धनगर समाज गुण गौरव व समाज प्रबोधन मेळावा मार्डी येथे

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मार्डी येथे दिनांक 25 डिसेंबर ला राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर फाउंडेशन मारेगाव चे वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव,ज्येष्ठ नागरिकांचा अमृत महोत्सवी सत्कार आणि समाज प्रबोधन मेळावा तिरुपती मंगल कार्यालय मार्डी येथे आयोजित करण्यात आला आहे. 
         
मार्डी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दादाजी कालर यांचे अध्यक्षतेखाली आयोजित मेळाव्याचे उदघाटन राजमाता अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय संस्था यवतमाळ चे अध्यक्ष पांडुरंग खांदवे यांचे हस्ते होणार असून मार्गदर्शक म्हणून धनगर अधिकारी कर्मचारी संघ चंद्रपूर चे कार्याध्यक्ष प्रा.संजय बोधे, अहिल्यादेवी प्रबोधन मंच अमरावती विभागाचे विभागीय अध्यक्ष अविनाश जानकर, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष कैलास उराडे आदी मान्यवरांचे उपस्थित राहणार आहेत.

वणी, मारेगाव आणि झरी तालुक्यातील समस्त समाज बंधू भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित सहभागी व्हावे असे, आवाहन कार्यक्रमाचे आयोजक महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच मारेगाव,वणी,झरी जामनी,आणि राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर फाउंडेशन मारेगाव या तालुका अध्यक्ष व सचिव यांनी केले आहे.

खेळासोबतच उद्योग धंद्याची कास धरा- माधव कोहळे

सह्याद्री चौफेर | वृत्सनाथा 

मारेगाव : मानवी जीवनात निरोगी शरीर निर्मिती साठी खेळाला विशेष महत्त्व आहे त्यामुळे युवक- विद्यार्थ्यांनी खेळाला जीवनातला अविभाज्य घटक बानवावा सोबतच आर्थिक विकासासाठी सध्या सरकार औद्योगीकरणाला विशेष महत्व देत असुन शेतकरी भुमीपुञ युवकांनी शेतकरी उत्पादन कंपनी सारख्या कंपन्यांची स्थापना करून खेळासोबतच शेतीपुरक उद्योग निर्माण करुन आपल्या आर्थिक उन्नती साठी उद्योग धंद्याची कास धरावी असे प्रतिपादन जय जीजाऊ स्पोर्टींग क्लब वेगाव द्वारा आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलताना सामाजिक कार्यकर्ते माधव कोहळे यांनी केले.
       
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी वेगावच्या सरपंच सौ.उषाताई देरकर ह्या होत्या.यावेळी मंचावर माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील देरकर,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे,मालाताई गौरकर,विठ्ठलराव झाडे,मधुकर टोंगे,हुकेश नांदे,विकास सोनटक्के,भाऊ आसुटकर,भारत गौरकर,आविनाश काकडे इत्यादी उपस्थित होते.
    
कार्यक्रमाचे सुञसंचालन सुनिल किंगरे व आभार प्रदर्शन निखिल काकडे यांनी केले.स्पर्धेच्या आयोजनासाठी जितेंद्र गौरकार, संदीप फटाले,प्रशांत गौरकार,सचिन देवाळकर,वैभव देवाळकर,संतोष पिपराडे,साहील बदकी,संतोष फटाले,प्रविण मेश्राम ,प्रतिक टिकले,गिरीश जिवतोडे ,राहुल काकडे,रवि निखाडे,कौशिक गौरकार इत्यादींनी परिश्रम घेतले.

शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सवी रक्तदान शिबीराचे आयोजन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा रक्तदान शिबीर घेवून अनेक गरीब गरजवंत लोकांना जीवनदान देण्याचं आयोजन शिव बहुउद्देशीय संस्था व संजय निखाडे मित्र परिवार, शिंदोला करित आहे. भव्य यात्रा महोत्सव निमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी (2024) मध्ये सुद्धा भव्य रक्तदान शिबीर सोमवार दि. 1 जानेवारी ला सकाळी 10 ते 4 वाजे पर्यंत शिवेचा मारोती देवस्थान, शिंदोला येथे होणार आहे.

