पाणी प्रश्न पेटला, इंदिराग्राम येथील महिला धडकल्या पंचायत समितीवर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील इंदिराग्राम वाशियांना मागील तीन ते चार महिन्यापासून पाण्याची टंचाई असल्याचे निवेदन इंदिराग्राम वाशियांनी पंचायत समिती कार्यालयाला आज (ता.३) देण्यात आले. यावेळी गावातील नागरिकासह महिलांची बहुसंख्येने उपस्थिती होती. 

निवेदनात असेही नमूद केले आहे की,नागरिक २०२२ ते २०२३ पर्यंतचे ८० टक्के ते ९० टक्के नागरिक गृहकर, पाणीकर, विदयुत कर, आरोग्य कर, गृहकर व इतर संपूर्ण कर इंदिराग्राम ग्रामपंचायतला भरले असताना आज विदयुत लाईन खंडित झाल्यामुळे गावाकऱ्यांना पिण्याचे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.

त्यामुळे गावातील लोकांना नाल्यातून पिण्याचे पाणी नाल्यातून आणावे लागत आहे. हे पाणी दुषित असल्यामुळे नागरिकांना ताप, हिवताप, मलेरिया, डेंगू, मलेरिया व इतर रोगांची दुषित पाण्यामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. याबाबत ग्रामपंचायत सचिव व सरपंच यांना वारंवार माहिती देऊन सुद्धा दुर्लक्ष केले जात आहे. अशी तक्रार निवेदनातून केली असून गावाकऱ्यांना पोळ्या सारखा सण अंधारात करावा लागला आहे. 

नागरिकांनी वारंवार मागणी केली मात्र, सचिव,सरपंचांनी नागरिकांना "तुम्ही संपूर्ण गृहकर भरल्याशिवाय तुम्हाला पाणी मिळणार नाही" या भाषेत सांगतात. असे निवेदनात म्हटलं आहे. त्यामुळे गारगोटी पोड (इंदिराग्राम) मध्ये किती गृहकर भरले व शिल्लक आहे. त्याची संपूर्ण माहिती ग्रामपंचायत कार्यालयाने जाहिर करावी. तसेच पंचायत समिती स्तरावरून याची सखोल चौकशी करून गावाकऱ्यांना तत्काळ पाण्याची समस्या दूर करण्यात यावी. पाण्याची समस्या न मिटल्यास अन्यथा उपोषण किंवा आंदोलन करण्यात येईल. असा गर्भीत ईशाराही नागरिकांनी दिलेल्या निवेदनातून गट विकास अधिकारी, मारेगाव यांना देण्यात आला आहे. 

भाजपा चा ओबीसी वरील प्रेम हे बेगडी आहे फसवं आहे आधी ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करा, नंतर ओबीसी जागर करा - प्रवीण खानझोडे लढा प्रतिनिधी


सह्याद्री चौफेर | राजू डावे 

बिहार राज्य जातनिहाय जनगणना करू शकते मग महाराष्ट्र राज्य सरकार का करीत नाही. लढा संघटना च्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मा. एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री म. रा. यांना निवेदन देऊन खालील मागण्या त्वरित मान्य कराव्या.

१) ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करून स्वेत पत्रिका जाहिर करावी. व स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे.
२) प्रत्येक जिल्हयात जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर ओबीसींच्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वस्तीगृह सुरु करण्यात यावे.
३) सर्वोच्च न्यायालयातील ५ मे २०२१ च्या मराठा आरक्षाणातील निकालाप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या १४ लाख नोकऱ्यांमध्ये ओबीसीचा सर्व प्रवर्गापेक्षा मोठा म्हणजे १ लाख ३० हजार नोकऱ्यांचा महाप्रचंड बॅकलॉग आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शासकिय अधिकारी व कर्मचाऱ्यांची जातनिहाय प्रवर्ग ठरवून त्यांच्या संख्येची निश्चित करावी.
ह्या बाबत लेखी निवेदन देण्यात आहे मागील 10 वर्षांपासून केंद्र शासनाने व राज्यस्तरावर कुठल्याही प्रकारची जातनिहाय जनगणना केलेली नाही. सोबतच महाराष्ट्रात ओबीस आरक्षणावर त्रिपल टेस्टच्या निकषावर जातनिहाय जनगणना केलेली नाही. सरकारी नोकरीमध्ये एकूण २७ टक्के आरक्षणाच्या तुलनेत ओबीसी वर्ग हा सरकारी नोकरीत मात्र ९.५ टक्केनेच पदभरती केलेली आहे.
राज्य मागास आयोगाने ओबीसींच्या हिता संदर्भात केलेली कुठलीही आकडेवारी, विद्यार्थ्यांचे वस्तीगृह व स्वतंत्र मंत्रालय स्थापन करुन त्या माध्यमातून ओबीसींच्या प्रत्येक प्रश्नांचे निराकरण करण्याचे अभिवचन तत्कालीन राज्य शासनाने मागील ९ वर्षांपासून ओबीसी बाबत कुठलीही ठोस भुमिका न घेता ओबीसीच्या शासकीय व निमशासकीय शैक्षणिक संस्था अनुदानीत खाजगी संस्था व शासनाचे सार्वजनिक उपक्रम तथा उद्योग या सर्व क्षेत्रात या ओबीसी समुदायांना २७ टक्के आरक्षण लागू असून सुद्धा त्यावर कुठल्याही प्रकारची राज्य सरकारने व केंद्र सरकारने अमलबजावणी केलेली नाही. तरी या निवेदनाच्या माध्यमातून आपण ओबीसी जातनिहाय जनगणना करुन ओबीसीची टक्केवारी निश्चित करावी व ओबीसींच्या वाट्याला येणाऱ्या टक्केवारी नुसार सरसकट यावर अमलबजावणी करावी असे निवेदन देताना 
प्रविण खानझोडे विकेश पानघाटे अजय धोबे ऍड रुपेश ठाकरें सुधीर खांडळकर व इतरही प्रतिनिधी उपस्थित होते.

