वणीत "नागपूर कराराची होळी"

सह्याद्री चौफेर : राजू डावे 

वणी : विदर्भ राज्य आंदोलन समिती वणी, मारेगाव, झरी उपविभागीय क्षेत्राच्या च्या वतिने, विदर्भावर अन्याय करणा-या नागपूर कराराची छ.शिवाजी महाराज चौक, वणी येथे होळी करण्यात आली.२८सप्टें.१९५३ साली नागपूर करार करुन,प.महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांनी विदर्भाला महाराष्ट्रात सामिल करुन,१ मे १९६० साली,विदर्भासह महाराष्ट्र राज्याची निर्मिती केली.एकूण ११ कलमी असलेल्या या करारात काही महत्वपूर्ण तरतूदी करण्यात आल्यात की,त्यामूळे विदर्भाचा सर्वांगिन विकास होईल,त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात निर्माण होणा-या सरकारी नोक-या व इतर सुविधांमध्ये विदर्भाच्या जनतेला लोकसंख्येच्या आधारावर २३ टक्के वाटा मिळेल.असे अपेक्षित होते,परंतू विदर्भाला पाने पुसण्यात आलीत. सर्वच क्षेत्रात अनुशेष निर्माण झाला.या करारामूळे विदर्भाची फसगत करण्यात आली, त्यामूळे या कराराची होळी करण्यात आली. आता आम्हाला महाराष्ट्रात अजिबात राहायचे नाही,त्यासाठी आम्हाला आमचे विदर्भ राज्यच हवे.
      
राज्य निर्मितीसाठी आवश्यक असणा-या सर्व सुविधा विदर्भात असतांना,विदर्भाचे राज्य नाही. विजनिर्मिती,जलजंगल,खनिजे,सुपिक जमिन हे सर्व असतांना येथल्या तरुणाच्या हाताला काम नाही,त्यामूळे नक्सलवाद, बेरोजगारी,कुपोषण,शेतकरी आत्महत्या,प्रदुषन अनुशेष व इतरही समस्या निर्माण झाल्या.त्यामूळे विदर्भावर अन्याय करणा-या या नागपूर कराराची होळी करण्यात आली, यावेळी,प्रा.पुरुषोत्तम पाटील,रफिक रंगरेज,राहुल खारकर,प्रा.बाळासाहेब राजुरकर,मुख्या.नामदेवराव जेनेकर,संजय चिंचोलकर,संजय खाडे,राजू पिंपलकर,प्रविण खानझोडे,एड.रुपेश ठाकरे,अमित उपाध्ये,प्रमोद खुरसने,धीरज भोयर,अलकाताई मोवाडे,निलिमाताई काळे,अनिल गोवारदिपे,राकेश वराटे,देवराव पा.धांडे,दशरथ पाटील,होमदेव कनाके,देवा बोबडे, रामदास पा.पखाले,प्रभाकर उईके,मारोती मोवाडे,भाऊराव लखमापूरे,विठ्ठल हेकाडे,व्हि.बि.टोंगे यासह अनेक विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते.
       
समितीच्या वतीने३० सप्टे.२०२३ रोजी स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना स्मरण करुन आष्टी-आर्वि-तळेगाव-कौंडण्यपूर अशी पदयात्रा करुन, २ऑक्टो.२०२३ला, दु.१ वा."विदर्भ संकल्प महिला मेळावा"आयोजित करण्यात आलेला आहे,तरी जिल्ह्यातील कार्यकर्ते व विदर्भप्रेमी जनतेने जास्तीत जास्त संख्येने मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा.पुरुषोत्तम पाटील (यवतमाळ जिल्हाध्यक्ष),राहुल खारकर(विदर्भ सचिव), राजू पिंपळकर,(यवतमाळ जिल्हा समन्वय) प्रा बाळासाहेब राजूरकर,निलिमाताई काळे,अलकाताई मोवाडे,कलावती क्षिरसागर आदीनी केले.