या शिबिरात जिल्हा सामान्य रुग्णालय शासकीय, रक्तपेढी चंद्रपूर यांच्या उपस्थितीत पार पडणार असून या महोत्सवी समाज प्रबोधनात्मक किर्तन दुपारी 12 वाजता ह.प.भ.कांचनाताई शेळके यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
धार्मिक तथा विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करून येत्या 1 जाने. ते 5 जानेवारी 2024 या पाच दिवसाच्या महोत्सवी भव्य रक्तदान शिबिरास, भव्य यात्रा महोत्सव यात्रेत तालुक्यातील जनतेनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान, महोत्सवाचा लाभ घेण्याचं आवाहन माजी सदस्य संजयभाऊ निखाडे व संजय निखाडे मित्र परिवार यांचे वतीने करण्यात आले आहे.

विशेष उल्लेखनीय की, या शिबिरात प्रथम 100 रक्तदात्यांना 20 लि. पाण्याची कॅन उपहार स्वरूपात येणार आहे. तसेच  ज्यांना या यात्रेत आपल्या प्रतिष्ठान, दुकाने थाटायची असतील त्यांनी समितीच्या सदस्यांकडे संपर्क साधावा अशी माहिती आयोजन समिती कडून देण्यात आली आहे. 

पोलिस स्टेशनला न जाता घरबसल्या मोबाईलवरून करा ऑनलाईन तक्रार..

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

पोलिस स्टेशनमध्ये न जाताही तुम्ही तुमची फिर्याद करु शकता. कारण तक्रार नोंदवण्यासाठी तुम्हाला पोलीस स्टेशनला जाण्याची गरज पडत नाही, तुम्ही घरी बसूनही सहज तक्रार सहज नोंदवू शकता. यालाच ऑनलाईन तक्रार करणे म्हणतात. ऑनलाइन तक्रार कश्या प्रकारे करायची जाणून घ्या..

 गुन्ह्यांचे वर्गीकरण साधारण दोन प्रकारात केले जाते
१) अदखलपात्र गुन्हा 
२) दखलपात्र गुन्हा 

अदखलपात्र गुन्हा - म्हणजेच फारसे गंभीर नसलेले गुन्हे, हे खाजगी स्वरूपाचे असतात. उदाहरणार्थ फसवणूक, त्रास देणे, सार्वजनिक उपद्रव इत्यादी. या स्वरूपाच्या गुन्ह्यात कोणताही पोलिस अधिकारी न्यायदंडाधिकारी यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही व्यक्तीला अटक करू शकत नाही.

दखलपात्र गुन्हा – म्हणजे गंभीर स्वरूपाचे गुन्हे उदाहरणार्थ चोरी, बलात्कार, हत्या, खंडणी, इत्यादी. या स्वरूपाच्या गुन्ह्यात एफआयआर दाखल करणं गरजेचं असतं.

आपल्याकडे अशी उदाहरणे समोर आहेत, जिथे पोलिस अधिकारी तक्रार घेण्यास नकार देतात. अशा प्रथा टाळण्यासाठी, ऑनलाइन तक्रार नोंदवणे चांगले आहे, कारण ते नेहमीच रेकॉर्डवर असते. ते पोलिस हटवू शकत नाहीत. जे पोलीस अधिकारी आपली कर्तव्य बजावत नाहीत त्यांना काम करण्यास ऑनलाइन तक्रार भाग पाडू शकते. आणि तक्रारदारास यावर त्वरित उपाय मिळतो.

