आरतीच्या हत्या प्रकरणातील आरोपीने केली लॉकअपमध्ये आत्महत्या

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वरोरा : शहरातील आनंदवन येथिल पंचवीस वर्षीय तरुणीच्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या समाधान माळी (24) रा. चोपडा (जि. जळगाव) ह. मु. वरोरा या आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

वरोरा पोलीस स्टेशनच्या कस्टडी मध्येच आज सकाळी साडे आठ च्या दरम्यान बुटाच्या लेसने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आरोपी 4 जुलै पर्यंत सात दिवसाच्या पोलीस कोठडीत होता. स्व. बाबा आमटे यांच्या आनंदवनात आरती दिगंबर चंद्रवंशी या तरुणीची बुधवारी घरात शिरून आरोपीने हत्या केली होती. प्रेमप्रकरणातील अविश्वासातून हा खून झाल्याचा संशय होता. खुनाच्या आरोपाखाली पोलिसांनी समाधान याला गुरुवारी संध्याकाळी अटक केली होती. आरोपीने पोलीस स्टेशन च्या कस्टडी मध्ये आत्महत्या केल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या सह वरोरा तहसीलदार देखील प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत.
 
या आत्महत्या प्रकरणातील बरेच प्रश्न अनुत्तरीत असून, या घटनेचा पुढील तपास पोलीस यंत्रणा करीत आहे. अजून पर्यंत अधिकृतरित्या पत्रकारांना माहिती मिळाली नसून शव विच्छेदनासाठी वरोरा किंवा चंद्रपूर रुग्णालयात शव नेण्यात येणार असल्याचे कळले.

विकासपुरुष मा.ना.श्री. संजयभाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा...


आमच्या कार्यसंघाचे नेतृत्व
केकच्या तुकड्यासारखे वाटणाऱ्या अत्यंत आदरणीय साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुमचे मार्गदर्शन आणि मार्गदर्शन खरोखरच प्रेरणादायी आहे आणि इथल्या प्रत्येक शिवसैनिकासाठी आशीर्वाद आहे ! तुम्ही करत असलेल्या सर्व गोष्टींबद्दल धन्यवाद आणि मी आणि माझी टीम तुम्हाला सतत यशाच्या पुढील वर्षासाठी शुभेच्छा देतो..!

शुभेच्छुक :- श्री विशाल किन्हेकर 
शिवसेना तालुका प्रमुख, मारेगाव (जि यवतमाळ) 

पालकमंत्री ना. संजयभाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरती व वृक्षारोपण

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री ना. संजयभाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना-युवासेना मारेगाव शाखा यांच्या माध्यमातून हनुमान मंदिर येथे महाआरती करण्यात आली. तालुक्यासह मारेगाव परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. शिवसेना तालुका प्रमुख विशाल किन्हेकर व युवासेना तालुका प्रमुख तुकाराम वासाडे विकसनशील युवा नेतृत्व असून अनेक सामाजिक बांधीलकी जपत गोरगरिबांना कायमच मदत करीत असतात. विकासाचे महामेरू पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून गौसेवा व वृक्षारोपण करण्यात आले. अनेक कारणांनी पर्यावरणाचा ऱ्हास होत असून तो थांबविण्यासाठी वृक्ष जतन करणे काळाची गरज आहे. सर्वांनी वृक्ष जतन करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन शिवसेना तालुका प्रमुख विशाल किन्हेकर यांनी केले. याप्रसंगी विजय मेश्राम उप तालुका प्रमुख, तुकाराम वासाडे युवासेना तालुका प्रमुख, सचिन ढोके युवासेना उपतालुका प्रमुख, डॉ बदकी शहर संघटक, तेजस कापसे युवासेना उपशहर प्रमुख, शंकर नागोसे युवासेना, राज कापसे शहर प्रमुख, कुंदन ताजने, अरविंद परचाके, अनिल राऊत, हरिभाऊ रामपुरे, जीवन वैद्य, महादेव लोणारे, शंकर कापसे यांच्या सह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन वृक्षलागवड केली. विविध सामाजिक उपक्रमांनी शिवसैनिकाकडून पालकमंत्री ना. संजयभाऊ राठोड यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या.

आदिवासी मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात आदिवासी टायगर सेना आक्रमक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : चंद्रपूर येथील आदिवासी मुलीला जातीवाचक शिवीगाळ, मारझोड व अश्लिल शिवीगाळ करून केस ओढून छातीवर हात लावणारे आरोपी 40 दिवस होऊन अटक न झाल्याने पिढीत मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आज आदिवासी टायगर सेना व पीडित मुलीला घेऊन चंद्रपूर येथे पत्रपरिषद घेण्यात आली.

