विचार करूया....पवन कुसुंदल यांच्या शब्दात


                     विचार करूया

मानव जन्म का लाभला
याचा विचार करू या
माणुसकीचे खरे नाते
हृदयी आपण भरू या

एक ध्येय साऱ्यांचे
असोत अनेक मार्ग
दूर व्हावे विकार अन्
लाभो सदा सन्मार्ग

काळ पाठी लागला
वेळ ही दवडत आहे
कधी करशील सत्कर्म वेड्या
दुर्गुण का निवडत आहे

प्रत्येक अंधारलेल्या वाटेवर
ज्ञानाचा प्रकाश पडावा
अनुभवातून भेद कळावे
सत्याचा संग घडावा

कर्तव्याला प्राधान्य देऊन
कर्माची जोड मिळावी
अधर्मतेचा नाश करण्या
धर्माची परिभाषा कळावी

आज पुन्हा एकदा नव्याने
अंतरी सद्भाव भरुया
सारे मिळून एकत्व जपूया
देशाचा विचार करू या


राहुल गांधी यांना दिलासा; मारेगाव काँग्रेस कमिटीचा जल्लोष


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मोदी आडनाव बदनामी प्रकरणात शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना दिलासा देत सुरत जिल्हा न्यायालयाने कायम ठेवलेल्या शिक्षेला स्थगिती दिली. हे वृत्त समजताच यवतमाळ जिल्ह्यासह मारेगाव कॉंग्रेस काँग्रेस कमिटी च्या वतीने स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष साजरा केला. पुढेही सत्याचाच विजय होईल, असा विश्वासही काँग्रेस कमिटीच्या वतीने व्यक्त केला आहे.

मोदी आडनाव प्रकरणी मानहाणीच्या प्रकरणी काँग्रेसचे युवा नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने देताच. मारेगाव काँग्रेस कमिटीच्या आशा पल्लवीत झाल्या. सुप्रीम कोर्टाने मानहाणी केस मध्ये राहुल गांधी यांना दिलासा दिला. कोर्टाचे आदेश कळताच काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्या मध्ये देशभर जल्लोष सुरु झाला. मारेगाव येथेही आज रात्री जल्लोष साजरा करण्यात आला. काँग्रेस मध्ये उत्स्फूर्तपणे वातावरण येथील मार्डी चौकात दिसून आले, दरम्यान राहुल गांधी जिंदाबाद म्हणत "राहुल गांधी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं" तथा राहुल गांधी यांचा विजय असो, असे नारे देऊन विजय जल्लोष साजरा करण्यात आला.

या विजयी जल्लोष दरम्यान, तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांनी अखेर सत्याचा विजय झाला आणि पुढेही होईल असे मत व्यक्त केले. यावेळी सभापती गौरी शंकर खुराणा, माजी नगरसेवक महंम्मद खालिद, रंगनाथ स्वामी संचालक उदय रायपुरे, ता. यु. कॉ. अध्यक्ष आकाश बदकी, यु.कॉ.श. अध्यक्ष सय्यद समीर, अ.सेल अध्यक्ष शाहरुख शेख, एनएसयुआय अध्यक्ष समीर कुळमेथे, अनु.जाती ता.अध्यक्ष आकाश भेले, रवि पोटे, सतीश कल्लेवार, सागर लोणारे, कार्तिक पुनवटकर, अर्शद सय्यद, सागर मडावी, निलेश उईके, अविनाश मेश्राम, अंकुश माफूर, मो.शायान, नवाजीश कुरेशी, गोपाल चिडे, व गीतेश तामगाडगे यांचे सह मारेगाव तालुक्यातील काँग्रेस कमिटी चे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. 



पती नरेंद्र बुजाडेंचा आरोप, डॉ लोढा यांनी केले त्या आरोपाचे खंडण

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : शहरातील लोढा मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ महेंद्र लोढा यांच्या निष्काळजी व हलगर्जीपणा मुळे अपंग नवजात बाळ जन्माला आले. सदर बाळ कधी दगावेल याची शक्यता नाही अशी तक्रार समोर आली आहे. तसेच नवजात बाळाचा चित्रफीत सह डॉ. लोढा यांचा नामोल्लेख करून, "छोट्याश्या बाळाचा जीव धोक्यात अडकला" असे सोशल मिडियावर पोस्ट झपाट्याने व्हायरल होत आहे. ही बाब अतिशय निंदनीय आहे असेही भावनिक अनेकांकाडून बोलल्या जात आहे. 

