सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : मोदी आडनाव बदनामी प्रकरणात शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना दिलासा देत सुरत जिल्हा न्यायालयाने कायम ठेवलेल्या शिक्षेला स्थगिती दिली. हे वृत्त समजताच यवतमाळ जिल्ह्यासह मारेगाव कॉंग्रेस काँग्रेस कमिटी च्या वतीने स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष साजरा केला. पुढेही सत्याचाच विजय होईल, असा विश्वासही काँग्रेस कमिटीच्या वतीने व्यक्त केला आहे.
मोदी आडनाव प्रकरणी मानहाणीच्या प्रकरणी काँग्रेसचे युवा नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने देताच. मारेगाव काँग्रेस कमिटीच्या आशा पल्लवीत झाल्या. सुप्रीम कोर्टाने मानहाणी केस मध्ये राहुल गांधी यांना दिलासा दिला. कोर्टाचे आदेश कळताच काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्या मध्ये देशभर जल्लोष सुरु झाला. मारेगाव येथेही आज रात्री जल्लोष साजरा करण्यात आला. काँग्रेस मध्ये उत्स्फूर्तपणे वातावरण येथील मार्डी चौकात दिसून आले, दरम्यान राहुल गांधी जिंदाबाद म्हणत "राहुल गांधी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं" तथा राहुल गांधी यांचा विजय असो, असे नारे देऊन विजय जल्लोष साजरा करण्यात आला.
या विजयी जल्लोष दरम्यान, तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांनी अखेर सत्याचा विजय झाला आणि पुढेही होईल असे मत व्यक्त केले. यावेळी सभापती गौरी शंकर खुराणा, माजी नगरसेवक महंम्मद खालिद, रंगनाथ स्वामी संचालक उदय रायपुरे, ता. यु. कॉ. अध्यक्ष आकाश बदकी, यु.कॉ.श. अध्यक्ष सय्यद समीर, अ.सेल अध्यक्ष शाहरुख शेख, एनएसयुआय अध्यक्ष समीर कुळमेथे, अनु.जाती ता.अध्यक्ष आकाश भेले, रवि पोटे, सतीश कल्लेवार, सागर लोणारे, कार्तिक पुनवटकर, अर्शद सय्यद, सागर मडावी, निलेश उईके, अविनाश मेश्राम, अंकुश माफूर, मो.शायान, नवाजीश कुरेशी, गोपाल चिडे, व गीतेश तामगाडगे यांचे सह मारेगाव तालुक्यातील काँग्रेस कमिटी चे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.