गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर पालकांचे ठिय्या आंदोलन मागे


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : जानकाई (पोड) जिल्हा परिषद शाळेत 1 ते 8 वर्ग आहे. एकूण पटसंख्या 61 असून सद्यस्थितीत एक शिक्षिक अध्यापनाचे कार्य करत आहे. परंतु शिक्षकाअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे गटशिक्षण अधिकारी पं.स. मारेगांव यांच्याकडे वारंवार शिक्षकाची लेखी स्वरुपात मागणी केली गेली, मात्र आज पर्यंत शिक्षकाची पूर्तता करण्यात आलेली नाही. त्यामुळे संतापलेल्या पालकांनी आज शुक्रवारला मारेगांव येथे संपूर्ण विध्यार्थी घेवून पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात विद्यार्थ्यांची शाळा भरवली.
तालुक्यातील जानकाई (पोड) येथील जि.प. शाळेतील शिक्षक मागणीच्या संदर्भात अनेकदा निवेदन दिले.परंतु शिक्षकाची पूर्तताच करण्यात येत नसल्याने अखेर आज दि.२/२/२०२४ रोजी शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन पंचायत समिती च्या प्रांगणात ठिय्या आंदोलन करून शिक्षकासाठी जोरदार मागणी करण्यात आली. दरम्यान पंचायत समितीचे प्रांगण कधी न गजबजलेले बघितले असे आज गजबजलेले पाहायला मिळाले. यावेळी शाळेवर तत्काळ शिक्षकाची पूर्तता करून होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे, अशी आग्रही मागणी पालकांनी लावून धरली होती. तसेच गटशिक्षण अधिकारी शिक्षक देण्यास असमर्थ ठरत असल्याचाही तीव्र संताप गावाकऱ्याकडून व्यक्त करण्यात येत होता.
आज सकाळपासून नुसती चर्चाच रंगत होती. शिक्षक द्या या मागणी साठी सरपंच,पालक व गावकरी शिक्षण विभागाच्या दालनात आक्रमक झाले होते. इकडे पंचायत समिती च्या आवारात ठिय्या मांडून बसलेले विद्यार्थी, शिक्षक मिळाला नाही तर आवारातून हटणार नाही ह्या ते भूमिकेत होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यासोबत त्यांच्या दालनात पुन्हा चर्चा झाली. ह्या संदर्भात बिडीओ व्हनखंडे यांनाही आमच्या प्रतिनिधिने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांच्याशी संवाद होऊ शकला नाही. 
बिईओ ह्यांची सविस्तर चर्चा झाल्यानंतर नियमित शिक्षक आणि शिक्षण स्वयमसेवक ह्या मागणीची आम्ही लवकरच पूर्तता करू, तूर्तास पालकांनी पंचायत समिती च्या आवारातील आजचे आंदोलन मागे घ्यावे, सर्वांच्या उपस्थितीत तथा माध्यमातून गट शिक्षण अधिकारी श्री. एस.ए. काटकर यांनी पालकांना सांगितले. यावेळी त्यांच्या शब्दाला मान देत गावाकऱ्यांनी नम्रपूर्वक आंदोलन मागे घेतलं, परंतु आम्हाला शिक्षक मिळाला नाही तर लवकरच परत आम्ही उपोषणाला बसू असे सर्व पालक यावेळी म्हणाले.

संतापलेल्या पालकांनी भरवली पंचायत समिती च्या आवारात विद्यार्थ्यांची शाळा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : जिल्हा परिषद शाळा जानकाई पोड येथे 1 ते 8 वर्ग असून एकूण पटसंख्या 61 आहे व सद्यस्थितीत एक शिक्षक कार्यरत आहे. त्या संदर्भात गट शिक्षण अधिकारी पं. स. मारेगांव यांच्याकडे वारंवार शिक्षकाची मागणी लेखी स्वरुपात केली परंतु आज पर्यंत शिक्षकाची पूर्तता करण्यात आलेली नाही. त्यामुळे आज पालकांनी मारेगांव येथे संपूर्ण विध्यार्थी येऊन पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात शिक्षणाचे धडे गिरवण्याकरिता आणण्यात आले.

शिक्षक मागणीच्या संदर्भात 2 ते 3 वेळा निवेदन दिले परंतु शिक्षकाची पूर्तता करण्यात आलेली नाही. असा पालकांचा आरोप असून आज दिनांक 2/2/2024 रोजी विद्यार्थ्यांना घेऊन पंचायत समिती च्या प्रांगणात शाळा भरवून शिक्षकाची मागणी करण्यात आली. एका शिक्षकाची पूर्तता करून होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे, अशी आग्रही मागणी पालकांची आहे. जानकाई (पोड) आदिवासी बहुल आदिम जमाती वास्तव्यास असून गटविकास अधिकारी शिक्षक देण्यास असमर्थ ठरत आहे.

सकाळपासून नुसती चर्चा सुरु असून शिक्षकाअभावी विद्यार्थी व पालक उघड्यावर पंचायत समिती च्या आवारात ठिय्या मांडून बसलेले आहे. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यासोबत चर्चा सुरु आहे. शिक्षक मिळाला नाही तर पंचायत समिती च्या शिक्षण विभागाच्या वेळकाढू धोरणाबाबत पालक, सरपंच, गावकरी व विद्यार्थी उपोषणास बसणार आहे.

