ऊन्हाळ्यात १ ग्लास ऊसाचा रस प्यायल्याने मिळतील भन्नाट फायदे; इम्यूनिटी वाढेल- फिट राहाल

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

उन्हाळ्याच्या दिवसांत बाजारात ऊसाचा रस मोठ्या प्रमाणात दिसून येतो. गरमीच्या वातारवणात हा रस रिफ्रेशिंग वाटतो. प्रत्येक वयोगटातील लोक ऊसाचा रस आवडीने पितात. ऊसाचा रस प्यायल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात.

ऊसाचा रस पिण्याचे फायदे
ऊन्हाळ्याच्या दिवसांत उसाचा रस प्यायल्याने शरीर पूर्ण दिवस हायड्रेट राहते. ऊसाचा रस प्यायल्याने दिवसभरातील पाण्याची कमतरता पूर्ण करता येते. डिहायड्रेशनमुळे जाणवणाऱ्या समस्याही कमी होतात.

इम्यूनिटी मजबूत राहते
ऊसाच्या रसात व्हिटामीन सी, आयर्न, कॅल्शिय यांसारखी पोषक तत्व असतात. ही पोषक तत्व इम्यूनिटी स्ट्राँग ठेवण्यास साहाय्याक ठरतात रिकाम्यापोटी ऊसाचा रस प्यायल्याने संक्रमण होण्याची शक्यता कमी होते.

गॅसची समस्या दूर होते
ऊसाच्या रसात ग्लुकोजचे प्रमाण जास्त असते. ग्लुकोज तुम्हाला एनर्जी प्रदान करते. रिकाम्या पोटी ऊसाचा रस प्यायल्याने शरीराला एनर्जी मिळते आणि दिवसभर ताजेतवाने वाटते. अनियमित खाणंपिणं आणि चुकीच्या लाईफस्टाईलमुळे लोकांना पोटाच्या समस्या उद्भवतात. यात फायबर्सचे प्रमाण जास्त असते. बाऊल मुव्हमेंट चांगली राहते.

ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते
ऊसाच्या रसाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल राहते. रिकाम्या पोटी ऊसाचा रस प्यायल्याने ब्लड शुगर नियंत्रात राहण्यास मदत होते. म्हणून योग्य प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला जातो.

किडनीचे कार्य चांगले राहते
सकाळी रिकाम्या पोटी ऊसाचा रस प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. किडनीचे आरोग्य चांगले राहते.


TDRF उपविभागीय अधिकारी कार्यालय वणी येथे जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या महिलांच्या कार्याचे कौतुक


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : दि. ८ मार्च २०२४ रोजी TDRF उपविभागीय अधिकारी कार्यालय वणी येथे TDRF सहाय्यक संचालक सौ. रुपाली हरिश्चंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनात जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून वणी पोलीस स्टेशनच्या महिला पोलिस उपनिरीक्षक अश्विनी रायबोले होत्या व TDRF मुख्य क्षेत्रीय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मुस्कान ज. सैय्यद मंचावर उपस्थित होत्या. सर्व प्रथम मुस्कान ज. सैय्यद यांनी उपस्थितांना TDRF व TDRF च्या १९ वर्षातील कार्याची माहिती देऊन कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनतर कार्यक्रमाचे मुख्य अतिथी अश्विनी रायबोले यांच्या हस्ते विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा व TDRF मधील महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये संजीवनी खिरटकर, नुजतजी शेख, संगीता तेमुर्डे, साक्षी मुजगेवार, अंजली उगवे, हिमांशी बदकल व वेदिका उरले व TDRF मधील सानिका सोनटक्के, सृष्टी दडमल, खुशी सिडाम व टीम (भद्रावती), श्रेया बावणे व टीम (घुग्गुस), अस्मिता वाळके,संजना देवगडे, किरण आत्राम व किरण चव्हण इत्यादी महिला व युवतींचा सन्मान करण्यात आला.
तद्नंतर कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी अश्विनी रायबोले यांनी उपस्थित महिलांना व TDRF जवानांना मार्गदर्शन केले. TDRF मध्ये मुलीसुद्धा आत्मसुरक्षेचे व नागरिसुरक्षेचे प्रशिक्षण घेत आहेत त्याचे कौतुक आहे सोबतच TDRF जवानांनी समाजकार्यासाठी व राष्ट्र कार्यासाठी असेच अग्रेसर राहून इतरांना मदत करावी असे सांगून TDRF च्या कार्याचे कौतुक केले व महिलांनी आपली सुरक्षा कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी विजया ठाकरे, सोनल बावणे,अश्विनी रामगिरवार, अर्चना मजगेवार, पिंकी अग्रवाल,दामिनी बल्की इत्यादी महिला व TDRF जवान उपस्थित होते.

