पोलिस स्टेशनला न जाता घरबसल्या मोबाईलवरून करा ऑनलाईन तक्रार..

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

पोलिस स्टेशनमध्ये न जाताही तुम्ही तुमची फिर्याद करु शकता. यालाच ऑनलाईन तक्रार करणे म्हणतात. ऑनलाइन तक्रार कश्या प्रकारे करायची जाणून घ्या..

गुन्ह्यांचे वर्गीकरण साधारण दोन प्रकारात केले जाते;
• अदखलपात्र गुन्हा 
• दखलपात्र गुन्हा
अदखलपात्र गुन्हा -
म्हणजेच फारसे गंभीर नसलेले गुन्हे, हे खाजगी स्वरूपाचे असतात. उदाहरणार्थ फसवणूक, त्रास देणे, सार्वजनिक उपद्रव इत्यादी. या स्वरूपाच्या गुन्ह्यात कोणताही पोलिस अधिकारी न्यायदंडाधिकारी यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही व्यक्तीला अटक करू शकत नाही.

दखलपात्र गुन्हा -
म्हणजे गंभीर स्वरूपाचे गुन्हे उदाहरणार्थ चोरी, बलात्कार, हत्या, खंडणी, इत्यादी. या स्वरूपाच्या गुन्ह्यात एफआयआर दाखल करणं गरजेचं असतं.
आपल्याकडे अशी उदाहरणे समोर आहेत, जिथे पोलिस अधिकारी तक्रार घेण्यास नकार देतात. अशा प्रथा टाळण्यासाठी, ऑनलाइन तक्रार नोंदवणे चांगले आहे, कारण ते नेहमीच रेकॉर्डवर असते. ते पोलिस हटवू शकत नाहीत. जे पोलीस अधिकारी आपली कर्तव्य बजावत नाहीत त्यांना काम करण्यास ऑनलाइन तक्रार भाग पाडू शकते. आणि तक्रारदारास यावर त्वरित उपाय मिळतो.
ऑनलाइन तक्रार कशी केली जाते?
ऑनलाइन तक्रार करण्यासाठी राज्य पोलीस वेबसाईटवर जावे लागते आणि वेबसाईट वरील दाखवलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

ऑनलाईन तक्रारची वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा- https://citizen.mahapolice.gov.in/Citizen/Login.aspx

 हरवलेल्या मोबाईलची तक्रार करण्यासाठी इथे क्लिक करा- https://citizen.mahapolice.gov.in/Citizen/MH/MobileMissingForm.aspx
एफआयआर नोंदवताना, गुन्हा घडलेली नेमकी जागा, नेमका हा गुन्हा कधी घडला ती नेमकी वेळ, माहिती असल्यास गुन्हेगाराचे नाव, नाव माहिती नसल्यास त्याचे अचूक वर्णन, गुन्हा घडताना आजूबाजूला कोण व किती माणसे होती, त्याचा तपशीलवार व अचूक वर्णन, हा गुन्हा कोणत्या स्वरूपाचा होता इत्यादी. हे तपशीलवार लिहिणे आवश्यक आहे. प्रत्येक राज्याची एक स्वतंत्र पोलीस वेबसाईट आहे. सध्या गुन्हा नोंदवण्याची ऑनलाइन पद्धतीत ही सर्वात सुरक्षित आणि सोयीची आहे.


प्रजासत्ताकदिनी विस्तार अधिकारी सुधाकर जाधव यांचा सत्कार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव तालुक्यातून मतदार नोंदणी कार्यक्रमामध्ये सर्व बीएलओ (केंद्स्तरीय मतदार नोंदणी अधिकारी) यांचे पर्यवेक्षण करण्यासाठी ८ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आलेले होते, उत्कृष्ट मतदार नोंदणी पर्यवेक्षक म्हणून श्री सुधाकर जाधव विस्तार अधिकारी पंचायत समिती मारेगाव यांचा प्रशस्तीपत्र प्रदान करून वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
श्री जाधव यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत प्रशासनाने २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी वणी येथील शासकीय मैदानात झालेल्या कार्यक्रमात, उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल वणी विधानसभा मतदार संघाचे आमदार यांचे हस्ते व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री गणेश किंद्रे, तहसीलदार, निखिल धुरदळ, ठाणेदार, अजित जाधव, यांच्या प्रमुख उपस्थितीत विस्तार अधिकारी सुधाकर जाधव (पं स मारेगाव) यांचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला आहे.


प्रजासत्ताक दिन विशेष; जाणून घ्या प्रजासत्ताक दिनाचा इतिहास....!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