भगतसिंग यांच्या विचारांची गरज...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

भारतामध्ये जालियनवाला बाग हत्याकांड नंतर बारा वर्षाचा एक मुलगा, खेळण्या आणि पळण्याच्या वयात जालियनवाला बागेत जाऊन हुतात्मा वंदन करतो. हाच मुलगा वयाच्या 17 व्या वर्षी बलवंत नावाने एका प्रेस मध्ये अन्यायाविरुद्ध लेख लिहीत असतो. आई जेव्हा याच्या लग्नाचा हट्ट धरते, तेव्हा आईला उत्तर देतो. 'माझे जीवन मी उच्च आदर्शासाठी समर्पित केले आहे. पारतंत्र्य भारतामध्ये माझे लग्न झाले, तर मृत्यू हीच माझी विधवा असेल' तेच भगतसिंग वयाच्या 23 व्या वर्षी देशाला स्वातंत्र्य मिळावे, समाजवादी व्यवस्था निर्माण व्हावी हे स्वप्न उराशी घेऊन आपल्या प्राणाचे बलिदान दिले. कुठून आली ही ताकद? काय विचार होते भगत सिंग यांचे ? कोणती व्यवस्था उभी करायची होती ? असे अनेक प्रश्न आजही आपल्याला पडतात.

आपल्या प्राणाचे बलिदान देऊन कित्येक क्रांतीकारकांनी भारताची ही भूमी पावन केली. त्याचा एक मोठा इतिहास आहे. त्या गौरवशाली इतिहासाची जाण भगतसिंग यांना होती. अन्याय आणि शोषणाविरुद्ध लढणाऱ्या क्रांतिकारकाचे विचार भगतसिंग सोबत होते. भगतसिंग सांगतात "आम्ही गुरुगोविंद सिंग, शिवाजी महाराज, रियाजखान, गैरीबाल्डी, केमाल पाशा, वॉशिंग्टन, लाफहायते, लेनिन आम्ही यांच्यापासून आदर्श घेऊन त्यांच्या पाऊलखुणांवर पाऊल ठेवित लढत आहोत. यावरून आपल्याला दिसेल की भगतसिंग यांना अन्याय व शोषणाविरुद्ध लढण्याची ताकद या विचारातून मिळत होती .आज भगतसिंग यांचे बलिदान व शौर्य याला अनन्य साधारण महत्त्व आहे तरी त्यांची महानता ही त्यांच्या आदर्शवादी विचारत दडलेले दिसते .त्यांना अपेक्षित असणाऱ्या समाज व्यवस्थेत दिसते.या आदर्श उद्दिष्ट साठी भगतसिंग याची बलिदान दिले. भगतसिंग लिहितात,"देशात अमुलाग्र परिवर्तनाची गरज आहे .ज्यांना ही गोष्ट उमजली आहे. त्यांचे कर्तव्य आहे. त्यांनी समाजवादी सिद्धांतावर समाजाची पुनर्रचना करावी,जो पर्यंत असे केले जाणार नाही. तो पर्यंत माणसाचे माणसाकडून होणारे शोषण थांबले जाणार नाही व मानवतेची यातनेतून सुटका होणार नाही. माझ्या रक्ताच्या थेंबातून युवक पेटून उठेल त्यातून राजकीय क्रांती होईल समाजवादी आधारावर समाजाची पुनर्रचना होईल." ज्यामध्ये श्रीमंती-गरिबीचा फरक राहणार नाही. विषमता राहणार नाही. शोषण विरहित समाज निर्माण करता येईल . स्वातंत्र्यासोबतच भगतसिंग यांना या पद्धतीने समाजाची उभारणी करायची होती. आणि त्यांना युवकांकडून अपेक्षा आहे. भगतसिंग युवकांच्या संदर्भाने लिहितात. ते आजही किती प्रासंगिक आहे बघा. "नवयुवक देशाची धुरा सांभाळणार आहेत. त्यांची बुद्धी पंगू बनवण्याचे प्रयत्न चालू आहे .भविष्यात त्याचे काय परिणाम होतील. आपण समजून घेणे गरजेचे, विद्यार्थ्यांचे मुख्य काम शिक्षण घेणे आहे. पण देशाच्या सद्यस्थितीचे ज्ञान आणि ती सुधारण्याचे उपाय विचार करण्याची क्षमता विकसित करण्याचा प्रशिक्षणात समावेश असू नये का ? स्वागत करणे, हार तुरे देणे, भाषण ऐकणे म्हणजे व्यवहारिक राजकारण काय? तर मग आपल्यावर जो अन्याय करत आहे.व्हाईसरॉय व कमिशन यांचे स्वागत करणाऱ्याला काय म्हणायचे . राजकारणाची ही दुसरी बाजू नाही का? सरकार आणि देशाच्या व्यवस्थेची निगडित कोणती गोष्ट राजकारणाच्या आखाड्यातील गोष्ट मानली जात असेल राजकारणाची दुसरी बाजू नाही का ? विद्यार्थ्यांना जन्मापासून खुश-मस्करी करण्याचा धडा शिकवला जायला पाहिजे का ? आज भारताला देश सेवकांची गरज आहे .जे तन मन धनाने देशासाठी लढतील. युवक हाच देशाचे परिस्थिती बदलू शकतो व उद्याचे भविष्य घडवू शकतो.

