सह्याद्री चौफेर | रुस्तम शेख
कळंब : (BCI) उत्तम कापूस निर्मिती प्रकल्प व स्पेक्ट्रम कॉटफायबर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि तिरझडा गावाकऱ्यांच्या पुढाकाराने तालुक्यात तिरझडा येथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले.
जैवविविधता आणि पर्यावरणाचे रक्षण या उद्देशाने जास्तीत जास्त प्राणवायू रिलीज करणाऱ्या झाडांची लागवड करण्यात आली.
दिवसें दिवस निसर्ग त्याचे रौद्र रूप दाखवत आहे त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत चाललेला दिसून येत आहे . त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात वृक्षांची लागवड करायला पाहिजे असा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून याठिकाणी देण्याचा प्रयन्त आहे.
यावेळी गावातील सरपंच. सौं. पपीता मून, उपसरपंच. मिथुन कुठे, पोलीस पाटील.विनोद आगलावे, आरोग्य सेविका त्याच प्रमाणे बीसीआय कार्यक्रमाचे क्षेत्र समन्वयक सागर शुक्ला उपस्थित होते.