मनसेच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त केळापूर तालुक्यातील नवनियुक्त मनविसे जिल्हाध्यक्ष अभिजीत नानवटकर यांच्या नेतृत्वात असंख्य युवकांचा मनविसेत पक्षप्रवेश


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

पांढरकवडा : मनसे १८ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षनेते मा.श्री.राजुभाऊ उंबरकर यांच्या आदेशानुसार दि.०९ मार्च २०२४ शनिवार रोजी विश्राम गृह पांढरकवडा येथे संध्याकाळी ०६ वा.नवनियुक्त मनविसे जिल्हाध्यक्ष अभिजीत नानवटकर यांचे प्रथम आगमनात जल्लोषात स्वागत करण्यात आले,त्यावेळीस मनसे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ शिवरामवार,मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष गजाननराव पोटे,मनविसे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अभिजीत नानवटकर यांच्या नेतृत्वात केळापूर तालुक्यातील पांढरकवडा शहरासह ग्रामीण भागातील असंख्य युवकांनी मनविसेत पक्षप्रवेश केला.त्यावेळी मनसैनिक रविभाऊ वल्लमवार शहर अध्यक्ष राकेश श्रीमनवार,तालुका उपाध्यक्ष अश्विन ठाकरे,तालुका उपाध्यक्ष अक्षय लक्षट्टीवार,तालुका उपाध्यक्ष वैभव मत्त्ते,विभाग अध्यक्ष अमोल जाधव,विभाग अध्यक्ष अमित भगत यांच्या उपस्थितीत केळापूर तालुक्यातील पांढरकवडा शहरात महाविद्यालय,शाळा,कॅलेज येथे आपल्या भाषणातून शाखा फलक अनावरण येत असुन विद्यार्थीनी एक पाऊल पुढे टाकत मनविसेत पक्षप्रवेश करा,विद्यार्थीना असलेले प्रश्न मनविसे च्या माध्यमातून सोडवु मनविसे विद्यार्थीच्या पाठिशी खंबीर पणे उभी आहे.असे विविध प्रश्नांवर नवनियुक्त मनविसे जिल्हाध्यक्ष अभिजीत नानवटकर बोलले,त्यावेळीस वैभव गोडे,प्रज्योत कडू,साहिल खांडरे,शिवम मत्ते,योगेश मत्ते,सागर कुमरे,दर्शन धानोरकर,प्रज्योत रोंघे,कार्तिक दोडावार,सोहन कोरचे,तेजस पुसनाके,रोहित नैताम,रितेश सुरपाम,साहिल कोरेकर,राहुल वाघाडे,राहुल कासार,सक्षम मिसाळ,हर्षदीप कांबळे,सार्थक धानोरकर,ऐफाझ सय्यद,समीर मलनास,सुमित वाघमारे,शिवम गेडाम,हेमंत गोयर,पियूष आडे गणेश गेडाम असे आदी युवकांनी मनविसेत पक्षप्रवेश केला,नवनियुक्त मनविसे जिल्हाध्यक्ष अभिजीत नानवटकर यांनी असंख्य युवकांनी मनविसेत पक्षप्रवेश केल्याबद्दल सर्वाचे अभिनंदन केले.

जीवेत शरद शतम् उस्ताद झाकीर हुसैन यांना ७३ व्या जन्मदिनानिमित्य अभिष्टचिंतन


जीवेत शरद शतम्
उस्ताद झाकीर हुसैन यांना ७३ व्या जन्मदिनानिमित्य अभिष्टचिंतन.

पद्मश्री, पद्मभूषण,पद्मविभुषण पुरस्कार प्राप्त. उस्ताद झाकीर हुसैन हे झाकीर भाई ह्या नावाने प्रसिद्ध असून तबल्याच्या परंपरेतील पंजाब घराण्याचे उस्ताद पद्मश्री अल्ला रक्खा खां साहेब यांचे चिरंजीव व शिष्य आहेत.

