कु समीक्षा देऊळकर यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानपत्र,सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : सूर्यान्स साहित्य व सांस्कृतिक मंच, यांच्या विद्यमाने वैदर्भीय कवी संमेलनाचे आयोजन रविवार दि.3 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता, सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथे करण्यात आले होते. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ विद्याधर बनसोड, चंद्रपूर हे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जयश्री कोटगिरवार, वर्धा,नीता कोंतमवार,चंद्रपूर, नरेशकुमार बोरीकर, चंद्रपूर, संगीता बढे, वर्धा, प्रवीण आडेकर, भद्रावती यांची उपस्थिती उल्लेखनीय आहे. सूर्यान्स साहित्य व सांस्कृतिक मंचचे अध्यक्ष इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली या कवीसंमेलनाचे सूत्रसंचालन चंद्रपूरचे स्वप्नील मेश्राम व वरोरा येथील आरती रोडे यांनी केले.
सूर्यान्स साहित्य व सांस्कृतिक मंच, द्वारे आयोजित "कविता पावसाच्या-पाऊस कवितांचा" या शीर्षकांअंतर्गत संपन्न झालेल्या निमंत्रित कविंच्या कविसंमेलनात प्रमुख अतिथी तथा निमंत्रित कवी म्हणून सहभाग घेतल्याबद्दल कु समीक्षा देऊळकर (ता. मारेगाव) यांना 'सन्मानपत्र' प्रदान करण्यात आले. त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. व पुढील भविष्यकालीन वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात सहभागी कवी रेवानंद मेश्राम, किरण चौधरी, प्रवीण तुराणकर, दिलीप पाटील, विजय वाटेकर, अरूण झगडकर, निलेश तुरके, दीपक शिव, गीता रायपुरे, गजानन माद्यस्वार, किशोर जामदार, सीमा भसारकर, शीतल कर्णेवार, ललित बोरकर, धनंजय साळवे, अरुण घोरपडे, वैशाली रामटेके, जयंत साळवे, अनिल पिट्टलवार, तनुजा बोढाले, रमेश भोयर, अर्जुमन शेख, मंजुषा दरवरे, कविता बेदरकार, सुरेश गारघाटे, आशिप घुमे, शिरीष दडमल, यांनी विशेष भाग घेतला.

नैसर्गिक विजेचा वाढला कहर, आणखी एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

वणी : तालुक्यात नैसर्गिक विजेचा कहर चांगलाच वाढल्याने आणखीन एका युवा शेतकऱ्याचा विज पडून मृत्यू झाल्याची घटना आज सोमवार ला दुपारी 3 वाजता च्या दरम्यान घडली. त्याच्या अशा आकस्मित निधनाने दहेगाव (घोंसा) परिसरात शोककळा पसरली आहे.
मृतक मनोज पांडुरंग गोहोकार (अंदाजे वय 33) रा.दहेगाव (घों.) असे वीज पडून मरण पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. आज दुपार पासून वरुण राजाने चिडचिड करित आपला रंग बदलला आणि मेघ गर्जने सह पाऊस धो-धो बरसु लागला. दरम्यान, मौजा गोदाळा शेत शिवारातील शेतात मनोज हा काम करित असताना जोरदार पाऊस सुरु झाला.  पावसामुळे तो एका झोपडीत आश्रयसाठी थांबला. अशातच अचानक मेघ गर्जना झाली आणि वीज पडली, यात त्याला नैसर्गिक विजेचा झटका लागून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
मनोज हा अल्पभूदारक शेतकरी असून त्याची तीन एकर गोदाळा शिवारात शेत आहे. त्याच्या पाठीमागे पत्नी, आई वडील, एक मुलगा, एक मुलगी, असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
विशेष उल्लेखनीय की, वणी तालुक्यातील बोरगाव (ता.2) येथील एका शेतमजुराचा घरा कडे परतत असताना वीज पडली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज गोदाळा शेत शिवारात वीज पडून आणखी एका युवा शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तसेच आज सोमवार ला दुपार च्या सुमारास मारेगाव तालुक्यातील गोरज येथील महिला व शिवणी येथील एका शेतकऱ्याचा बैल ठार झाल्याचे वृत्त आहे. ह्या संपूर्ण घटना बघता नैसर्गिक विजेचा चांगलाच कहर वाढल्याने शेत मजुरामध्ये शेतात काम कसं करायचे असा प्रश्न पडला असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

एकीकडे वीज पडून विवाहित महिला ठार तर, दुसरीकडे वीज पडून शेतकऱ्याचा बैल दगावला!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : जवळपास महिन्याभरापासून वरुण राजाने ब्रेक घेतल्यानंतर या सप्टेंबर मध्ये म्हणजे काल रविवारपासून पावसाने धुवाधार बॅटिंग सुरु केली. सर्वत्र मेघ गर्जने सह विजेचा कडकडाट, त्यामुळे आजचा दिवस तालुक्यासाठी मोठा घातक वेदनादायी ठरला आहे. 