"जगाच्या इतिहासाचे पाणी उघडून पहा युवकांच्या रक्ताने लिहिलेले संदेश तुम्हाला पानो पाणी दिसेल, जगाच्या क्रांत्या व परिवर्तनाची वर्णने बघा त्यात तुम्हाला असेच युवक भेटतील" आजची परिस्थिती काय ? भगतसिंगाला अपेक्षित असणारा युवक दिसतो का ? आज आपल्याला व्हाट्सअप यूनिवर्सिटी वरून नॉलेज घेत त्याचा प्रचार करताना दिसतो. देशाचा व आपलं हीत काय, आपली समस्या कोणती हे न ओळखता भिडच्या प्रचाराला बळी पडत,बिन पगारी फुल अधिकारी म्हणून कार्य करताना दिसतो. राजकारणाच्या नावावर प्रस्थापितांना शुभेच्छा देताना व स्वागत करताना आढळतो आणि ज्यांना वैचारिक जाण आहे ते आपल्या आयुष्याच्या चौकटीत खुश आहे. यांचा समाज आणि देशाशी संबंध नाही. ही आज वास्तविकता आहे, तरी सुद्धा आजही भगतसिंगांचे विचार मांडणारे युवक जिवंत आहेत. जे भगतसिंगाच्या स्वप्नातील समाज निर्माण करण्यासाठी झटत आहेत. अन्याय विरुद्ध लढत आहेत. स्वतः आणि समाजाची जाण जिवंत ठेवून कोणत्याही स्तरावर असतील तरी आपल्या पद्धतीने आपापल्या क्षेत्रात समाज हिताच्या दृष्टीने योगदान देत आहेत. म्हणून हा समाज आज जिवंत आहेत. 
भगतसिंह यांच्या स्वप्नातील समाज व्यवस्था (समाजवादी) तर दूरच उलट बेरोजगारी गगनाला भिडली. महागाई वाढली, युवा बेरोजगार आहे . शेतकरी कामगार त्रस्त झाले. मोजक्या लोकांच्या हातात अमाप संपत्ती जमा होवून राहिली .अमीरी आणि गरिबीची दरी वाढली . प्रत्येक सरकारी क्षेत्रात खाजगीकरण मोठ्या प्रमाणावर चालू झाले. शोषण व्यवस्थेचे खांब दिवसेंदिवस मजबूत होऊन राहिले. यामध्ये सामान्यांना अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व शिक्षण मिळणं कठीण झालाय. भगतसिंग यांच्या समाजवादी व्यवस्थेच्या विरोधात भांडवली व्यवस्था उभी ठाकली. आता बदल कसा शक्य आहे ? कोण पुढे येणार ? जेव्हा जेव्हा विदारक परिस्थिती आली तेव्हा युवकांनी च पुढे पाऊल टाकीत समाज परिवर्तन केल्याचे उदारणे आहे. म्हणून भगतसिंग यांना युवकांकडून अपेक्षा आहे संविधानाच्या चौकटीत राहून भगतसिंग यांच्या स्वप्नातील समाजवादी व्यवस्था आणण्यासाठी संघर्ष करणे आता अपरिहार्य झाले. समाज परिवर्तनाचा समान कार्यक्रम ठरून संघर्ष करावा लागेल.

