कु समीक्षा देऊळकर यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानपत्र,सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : सूर्यान्स साहित्य व सांस्कृतिक मंच, यांच्या विद्यमाने वैदर्भीय कवी संमेलनाचे आयोजन रविवार दि.3 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता, सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथे करण्यात आले होते. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ विद्याधर बनसोड, चंद्रपूर हे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जयश्री कोटगिरवार, वर्धा,नीता कोंतमवार,चंद्रपूर, नरेशकुमार बोरीकर, चंद्रपूर, संगीता बढे, वर्धा, प्रवीण आडेकर, भद्रावती यांची उपस्थिती उल्लेखनीय आहे. सूर्यान्स साहित्य व सांस्कृतिक मंचचे अध्यक्ष इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली या कवीसंमेलनाचे सूत्रसंचालन चंद्रपूरचे स्वप्नील मेश्राम व वरोरा येथील आरती रोडे यांनी केले.
सूर्यान्स साहित्य व सांस्कृतिक मंच, द्वारे आयोजित "कविता पावसाच्या-पाऊस कवितांचा" या शीर्षकांअंतर्गत संपन्न झालेल्या निमंत्रित कविंच्या कविसंमेलनात प्रमुख अतिथी तथा निमंत्रित कवी म्हणून सहभाग घेतल्याबद्दल कु समीक्षा देऊळकर (ता. मारेगाव) यांना 'सन्मानपत्र' प्रदान करण्यात आले. त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. व पुढील भविष्यकालीन वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात सहभागी कवी रेवानंद मेश्राम, किरण चौधरी, प्रवीण तुराणकर, दिलीप पाटील, विजय वाटेकर, अरूण झगडकर, निलेश तुरके, दीपक शिव, गीता रायपुरे, गजानन माद्यस्वार, किशोर जामदार, सीमा भसारकर, शीतल कर्णेवार, ललित बोरकर, धनंजय साळवे, अरुण घोरपडे, वैशाली रामटेके, जयंत साळवे, अनिल पिट्टलवार, तनुजा बोढाले, रमेश भोयर, अर्जुमन शेख, मंजुषा दरवरे, कविता बेदरकार, सुरेश गारघाटे, आशिप घुमे, शिरीष दडमल, यांनी विशेष भाग घेतला.