भाजपची धुरा जाणत्यांकडेच; मारेगाव तालुका अध्यक्ष पदी अविनाश लांबट

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : भाजपात दाखल झालेले व कमी वेळात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदावर झेप घेणारे अविनाश लांबट यांची भारतीय जनता पार्टी मारेगाव तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती झाली आहे. 

भारतीय जनता पार्टी, यवतमाळ जिल्ह्यातील मंडळ अध्यक्ष पदाची घोषणा पत्रकान्वये काल जाहीर करण्यात आली आहे. मारेगाव तालुक्याची भाजपची धुरा जाणत्यांकडेच दिल्याने आता पक्षाला मोठी संजीवनी मिळणार आहे.

विशेष म्हणजे तालुका अध्यक्ष पदाकरिता चार उमेदवारांनी आपली इच्छा जाहीर केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती, यात विद्यमान ता.अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, शशिकांत आंबटकर (काका), गणेश झाडे, अविनाश लांबट यांनी अध्यक्ष पद पदरात पाडून घेण्यासाठी खटाटोप सुरु केला. परंतु पक्षाच्या प्रोटोकॉल नुसार दोघांना माघार घ्यावी लागली,तर उरले दोन. दोन पैक श्री लांबट सोडले तर इतरांचा तालुक्यात पाहिजे तसा फारसा जमघट नसल्याने त्यांनाही अध्यक्ष पद मिळवता आले नाही असे समजते. त्यामुळे अल्पवाधित आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या अगदी निकट मानले जाणारे, राजकीय, सामाजिक तथा सामान्यांच्या कार्यात, मदतीला एका हाकेला धावून जाणारे, मारेगाव तालुक्यात लोकप्रिय, मनमिळाऊ स्वभावाने ओळखले जाणारे अविनाश लांबट यांची भाजप च्या मारेगाव तालुका अध्यक्ष पदी अखेर वर्णी लागली. त्यांच्या कडे सर्वानुमते तालुक्याची जबाबदारी देण्यात आली.

या निवडीबाबत तालुक्यातील कार्यकर्त्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, सोशल च्या माध्यमातून राजकीय, सामाजिक क्षेत्रासह त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. याबाबत अविनाश लांबट यांच्याशी संवाद साधला असता नवनिर्वाचित अध्यक्ष श्री लांबट म्हणाले, वणी मतदारसंघाचे आमदार संजीव रेड्डी बोदकुलवांर यांच्या विकासात्मक कामाला प्रेरीत होऊन आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या निवडीचे श्रेय त्यांनी सन्माननीय माजी मंत्री हंसराज भैय्या अहिर, वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांचे असल्याचे 'सह्याद्री चौफेर' ला बोलताना सांगितले.

तालुक्यातील जनमानसात स्वच्छ प्रतिमा असल्याने पक्षाने त्याची निवड तालुका अध्यक्ष पदी केल्याने सर्व स्तरांतून त्यांच्या निवडीचे स्वागत केले जात आहे. त्यांची निवड आगामी काळात करिश्मा करणारी ठरणार आहेत.


चिंचाळा येथील ७० वर्षीय वृद्धाने घेतला विषाचा घोट

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : दिवसागणिक आत्महत्येच्या घटनेत वाढ होत आहे. काल हटवांजरी येथील इसमाची आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना तालुक्यातील आणखी चिंचाळा येथील एका वृद्धाने आपल्या राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली. 

भाऊराव सदाशिव थेटे (70) असे वृद्धाचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी साडे सात वाजता च्या दरम्यान त्यांनी राहत्या घरी विष प्राशन केले. वृद्धाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तपासणी अंती डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप तरी अस्पष्ट असून मृतकाच्या पाठीमागे एक मुलगा, एक मुलगी, स्नुषा, जावई व नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

या दुःखद घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

सिमा चोरडिया यांची श्री धनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहरातील नामांकित श्री धनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वणीच्या अध्यक्ष पदी सीमा विजय चोरडिया यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

विद्यमान अध्यक्ष आरती चौधरी यांनी व्यक्तिगत कारणास्तव राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालय वणी, यांच्या आदेशानुसार एस.डी. मडावी सहाय्यक सहकार अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष पदाची निवड करण्यात आली. यामध्ये सीमा चोरडिया यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

या निवडीबाबत आरती संजय चौधरी यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना नवनियुक्त अध्यक्ष सीमा चोरडिया यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकत जी जबाबदारी दिली त्यामध्ये निश्चितच मी पतसंस्थेला प्रगती पथावर नेत पतसंस्थेच्या माध्यमातून तळागाळातील सर्व सामान्य लोकांना बचतीची सवय लावून कर्ज स्वरूपात कर्ज उपलब्ध करून जीवनमान उंचाविण्याचा प्रयत्न असणार आहे, अशा यावेळी त्या म्हणाल्या.

