतीची नितांत गरज आहे. यासाठी त्यांनी पाठबंधारे बांधकाम उपविभाग पांढरकवडा यांना सुद्धा लेखी दिली आहे.