सावंगी घाटातून माती मिश्रित वाळू पुरवठा होत असल्याची ओरड


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : तालुक्याच्या शेवटच्या टोकाला वर्धा नदी वाहते. या वर्धा नदी पात्रातून मागील काही महिन्यापासून बुकिंग वाळू थेट लाभार्थी व अन्य बांधकामला वाळू चा पुरवठा केल्या जात असताना मात्र, चांगल्या प्रतीची वाळू जिल्ह्यात आणि माती मिश्रित वाळू तालुक्यातील लाभार्थीना पुरवल्या जात आहे. व जादा पैसे मोजणाऱ्याना दर्जेदार वाळू मिळत असल्याचे तक्रारी माध्यमाकडे बोलून दाखवल्या जात आहे. त्यामुळे अनेकांनी सावंगी घाटाकडे पाठ फिरवली असून याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे अशी आर्तहाक मागणी आहे. 

मारेगाव तालुक्यात पांढऱ्या सोन्याला भाव नसेल, तेवढे भाव या काळ्या मातीच्या (वाळू) सोन्याला आले आहे. कधी काळी ढुंकूनही न पाहणाऱ्या वाळू ही आता कमाईच साधन म्हणून बनली आहे. ज्याचं त्यांचं लक्ष फक्त वाळू तस्करी कडेच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेती मशागतीकरिता निर्माण करण्यात आलेले ट्रॅक्टर हे वाळू तस्करीकरिता सर्रास वापरले जात असल्याचे दिसून येत आहे. महसूल विभागाकडून आतापर्यंत अनेक कारवाया ह्या ट्रॅक्टर व अन्य वाहनावर झाल्याचे वृत्त समोर आले आहे. परंतु वाळू ची क्वालिटी कशी असली पाहिजे किंवा वाळूचा दर्जा हा उत्तम असावा म्हणून संबंधित विभागाने साधी तपासून तसदी केली नसावी,असे कधी वाचण्यात ऐकण्यात गेलेले नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून आपल्या हक्काचं घर म्हणून स्वप्न रंगवलेल्याना त्यांच्या घराचे बांधकाम हे माती मिश्रित वाळू ने बांधावे लागत असेल यासारखे दुर्दैव नाही. याकडे संबंधित विभागाने जातीने लक्ष दिले पाहिजेत असे लाभार्थ्यातून बोलले जात आहे. 

मोठा गाजावाजा करून शासनाने वाळू चे नवीन धोरण आणले. गरिबांना मोफत वाळू मिळेल म्हणून नियम लादले. परंतु नियमांना धुऱ्यावर टांगत सावंगी घाटातून आजतागायत ना क्वालिटीची वाळू मिळत,ना अशीही वाळू मिळत. मिळतात फक्त वाळू धनदांडग्याना, अशी लाभार्थ्यातून ओरड आहे. पावसाळा अगदी तोंडावर आला, कित्येकांचे घर मोडून खाली जागेवर संसार मांडून दिवस काढणे सुरू आहे. वाळू पटकन मिळेल आणि घर बांधू म्हणून चांगल्या प्रतीची वाळू मिळावी या प्रतीक्षेतच लाभार्थ्यांचे दिवस असेव जात असल्याने घराचे बांधकाम पूर्ण होईल कि नाही, उच्च प्रतीची वाळू मिळेल कधी? अशी चिंता लाभार्थ्यांना सतावत आहे. परिणामी प्रशासनाने या वाळू च्या गोरखधंद्याची चौकशी करून प्रथम लाभार्थ्यांना नियम शर्ती अटी बाजूला ठेऊन सावंगी डेपोतून उच्च प्रतीची वाळू उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.

आई-वडिलांच्या कष्टाचं चीज; ‘तिने’ दहावीत मिळवले घवघवीत यश

सह्याद्री चौफेर | लखन लोंढे 

महागांव : आई-वडील हे मुलांच्या शिक्षणासाठी खूप कष्ट घेतात. मात्र, त्यांच्या या कष्टाचे चीज मुलांनी केल्यानंतर याचे समाधान त्यांच्यासाठी मोलाचे असते. याचप्रकारे दहावीच्या परिक्षेत ८५.८० टक्के गुण मिळवणाऱ्या सलोनी इंदल चव्हाण या विद्यार्थिनीने आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केले आहे. आपल्या या यशाचे श्रेय तिने केवळ आई-वडिलांना दिले आहे. 