या निवडीच्या अनुषंगाने विजय चोरडिया यांनी सर्व महिला संचालकांचे आभार मानले. दरम्यान, संस्थेला प्रगतीपदावर नेण्याची हमी दिली. यावेळी आरती चौधरी, पूजा जुनगरी, वंदना राजूरकर, पल्लवी उदापूरकर, ताई मुठावार, सरोज कोनप्रतीवार, संगीता खुंगर, मंजू बिलोरिया, सविता राऊत, गीता तुराणकर, शुषमा येवले, सोनू मदान आदी संचालक उपस्थित होत्या.

या प्रसंगी एस.डी. मडावी सहायक सहकार अधिकारी यांचे स्वागत अतुल मुठ्ठावार यांनी तर कार्यक्रमाचे संचालन राजू तुराणकर यांनी केले.

आता शिर्डीत साईभक्तांना मास्क बंधनकारक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

शिर्डीच्या साई मंदिरात आता मास्क सक्ती करण्यात आलेली आहे. शिर्डीच्या साई मंदिरात 'नो मास्क, नो दर्शन'. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साईसंस्थान सज्ज झालेलं आहे आणि तो निर्णय घेण्यात आलेला आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत. दर्शन रांगेत साई संस्थानने भक्तांना मास्क द्यावेत. JN.1 च्या पार्श्वभूमीवर या सूचना करण्यात आलेल्या आहेत.

शिर्डीत साई समाधी दर्शन घेण्यासाठी संपूर्ण जगभरातून भाविक शिर्डीला येत असतात. मात्र, आता कोरोनाच्या जेएन. वन (JN.1) या नव्या विषाणूने जगाची चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रात देखील कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. 

या पार्शवभूमीवर शिर्डीत साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविक आणि ग्रामस्थांना मास्क सक्ती करण्यात आली आहे. ज्या भाविकांकडे मास्क नसेल त्यांना दर्शनासाठी प्रवेश मिळणार नाही. 

तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रवेशद्वाराजवळ मास्क उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी तुकाराम हुळवळे यांना दिल्या आहेत. महत्वाचं म्हणजे या सूचनेची अंमलबजावणी आजपासून होणार आहे. त्यामुळे आता साईभक्तांना मास्क बंधनकारक असणार आहे.


दोन वेचण्यातच कपाशीच्या पऱ्हाट्या मोकळ्या?

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यात दुष्काळाने भयावह स्थिती निर्माण झाली असून अवकाळीने खरिपाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. परिणामी अनेक भागात पहिल्या किंवा दुसऱ्या वेचणीतच कपाशीच्या पऱ्हाट्या मोकळ्या झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

मारेगाव तालुक्याला मागील काही वर्षांपासून लागलेले दुष्काळाचे ग्रहण अजूनही सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. परिणामी शेतकऱ्यांसह सर्वसामान्य माणूस हवालदिल झाला आहे. यंदाही वरुणराजाच्या वक्रदृष्टीने तालुका दुष्काळात होरपळत आहे. त्यात जेमतेम पावसावर आलेल्या सोयाबीन व कपाशीचे अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पावसाने थोड्याफार प्रमाणात येणाऱ्या कपाशीसह इतर पिके हातची गेली आहेत.
ऐरवी फेब्रुवारी, मार्च महिन्यापर्यंत कापूस वेचणी सुरू असते. परंतु यंदा हंगाम लवकरच आटोपण्यावर असून मोठ्या प्रमाणात सोयाबीन, कापसाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. कमी पाऊस, उन्हाचा तडाखा व ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस यामुळे पांढरे सोने डिसेंबरच्या अखेरीस शेतातून हद्दपार होण्याची शक्यता आहे. अनेक शेतात पहिल्या किंवा दुसऱ्या वेचणीत कापसाच्या पऱ्हाट्या संपल्याचे दिसत आहेत. यंदाच्या दुष्काळात अनेकांचे हातचे सोयाबीन पिक गेले, कापूसही हद्दपार होणार असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. यावर्षी खरिपाची लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, पावसाने ऐनवेळी दगा दिला त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
शेतकऱ्यांसाठी सर्वपक्षीय नेते कधी एकवटणार?

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य तो हमीभाव भेटण्यासाठी नेते मंडळी एकत्र झटणार का? कापसाला भाव मिळवण्यासाठी सामान्य नागरिक रस्त्यावर कधी उतरणार? जबाबदार सामान्य नागरिक नेत्यावर दबाव टाकून शेतीविषयक प्रश्न सोडवून घेतील का?
मात्र, सद्यस्थिती पाहता कोणीकोणाचे वाली नसल्याचे चित्र दिसतेय. परिणामी येत्या आगामी (2024) निवडणुकीत आपलिया आपण करावी सोडवण...