भगतसिंग याच धगधगत जीवन आम्हालाही लढण्याची ताकद देऊन जात. समाजामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्य करीत असताना, अचानक आपल्याला निराशा आली किंवा आपला मार्ग भटकत आहे. लढायचं कशासाठी ? अशी एक वेळ येते तेव्हा भगतसिंगाचे जीवन लढण्याची आणि त्यागाची प्रेरणा देत असते. भगतसिंग यांचे विचार आणि प्रेरणा सदैव आपल्या आयुष्यात चिरकाल टिकून राहावेत .

भगतसिंग तू झिंदा है, हर एक लहू के कतरे मे....
याद है भगता तेरी आंधी, आग लगी है सिनेमे...

 - संदीप गोहोकार
मो: 7350006276

कामाची बातमी! 100 व 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर होणार व्यवहारातून बाद...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

प्रतिज्ञापत्र, खरेदी-विक्री करार यासारख्या कायदेशीर गोष्टींसाठी वापरला जाणारे 100 व 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर आता व्यवहारातून बाद होणार आहेत. त्याऐवजी तेवढ्याच किमतीचे स्टॅम्प पेपर राष्ट्रीय बँकेतून फ्रॅकिंग करून मिळणार आहेत. त्यामुळे गैरव्यवहाराला आळा बसणार असून, सर्वसामान्यांना स्टॅम्प पेपरसाठी तासन्तास रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. याबाबत महसूल विभागाने प्रस्ताव तयार केला असून, तो लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.

भारतात स्टॅम्प पेपरचे दोन प्रकार आहेत. न्यायिक स्टॅम्प पेपर आणि गैरन्यायिक स्टॅम्प पेपर. कायदेशीर किंवा आर्थिक दस्तऐवजांच्या अंमलबजावणीसाठी स्टॅम्प पेपर वापरला जातो. ते अधिकृत मुद्रांक विक्रेते किंवा सरकार मान्यताप्राप्त बँकांमध्ये मिळतात. स्टॅम्प पेपरवर मुद्रांक शुल्क भरले जाते. स्टॅम्प पेपरचे मूल्य व्यवहाराच्या मूल्यावर अवलंबून असते. त्यानुसार योग्य स्टॅम्प पेपर वापरला जातो.

तेलगीने बनावट स्टॅम्प पेपर तयार करून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला होता. त्यातून धडा घेत महसूल विभागाच्या अखत्यारित येणार्‍या मुद्रांक व शुल्क नोंदणी विभागाने 100 व 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर कायदेशीर व्यवहारातून रद्द करण्यासाठी पाऊल उचलले आहे.

प्रिंटिंग, सुरक्षा, वाहतुकीचा खर्च वाचणार

नाशिक येथे सरकारी प्रिंटिंग प्रेसमध्ये स्टॅम्प पेपरची छपाई केली जाते. परंतु, 100 व 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर कायदेशीर व्यवहारातून बाद केल्यानंतर छपाईचा खर्च, कागदाच्या खर्चाबरोबरच सुरक्षेवरील ताण कमी होणार असून, वाहतुकीचा खर्चदेखील वाचणार आहे. विशेष म्हणजे, बँकेतील फ्रॅकिंग सुविधेमुळे बोगस स्टॅम्प पेपरला आळा बसणार आहे.