आरोपी वर 16/05/2024 ला भादवी 354(A) (1)(i), 294,506, 34 सह अनुसूचित जातीजमाती (अत्याचार प्रतिबंधक) 3(2)(va),3(1)(W) गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु अजूनही आरोपी प्रबोधकुमार जाडाजी,पंकज सिंग, कुमार पाल हे अजूनही मोकाट आल्याने वारंवार हे फिर्यादी मुलीला धमकी देत आहेत की,केस मागे घ्या. नाही तर जिवे मारू अशी धमकी देत आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी ह्यांनी वारंवार उडवा उडवी चे उत्तर देत आहे.अशी माहिती फिर्यादी मुलींनी आदिवासी टायगर सेना चे अ‍ॅड. संतोष कुळमेथे विदर्भ अध्यक्ष अ‍ॅड. जितेश कुळमेथे विदर्भ महासचिव, प्रा हितेश मडावी जिल्हा अध्यक्ष, माजी सैनिक ड्रेफुल आत्राम, जिल्हा उपाध्यक्ष, प्रियंका मडावी जिल्हा युवती अध्यक्ष, रंजीत मडावी जिल्हा अध्यक्ष युवक, विराज सुरपाम जिल्हा महासचिव युवा. ह्यांना निवेदन देऊन व आपबीती सांगितली, प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत आदिवासी टायगर सेना च्या वतीने पोलिस अधीक्षक चंद्रपूर, उप विभागीय पोलिस अधिकारी ह्यांना भेट देऊन निवेदन देण्यात आले. तरीही पोलिस विभाग मार्फत कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही.

आज पत्रकार परिषद घेऊन पोलिस विभाग ह्यांना धारेवर धरले. फिर्यादी युवतींनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, मला व माझ्या परिवाराला काही झाल्यास ह्यांची सर्व जबाबदारी पोलिस विभागाची राहील. तसेच आरोपींना अटक न केल्यास मी आत्मदहन पोलिस अधीक्षक कार्यालय समोर करेल असा ईशारा पत्रपरिषद घेत दिला.

पांढरकवडा येथील बालकाच्या हत्येप्रकरणी आरोपी गजाआड


सह्याद्री चौफेर | रवि वल्लमवार 

पांढरकवडा : मोहल्यात राहणाऱ्या मोहल्यातीलच बालकाची त्याच्या सम वयाच्या बालकाने चाकूने वार करून हत्या केल्याने पांढरकवडा शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही निर्घृणपणे हत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री साडे नऊ ते दहा वाजता च्या दरम्यान समोर आली आहे.

सय्यद नावेद सय्यद हारून (16) असे मृतक बालकाचे नाव आहे. तो चिकन सेंटर वर मजुरीने काम करत होता, अशी माहिती आहे. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पांढरकवडा पोलिसांनी रात्रीच आरोपीला ताब्यात घेतलं आहे. 

आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, आई नजीमा सय्यद, मोठा मुलगा सय्यद मुनीर, सय्यद नावेद व सर्वात लहान मुलगी अल्फीया सय्यद हे तिघेही रा. चंद्रशेखर वार्ड, पांढरकवडा येथे एकत्र राहतात. नावेद हा पांढरकवडा येथील चिकनच्या दुकानांमध्ये मजुरीचे काम करीत असून तो सकाळीच 7 वाजता कामावर जातो आणि रात्री 9 ते 9.30 वाजता च्या दरम्यान,आपल्या घरी परत येतो. शुक्रवार दिनांक 28/06/2024 रोजी रात्री परत येत असतानाच मोहल्यात राहणाऱ्या वार्डातील बालकाचे रस्त्यात नावेद याच्याशी भांडण सुरू आहे असे समजले. भांडणाच्या दिशेने सय्यद नावेदचे कुटुंबिय गेले असता त्याच्या पाठीत चाकू भोकसला होता, तेव्हाच आईने त्याला ओढण्याचा प्रयत्न केला असता नावेद रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला. दरम्यान, घटनास्थळावर आलेल्या फिर्यादी सह बहिण व बहिणीचा पती व नातेवाईकांच्या मदतीने त्यांनी गंभीर अवस्थेत असलेल्या सय्यद नावेद सय्यद हारून याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, अति रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याला यवतमाळ येथे हलविण्यात आले असता वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी तपासून तो मृत पावल्याचे घोषित केले. या एकसारख्या वयाच्या बालकाची हत्येने शहरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणातील आरोपी केवळ सोळा वर्षाचा असून त्याला रात्रीच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला चाकूची चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी आरोपीच्या विरोधात 302 अन्वये गुन्हा दाखल केला नेमका खून कोणत्या कारणाखाली केला, याबाबत निश्चित माहिती पोलिसांनी दिली नाही. याप्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशी सुरु केली असून लवकरच आरोपीच्या विरोधात आरोप पत्र तयार करण्यात येईल असेही सांगण्यात आले. या घटनेचा अधिक तपास ठाणेदार दिनेश झामरे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष गजभिये तपास करीत आहे.