आज आपण स्वतंत्र भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करणार आहोत. या दिनानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. परंतु २६ जानेवारी १९५० रोजी भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. 
प्रजासत्ताक दिनाचा इतिहास
भारत स्वतंत्र झाल्यावर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. ही राज्यघटना २६ जानेवारी १९५० पासून लागू करण्यात आली. याच दिवशी भारत प्रजासत्ताक असल्याची घोषणा करण्यात आली. १९३० मध्ये या दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली होती. त्यामुळे याच दिवशी संविधान स्वीकारण्यात आले.
सन १९२९ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने एका बैठकीचे आयोजन केले होते. यात ब्रिटिशांनी २६ जानेवारी १९३० पर्यंत भारताला स्वतंत्र देशाचा दर्जा देण्यात यावा ही मागणी करण्यात आला. या दिवशी सर्वात पहिलं भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळेपर्यंत स्वातंत्र्य दिन २६ जानेवारीलाच साजरा केला जात होता. २६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू करण्यात आले आणि २६ जानेवारी १९३० रोजी पूर्ण स्वराज्य घोषित करण्याच्या तारखेला महत्त्व देण्यासाठी २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून घोषित करण्यात आला.
भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली समिति तयार करण्यात आली. यात ३०८ सदस्य होते. हा मसुदा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे डॉ.भारतरत्न बाबासाहेब यांनी तयार केला. यात अनेक सुधारणा आणि बदल केल्यावर समितीच्या सदस्यांनी २४ जानेवारी १९५० रोजी हस्तलिखित कायद्याच्या दोन प्रतींवर सह्या केल्या. त्यानंतर दोन दिवसांनी २६ जानेवारी रोजी ही घटना सकाळी १० वाजून १८ मिनिटांनी भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनला. यानंतर १० वाजून २४ मिनिटांनी डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. 
या दिवशी, डॉ. राजेंद्र प्रसाद पहिल्यांदाच राष्ट्रपती म्हणून एका बग्गीतून राष्ट्रपती भवनातून बाहेर आले, जिथे त्यांनी प्रथमच लष्करी सलामी घेतली आणि त्यांना प्रथमच गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. या दिवशी, तिरंगा फडकावण्याबरोबरच, राष्ट्रगीत गाणे आणि भव्य लष्करी संचलन देखील केले जाते.

उद्या मारेगावकर घेणार "वळण"


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल

मारेगाव : उद्या 27 जानेवारी ते 2 फेब्रु. दरम्यान परसोडा येथे भव्य शिवपुराण कथा होत आहे. त्या अनुषंगाने सात दिवसाच्या प्रवचनाला मोठ्या संख्येने भाविकांची त्या ठिकाणी कथा ऐकण्यासाठी गर्दी होणार आहे. याकरिता कायदा आणि सुव्यवस्थेचा भाग म्हणून उद्या मारेगाव ते वणी हा महामार्ग बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी, गृहविभागाने काढला आहे.
त्यामुळे उद्यापासून सात दिवस मारेगावकर मार्डी, नांदेपेरा, वणी असे वळण घेणार आहे. परंतु वणी-यवतमाळ मार्गांवरील असलेले राजूर, निंबाळा, भांदेवाडा, बोदाड, झरपट, सोमनाळा व कळमना ह्या गावांना त्रास होणार आहे ह्या करीता संबंधित गावांचा रहिवासियांकडून वणी उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन सुद्धा देण्यात आले आहेत. तर कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी वणीला आलेले एडी. एस पी जगताप साहेब ह्यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली होती. दरम्यान, जगताप साहेबांनी सर्वतोपरी पोलीस विभाग सहकार्य करेल मार्ग संबंधित बाधित गावांना मोकळा करून देण्यात येईल असे आश्वासन दिले.
मात्र, वणी ते मारेगाव हा महामार्ग बंद करण्यात येणार असल्यामुळे कोणत्याही वाहनांची येरजाऱ्या होणार नसल्याने शेतकरी, शेतमजूर, रोज मजुरी करणारे, ऑटो वाहक, शाळा व कॉलेजचे विद्यार्थी, चुना उत्पादन, चुना उद्योगातील शेकडो कामगार रोजमजुर, गावात किराणा व अन्य आवश्यक वस्तूंचा पुरवठा ठप्प होईल व येथील किराणा व अन्य व्यवसाय बंद राहतील व त्यामुळे चालत्या फिरत्या उद्योग,धंद्यावर आर्थिक संकट ओढवणार आहे. 
तसेच मारेगाव येथून वळण घेतल्यावर मार्डी, नांदेपेरा, वणी या मार्गाचा अधिक चा ताण वाढणार आहे. आधीच जड वाहतुकीस बंद असलेला हा रस्ता. आता भरधाव वाहने धावताना दिसणार किंबहुना अपघाताची शक्यता बळावणार, या पूर्वी नांदेपेरा मार्गाने कोळसाची जड वाहतूक करणारी ट्रक वाढली होती, तेव्हा या मार्गांवर नाहक जीव लोकांना गमवावा लागला. आताही तीच परिस्थिती मार्डी नांदेपेरा वणी या वळणावर उद्भवल्यास पुन्हा अपघाताची शृंखला चालणार तर नाही,असे भीतीदायक बोलल्या जात आहे. 
वरील ह्या महत्त्वाचा मुद्दा व प्रश्न संबंधित विभागाने लक्षात घेऊन हा वणी यवतमाळ महामार्ग पूर्ववत सुरु ठेवावा अशी सर्व सामान्यांना वाटत आहे किंबहुना बंद करू नये अशी अपेक्षा असून एडी एस पी जगताप साहेबांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे जनतेला दिलेले आश्वासन कितपत प्रत्यक्षात दिसते याकडे मारेगाव वणी महामार्गांवरील दैनंदिन वाहतूक करणाऱ्या नागरिकांचे लागले आहे.


सर्व देश वाशियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!


या विशेष दिवशी, आपल्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या शूर आत्म्यांचे स्मरण करूया आणि त्यांच्या वारशाचा सन्मान करूया. आपल्या शूरवीरांनी आपल्या भविष्यासाठी काय केले हे लक्षात घेऊन त्यांचे स्मरण करत त्यांचा वारसाहक्क जपात पुढे न्यायला हवा. आपल्या पुढच्या पिढीला याची जाणीव करण्यासाठी भारतीय प्रजासत्ताक दीन निमित्त  शुभेच्छा...

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!!