सलोनीचे वडील इंदल चव्हाण व आई पुष्पा चव्हाण हे दांपत्य रोज मजुरी करतात व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, उरलेल्या पैशात प्रपंच आणि मुलीचं शिक्षण सलोनी ही श्री साईबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, टेंभी इयत्ता दहावीत शिक्षण घेत होती. दहावीत ८५.८० टक्के गुण मिळवत तिने आई-वडिलांची मान गर्वाने उंच केली आहे. ती अत्यंत गरिबी परिस्थिती वाढलेली. मात्र, कधीच कुठल्या गोष्टीसाठी तिने हट्ट केला नाही, अगदी पुस्तकांसाठी देखील. आई-वडील जेवढं देतील तेवढ्यातच तिने आनंद मानला. हे घवघवीत यश मिळवताना तिनेही स्वतः मोठे कष्ट घेतले. विशेष म्हणजे ट्युशन लावण्याची परिस्थिती नसल्यामुळे ती स्वतः घरी सकाळी सहा वाजल्यापासून तिचा अभ्यास सुरु व्हायचा त्यानंतर शाळा आणि पुन्हा सायंकाळी ६ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत अभ्यास असा तिचा दिनक्रम होता.

आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे भान ठेवत सलोनीने दिवस रात्र अभ्यास करीत दहावीत चांगले गुण मिळवले. सलोनीला भविष्यात उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर बनायचं आहे. समाजसेवेचीही तिला आवड असून याद्वारे वृद्ध, दिव्यांग आणि गरीबांसाठी काम करण्याची इच्छा तिने आमच्या प्रतिनिधी जवळ बोलून दाखवली आहे.

कठीण प्रसंगातून संघर्ष करत दहावीच्या परीक्षेत मिळवले यश

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : 10 वर्षांचा असतांना वडिलांनी दुसरी पत्नी केली, त्यात घरची परिस्थिती हलाखीची, मायमाउलीने मोलमजुरी करून मुलाच्या शिक्षणात खंड न पडावं म्हणून आश्रम शाळेत टाकले. 8 वीपासून शिक्षण घेत-घेत 10 व्या वर्गात गेला. शेवटी त्याचे फळ मिळाले. ही कोणत्या चित्रपटाची कथा नाही तर ही खऱ्या संघर्षाची कहाणी आहे.
मारेगाव तालुक्यातील कानडा येथे राहणाऱ्या अनिकेत हनुमान कोवे ह्या विद्यार्थ्यांने परिस्थितीवर मात करत यश संपादन केलं आहे. अनिकेत नुकताच दहावीत पास झाला. त्याने या परीक्षेत 72 टक्के घेतले असून त्याचे विशेष कौतुक होत आहे. अनिकेत कोवे 4 थीत असतांना म्हणजे 10 व्या वर्षीच वडीलांनी पहिली पत्नी (अनिकेत ची आई) सोडून दुसऱ्या महिलेशी लग्न केले होते. म्हणून अनिकेतची अपंग आई मजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करत होती. तर अनिकेत अभ्यासात हुशार होताच पण परिस्थितीने त्याला फार काही शिखर गाठता येत नव्हते. अपंग आईने मुलाच्या शिक्षणात खंड पडू नये, किंबहुना आपला मुलगा शिक्षणात कुठे मागे पडू नये म्हणून अनिकेत ला भद्रावती तालुक्यातील सुमठाणा येथील माध्यमिक आश्रम शाळेत टाकले. 
तिथे तो आठवी पासून शिक्षण घेत होता, अनिकेत ने दहावीची परीक्षा दिली होती. आज सोमवार (दि.27) मे ला दुपारी 1 वा. ऑनलाईन 10 वीचा निकाल जाहीर झाला. त्यात त्याने अतिशय कठीण प्रसंगातून संघर्ष करत दहावी च्या परीक्षेत 72.60 टक्के घेऊन उत्तीर्ण झाला. एवढी हलाखीची परिस्थिती असतांनाही अनिकेत हे यश संपादन केले त्या बद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शिंदोला-शिरपूर सर्कल गटाच्या वतीने शिवसेना (उबाठा) गटाचा पार पडला मेळावा