मात्र,डॉ.लोढा यांनी 4 ऑगष्ट रोजी येथील शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्र परिषदेत या संपूर्ण प्रकरणाबाबत खुलासा केला. त्यांचे वर केलेल्या आरोपाचे त्यांनी खंडण केले तसेच सदर घटनेने व्यथित झालेले वणी ग्रामीण रुग्णालयाच्या मानवसेवी स्त्रीरोग चिकित्सक या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती डॉ लोढा यांनी परिषदेत जाहीर केली.
नरेंद्र बुजाडे याचा आरोप काय 

शहरातील भगतसिंग चौक येथील नरेंद्र शंकर बुजाडे यांची पत्नी भाग्यश्री बुजाडे ही गर्भवती असल्याने ती ग्रामीण रुग्णालयात वेळोवेळी तपासणी करिता जायच्या. ती 3 महिन्यांची गर्भवती असतांना ग्रामीण रुग्णालयात मानवसेवी स्त्री रोग चिकित्सक म्हणून कर्तव्य बजाविणाऱ्या डॉ. महेंद्र लोढा यांनी नरेंद्र बुजाडे यांना पत्नीची सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या सल्ल्यानुसार नरेंद्र बुजाडे यांनी लोढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 3 व 6 महिन्याच्या अंतरात पत्नीची सोनोग्राफी करून घेतली. दोन्ही सोनोग्राफीमध्ये डॉ. लोढा यांनी बाळ सुदृढ असल्याचे सांगितले. परंतु महिलेच्या गर्भधारणेला 9 महिने पूर्ण होण्याआधीच महिलेची प्रसूती झाली. जन्माला आलेले बाळही अपंग आले होते. आता जन्मताच बळावर शस्त्रक्रिया करण्याचा प्रसंग बुजाडे यांचेवर ओढावला. मात्र, बाळ सुदृढ व स्वस्थ असल्याचे डॉ. लोढा यांनी निदान दिल्यानंतरही बाळ विकलांग जन्माला आल्याने बुजाडे दांपत्य कमालीचे व्यथित झाले. त्यांनी डॉ. लोढा यांना तुमच्या सल्ल्यानुसार उपचार घेतल्यानंतरही बाळ विकलांग जन्माला आल्याचे सांगताच,डॉ. लोढा त्यांच्यावरच संतापले व त्यांना अपमानित केल्याचा आरोप नरेंद्र बुजाडे यांनी पत्र परिषदेतून केला. डॉ. लोढा यांच्या निष्काळजी व हलगर्जीपणामुळेच नवजात बाळ विकलांग जन्माला आले असून त्यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी पत्र परिषदेतून केली आहे. याबाबत त्यांनी पोलिस स्टेशन व संबंधित विभागांकडेही तक्रारी केल्या असल्याचे यावेळी सांगितले.
डॉ.महेंन्द्र लोढा यांनी केले आरोपाचे खंडण 

लोढा हॉस्पिटल मध्ये साधी लेवल (1) ची सोनोग्राफी मशीन आहे. महिलेनी ज्या दिवशी सोनोग्राफी केली तेंव्हा गर्भाशयातील बाळ 22 आठवड्याचे होते. लेव्हल 1 च्या मशीन मध्ये पुरेशी माहिती दिली जात नाही. त्यासाठी मी सदर पेशंट ला 3 डी सोनोग्राफी केंद्रांवर जाऊन सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. त्या बाबतचे रेफर लेटर महिलेला दिले. मात्र, त्या महिलेने ती सोनोग्राफी केली नाही. सदर महिला त्यानंतर तपासणी साठी आली नाही. त्यांनी तपासणी न केल्याने नवजात बाळाच्या प्रकृती बाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.