दुकानात पाट्या मराठीत लावा ; सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे यांच्याकडून स्वागत

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : सर्वोच्च न्यायालयाने मुंबईसह राज्यातील व्यापाऱ्यांना दोन महिन्यांत दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले. या आदेशाचे वणी विधानसभा क्षेत्रात मनसैनिकांच्या वतीने जल्लोष करण्यात आला. त्या आदेशाचे स्वागत व कोर्टाचे आभार मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे यांनी प्रसिद्धी पत्रकातून मानले आहे.
गेल्या वर्षी राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्व दुकानांवर मराठी भाषेत पाट्या लावण्याचे आदेश जारी केले होते. त्यास फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने न्यायालयात आव्हान दिले होते. दुकानांच्या पाट्या मराठी भाषेत असाव्यात हा आदेश अतार्किक आहे. राज्य सरकार भाषेच्या बाबत दुकानदारांवर मोठ्या आर्थिक भुर्दडाची सक्ती लादू शकत नाही, असा युक्तिवाद याचिकादारांनी केला होता.
या निकालाविरुद्ध व्यापारी संघटनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर सुनावणी करताना मराठी पाट्या लावण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देताना सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी डिसेंबरपर्यंत स्थगित केली. आता दसरा, दिवाळीपूर्वी दुकानांवर मराठी नामोल्लेख असलेल्या पाट्या लावून व्यावसायिक उलाढाल वाढविण्याची हीच वेळ आहे, असा सल्ला देत सुप्रीम कोर्टाने व्यापाऱ्यांना मराठी पाट्या लावण्याचा सोमवारी सुनावणीवेळी न्यायालयाने व्यापाऱ्यांना फटकारत आदेश दिल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करून आभार व्यक्त केले. सर्व व्यापाऱ्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे पालन करून सहकार्य करावे असे ते 'सह्याद्री चौफेर' ला बोलताना सांगितले.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या ऐतिहासिक लढ्याला यश मिळाल्याने राज्यासह यवतमाळ जिल्ह्यात मनसैनिकाकडून ठिकठिकाणी आनंद साजरा होत आहे.

अंमलदार अनुराधा वासाडेंच्या समयसूचकतेने आगीवर नियंत्रण

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : साई मंदिर चौकात एका चायनीज स्टॉल ला अचानक आग लागली. त्या स्टॉल ला लागलेले अन्य दुकान आगीच्या कवेत येऊ नये, याठीकाणी कर्तव्यावर असलेल्या स्वतः प्रयत्न करणाऱ्या वाहतूक अंमलदार यांच्या समयसूचकतेने पुढील अनर्थ टळला. क्षणाचाही विलंब न लावता अगीवर नियंत्रण मिळविले. ही घटना दिं.26 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.

शहरातील साई चौकात वाहतूक नियंत्रण उपशाखा वणी येथील वाहतूक नियमन करणे करिता कर्तव्यावर असलेल्या वाहतूक अंमलदार मपोशी अनुराधा वासाडे (ब.नं. 477) ह्या आपले कर्तव्य बजावत होत्या, अशातच येथील एका चायनीजच्या स्टॉलला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. सदर स्टॉल च्या आजूबाजूला 2 बँक, साई मंदिर, हॉटेल, जैताई मंदिर व इतर छोटे-मोठे भरपूर दुकाने व गजबजला परिसर असल्याने सदर आगीने रौद्र रूप धारण केले असते तर, आजूबाजूच्या दुकानाची हानी होऊन मोठे नुकसान झाले असते. अंमलदार अनुराधा वासाडे ह्यानी तत्काळ धैर्य दाखवून बाजूलाच असलेल्या स्टेट बँकेतील उपलब्ध अग्निशामक यंत्रच्या सहाय्याने त्या आगीवर वेळीच नियंत्रण मिळविले.  

दरम्यान,स्टॉल दुकानदाराच्या हाताला किरकोळ इजा झाली. यात, स्टॉल संपूर्ण जळाले. परंतु मपोशी अनुराधा वासाडे यांनी आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला. तीने दाखवलेल्या समयसूचकता व धैर्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.