शेतकऱ्यांना वीज पुरवठा नियमित द्या - शेतकऱ्यांची मागणी

सह्याद्री चौफेर | रवि वल्लमवार 

पांढरकवडा : पाऊस कायमचा निघून गेल्याने शेतकरी राजा चिंतेत आला असून, शेतातील उभे पिके करपण्याच्या मागावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची भिस्त वीज पुरवठ्यावर अवलंबून असल्याने शेत पिकांना आता पाणी देणे आवश्यक असल्यामुळे शेती पंपाला वीज पुरवठा सुरळीत देण्यात यावा, या मागणीसाठी खैरगांव देशमुख व मोरवा येथील शेतकऱ्यांनी पांढरकवडा अभियंता यांना निवेदन देण्यात आले. 

तालुक्यातील महावितरणच्या मनमानी कारभाराने शेतकरी त्रस्त असून पाऊस उशिरा आल्यानंतर अतिवृष्टी नंतर पावसाचा खंड, यामुळे आधीच शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली आहे. यावर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. त्यातच काही पाणी असणारे शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी धडपड करीत आहे.

दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात विजेची मागणी वाढत असते हे माहीत असताना सुद्धा महावितरण ऑक्टोबर महिन्यात विजेचा पुरवठा सुरळीत करत नाही. अत्यंत निकृष्ट दर्जाचे विद्युत वितरण साहित्य वापरल्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होतो अपुरे मनुष्यबळ वापरून कंत्राटी लोकांच्या हातात वीज वितरण व्यवस्था दिलेली आहे. खैरगाव देशमुख, मोरवा, वागदा येथील शेतकरी मागील महिन्याभर पासून विजेच्या लपंडावामुळे शेतकरी त्रस्त आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत बंद असते आणि त्यानंतर आलेली विजसुद्धा कमी दाबाचा असते. त्यामुळे फॉल्ट होऊन बीज रात्रभर सुद्धा बंद असते वीज वितरण अधिकाऱ्यांना वारंवार फोनवर सांगून सुद्धा काहीही त्यावर उपाय योजना करत नाही. विज नादुरुस्त झाले तर शेतकरी स्वतः डीपी जवळ जाऊन ऑपरेट करतो हे अत्यंत घातक परिस्थिती आहे.

शेतकरी त्यासाठी प्रशिक्षित नाही आणि तो डीपीवर फ्यूज टाकतो काही अपघात घडल्यास याला महावितरणच जबाबदार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी एक निवेदन अभियता महावितरण अधिकारी पांढरकवडा, उपविभागीय अधिकारी पांढरकवडा, आणि तालूका कृषी अधिकारी कृषी विभाग पाढरकवडा यांना निवेदन दिले. यात शेतकऱ्यांनी सांगितले की, या दोन दिवसात वितरण व्यवस्था दुरुस्त नाही झाली तर, आंदोलनाशिवाय आमच्याजवळ पर्याय नाही हे त्यांनी सांगितले.

आधीच पीक परिस्थिती अत्यंत वाईट अवस्थेत आहे शेतकरी रात्रभर जागा राहून पिकाला पाणी देण्यासाठी शेतात पोहोचतो परंतु विज नसल्यामुळे शेतकरी पाणी देऊ शकत नाही. आणि हे पीक नष्ट झाल्यास शेतकऱ्यांच्यावर आत्महत्या शिवाय पर्याय नाही कारण आतापर्यंत सर्व खर्च होऊन गेलेला आहे आणि त्यांनी पाणी नाही दिले तर पीक वाचू शकत नाही. अत्यंत बिकट परिस्थितीत महावितरण अधिकारी यांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांची समस्या दूर करावी. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

निवेदन देताना संतोष देशटीवार, नितीन बन्तपेलीवार,
अमीर जिवाणी, ज्ञानेश्वर नैताम, मोहन मलेलवार, दिलीप बोमेनवार, प्रकाश शिवणवार, आकाश नाईनवार आदींची उपस्थिती होती. 

समाजकल्याण उपायुक्त डॉ.सचिन शंकरराव मडावी यांना मातृशोक


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : आज दि.30 ऑक्टोबर 2023 रोज सोमवार ला पहाटे 5 वाजता सौ रत्नमाला शंकरराव मडावी यांचे निधन झाले, त्या माजी नायबतहसीलदार तथा स्वीकृत नगरसेवक श्री. शंकरराव मडावी यांच्या पत्नी सौ.रत्नमाला शंकर मडावी ह्या पत्नी होत, तर समाजकल्याण उपायुक्त डॉ सचिन मडावी (गडचिरोली) यांच्या मातोश्री होत्या.

