विदर्भ अॅग्रो सोल्यूशन कंपनीकडून खोटे धनादेश देऊन शेतकऱ्यांची फसवणूक


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील बोडखा (मोकाशी) येथील शेतकऱ्याची वाळली हळद खरेदी करून खोटे धनादेश दिले व त्यांची आर्थिक फसवणूक केली त्यामुळे विदर्भ अॅग्रो सोल्यूशन कंपनीच्या संचालक प्रकाश लोखंडे वर फौजदारी गुन्हा करा व सर्व शेतकऱ्यांच्या हळद या मालाची उर्वरित रक्कम मिळवून देऊन शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या विदर्भ एग्रो सोल्यूशन कंपनीचे नोंदणी (लायसन्स) रद्द करा अशी मागणी पीडित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत केली आहे. 

बोडखा या गावांतील जवळपास ३५ शेतकऱ्यांच्या शेतात पिकणारी वाळलेली हळद दिनांक १२/०४/२०२२ ला योग्य भाव ठरवून व वजन करून वाळलेली हळद कंपनीने घेतली व अॅडव्हान्स म्हणुन प्रत्येकी पन्नास हजार आर. टी. जि. एस. व्दारे दिले. उर्वरीत रक्कमेचे धनादेश दिले मात्र, ते धनादेश शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४५ दिवसांनी लावले असता कंपनी संचालकांच्या बँक खात्यात कोणतीही रक्कम नसल्यामुळे दोनदा चेक बॉन्स झाले, दरम्यान विदर्भ अॅग्रो सोल्यूशन कंपनीच्या संचालक प्रकाश लोखंडे यांच्याकडे शेतकरी भेटीला गेले असता व वारंवार त्यांना विनंती केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे देऊन शेतकऱ्यांना कार्यालयातून हाकलून दिले.
कंपनी संचालकांना माहीत होते की, बँकेत चेक वटविल्या जाणार नाही. तरी सुद्धा जाणून बुजून व त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, दरम्यान एक वर्ष लोटून सुध्दा मालाची रक्कम मिळाली नसल्याने शेतकरी शेतीचे हंगामात शेतीची मशागत कशी करावी व शेतात पेरणी कशी करावी. हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. जर शेतात माल न पेरल्यास शेतकऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे, प्रसंगी ते टोकाची भूमिका घेऊ सुद्धा शकतात. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन आरोपी विदर्भ अॅग्रो सोल्यूशन कंपनीचे संचालक प्रकाश लोखंडे यांच्यावर फौजदारी कारवाई करून शेतकऱ्यांचे उर्वरित पैसे परत मिळवून द्यावे. अन्यथा शेतकऱ्यांनी सामूहिक आत्महत्या केल्यास शासन व पोलीस प्रशासन जबाबदार असेल असा इशारा जनआक्रोश संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. अमोल बावणे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, बोंडखा गावातील ग्रामपंचायत सदस्य प्रशांत मेश्राम यांच्यासह पिडीत शेतकरी विलास तुराळे, पुनेश्वर तुराळे, उत्तम तुराळे, प्रल्हाद मेश्राम, देविदास हुलके, किसना चिडे यांनी दिला आहे. 

प्रवीणभाऊ खानझोडे मित्र परिवाराचा उपक्रम


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

पंढरपूर वारी साठी निघालेल्या वारकरी यांचा आदरतिथ्य करून शुभेच्छा दिल्या


बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जीवभाव


वारी....संपुर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी एक अजब जादूगरी....प्रत्येकवर्षी न विसरता न चुकता आषाढीची वारी करून आपल्या लाडक्या पांडुरंगाचे दर्शन घेणे, त्याला डोळेभरून पाहणे ही सच्च्या वारक. याची ओळख! खांद्यावर भगवी पताका घेउन उन्हातान्हात, पाऊसपाण्यात कशाकशाची तमा न बाळगता विठुरायाचे ओठावर अखंड नामस्मरण करत वारकरी पंढरीच्या वाटेवर निघतात.