ऑनलाइन तक्रार कशी केली जाते?
ऑनलाइन तक्रार करण्यासाठी राज्य पोलीस वेबसाईटवर जावे लागते आणि वेबसाईट वरील दाखवलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

ऑनलाईन तक्रारची वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा https://citizen.mahapolice.gov.in/Citizen/Login.aspx

हरवलेल्या मोबाईलची तक्रार करण्यासाठी इथे क्लिक करा https://citizen.mahapolice.gov.in/Citizen/MH/MobileMissingForm.aspx

एफआयआर नोंदवताना, गुन्हा घडलेली नेमकी जागा, नेमका हा गुन्हा कधी घडला ती नेमकी वेळ, माहिती असल्यास गुन्हेगाराचे नाव, नाव माहिती नसल्यास त्याचे अचूक वर्णन, गुन्हा घडताना आजूबाजूला कोण व किती माणसे होती, त्याचा तपशीलवार व अचूक वर्णन, हा गुन्हा कोणत्या स्वरूपाचा होता इत्यादी. हे तपशीलवार लिहिणे आवश्यक आहे. प्रत्येक राज्याची एक स्वतंत्र पोलीस वेबसाईट आहे. सध्या गुन्हा नोंदवण्याची ऑनलाइन पद्धतीत ही सर्वात सुरक्षित आणि सोयीची आहे.


मुलांची निवासी शाळा दुराव्यस्थेत, दुरुस्ती व चौकशीची मागणी


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभागाअंतर्गत परसोडा (वणी) येथील शासकिय अनुसुचीत जाती मुलांची निवासी शाळेची इमारत (वसतीगृहाची) येत्या फक्त १२ वर्षात पडण्याच्या अवस्थेत आलेली आहे, त्यामुळे या बांधकामाची चौकशी करुन संबंधित प्रशासनावर कार्यवाई करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन मा. सहाय्यक आयुक्त साहेब समाज कल्याण विभाग, यवतमाळ यांना देण्यात आले. 

वणी तालुक्यातील परसोडा रोड येथे महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभाग अंतर्गत शासकीय अनुसुचीत जाती करिता निवासी शाळा बांधण्यात आली. सदर मुलांची निवासी शाळेचा लोकार्पण सोहळा दि. १०/११/२०१२ रोजी पार पडला. तेव्हापासुन त्या इमारतीकडे सामाजिक न्याय विभागाने पुर्णत: दुर्लक्ष केले. आज त्या पडक्या इमारतीमुळे सर्व विद्यार्थ्यांना मारेगांव येथे स्थलांतरीत करण्यात आल्यामुळे त्यांचा विनाकारण भ्रूदंड आज शासनास पडत आहे. या गंभीर विषयाकडे सामाजिक विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असून येथील निवासी शाळा अत्यन्त दुराव्यस्थेत असल्याने त्या इमारतीची दुरुस्ती व बांधकामच्या चौकशीची मागणी होणे आवश्यक आहे. 

त्या वसतीगृहात खालील सुविधांचा अभाव आहे.

१) पिण्याच्या पाण्याची बोअर नादुरुस्त आहे. तसेच लाखो रुपयाचे वृक्षारोपण करुन ते झाडे पाण्याअभावी सुकत आहे.
२) बिल्डींगचे पूर्ण पिल्लर, वॉल कंपाऊंड, भिंती पडक्या अवस्थेत आहे.
३) डोमच्या टिना सुद्धा पुर्णत: नाहीशा झाल्या आहेत.
४) वसतीगृहाकडे जाणारा डांबरीकरणाचा रोड सुद्धा पुर्णता उखडलेला आहे.

त्यामुळे शिक्षण घेत असलेल्या विध्यार्थ्यांना दुसऱ्या तालुक्यात स्थलांतरित केले. परिणामी या बिल्डींगचे स्ट्रक्चरल ऑडिट (Structural Audit) करुन संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी. २०१२ पासुन ते आजपर्यंत देखभाल दुरुस्तीवर झालेल्या खर्चाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आली आहे. दिलेल्या निवेदनाची तत्काळ दखल घेऊन विद्याथ्यांना होणारी गैरसाय टाळून न्याय द्यावा, असे लढा संघटनेचे वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी प्रवीण खानझोडे, अ‍ॅड. रुपेश ठाकरे, राहुल क्षीरसागर, शरद सुरपाम, मंगेश येटे, राजू मडावी, संगीता पेंदोर, किरण मडावी, सुवर्णा चांदेकर आदी उपस्थित होते.