गेल्या महिन्याभऱ्यापासून त्यांचे वर उपचार सुरु होते. आज पहाटे गडचिरोली येथील हॉस्पिटल मध्ये दुःखद निधन झाले.

त्यांचा पश्चात पती, मुलगा, मुलगी, स्नुषा, जावई व नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 3.00 वाजता मारेगांव येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार होणार आहे. 

वचननामा: स्वतंत्र भारताच्या लोकशाही राजास अर्थात मतदारास विनम्र अभिवादन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

येत्या 5 नोव्हेंबर 2023 रोजी म्हैसदोडका ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. ग्रामपंचायत विकास आराखडा, गावातील नागरिकांच्या समग्र विकासासाठी मी सौ ललिता मारोती तुराणकर आपल्या शतशः आशिर्वादाने "सरपंच" पदाकरिता उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल केली आहे.

ग्रामपंचायत स्तरावरील मानवी हक्कावर आधारित विकास प्रक्रिया राबविण्यात मी कटिबद्ध राहणार आहे. गाव विकासाचा दूरदृष्टीने विकास साधण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत प्रशासनाच्या सर्व अधिकारी, कर्मचारी तथा गावातील नागरिकांच्या सुयोग्य मदतीने आराखडा करावयाचे असल्याची प्रामाणिक व सुबक कल्पना कृतीत उतरवून गाव सर्वांगसुंदर घडविण्याचा माझा मानस आहे.

गाव पातळीवरील पायाभूत सुविधांचा विकास त्यात प्रामुख्याने नागरिकांची मूलभूत गरज असलेल्या वीज पाणी, आरोग्य, शिक्षण, वाचनालय, युवकांकरिता क्रिडांगण, रस्ते, नाली सह विविधांगी उपाय योजनेवर मी व माझी टीम भर देऊन सदैव प्रामाणिक प्रयत्न असेल.

ग्राम पातळीवर पक्ष, गट तटाला बगल देवून सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक उपाययोजना आपल्या सहकार्याने व आशिर्वादाने विकासाभिमुख योजना राबविण्यासाठी आणि त्याचा अमल करण्यासाठी हा माझा नियोजित वचननामा...!

मायबाप, भाऊ, ताई आपले अमूल्य मत गाव पातळीवरील विकासाचा वाटा पदरी पाडण्यासाठी मी ललिता मारोती तुरणकर बोध चिन्ह कपबशी या पहिल्या क्रमांकाच्या बोधचिन्हा समोरील बटण दाबून मला व माझ्या संपूर्ण टीम ला आशीर्वाद द्यावा व गाव विकासाचे शिलेदार व्हावे हेच आशिर्वादरुपी मागणं आहे.

उमेदवार - सौ. ललिता मारोती तुरणकर, म्हैसदोडका 

शॉट सर्किट मुळे जुन्या घराला लागली आग, नवरगाव येथील घटना


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील नवरगाव येथील जुन्या घराला आग लागल्याची घटना आज रविवार रोजी सायंकाळी साडेसात वाजता च्या दरम्यान निदर्शनास आली. आग दिसताच शेजाऱ्यांची तारांबळ उडाली. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून शेजारील असलेल्या नातेवाईकांनी सदर आग पाणी झोकून विझवल्याची माहिती आहे.

राहुल पांडुरंग लोणारे यांचे नवरगाव येथील जुने माती कवेलू चे घर आहे. नवरगाव च्या जुन्या घरात जुने सामान, घरेलू साहित्य, लाकडी फाटा तसाच ठेवला असतांना आज रविवार ला सायंकाळी शॉर्ट सर्किट ने आग लागली. आगीने रौद्ररूप धारण करायच्या अगोदर च शेजारी असलेल्या नातेवाईकांना ही आग निदर्शनास येताच त्यांनी पाणी झोकून सर्व आग नियंत्रणात आणली.घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन व महावितरण कंपनी चे अधिक घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला.

दरम्यान, अचानक शॉर्ट सर्किट ने लागलेल्या आगीने राहुल पांडुरंग लोणारे यांचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात येत असून पुढील मात्र, अनर्थ टळला असेही बोलल्या जात आहे.

