फैजल बशीर खान मित्रपरिवार यांनी जोपासली सामाजिक जाणीव

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : येथील सामाजिक व व्यावसायिक असलेल्या राजूर येथील फैजल बशीर खान मित्रपरिवार तर्फे चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार दिवंगत बाळू भाऊ धानोरकर यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांचे सुपुत्र मानस बाळू धानोरकर यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना बॅग व खाऊचे वाटप करण्यात आले.
फैजल बशीर यांनी आपल्या गावाप्रति आपली जाणीव करून दिली की,नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असता गरजवंत विद्यार्थ्यांना जन्मदिनाच्या निमित्ताने शालेय बॅग वाटप करण्यात आले.यावेळी प्रवीण काकडे, जी. प.सदस्य संघदिप भगत, राजूर ग्राम पंचायतच्या सरपंच सौ.विद्याताई पेरकावार, माजी सरपंच विद्यमान सदस्या प्रणिता मो.असलम, माजी सरपंच धनराज देवतळे,मो. असलम, प्रवीण खानझोडे, रुपेश ठाकरे उपसरपंच मुंगोली,निरे सर आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन महेश लिपटे सर, आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन फैजल खान यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतीश तेवर, सय्यद मोसिम आदी फैजल बशीर खान मित्रपरिवाराच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

गटशिक्षणाधिकारी यांचे वरील केलेले आरोप तथ्यहीन


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील 11 जि.प. शाळेत एकही शिक्षक नाही. शिक्षकांची कमतरता आहे,हा महत्वाचा चिंतन करण्याचा मुद्दा आणि गंभीर विषय आहे. यामुळे विद्यार्थ्यांने शैक्षणिक नुकसान होत आहे. असे असतांना शिक्षक संघटनेच्या वतीने येथील गटशिक्षणाधिकारी नरेंद्र कांडुरंवार यांचे विरोधात करण्यात येत असलेले आरोपामुळे शिक्षण विभाग वादाच्या भोवऱ्यात असून विविध संघटना गटशिक्षणाधिकारी यांच्या समर्थनार्थ निवेदन संबंधितांना सादर करित आहे.

मारेगाव येथील गटशिक्षणाधिकारी कांडुरंवार यांचे विरोधात करण्यात येत असलेले आरोप तथ्यहीन आहे. अशा आशयाचे निवेदन पहापळ येथील शाळा व्यवस्थापन समीतीच्या वतीने मारेगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना देण्यात आलेल्या खुलासा दर्शक निवेदनातून करण्यात आला आहे.

मारेगाव पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी कांडुरवार यांच्या कडील कारभार काढून घ्यावा,या प्रमुख मागणीसाठी काही शिक्षक संघटनेकडून आंदोलन करण्यात येत आहे. मात्र, त्यांच्या या मागणीच्या विरोधात स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने निवेदने देऊन त्यांच्या मागणीला विरोध दर्शवीत आहेत. गट शिक्षणाधिकारी यांचेवरील आरोप हे निरर्थक असून सर्वांप्रती सहकार्याची भूमिका बाळगणारे अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यामुळे प्रामाणिक काम करणाऱ्या अधिकाऱ्यावर अन्याय करण्यात येऊ नये, अशा प्रकारचे निवेदन पहापाळ शाळा व्यवस्थापन समितीने मारेगाव बिडीओ यांचे मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी व जि प शिक्षणाधिकारी यवतमाळ यांना देण्यात आले.

यावेळी निवेदकर्ते अमोल गुरनुले, भैय्याजी कनाके, संजय भुसारे, सोनाली भट, शीतल भोयर, राहुल भेंडाळे, दिपाली गुरनुले, मारोती आत्राम, विनोद आत्राम शाळा समिती अध्यक्ष व ग्राम.सदस्य आदींची उपस्थिती होती. 

आयटीआयसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया दिनांक 12 जून 2023 पासून सुरू करण्यात आलेली असून दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण इच्छुक विद्यार्थ्यांनी admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाऊन दिनांक 11 जुलै 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज सादर करावेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीची माहिती पुस्तिका ऑनलाईन स्वरूपात संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

अर्ज नोंदवून झाल्यावर उमेदवारांनी नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन आपला अर्ज निश्चित करावा व त्यानंतर विकल्प सादर करावे. प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्यांबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये समुपदेशन करण्यात येत आहे. यामध्ये उमेदवारांना विविध व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती देण्यात येते.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राज्यभरात एकूण 85 व्यवसाय उपलब्ध असून 154932 एवढ्या जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. येणाऱ्या कालावधीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये जादा मागणीचे तसेच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित 652 नवीन अभ्यासक्रमाच्या तुकड्या सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. जागतिक बँकेच्या सहकार्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. तसेच आयटीआय प्रवेशित उमेदवारांना प्रतिमाह देण्यात येणाऱ्या विद्यावेतनात वाढ करण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले आहे. विविध प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनाही लागू करण्यात आलेली आहे.

 दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नियमानुसार दहावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते तर दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नियमानुसार बारावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते. तरी दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआयतून व्यावसायिक शिक्षण पूर्ण करून त्वरित रोजगार, स्वयंरोजगार अथवा उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त होण्यासाठी आयटीआयमध्ये प्रवेश घ्यावे, असे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे.

विसंअ

रान डुकराच्या हल्ल्यात होतकरू मजूर ठार...


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीत येत असलेल्या वणी परीक्षेत्रातील जंगलात शेळ्या चराई करित असताना एका होतकरू शेतमजुरावर रानडुकराने हल्ला चढवून ठार केले. आज मंगळवारला दुपारी 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्दैवी घटनेने वणी उपविभागात एकच खळबळ उडाली असून शेतमजूर वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

नामदेव सोयाम (64) असे रानडुकराच्या हल्ल्यात जागीच ठार झालेल्या शेतमजुराचे नाव आहे. वणी परीक्षेत्रातील जंगलात कायर येथील नामदेव हा गावातील व स्वतःच्या शेळ्या चराई करायचा. आज तो नेहमी प्रमाणे कायर परिसरातील जंगलात बक-या चराई करण्यासाठी घेऊन गेला. दरम्यान, आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास झुडपात दडून बसलेल्या रानडुकराने अचानक नामदेव यांचे वर हल्ला चढवीला. या हल्ल्यात 64 वर्षीय नामदेव यांना धूम ठोकण्यासाठी कवडीचीही संधी मिळाली नसल्याने या वृद्ध शेतमजूराला रान डुकरांच्या हल्ल्यात नामदेवला आपला जीव गमवावा लागला आहे.

नामदेव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, स्नुषा व नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. या दुःखद घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. संबंधित विभागाने मृतकाच्या कुटुंबीयांना शासनाची मदत मिळावी अशी आर्तहाक मागणी नागरिकांतून होत आहे.

सोसाट्याचा वारा... वातावरणात "थंडा थंडा कुल कुल"


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : मागील आठ ते दहा दिवसापासून वरुण राजाने दडी मारली आहे. वातावरणात नाकी नऊ आणणारा कडक्याचा उकाडा. त्यामुळे अंगाची लाहिलाही होत असून, नेहमीप्रमाणे दुपार पर्यंत घामाने ओलं होऊन अंग न्हावून निघत असतांना अचानक आज वातावरणात बदल झाला. तीन च्या नंतर वातावरणात "थंडा थंडा कुल कुल" वाटायला लागले. या नैसर्गिक कुलिंग मुळे शेतकऱ्यांसह नागरिक पावसाची दाट शक्यता वर्तवू लागले.

ढगाळ वातावरण,मात्र सोसाट्याचा वारा, त्यात गारवा प्रत्येकाला भेदून जात होता. परंतु पाऊस मात्र आला नाही. असे वाऱ्याचे नाटक जवळपास अर्धा चालले. पाऊस आता येईल मग येईल म्हणत,गर्मीन तापलेलं अंग थंडगार झाले खरं... परंतु यामुळे लागलेली वरुण राजाची आस कोरडी ती कोरडीच राहिली.

रोहणी, मृग कोरडा गेला आणि आता आर्द्रा नक्षत्र लागले. मात्र, पाऊसाचा कुठेही थांग पत्ता लागत नसल्याने बेपत्ता असलेल्या पावसाने शेतकरी चिंतेत आला आहे. पेरणीचे गणित बिघडेल म्हणून शेतकऱ्यानी पावसाची वाट न बघता, तज्ञाला न जुमानता वावर सारे टिबून टाकले. दरम्यान,काही अंशी पाऊस हजेरी लावून गेला, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आणि धडाधड पेरणी करून सर्व मोकळे झाले. "तेल गेलं तूप गेलं हाती आले धुपारणे"येईल म्हणायची वेळ तर येईल नाही ना, परंतु आता मात्र, पावसाअभावी चटके किती सोसावे लागत आहे. हे मागील काही दिवसापासून बघत आहात.

मात्र, आज अचानक वातावरण बदलले, ढगाळ वातावरण, सोसाट्याचा वारा, सर्वत्र गारवा आहे. सायंकाळी तरी पाऊस पडेल असे अंदाज बांधले जात असतांना वाट शेतकरी शेतमजूर जोरदार पावसाची बघतो, हे विशेष...!!