सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : जवळपास महिन्याभरापासून वरुण राजाने ब्रेक घेतल्यानंतर या सप्टेंबर मध्ये म्हणजे काल रविवारपासून पावसाने धुवाधार बॅटिंग सुरु केली. सर्वत्र मेघ गर्जने सह विजेचा कडकडाट, त्यामुळे आजचा दिवस तालुक्यासाठी मोठा घातक वेदनादायी ठरला आहे.

आज सोमवारला दुपारी तालुक्यातील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली असताना गोरज परिसरात देखील मेघगर्जनेसह पाऊस आला, काही क्षणाकरिता पावसाने उसंत घेतल्याने परिसरातील शेतकरी शेतमजूर घराच्या वाटेनं निघाले. अशातच गोरज येथील पती व पत्नी आणि शेतमजूरासह घराकडे बैलबंडीने जात असताना अचानक गोरज फाट्यावर वीज पडली. यात नैसर्गिक विजेचा शॉक लागून विवाहित महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
सुवर्णा संजय कांबळे (35) रा. गोरज असे मृतक महिलेचे नाव आहे. दरम्यान, पती, शेतमजूर आणि बैलबंडीचा एक बैल बेशुद्ध पडले होते, तूर्तास यात पती संजय, मजूर मोहन व एक बैल किरकोळ जखमी झाल्याचे समजते. ही घटना आज दुपारी 2.30 वाजता च्या दरम्यान घडली.
घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, व मृतदेह तालुक्याच्या ठिकाणी रवाना करण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरु आहे.
तसेच तालुक्यातील दुसरी घटना शिवणी (धोबे) परिसरात आजच दुपार च्या सुमारास मुसळधार पाऊस आला. अशातच विजेचा कडकडाट होताच वीज पडून ऐका शेतकऱ्याचा बैल ठार झाल्याची माहिती आहे. ऐण शेतीच्या हंगामात बैल ठार झाल्याने शेतकरी धनराज धोबे यांचे मोठे नुकसान झाले आहे. सदर दोन्ही घटनेने तालुक्यासह परिसरात हळहळ व्यक्त होत.