शेकडो कोस पायी वारी करून फक्त विठोबाचे डोळे भरून दर्शन घेणे हेच या वारीचं साध्यकरून आपलं जीवनसुकर करण्यासाठी पळसोनी, मुधोंनी, झोला परिसरातील सर्व पांढरपूर प्रेमी यांचा पुष्पहार घालून सर्वांचा स्वागत कारण्यात आले.

ह्यावेळी प्रवीण खानझोडे, विकेश पानघाटे, जीवेश भट पळसोनी प्रविण भाऊ चौधरी, रूकेश भट, योगराज बोधाणे, संतोष रिंगोले, बंडु रिंगोले, संजय नाईक, शंकर चलाख, दिनेश भट, तुकाराम चौधरी, ढोकेपाटील, अनंता चौधरी, बापूजी झट्टे, व भरपूर असा वारकरी मित्र परिवार उपस्थित होते.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३९ वा दीक्षान्त समारंभ

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

अमरावती : भारत हा तरुणांचा देश आहे. कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यासाठी जग भारताकडे आशेने पाहते. त्यामुळे देशाला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अंगीकार करतानाच, विद्यापीठाने आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यात उपजीविकाक्षम कौशल्य निर्माण करावे, असे प्रतिपादन कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३९ वा दीक्षान्त समारंभ राज्यपालांच्या हस्ते येथील पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप परिसरातील स्वामी विवेकानंद सभागृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते. दीक्षान्त समारंभात 249 संशोधकांना आचार्य पदवी, गुणवंतांना 119 सुवर्णपदके, 23 रौप्यपदके आणि 25 रोख पारितोषिके, तसेच 46 हजार 144 विद्यार्थ्यांना पदवी व 236 विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र. कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी विद्यापीठाकडून प्रक्रिया होत असल्याबाबत राज्यपाल श्री. बैस यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, येत्या काळातील विविध क्षेत्रांच्या गरजा ओळखून त्यानुरूप विद्यार्थ्यांत कौशल्य विकास घडविण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण उपयुक्त ठरेल. राष्ट्रीय आकांक्षेनुसार देशाला विकासाच्या शिखरावर नेणारी संशोधक व व्यावसायिकांची पिढी यातून घडेल. विद्यार्थ्यांनी केवळ ‘नोकरी शोधणारे’ न होता ‘नोकऱ्या निर्माण करणारे’ बनावे अशा उद्यमशीलतेचा विकास या धोरणातून होईल.

नैतिक मूल्यांचे वर्धन व संस्कृतीचे आकलन वाढविण्यासाठीही धोरण उपयुक्त आहे. धोरणाच्या अंमलबजावणीमुळे आधुनिक शिक्षणाच्या नव्या पर्वाचा आरंभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, संत गाडगेबाबा यांनी आयुष्यभर स्वच्छतेचा पुरस्कार केला. खऱ्या अर्थाने ते स्वच्छ भारत अभियानाचे जनक आहेत. त्यांच्या नावे स्थापित विद्यापीठाने राज्यात सर्वात स्वच्छ महाविद्यालये व स्वच्छ विद्यापीठाचे उदाहरण निर्माण करावे. संत गाडगेबाबा यांनी समाजाला अंत्योदयासाठी 'दशसूत्री' दिली. आम्हा सर्वांसाठी ती मार्गदर्शक आहे.

विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांचे ‘नॅक मूल्यांकन’ करून घ्यावे. शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी विद्यापीठाने योगदान द्यावे. किमान दहा गावे दत्तक घेऊन तिथे परिवर्तनासाठी प्रयत्न करावेत. या कामात विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे जेणेकरून त्यांच्यात वास्तव व सामाजिक परिस्थितीबद्दलची जाणीव विकसित होईल, असेही त्यांनी सांगितले.

विद्यापीठाकडून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची येत्या शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. येवले यांनी प्रास्ताविकात सांगितले.