वडिल एक जागतिक ख्यातीचे तबला वादक असल्यामुळे साहजिकच त्यांना तबल्याचे शिक्षण जन्मताच किंबहुना गर्भ संस्कारच झाले.संगीत क्षेत्रात झाकीर भाई हे अत्यंत सुंदर राजबिंडी व्यक्तिमत्व कायम राहिले आहे. जणू ईश्वराने त्यांचा साचाच वेगळा बनवला की काय असं वाटतं. त्यांच्या केसांची नक्कल त्या नंतरचे सगळे तबला वादक आजतागायत करत आहेत. सर्व धर्म समभावाची भावना त्यांच्या अंगी असून ते हिंदूंच्या देव देवत्यांचा श्रद्धेने कायम सन्मान करतात. श्री गणेष ते इष्टदेव, कुलदैवत माणतात.
माँ सरस्वती म्हणून ते सरस्वती माते समोर नम्रतेने झुकतात.
 कठोर परिश्रम व साधना करून त्यांनी तबला वादनात जागतिक ख्यातीत अग्रगण्य स्थान कायम राखले. तंतुवाद्य प्रकारातील त्यांची साथ संगत अतिशय प्रभावी व संयमी राहली आहे.
साथ संगतीपेक्षा एकल तबला वादनात त्यांचा हातखंड असून प्रत्येक कार्यक्रमात त्याचा वेगळाच प्रयोग दिसतो.
त्याची तबला वादन शैली व अत्यंत तयारी पाहून अनेक संगीत क्षेत्राबाहेरील लोकांना तबला शिकण्याची आवड निर्माण झाली, त्यामुळे मी त्यांना तबला प्रसार माध्यम म्हणूनही संबोधू इच्छितो.

त्यांनी जगभरात अनेक कार्यक्रम सादर करत असतांनाच देश विदेशात हजारो तबला वादक घडवीत आहे.
अशा या महान तबला साधकास 'स्वरांगण संगीत विद्यालय' मारेगाव तर्फे लाख तोफांची सलामी.

शब्दांकन - रवि घुमे
तबला शिक्षक, मारेगाव 

कानडा येथे जागतिक महिला दिनानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : काल दि. ८ मार्च २०२४ ला ग्रामपंचायत कानडा च्या सरपंच सौ. सूषमाताई रूपेश ढोके यांच्या संकल्पनेतून महिला दिनाच्या निमित्ताने मॅरेथॉन स्पर्धा व महिला मार्गदर्शन चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रथम सावित्रीबाई फुले व अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
प्रथम सकाळी ८ वा.मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली, यामधे 'अ' गट मुली ५ ते २० वयोगटातील व २१ ते पूढे वयोगटातील महिलांनी सहभाग घेतला. मुलीमध्ये प्रथम पारितोषिक ११०१ रू.भूमी ढोके, द्वितीय पारितोषिक जानवी ऊईके, तृतीय पारितोषिक कांचन आस्कर, तर महिला 'ब' गट मधून प्रथम पारितोषिक श्रध्दा डाहूले, द्वितीय पारितोषिक मिनाक्षी बावने, तृतीय पारितोषिक स्नेहल फाले यांनी पटकाविले व आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच कोमल धाबेकर, शिवणी (रेशीम शेती उद्योग), निलीमा विठ्ठल निकोडे, डोलडोंगरगाव (वनरक्षक पदासाठी चे परीक्षेत यवतमाळ जिल्ह्यातून मुली मधून प्रथम) यांचे शाल व पूष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात दूपारी २ वाजता महिला मार्गदर्शनाचा कार्यक्रम झाला, मार्गदर्शक म्हणून सिमा बांब्रटकर (व्यवस्थापक लोकसंचालीत साधन केंद्र आर्णी) ह्या होत्या. प्रमूख उपस्थिती कविता झीले ग्रामपंचायत सदस्य, रेखा आस्कर ग्रामपंचायत सदस्य, कल्पना मरसकोल्हे C R P बचत गट, अर्चनाताई धोबे, अल्काताई चामाटे, गीता झीले, सुवर्णाताई डाहूले, व गावातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.