जर सदर महिलेने सर्व तपासण्या वेळोवेळी केल्या असत्या तर नवजात बाळाच्या प्रकृतीबाबत आधीच निदान झाले असते. एक डॉक्टर म्हणून यात कोणताही निष्काळजीपणा आला नाही. असे सर्व आरोपाचे खंडण करित डॉ. लोढा यांनी घेतलेल्या पत्र परिषदेत खुलासा केला आहे. 


तिरझडा येथे उत्स्फूर्तपणे वृक्षारोपण

सह्याद्री चौफेर | रुस्तम शेख 

कळंब : (BCI) उत्तम कापूस निर्मिती प्रकल्प व स्पेक्ट्रम कॉटफायबर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि तिरझडा गावाकऱ्यांच्या पुढाकाराने तालुक्यात तिरझडा येथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले.            
                    
जैवविविधता आणि पर्यावरणाचे रक्षण या उद्देशाने जास्तीत जास्त प्राणवायू रिलीज करणाऱ्या झाडांची लागवड करण्यात आली.

 दिवसें दिवस निसर्ग त्याचे रौद्र रूप दाखवत आहे त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत चाललेला दिसून येत आहे . त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात वृक्षांची लागवड करायला पाहिजे असा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून याठिकाणी देण्याचा प्रयन्त आहे.
                    
यावेळी गावातील सरपंच. सौं. पपीता मून, उपसरपंच. मिथुन कुठे, पोलीस पाटील.विनोद आगलावे, आरोग्य सेविका त्याच प्रमाणे बीसीआय कार्यक्रमाचे क्षेत्र समन्वयक सागर शुक्ला उपस्थित होते.

भिंडेंच्या वादग्रस्त विधानांचे पडसाद मारेगावात

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे हे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे प्रमुख असून ते नेहमी वादग्रस्त वक्तव्य करून समाजात जातीय व धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करित असून सतत चर्चेत असतात. ते अमरावती येथिल एका कार्यक्रमाला उपस्थित राहून थोर महापुरुष यांचे वर अशोभीय भाषा वापरून अपमान केल्यामुळे सामाजिक भावना दुखावल्याने भिडे गुरुजी यांचे वर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करा अशी मागणी अखिल भारतीय माळी महासंघ, पहापळ च्या वतीने करण्यात आली आहे. 
मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे यांची अमरावती येथे दि.27 जुलै रोजी सभा बोलवली होती. भिडे हे आपल्या कार्यक्रमातून महापुरुषांचा अवमान सतत करत असतात यामुळे जातीय दंगल पेटविण्याचा प्रयत्न भिडे यांच्या विधानावरून दिसत असल्याने अखिल भारतीय माळी महासंघाकडून त्यांचा निषेध केला आहे.
मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांनी अमरावती येथील आपल्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व महात्मा जोतिबा फुले यांच्या वैयक्तिक चारित्र्यावर हल्ला केला, यामुळे माळी महासंघ आक्रमक झाली असून अखिल भारतीय माळी महासंघाच्या कार्यकर्त्यांनी मारेगाव येथे तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन देऊन त्यांचा जाहीर निषेध केला व भिडे यांचे वर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची तसेच त्यांच्या सभेवर बंदी घालण्यात यावी अशी सुद्धा मागणी माळी महासंघाच्या वतीने केली आहे.
प्रदेशाध्यक्ष राजेंद्र महाडुळे, व जिल्हाध्यक्ष राम भेंडाळे, यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र मांदाडे, अमोल गुरनुले, राजुभाऊ शेंडे,  राहुल भंडारे, मनोज शेंडे, राम भेंडारे, दिलीप सोनुले, राजुभाऊ रस्से, कार्तिक शेंडे, महेश बाट‌गुरे, विवेक बुजाडे, सचिन मोहितकर, अनंत मांडवकर, किशोरे गुरनुले, मनोहर मोहुर्ले, कैलास ठाकरे, दिगांबर आत्राम, रवि निखाडे, सुभाष आत्राम, नरेंद्र गुरुनुले, आकाशकांत भासले, गणेश सोनुले, नामदेव रस्से आदींची उपस्थिती होती.