नियमित शिक्षक आणि स्वयमसेवक ह्या मागणीचा आम्ही लवकरच पूर्तता करू, तूर्तास पालकांनी पंचायत समिती च्या आवारात भरवलेली आजची शाळा मागे घ्यावे.

-एस ए काटकर 
गट शिक्षण अधिकारी

ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – मुख्यमंत्री

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : ग्रामपंचायतस्तरावर काम करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांच्या विविध मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असून ग्रामरोजगार सेवकांचा गटविमा काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ग्रामरोजगार सेवकांच्या पदनामात बदल करुन ते ग्रामरोजगार सहायक असे करण्यात येईल, असे जाहीर करतानाच मानधनात वाढ करण्यासाठी अन्य राज्यात यासंदर्भात घेतलेल्या निर्णयांची माहिती घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

राज्यातील ग्रामरोजगार सेवकांच्या विविध मागण्यांबाबत चर्चेसाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, रोजगार हमी विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, रोहयो मिशन महासंचालक नंदकुमार यांच्यासह ग्राम रोजगार सेवक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे अभिलेख आणि नोंदवह्या आदी कामांसाठी ग्रामसेवकांना मदतनीस म्हणून ग्रामरोजगार सेवकांच्या सेवा घेण्यात आल्या आहेत. राज्यात २६ हजार ६०० ग्रामरोजगार सेवक ग्रामपंचायतस्तरावर कार्यरत असून त्यांना कामाच्या प्रमाणानुसार मानधन दिले जाते. सध्या मिळणाऱ्या मानधनात वाढ करण्यासाठी अन्य राज्यात या ग्रामरोजगार सेवकांच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयांची माहिती घेऊन सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

ग्रामरोजगार सेवकांना सध्या विमा कवच नसल्याने अपघात किंवा इतर कारणांमुळे मृत्यू झाल्यास कुटुंबियांचे हाल होतात, ही बाब लक्षात आल्यावर ग्रामरोजगार सेवकांचा गटविमा काढण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. कोरोना काळात मृत्यू झालेल्या ग्रामरोजगार सेवकांची माहिती संकलित करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेऊन गावाच्या दिशेने परत जाताना दुचाकीला अपघात, एक ठार, तर इतर दोन जखमी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : देवकारण आणि लग्नात विग्न ह्या घटना आपण नेहमी वाचत असतो. अशीच घटना काल बुधवार ला वणी-वरोरा मार्गांवरील झोला फाट्या जवळ अचानक मोटारसायकल चे बॅलन्स अनियंत्रण होऊन बस आणि दुचाकी चा मोठा अपघात घडला. या भीषण अपघातात एक 49 वर्षीय महिला जागीच ठार झाली तर इतर सहकारी जखमी झाल्याचे वृत्त आहे. 

वणी शहराच्या काही अंतरावर मंगळवार पासून धार्मिक प्रवचनाचा कार्यक्रम सुरू आहे. हा कार्यक्रम ऐकूण जयश्री शंकर उमाटे (49), मुलगा प्रतिक शंकर उमाटे (25) रा. सुर्यमंदिर वार्ड (ता.भद्रावती), व जाऊ चित्रा सुरेश उमाटे (55) हे तिघेही मोटारसायकल क्रमांक (MH-34 CE- 3120) ने ट्रिपल सीट वणीहून आपल्या गावाच्या दिशेने निघाल्याचे समजते. अशातच परत जात असताना वाटेत जयश्रीला फिट आली. फिट आल्याने तिचे मोटारसायकल वरून बॅलन्स बिघडले व ती रस्त्या वर धाडकन आदळली. 

दरम्यान, मुलगा प्रतीक, व चित्रा सुरेश उमाटे हे रस्त्याच्या कडेला पडले. अशातच मागून येणाऱ्या भरधाव बस क्रमांक (MH-14 HG-8227) वणी-चंद्रपूर या बस चे मागील चाक जयश्रीच्या अंगाच्या काहीभागावरून गेले. दुर्दैवाने त्या जागीच ठार झाल्या तर, मुलगा व जाऊ हे जखमी झाले. जयश्री यांना नेहमीच फिट यायची असे समजते. ठार माहिलेचा मृतदेह वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून या घटनेची माहिती मृतकाचा कुटूंबियांना देण्यात आली. घटनेचा पंचनामा करून पुढील तपास वणी पोलिस करीत आहे. मात्र या भीषण अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त होतांना दिसली.

यमुनाताई दारुंडे अनंतात विलीन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : शहरातील चोखाजी एच पी गॅस एजन्सीचे संचालक राजूभाऊ दारुंडे यांच्या आई यमुनाताई चोखाजी दारुंडे ह्यांचे काल बुधवार ला सुभाष नगर येथील स्वगृही निधन झाले. त्यांचे मृत्यूसमयी 72 वर्षाचे वय होते.

यमुनाजी दारुंडे यांना गेल्या चार दिवसापूर्वी डोक्याला अर्धांगवायुचा तीव्र झटका आला. त्यांना तत्काळ चंद्रपूर येथील एका खासगी दवाखान्यात हलविण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती खालावत असल्याने काल बुधवार दुपारी त्यांना प्राणवायूवर आणण्यात येवून निवासी ठेवण्यात आले. मात्र दुपारी 3.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

त्यांच्या पाठीमागे दोन मुली, एक मुलगा, जावई, स्नुषा, नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.
आज गुरुवार ला सकाळी 10 वाजता यवतमाळ रोड वरील शेतात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.