मुलांची निवासी शाळा दुराव्यस्थेत, दुरुस्ती व चौकशीची मागणी


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभागाअंतर्गत परसोडा (वणी) येथील शासकिय अनुसुचीत जाती मुलांची निवासी शाळेची इमारत (वसतीगृहाची) येत्या फक्त १२ वर्षात पडण्याच्या अवस्थेत आलेली आहे, त्यामुळे या बांधकामाची चौकशी करुन संबंधित प्रशासनावर कार्यवाई करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन मा. सहाय्यक आयुक्त साहेब समाज कल्याण विभाग, यवतमाळ यांना देण्यात आले. 

वणी तालुक्यातील परसोडा रोड येथे महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभाग अंतर्गत शासकीय अनुसुचीत जाती करिता निवासी शाळा बांधण्यात आली. सदर मुलांची निवासी शाळेचा लोकार्पण सोहळा दि. १०/११/२०१२ रोजी पार पडला. तेव्हापासुन त्या इमारतीकडे सामाजिक न्याय विभागाने पुर्णत: दुर्लक्ष केले. आज त्या पडक्या इमारतीमुळे सर्व विद्यार्थ्यांना मारेगांव येथे स्थलांतरीत करण्यात आल्यामुळे त्यांचा विनाकारण भ्रूदंड आज शासनास पडत आहे. या गंभीर विषयाकडे सामाजिक विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असून येथील निवासी शाळा अत्यन्त दुराव्यस्थेत असल्याने त्या इमारतीची दुरुस्ती व बांधकामच्या चौकशीची मागणी होणे आवश्यक आहे. 

त्या वसतीगृहात खालील सुविधांचा अभाव आहे.

१) पिण्याच्या पाण्याची बोअर नादुरुस्त आहे. तसेच लाखो रुपयाचे वृक्षारोपण करुन ते झाडे पाण्याअभावी सुकत आहे.
२) बिल्डींगचे पूर्ण पिल्लर, वॉल कंपाऊंड, भिंती पडक्या अवस्थेत आहे.
३) डोमच्या टिना सुद्धा पुर्णत: नाहीशा झाल्या आहेत.
४) वसतीगृहाकडे जाणारा डांबरीकरणाचा रोड सुद्धा पुर्णता उखडलेला आहे.

त्यामुळे शिक्षण घेत असलेल्या विध्यार्थ्यांना दुसऱ्या तालुक्यात स्थलांतरित केले. परिणामी या बिल्डींगचे स्ट्रक्चरल ऑडिट (Structural Audit) करुन संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी. २०१२ पासुन ते आजपर्यंत देखभाल दुरुस्तीवर झालेल्या खर्चाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आली आहे. दिलेल्या निवेदनाची तत्काळ दखल घेऊन विद्याथ्यांना होणारी गैरसाय टाळून न्याय द्यावा, असे लढा संघटनेचे वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी प्रवीण खानझोडे, अ‍ॅड. रुपेश ठाकरे, राहुल क्षीरसागर, शरद सुरपाम, मंगेश येटे, राजू मडावी, संगीता पेंदोर, किरण मडावी, सुवर्णा चांदेकर आदी उपस्थित होते.