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिंदोला-शिरपूर सर्कल यांच्या संयुक्त विद्यमानाने शिंदोला येथे भव्य सत्कार सोहळा व पक्षप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वणी विधानसभा क्षेत्रातील लोकप्रिय नेते तसेच यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उपाध्यक्ष संजय देरकर यांच्या गेल्या 20 वर्षाच्या राजकीय कारकीर्दीची दखल घेऊन सन्माननीय पक्ष प्रमुख श्री.उद्धवसाहेब, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी संजय भाऊ देरकर यांची वणी विधानसभा प्रमुख पदी नियुक्ती केली त्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिवसैनिक तथा माजी सभापती अनिल भाऊ राजूरकर हे होते तर, प्रमुख पाहुणे म्हणून शिंदोला येथील ज्येष्ठ नागरिक विठ्ठल सुरपाम श्री. संजय देठे शिवसैनिक वणी लोकेश्वर बोबडे, प्रीतम बोबडे, सौ.मंगलाताई भटवलकर सरपंच चिखली, श्री विठ्ठल बोंडे माजी सरपंच शिंदोला, श्री अनिल झाडे सोसायटी अध्यक्ष चनाखा परमडोह, श्री.मयूर बांदुरकर सोसायटी अध्यक्ष येनाडी, महादेव मसे सोसायटी अध्यक्ष कोलगाव, नथूभाऊ गौरकार सोसायटी अध्यक्ष टाकळी, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 

या कार्यक्रमामध्ये निंबाळा, बोरगाव, ढाकोरी, बोरी, पाथरी गोवारी, परमडोह, शिंदोला, येनाडी, कोलगाव, साखरा येथील शेकडो युवकांनी संजय देरकर यांच्या कार्यावर विश्वास ठेवून शिवसेना (उबाठा) मध्ये जाहीर प्रवेश केला व पक्षासाठी तन-मन-धनाने काम करेल व वणी विधानसभेवर भगवा फडकवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असे युवकांनी सांगितले. 

कार्यक्रमांमध्ये विचार व्यक्त करताना संजय देरकर यांनी देशाची व महाराष्ट्राची परिस्थिती पाहता फक्त एकमेव पक्षप्रमुख उद्धव साहेब, बाळासाहेब ठाकरे हेच एकमेव व्यक्तिमत्व देशाला व महाराष्ट्राला ह्या वाईट परिस्थितीमधून म्हणून बाहेर काढू शकते. त्याकरिता वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व युवकांनी पक्षांमध्ये प्रवेश करावा आणि पक्षप्रमुख श्री.उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांचे हात मजबूत करावे. शिवसेना (ऊबाठा) च्या माध्यमातून वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व युवक-युवती शेतकरी, शेतमजूर विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्या समस्या प्रामुख्याने सोडवल्या जाईल असे, आश्वासन विधानसभा प्रमुख यांनी मनोगत व्यक्त करताना दिले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल राजुरकर यांनी सुद्धा कार्यक्रमात बोलताना कुठलाही मतभेद न ठेवता शिवसेना पक्षाकरिता एक मताने आणि खांद्याला खांदा लावून आपण सर्व शिवसैनिक म्हणून काम करू असे सांगितले. या कार्यक्रमाला शिंदोला,शिरपूर सर्कल मधील असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. कार्यक्रमामुळे शिवसैनिकांमध्ये एक नवसंजीवनी निर्माण झाली आहे असे, उपस्थित शिवसैनिकांचे मत होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.राजेंद्र इददे यांनी केले तर, आभार प्रदर्शन व प्रास्ताविक श्री लोकेश्वर बोबडे यांनी केले.  सत्कार सोहळा व पक्षप्रवेश कार्यक्रम अतिशय आनंदात व उत्साहात पार पडला हे विशेष...!

नवयुवकाचा पाण्यात बुडून मृत्यू


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : चंद्रपूर जिल्ह्यातील तालुका वरोरा येथील एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज रविवारला दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. 
याबाबत माहिती अशी, वरोरा, जि. चंद्रपूर येथील मानव अविनाश राऊत (वय 15) हे दि. 26 मे रोजी मित्रां सोबत वर्धा नदीच्या पात्रातील मौजे दांडगाव (ता. मारेगाव जि. यवतमाळ) च्या बाजूने पोहण्यासाठी गेला असता पाण्यामध्ये बुडून मृत्यू पावला आहे. ही घटना अंदाजे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. 
वृत्तलिहेपर्यंत बुडालेल्या मुलाची बॉडी थोडयाच वेळापूर्वी सापडली असून ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे शवविच्छेदनासाठी आणण्याची प्रक्रिया चालू असल्याचे माहिती असून पुढील तपास संबंधित विभाग करित आहे.