आज सोमवारला दुपारी तालुक्यातील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली असताना गोरज परिसरात देखील मेघगर्जनेसह पाऊस आला, काही क्षणाकरिता पावसाने उसंत घेतल्याने परिसरातील शेतकरी शेतमजूर घराच्या वाटेनं निघाले. अशातच गोरज येथील पती व पत्नी आणि शेतमजूरासह घराकडे बैलबंडीने जात असताना अचानक गोरज फाट्यावर वीज पडली. यात नैसर्गिक विजेचा शॉक लागून विवाहित महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 
सुवर्णा संजय कांबळे (35) रा. गोरज असे मृतक महिलेचे नाव आहे. दरम्यान, पती, शेतमजूर आणि बैलबंडीचा एक बैल बेशुद्ध पडले होते, तूर्तास यात पती संजय, मजूर मोहन व एक बैल किरकोळ जखमी झाल्याचे समजते. ही घटना आज दुपारी 2.30 वाजता च्या दरम्यान घडली. 
घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, व मृतदेह तालुक्याच्या ठिकाणी रवाना करण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरु आहे.
तसेच तालुक्यातील दुसरी घटना शिवणी (धोबे) परिसरात आजच दुपार च्या सुमारास मुसळधार पाऊस आला. अशातच विजेचा कडकडाट होताच वीज पडून ऐका शेतकऱ्याचा बैल ठार झाल्याची माहिती आहे. ऐण शेतीच्या हंगामात बैल ठार झाल्याने शेतकरी धनराज धोबे यांचे मोठे नुकसान झाले आहे. सदर दोन्ही घटनेने तालुक्यासह परिसरात हळहळ व्यक्त होत. 

श्री विजयबाबू चोरडिया यांना त्यांच्या वाढदिवसनिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा "



आदरणीय लोकनेते विजयबाबू जी,

भाऊसाहेब, तुमच्या आयुष्यात सर्व चांगला गोष्टी घडोत, भरपूर आनंद आणि सुखदायक आठवणी तुम्हाला मिळोत. आजचा दिवस तुमच्या आयुष्याची नवी सुरूवात ठरो, आदरणीय विजयबाबू चोरडिया,प्रतिष्ठित उद्योगपती तथा सामाजिक कार्यकर्ता व भाजप कार्यकारिणी सदस्य भाऊसाहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!

शुभेच्छुक : श्री उमेश पोद्दार 
सामाजिक कार्यकर्ते तथा सचिव श्री कृष्ण जन्माष्टमी उत्सव समिती, वणी 

आज लोकनेते विजयबाबू चोरडिया यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वणीकरासाठी भजन संध्याची पर्वणी...!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : आज सोमवार ४ सप्टेंबर ला "मुझे चढ गया भगवा रंग" फेम प्रसिद्ध भजन गायिका शहनाज अख्तर यांचा वणीमध्ये पहिल्यांदाच हिंदी मराठी सदाबहार भक्ती गीतांचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ६ ते रात्री १० पर्यंत भजनसंध्याचे आयोजन करण्यात आले आहे. गायिका शहनाज अख्तर श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणार आहे. या निमित्ताने त्यांच्या गाजलेल्या गाणी त्यांच्याच सुमधुर आवाजातून प्रेक्षकांना थेट ऐकायला मिळणार असल्यामुळे साहजिक वणीकरांचे विशेषतः भजनप्रेमींचे पाय भक्ती रसात थिरकणार आहे.
शहरातील प्रतिष्ठित व्यापारी विजय चोरडिया यांच्या वाढदिवस निमित्ताने 31 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर पर्यंत सतत सहा दिवस सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यात मारेगाव, कायर वणी येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जवळपास दोन हजाराच्या वर वणी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी लाभ घेतला आहे. आज रविवार (ता.3) सप्टेंबर ला अमृत भवन येथे लहान मुलांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आले होते. यात प्रदर्शनी व आनंदमेळा आयोजन करण्यात आले. दुपारी ३ वाजता पासून तर सायं. ६ वाजेपर्यंत असंख्य बालगोपाल सहभागी झाले होते.
वणी उपविभागीय क्षेत्रात गेल्या बारा वर्षांपासून सामाजिक कार्याचा वारसा जपत विजयबाबू चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. याच निमित्ताने श्री कृष्ण जन्माष्टमी उत्सव समिती व विजय चोरडिया मित्र परिवाराच्या विद्यमाने मा.विजयबाबू चोरडिया भाजपा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध भजन गायिका शहनाज अख्तर यांच्या सुमधुर भक्ती गीतांचा कार्यक्रम आज सोमवारी सायंकाळी येथील शासकीय मैदान, पाण्याच्या टाकी जवळ आयोजन करण्यात आले आहे. या भक्ती रसात वणी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती दर्शवून भजन संध्याचे आनंद घ्यावा असे, आवाहन श्री कृष्ण जन्माष्टमी उत्सव समिती, बजरंग दल व विश्वहिंदू परिषद तसेच विजय चोरडिया मित्र परिवार यांनी केले आहे.