कोणी रेती देता का रेती; रेतीच्या तुटवड्यामुळे गवंडी कामगारांवर आली उपासमारीची वेळ

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यात गेल्या कित्येक दिवसापासून घरकुल सह इतर बांधकामांना रेती मिळत नसल्याने यावर निर्भर असलेल्या कामगारांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. तर तालुक्यातील रेतीडेपो शोभेची वस्तू ठरू पाहत आहे.

शासनाने नवीन वाळू धोरण आणले. या नव्या वाळू धोरणाची अंमलबजावणी केव्हाचीच झाली. या नवीन धोरणानुसार सर्व नागरिकांना प्रति ब्रास वाळू मिळणार अशा घोषणाही झाल्या आहे. त्यानंतर वाळू मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी महाखनिज या पोर्टलवर वाळू खरेदीच्या मागणीची नोंद केल्या आहे. परंतु  घरकुल बांधकामांना रेती मिळत नसल्याच्या अनेक लाभार्थ्यांची ओरड कायम आहे. त्यामुळे अनेकांच्या घराची अर्धवट कामे आहेत, तर तर काहींच्या घराची छपाई व्हायचे आहे. तूर्तास हे सर्व अर्धवट असलेले बांधकामं कामगारांना वाकुल्या दाखवत आहे.

तालुक्यातील शेवट च्या टोकावर असलेल्या कोसारा घाटावर शासकीय डेपो थाटला आहे. मात्र, अजूनही या रेती डेपोतून तीळमात्र रेती लाभार्थ्यांना मिळाली नाही असे नागरिकांतून बोलल्या जात आहे. रेतीसाठी घरकुल लाभार्थी वणवण फिरत आहे. हा प्रश्न गंभीर असताना लोकप्रतिनिधी प्रशासन चीरनिद्रेत का आहे. असा प्रश्न उपस्थिती होत आहे. नको तिथे डोकं लावत लोकप्रतिनिधी तासंतास ठिय्या मांडून बसतात परंतु जनतेच्या समस्या, प्रश्नाकडे ढुंकूनही पाहत नाही असे जनतेतून बोलल्या जात आहे. गेल्या कित्येक महिन्यापासून लाभार्थ्यांना वाळू मिळाली नाही यासाठी कधी लोकप्रतिनिधी पुढाकार घेत नसल्याचे दबक्या आवाजात नागरिकात चर्चील्या जात आहे.वरून ते खालपर्यंत सरकार आपलं, सारी सिस्टीम लोकप्रतिनिधीची असे ठासून सांगत असताना रेतीचे भिजत घोगंडं अडलं कुठे हे कळायला मार्ग नाही. परंतु या दुर्लक्षितपणामुळे संबंधित व्यवसाय गेल्या तीन वर्षांपासून डबघाईस आले आहे. रेती महत्वाचे असल्यामुळे सिमेंट, सलाख, गिट्टी काही कामाची नाही. महत्वाचे आहे ती,म्हणजे रेती. रेतीच मिळत नसल्याने अनेक काम निकृष्ट दर्जाचे होत असून लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. 

आता मोदी योजना आली. इतर मागासवर्गीयकरिता नवीन घरकुल उद्दिष्ट आहे, सर्व प्रशासन यंत्रणा जुळवा जुळव साठी कामाला लागली. परंतु रेती मिळत नसल्याने घरकुल बांधकाम करतील कसे हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आधीचे घरकुल अर्धवट असल्याने सरकार ने कोणतीही योजना आखाच्या अगोदर रेती उपलब्ध करून द्यावी, मग योजना बिजना राबविण्यात यावी असा खोचक सवाल ही नागरिकांतून करण्यात येत आहे. समोर दिवाळी सारखा सण आहे. तालुक्यातील रेती अभावी संबंधित कामगार मजूर कित्येक दिवसापासून रिकामे आहे, त्यांच्या हाताला काम नाही. परिणामी त्यांच्या वर उपासमारीची वेळ असून घरकुल लाभार्थी रेती साठी क्षणोक्षणी तडफडत आहे. अशी सद्य स्थिती असताना लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळवून द्यावी जेणेकरून कामगारांवर उपासमारीची वेळ येणार नाही, त्यामुळे रेती ची किचकट असलेली बाब सध्या बाजूला सारून सरळ सरळ रेती लाभार्थ्यांना मिळावी अशी मागणी जोर धरत आहे.