समारंभापूर्वी शासकीय विश्रामगृह येथे राज्यपालांना पोलीसांतर्फे मानवंदना देण्यात आली. यावेळी
आमदार रवी राणा, आमदार प्रताप अडसड, विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडेय, जिल्हाधिकारी पवनीत कौर, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी , पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, सहायक जिल्हाधिकारी रिचर्ड यांथन आदींनी स्वागत केले.

रस्ता अपघात: अश्रू नयनांनी दिला चौघांना अखेरचा निरोप

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे शुक्रवारी दुपारी झालेल्या अपघातात मारेगाव शहरातील एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू झाला. शनिवारी एकाच वेळी चौघांचेही अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मारेगाव शहरात शोकाकुल वातावरण पाहायला मिळाले.

रफिक आणि युसूफ दोघेही सख्खे भाऊ होते आणि ते वेगवेगळ्या व्यवसायात होते. दोन्ही कुटुंबात एकता होती. नियतीने पत्नीसह दोन्ही भावांवर कहर केला. शुक्रवारी चंद्रपूरहून परतत असताना त्यांच्या बेलोरा गाडीला चिंचाळा गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात चारही जणांचा मृत्यू झाला. चौघांच्या मृत्यूची बातमी मारेगावात पसरताच शोककळा पसरली. शनिवारी एकाच वेळी चौघांची अंत्ययात्रा निघाली. यावेळी तालुक्यातील नातेवाईकांसह  मित्र परिवार, हजारो जनसमुदाय त्यांच्या अंत्य यात्रेत सहभागी झाले होते.
राजुरा हे एका कौटुंबिक कार्यक्रमाला गेले होते:
रफिक भाई यांचा ऑटोमोबाईलचा व्यवसाय होता. तर युसूफ भाई यांचा मुख्य व्यवसाय कोल्ड ड्रिंक एजन्सी व शेती होता. रफिक भाई यांचा मुलगा जावेद मुंबईत इंजिनिअर आहे. आणि मुलगी मुस्कान चंद्रपुरात एमबीए करत आहे. युसूफ भाई यांची मुलगी सानिया NEET ची तयारी करत आहे आणि दुसरी मुलगी तंनवूर बी फॉर्म करत आहे. कुटुंबातील चार प्रमुख कुटुंबीय एका कार्यक्रमासाठी गुरुवारी राजुरा येथे गेले होते. परतीच्या प्रवासात युसूफभाईंनी बल्लारपूरमध्ये काही काळ घालवला, युसूफभाईंच्या कुटुंबाची गाडी पडोली मार्गावरून जात असताना चिंचाळा गावाजवळ दुभाजकावर आदळली. ज्यात चौघांनाही आपला जीव गमवावा लागला. 

माझा शेतकरी राजा - समीक्षा देऊळकर

  
                        "माझा शेतकरी राजा"

माझ्या शेतात डुले हिरवे गार रान,
शेताला पाहून शेतकऱ्याची होईल उंच मान...

रात्र न दिवस काम करी कष्ट करी
देवा त्याला अन्न मिळूदे त्याच्या घरी...

करतो नांगरण पेरनं, जमिनीत टाकीन बी
येऊदे पीक भरा भर, देवा कडे प्रार्थना करतो मी..

हीच माझी धर्ती, हीच माझी आई
काळया जमिनी शिवाय कोणीच जगऊ शकत नाही...

सारखा बघतो आभाळाकडे, केव्हा पीक येईल वरती
जेव्हा पीक येईल वरती, हिरवी दिसेल धरती...

शेती साठी जगतो रात्रंदिवस,
पीक वरती यायला अजून लागेल किती दिवस...

दिसे झाड हिरवे हिरवे, तसे पान झुरवे झुरवे
इवल्या इवल्या देठाना पान कोवळे कोवळे...

कोवळ्या कोवळ्या पानांना आहे हिरवे देठ
माझ्या शेतकरी बापाचं भरूदे पोट...

झाड मोठ झालं की, देईल खूप पीक,
शेतकरी म्हणतो देवा मला मागाला लावू नको भिक...