शि.प्र.मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मा.गांधी व लालबहादूर शास्ञी जयंती संपन्न

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : येथील शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्ञी जयंती संपन्न झाली. या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.क्षीरसागर सर व उप मुख्याध्यापक मा. तामगाडगे सर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करुन माल्यापर्ण करण्यात आले. या वेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित हाेते.

ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती संपन्न


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : आज सोमवार दि. २ ऑक्टोबर २०२३ रोजी ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. त्याचबरोबर स्वच्छता अभियान कार्यक्रम देखील राबविण्यात आला. वैद्यकीय अधीक्षक साहेब डॉ. सुभाष इंगळे यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी रुग्णालयातील इन्चार्ज सिस्टर निता कोवे, डॉ. जवादे मॅडम, डॉ. नागभीडकर सर, डॉ. अश्विन सर, डॉ. राजेश सर, खामनकर सर, तावडे सर, कल्याणकर सर, रामटेके सर, जयश्री इंगोले, प्रणाली राऊत, भाग्यश्री सवाई, रेवती गोचडे, नेहा मेंगेवार, प्रीती कुळसंगे, कायसी साखरे, योगिता कुकुर्डे, पूजा सौदे, संगीता वैद्य, माधुरी ब्राह्मणे, सुरेश लिहितकर, सागर चिंडाले, रंजीत मडावी, संतोष सारवान, राजकिरण राठोड, अनंता पाचपोहर, मनोज चिंचुलकर, यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हिंगोली जिल्ह्यातील धरणग्रस्तांच्या आर्थिक मागण्या पूर्ण करा,नाही तर रस्त्यावर उतरून लढा देणार - अॅड. सचिन नाईक


सह्याद्री चौफेर | नंदकुमार मस्के 

महागांव : हिंगोली जिल्हयातील ईसापुर, सिध्देश्वर, येलदरी धरणग्रस्तांची राष्ट्रीय युवा नेते धरणग्रस्त-विस्थापितांच्या समस्यांचे अभ्यासक ॲड. सचिन नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. 2 ऑक्टो 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नाईकनगर हिंगोली येथे भव्य धरणग्रस्त हक्क परिषद पार पडली. यावेळी तिन्ही प्रकल्पातील १० हजार बाधित धरणग्रस्त उपस्थित होते.

ॲड. सचिन नाईक म्हणाले ईसापुर, सिध्देश्वर, येलदरी
धरणग्रस्तांना मागील 40 वर्षापासून आर्थिक-सामाजिक- शैक्षणिक-सांस्कृतिक न्यायापासून वंचित ठेवले आहे. धरणग्रस्तांची वर्तमान परिस्थिती जाहिर करून लेखी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावा, अन्यथा सरकार विरुद्ध रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल.

यावेळी माजी आमदार रामरावजी वडकुते, माजी आमदार डॉ. संतोष टारफे, धरणग्रस्त विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवि शिंदे, दिपकराव वडकुते, माजी जि.प. उपाध्यक्ष सद्वाराव मोहट, साहेबराव मस्के, बाबुराव शिंदे पाटील, शिवप्रसाद मस्के, पंकज हाडबे, डॉ. रमेश मस्के, बाजीराव मरक, संजय राठोड, राजु थिटे, भगवान पावरे, डॉ. सतीश पाचपुते, वामनराव पोळे, भारकरराव बेंगाळ, पंजाबराव वडकुते, विनोद मस्के. सचिन पोले, प्रा. गजानन हाके, आकाश कारगुडे, अ‍ॅड. विजय राऊत, एकनाथ हराळ, यश कोकरे, शरद पोले, रविद्र गडदे, प्रकाशराव पोले, विकास राहुल मस्के, शुभम बियाणी, भास्करराव पोले, राम जपते, विजयराव नाईक, देवानंद चंद्रवंशी, कचरु बुरकुले, सुरज वडकुते, पंढरीनाथ ढाले, शिवाजी ढाले, विनोद जैस्वाल, महेंद्र मस्के, विलासराव मस्के, वसंतराव मस्के, आनंदराव मस्के, विशवाबर सुकळकर, गजानन मस्के, धुपतरा मस्के, सह विदर्भातुन महागाव पुसद तालुक्यातून शेकडो धरणग्रस्त व मराठवाड्यातुन हादगाव, कळमनुरी, औढा, सेनगाव, जिंतुर हिंगोली येथे बरेच धरणग्रस्त आदी उपस्थित होते.