सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : तालुक्यात नैसर्गिक विजेचा कहर चांगलाच वाढल्याने आणखीन एका युवा शेतकऱ्याचा विज पडून मृत्यू झाल्याची घटना आज सोमवार ला दुपारी 3 वाजता च्या दरम्यान घडली. त्याच्या अशा आकस्मित निधनाने दहेगाव (घोंसा) परिसरात शोककळा पसरली आहे.
मृतक मनोज पांडुरंग गोहोकार (अंदाजे वय 33) रा.दहेगाव (घों.) असे वीज पडून मरण पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. आज दुपार पासून वरुण राजाने चिडचिड करित आपला रंग बदलला आणि मेघ गर्जने सह पाऊस धो-धो बरसु लागला. दरम्यान, मौजा गोदाळा शेत शिवारातील शेतात मनोज हा काम करित असताना जोरदार पाऊस सुरु झाला. पावसामुळे तो एका झोपडीत आश्रयसाठी थांबला. अशातच अचानक मेघ गर्जना झाली आणि वीज पडली, यात त्याला नैसर्गिक विजेचा झटका लागून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
मनोज हा अल्पभूदारक शेतकरी असून त्याची तीन एकर गोदाळा शिवारात शेत आहे. त्याच्या पाठीमागे पत्नी, आई वडील, एक मुलगा, एक मुलगी, असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
विशेष उल्लेखनीय की, वणी तालुक्यातील बोरगाव (ता.2) येथील एका शेतमजुराचा घरा कडे परतत असताना वीज पडली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज गोदाळा शेत शिवारात वीज पडून आणखी एका युवा शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तसेच आज सोमवार ला दुपार च्या सुमारास मारेगाव तालुक्यातील गोरज येथील महिला व शिवणी येथील एका शेतकऱ्याचा बैल ठार झाल्याचे वृत्त आहे. ह्या संपूर्ण घटना बघता नैसर्गिक विजेचा चांगलाच कहर वाढल्याने शेत मजुरामध्ये शेतात काम कसं करायचे असा प्रश्न पडला असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.